2 उत्तरे
2 answers

भारतात मोबाइल केव्हा आला?

10
     मोबाईल आजच्या काळातील एक गरजेचं साधन बनला आहे. आपण आपलंच उदाहरण घेऊन बघू शकतो की आपण दिवसभरातील किती वेळ यावर व्यतित करत असतो. जागतिक क्रमावरीनुसार मोबाईल वापरणार्यांच्या संख्येमध्ये भारताचा चीन नंतर दुसरा नंबर लागतो. पण भारतात मोबाइलला कधी आला? याची सुरुवात कधी झाली?🤔

     भारतात मोबाइलला येऊन २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. १९९५ साली भारतात पहिला मोबाइल लाँच केला होता त्या मोबाइलच नाव होतं नोकिया रिंगो (Nokia Ringo). भारतातला पहिला मोबाइलवरून कॉल पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बासू आणि त्यावेळेचे केंद्रीय दूरध्वनी मंत्री सुख राम यांच्या मध्ये झाला होता. त्यावेळी modi telstra या जॉईंट venture group ला मोबाईल सेवा पुरवण्याचा काम देण्यात आले होते.

     आता जाणून घेऊया भारतातील पहिल्या मोबाइलची काही वैशिष्ट.





निर्माते ~ नोकिया

मॉडेल ~ रिंगो

लाँच डेट ~ १९९५

डायमेंशन ~ १५२ * ५५ * ३३ mm

वजन ~ २३५ ग्रॅम

मेमरी ~ ६० कॉन्टॅक्टस

डिस्प्ले ~ मोनोक्रोम lcd

      आजकालच्या स्मार्ट फोन धारकांना हे वैशिष्ट्ये एकदम साधारण वाटत असतील पण हे ही लक्षात घेतले पाहिजे की जर इथून सुरवात नसती झाली तर आजवरच्या प्रगती पर्यंत पोहचलो नसतो.
उत्तर लिहिले · 31/8/2020
कर्म · 7975
0

भारतात मोबाइल 31 जुलै 1995 रोजी आला.

पहिली मोबाइल कॉल कोलकाता शहरात झाली होती, जी तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्यात झाली.

भारतातील पहिली मोबाइल सेवा Modi Telstra नावाच्या कंपनीने सुरू केली होती.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2820