2 उत्तरे
2
answers
सोहळा म्हणजे काय ?
10
Answer link
सोहळा याच समानार्थी शब्द समारंभ होतो
आपल्या सर्वांच्याच घरात कधी कधी कोणत्या न कोणत्या प्रकारचा समारंभ आयोजित करण्याचा प्रसंग येतो. वाढदिवस, साखरपुडा, लग्न, लग्नाचा वाढदिवस, वास्तुशांती, उदघाटन असे कितीतरी समारंभ आपण साजरे करीत असतो. आपल्या आनंदात आपले नातेवाईक, हितचिंतक, मित्र-मैत्रिणी इ. सहभागी व्हावेत, अशी त्या मागील मुख्य भावना असते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनांत कित्येक वेळा जवळच्या नातेवाईकांची अथवा मित्रांची वर्षांनुवर्षे भेट होत नाही, या निमित्ताने ते भेटतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. नवीन ओळखी होतात, माणसं जवळ येतात, नाती अधिक घट्ट होतात.
पण अशा कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक वेळीच इतके सोपे नसते. कार्यक्रमासाठी सोयीस्कर दिवस, वेळ ठरविणे, आमंत्रिताची संख्या जास्त असेल तर त्यासाठी स्वतंत्र हॉल ठरविणे. हॉल म्हटला की, मग हॉलची सजावट, बसण्याची व्यवस्था, अल्पोपहार अथवा जेवणाची व्यवस्था, अशी एक की अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते. उत्सवमूर्तींच्या कपड्यांपासून, दागदागिन्यांपर्यंत अनेक वस्तूंची खरेदी होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे निमंत्रणे. कोणत्याही कार्यक्रमाचा हा सर्वात महत्वाचा भाग असतो. त्यातही निमंत्रणांची यादी तयार करणे, हे अत्यंत जिकीरीचे काम असते. बऱ्याच वेळा जुन्या काही कार्यक्रमांच्या यादीवरून नवीन यादी तयार केली जाते. आठवतील तशी परिचितांची, मित्रांची, नातेवाईकांची नावे त्यात लिहिली जातात. कितीही आठवणीत ठेवले तरी कधीकधी अगदी जवळची माणसे राहून जातात. काही वेळा निमंत्रणपत्रिका छापल्या जात नाहीत. छोट्या कार्यक्रमांची बहुदा तोंडीच आमंत्रणे दिली जातात.
आमंत्रणे करतानाही प्रत्येकाकडे प्रत्यक्ष जाऊन आमंत्रण देणे कधी कधी शक्य नसते. मग कधी फोनवरून आमंत्रणे केली जातात. तर कधी नातेसंबंधातील महत्वाची आमंत्रणे स्वतः प्रत्यक्ष भेटून केली जातात. दिवसभरात दहा-बारा ठिकाणी जाऊन आमंत्रणे द्यायची म्हटले तरी यजमानाची दमछाक होते. प्रत्येकाला आमंत्रण देताना कार्यक्रमाचा तपशील सारखाच सांगितला जाईल याचीही शाश्वती नसते.
यजमानाच्या दृष्टीने मुख्य कार्यक्रम महत्वाचा असतो. त्यामुळे कार्यक्रमाची वेळ, ठिकाण वगैरे गोष्टी सांगितल्या जातात, पण किती जणांचे आमंत्रण आहे? कार्यक्रमानंतर जेवण आहे की नुसताच अल्पोपहार आहे? अल्पोपहार असेल तर काय मेनू आहे? अल्पोपहारानंतर कॉफी की आईसक्रीम? असे तपशील कधी कधी सांगावयाचे राहून जातात. फोनवरून आमंत्रण देतानाही सर्वांना अगदी एकाच साच्यातील वाक्यात आमंत्रण दिले जाईल, असे होत नाही. निमंत्रण म्हणजे काही कॉन्ट्रॅक्ट नव्हे.
मग कार्यक्रमाच्या वेळी रूसवे, फुगवे सुरू होतात. "मी जवळचा नातेवाईक असून मला जेवायला सांगितले नाही". "किती जणांनी यायचे ते स्पष्ट सांगितले नाही, मग मुलांना घरी ठेऊन कसे यायचे". " जेवण देणार आहे हे आधी सांगितले असते तर आम्ही स्वयंपाक करून आलो नसतो "." माझ्या मिस्टरांना प्रत्यक्ष आमंत्रण दिले असते तर तेही आले असते ". " आम्ही आल्यावर ’या’ सुध्दा म्हटले नाही ". अशा एक की अनेक कारणांवरून यजमानाबद्द्लची नाराजी व्यक्त केली जाते. यात बहुतेक वेळा अत्यंत जवळची, नात्यातील प्रेमाचीच माणसे अधिक असतात. कधी कधी जुन्याच कुठल्यातरी गोष्टीचा राग या कार्यक्रमाच्या निमित्ताने उफाळून आलेला असतो.
