3 उत्तरे
3 answers

स्वराज्य म्हणजे काय?

3
स्वराज्य म्हणजे काय?
तर, स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य.
उत्तर लिहिले · 11/7/2020
कर्म · 13290
1
जहागी-या जशा वडिलोपार्जित वारशाने वा कोणाच्या कृपेने मिळतात, तसे स्वराज्य वडिलोपार्जित वारशाने मिळत नसते. स्वराज्य म्हणजे स्वत: संपादन केलेलं राज्य, बापजाद्यांचं राज्य नव्हे! ते निर्माण करावं लागतं. महाराज स्वराज्यनिर्माते होते. मध्ययुगीन भारतातील एकमेव स्वराज्य निर्माते!

स्वराज्याची संकल्पना जिजाऊ मांसाहेब आणि शहाजी राजांनी बाल शिवरायांच्या मनात रुजवली होती. ते स्वप्न त्यांनी आपल्या सवंगड्यांच्या आणि रयतेच्या डोळ्यात पेरले. रयतेच्या डोळ्यात ते उगवलं होतं. कारण ते स्वकल्याणाचं नव्हे तर समस्त रयतेच्या कल्याणाचं स्वप्न होतं. रयतेने त्यासाठी तनमनधन अर्पण केलं. म्हणून ते साकार झालं. शिवराय राजे झाले अनं प्रत्येक मावळ्याला, कुणब्याला, बलुतेदाराला, शूद्रातिशूद्राला आणि मुसलमानालाही आपणच राजे झालो, असा अत्यानंद झाला. समस्त रयतेला असा आणि इतका आनंद इतिहासात कधीही झाला नव्हता.

            
 

            

            
उत्तर लिहिले · 13/5/2020
कर्म · 55350
0

स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. 'स्व' म्हणजे स्वतः आणि 'राज्य' म्हणजे शासन. स्वराज्य म्हणजे स्वतःच्या लोकांचे, स्वतःच्या हिताचे राज्य.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा ध्यास घेतला. त्यावेळीExisting political systems मुघलांचे राज्य होते आणि तेथील शासक जनतेवर अन्याय करत होते. त्यामुळे, शिवाजी महाराजांनी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि स्वतःचे राज्य स्थापन करण्यासाठी संघर्ष केला.

स्वराज्यात,

  • न्याय : प्रजेला न्याय मिळतो.
  • सुरक्षितता : लोकांच्या जीविताची आणि मालमत्तेची सुरक्षा असते.
  • समृद्धी : राज्याची आर्थिक व्यवस्था सुधारते.
  • स्वतंत्रता : लोकांना आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य असते.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5120

Related Questions

लोकशाही विकेंद्रीकरणावर टिपा लिहा.
लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय?
लोकशाही विकेंद्रीकरणात माध्यमांचे योगदान स्पष्ट करा.?
साम्यवाद आणि कम्युनिझमचा प्रचार मार्क्सवाद?
भारतीय निवडणूक आयोगाची कार्ये काय आहेत?
भारतीय निवडणूक आयोगाची कार्ये कोणती आहेत?
2004 च्या राजकीय निवडणुकीचे विश्लेषण करा?