अफवा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

"काका मला वाचवा" अशी हाक शनिवार वाड्यातून येते ते खरे काय?

2 उत्तरे
2 answers

"काका मला वाचवा" अशी हाक शनिवार वाड्यातून येते ते खरे काय?

2

. दर अमावस्येला का घुमतो शनिवारवाड्यात आवाज..."काका, मला वाचवा". ⭕

*मराठा साम्राज्याला यशोशिखरावरनेणारे पेशवा बाजीराव यांनी १७४६ मध्ये एका महलाचे निर्माण केले जो आज शनिवारवाडा म्हणून ओळखला जातो. हा वाडा पुण्यात आजही आहे. सन १८१८ पर्यंत हा वाडापेशव्यांच्या अधिकारक्षेत्रात राहीला त्यानंतर या महलाचा मोठाहिस्सा आगीत होरपळला गेला.*
या वाड्याचे अनेक असे रहस्य आहेत जे आजही अनुत्तरीत आहेत.ही आग कशी लागली हेसुद्धा आजपर्यंत न उलगडलेले कोडे आहेत. पण इतकेच नाही तरयेथील स्थानिक लोकांच्या मते या महलात दर अमावस्येला एक आर्त हाक ऐकू येते जी म्हणते "काका, मला वाचवा".हा आवाज त्या व्यक्तिचा आहे ज्याची या महलात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर त्याचे प्रेत नदीत सोडून देण्यात आले होते.            

असे म्हणतात की, पेशवा बाजीराव यांच्या मृत्यूनंतर शनिवारवाड्यात राजनैतिक अव्यवस्थेचे वातावरण होते. यामुळेच डावपेच आणि सत्तेची लालसा यामुळे १८ व्या वर्षीच नारायणराव यांची हत्या शनिवारवाड्यात करण्यात आली. असे म्हणतात की, नारायणराव आजही त्यांचे काका राघोबा यांना मदतीसाठी बोलवितांना आवाज देतात "काका, मला वाचवा".पण, नारायणराव यांच्या हत्येमागे कायकारण आहे त्याचीसुद्धा एक दुःखद गोष्ट आहे.नारायणराव नानासाहेब पेशवा यांचे सर्वात लहान पुत्र होते. त्यांच्या दोन भावांच्या मृत्यूनंतर त्यांना पेशवा बनविण्यात आले होते. नारायणरावपेशवा तर बनले पण कमी वय असल्यामुळे त्यांना रघुनाथराव म्हणजेच राघोबा यांना त्यांचा संरक्षक बनविण्यात आले आणि शासन संचालकांचा कारभारही राघोबा यांच्याच हातात होता.माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,पण या व्यवस्थेमुळे राघोबा आणि त्यांची पत्नी आनंदीबाई फारसे खूश नव्हते. त्यांना सत्तेवर पूर्ण अधिकार हवा होता.राघोबांच्या या मनसुब्याची भनक नारायणराव यांना लागली होती यामुळेच या दोन्ही पक्षात खूप वाद होण्यास सुरुवात झाली. यादरम्यान रघुनाथराव यांनी सुमेर सिंह गर्दी जे भिल्लांचेसरदार होते त्यांना नारायणराव यांना ताब्यात घेण्याचा हुकुम दिला. पण या पत्राला आनंदीबाईने बदलले आणि नारायणराव यांना मारण्याचा आदेश दिला. सुमेर सिंग आणि नारायणराव यांचे संबंध चांगले नव्हते, त्यामुळेसुमेर सिंहने नारायण राववर हल्ला केला.नारायणराव काका मला वाचवा असे ओरडत शनिवारवाड्यात पळत होते आणि ते त्यांचे अखेरचे शब्द ठरले. सुमेर सिंहने त्यांच्यावर तलवारीने वार करत नारायणरावचे प्राण घेतले.असे म्हणतात की, आजही नारायणरावांची आत्मा शनिवारवाड्यात आहे आणि मदतीसाठी हाक देत आहे.

0
शनिवार वाड्यातून "काका मला वाचवा" अशी हाक येते, याबद्दल अनेक कथा आणि आख्यायिका प्रचलित आहेत.
  • आख्यायिका: असे मानले जाते की ही हाक नारायणराव पेशवे यांची आहे, ज्यांची १७७५ मध्ये शनिवार वाड्यात हत्या करण्यात आली होती.
  • ऐतिहासिक तथ्य: इतिहासानुसार, १७७५ मध्ये नारायणराव पेशवे यांच्या हत्येचा कट रचला गेला आणि त्यांना मारण्यात आले. त्यामुळे काही लोकांचा असा विश्वास आहे की त्यांची आत्मा अजूनही वाड्यात भटकते आणि मदतीसाठी किंचाळते.
  • सत्यता: या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही, कारण हा केवळ एक समज आहे.ghostly noises at shaniwar wada - Google Search<>
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440

Related Questions

नोव्हेंबर 2021 मध्ये 15 दिवस पृथ्वीवर अंधार असणार ही पेपरमध्ये बातमी आली आहे, हे खरं आहे का?
सोशल मीडियावर अमीरखानचा दहशतवाद्यांबरोबरचा फोटो व्हायरल होत आहे, ते खरे आहे का?
पाकिस्तानला शाहरुखने खरंच ४५ कोटींची मदत दिली होती?
सर, व्हॉट्सॲपवर आज एक व्हायरल झाले आहे की भारत-चीन युद्ध चालू झाले आहे आणि भारताचे १५३ सैनिक मारले गेले आहेत. हा मेसेज खरा आहे का?