यावेळी यजमानाच्या मनःस्थितीचा विचार केला जात नाही.
तो बिचारा दोन-तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात पूर्णपणे थकून गेलेला असतो. आयोजन कोठे ढासळू नये, कोठे काही उणेपणा राहू नये म्हणून त्याची लगबग, धावपळ सुरू असते. कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा, पाहुण्यांच्या सरबराईत कोणतीही उणीव राहू नये म्हणून तो प्रयत्नशील असतो. कोणालाही कार्यक्रमाला आमंत्रण देऊन, बोलावून त्यांचा अपमान करायाचा किंवा गैरसोय करायची असा त्याचा उद्देश मुळीच नसतो. सर्व आप्तांनी, मित्रमंडळींनी एकत्र येऊन काही थोडा वेळ एकमेकांच्या सहवासात आनंदात घालवावा, हीच यजमानाची इच्छा असते.
पण आमंत्रित मंडळी यजमानाची मानसिकता कधी कधी समजावून घेत नाहीत. आधीच तणावात असलेले यजमान आणखीच भांबावून जातात. कार्यक्रमाच्या मूळ उद्देशालाच सुरूंग लागलेला असतो. रूसवे-फुगवे काढण्यातच वेळा निघून जातो. काही समंजस मंडळी ’ कार्यक्रम छान झाला’ असा अभिप्राय देऊन जातात. यजमान थोडा सुखावतो.
एवढे सगळे होऊनही कार्यक्रम संपल्यावर यजमान आपल्याकडून नकळत झालेल्या चुकांची उजळणी करत, पुढच्या कार्यक्रमांत त्या कशा टाळता येतील, याचा विचार करण्यात गुंग होऊन जातो.
शेवटी मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे.
🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩
आपल्या सर्वांच्याच घरात कधी कधी कोणत्या न कोणत्या प्रकारचा समारंभ आयोजित करण्याचा प्रसंग येतो. वाढदिवस, साखरपुडा, लग्न, लग्नाचा वाढदिवस, वास्तुशांती, उदघाटन असे कितीतरी समारंभ आपण साजरे करीत असतो. आपल्या आनंदात आपले नातेवाईक, हितचिंतक, मित्र-मैत्रिणी इ. सहभागी व्हावेत, अशी त्या मागील मुख्य भावना असते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनांत कित्येक वेळा जवळच्या नातेवाईकांची अथवा मित्रांची वर्षांनुवर्षे भेट होत नाही, या निमित्ताने ते भेटतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. नवीन ओळखी होतात, माणसं जवळ येतात, नाती अधिक घट्ट होतात.
पण अशा कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक वेळीच इतके सोपे नसते. कार्यक्रमासाठी सोयीस्कर दिवस, वेळ ठरविणे, आमंत्रिताची संख्या जास्त असेल तर त्यासाठी स्वतंत्र हॉल ठरविणे. हॉल म्हटला की, मग हॉलची सजावट, बसण्याची व्यवस्था, अल्पोपहार अथवा जेवणाची व्यवस्था, अशी एक की अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते. उत्सवमूर्तींच्या कपड्यांपासून, दागदागिन्यांपर्यंत अनेक वस्तूंची खरेदी होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे निमंत्रणे. कोणत्याही कार्यक्रमाचा हा सर्वात महत्वाचा भाग असतो. त्यातही निमंत्रणांची यादी तयार करणे, हे अत्यंत जिकीरीचे काम असते. बऱ्याच वेळा जुन्या काही कार्यक्रमांच्या यादीवरून नवीन यादी तयार केली जाते. आठवतील तशी परिचितांची, मित्रांची, नातेवाईकांची नावे त्यात लिहिली जातात. कितीही आठवणीत ठेवले तरी कधीकधी अगदी जवळची माणसे राहून जातात. काही वेळा निमंत्रणपत्रिका छापल्या जात नाहीत. छोट्या कार्यक्रमांची बहुदा तोंडीच आमंत्रणे दिली जातात.
आमंत्रणे करतानाही प्रत्येकाकडे प्रत्यक्ष जाऊन आमंत्रण देणे कधी कधी शक्य नसते. मग कधी फोनवरून आमंत्रणे केली जातात. तर कधी नातेसंबंधातील महत्वाची आमंत्रणे स्वतः प्रत्यक्ष भेटून केली जातात. दिवसभरात दहा-बारा ठिकाणी जाऊन आमंत्रणे द्यायची म्हटले तरी यजमानाची दमछाक होते. प्रत्येकाला आमंत्रण देताना कार्यक्रमाचा तपशील सारखाच सांगितला जाईल याचीही शाश्वती नसते.
यजमानाच्या दृष्टीने मुख्य कार्यक्रम महत्वाचा असतो. त्यामुळे कार्यक्रमाची वेळ, ठिकाण वगैरे गोष्टी सांगितल्या जातात, पण किती जणांचे आमंत्रण आहे? कार्यक्रमानंतर जेवण आहे की नुसताच अल्पोपहार आहे? अल्पोपहार असेल तर काय मेनू आहे? अल्पोपहारानंतर कॉफी की आईसक्रीम? असे तपशील कधी कधी सांगावयाचे राहून जातात. फोनवरून आमंत्रण देतानाही सर्वांना अगदी एकाच साच्यातील वाक्यात आमंत्रण दिले जाईल, असे होत नाही. निमंत्रण म्हणजे काही कॉन्ट्रॅक्ट नव्हे.
मग कार्यक्रमाच्या वेळी रूसवे, फुगवे सुरू होतात. "मी जवळचा नातेवाईक असून मला जेवायला सांगितले नाही". "किती जणांनी यायचे ते स्पष्ट सांगितले नाही, मग मुलांना घरी ठेऊन कसे यायचे". " जेवण देणार आहे हे आधी सांगितले असते तर आम्ही स्वयंपाक करून आलो नसतो "." माझ्या मिस्टरांना प्रत्यक्ष आमंत्रण दिले असते तर तेही आले असते ". " आम्ही आल्यावर ’या’ सुध्दा म्हटले नाही ". अशा एक की अनेक कारणांवरून यजमानाबद्द्लची नाराजी व्यक्त केली जाते. यात बहुतेक वेळा अत्यंत जवळची, नात्यातील प्रेमाचीच माणसे अधिक असतात. कधी कधी जुन्याच कुठल्यातरी गोष्टीचा राग या कार्यक्रमाच्या निमित्ताने उफाळून आलेला असतो.
यावेळी यजमानाच्या मनःस्थितीचा विचार केला जात नाही.
तो बिचारा दोन-तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात पूर्णपणे थकून गेलेला असतो. आयोजन कोठे ढासळू नये, कोठे काही उणेपणा राहू नये म्हणून त्याची लगबग, धावपळ सुरू असते. कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा, पाहुण्यांच्या सरबराईत कोणतीही उणीव राहू नये म्हणून तो प्रयत्नशील असतो. कोणालाही कार्यक्रमाला आमंत्रण देऊन, बोलावून त्यांचा अपमान करायाचा किंवा गैरसोय करायची असा त्याचा उद्देश मुळीच नसतो. सर्व आप्तांनी, मित्रमंडळींनी एकत्र येऊन काही थोडा वेळ एकमेकांच्या सहवासात आनंदात घालवावा, हीच यजमानाची इच्छा असते.
पण आमंत्रित मंडळी यजमानाची मानसिकता कधी कधी समजावून घेत नाहीत. आधीच तणावात असलेले यजमान आणखीच भांबावून जातात. कार्यक्रमाच्या मूळ उद्देशालाच सुरूंग लागलेला असतो. रूसवे-फुगवे काढण्यातच वेळा निघून जातो. काही समंजस मंडळी ’ कार्यक्रम छान झाला’ असा अभिप्राय देऊन जातात. यजमान थोडा सुखावतो.
एवढे सगळे होऊनही कार्यक्रम संपल्यावर यजमान आपल्याकडून नकळत झालेल्या चुकांची उजळणी करत, पुढच्या कार्यक्रमांत त्या कशा टाळता येतील, याचा विचार करण्यात गुंग होऊन जातो.
शेवटी मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे.
🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩
0
Answer link
सोहळा म्हणजे एक विशेष कार्यक्रम किंवा समारंभाचे आयोजन. हा कार्यक्रम आनंद, उत्सव, किंवा महत्त्वपूर्ण घटना साजरा करण्यासाठी आयोजित केला जातो.
सोहळ्याचे काही प्रकार:
- लग्न सोहळा: दोन व्यक्तींच्या जीवनातील एक महत्त्वाचा आणि आनंदी सोहळा.
- सण-उत्सव: दिवाळी, दसरा, गणेशोत्सव यांसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे पालन.
- पुरस्कार सोहळा: विशिष्ट क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी आयोजन.
- सांस्कृतिक कार्यक्रम: संगीत, नृत्य, नाटक यांसारख्या कलांचे प्रदर्शन.
सोहळा कोणताही असो, तो एक सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा भाग असतो. यात लोक एकत्र येतात, आनंद वाटून घेतात आणि संबंध दृढ करतात.