Topic icon

अफवा

0
मला माफ करा, मला ह्याबद्दल कोणतीही माहिती नाही. मी तुम्हाला ह्याबद्दल माहिती देऊ शकत नाही.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1660
0
      *️⃣ व्हायरल सत्य *️⃣

▶️  आमीर खानचा दहशतवाद्यांसोबत फोटो नाही, चुकीचा दावा व्हायरल  ◀️
▶️ सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज चुकीचा ◀️
https://bit.ly/3iaHjGY
बाॅलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता आमीर खानचा दहशतवाद्यांसोबत फोटो असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
https://bit.ly/3iaHjGY
यात म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आमीर खानने ट्विट देखील केले नाही. त्याचा एक फोटो देखील व्हायरल झाला आहे ज्यात तो दहशतवादी तारिक जमील आणि जुनैद शमशेद यांची भेट घेत आहे. याशिवाय 15 आॅगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत टर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची मुलाखत घेतली.
▶️ Fact Check / Verification ◀️
आमीर खानने दहशतवाद्यांची खरंच भेट घेतली होती का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला एक ट्विट आढळून आले. ज्यात आमीर खानचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत यात दुसरा फोटो पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीसोबत तर पहिला फोटोत दोन व्यक्ती दिसत आहेत. या दोन व्यक्ती दहशतवादी तारिक जमील आणि जुनैद शमशेद असल्याचे म्हटले आहे.या भारतविरोधी लोकांची भेट आमीर खान घेत असल्याचे म्हटले आहे.
फेसबुकवर देखील हा दावा व्हायरल झाला असल्याचे आढळून आले.
आम्ही आमीर खानचा व्हायरल फोटो नेमका कधीचा आणि कुणासोबतचा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स इमेजचा आणि यांडेक्सचा आधार घेतला असता जुनैद जमशेदच्या आॅफिशियल ट्विटर अकाउंटवर व्हायरल फोटो 14 मार्च 2013 रोजी शेअर केल्याचे आढळून आले. जुनैद हे पाकिस्तानी गायक होते त्यांचे 2016 मध्ये विमान अपघातात निधन झाले. जमसेद यांचे नाव व्हायरल ट्विटमध्ये समशेद असे लिहिले आहे. शिवाय आमीर त्यांच्या सोबत असणारी दुसरी व्यक्ती मौलाना तारीक जमील हे असल्याचे म्हटले आहे. ते पाकिस्तानातील धर्म उपदेशक असून इस्लामिक स्काॅलर आहेत. शिवाय अनेक देशांत प्रसिद्ध आहेत.
आम्हाला या दोघांचे दहतवादी कनेक्शन असल्याचे एकही मीडिया रिपोर्ट आढळून आले नाही.
https://bit.ly/3iaHjGY
आमीर खानचा शाहीद आफ्रिदीबरोबरचा फोटो 2012 मधील मक्का यात्रेदरम्यानचा आहे. याबाबत एनडीटीव्ही ने देखील वृत्त दिले होते.
*Conclusion*
यावरुन हेच स्पष्ट होते की, आमीर खानचे जुने फोटो आत्ताचे म्हणून चुकीच्या दाव्याने व्हायरल करण्यात आले आहेत. शिवाय फोटोती व्यक्ती या दहशतवादी नसून गायक व धर्म उपदेशक आहेत.

Result- Misleading
Sources
एनडीटीव्ही- https://sports.ndtv.com/world-cup-2011/shahid-afridi-meets-aamir-khan-in-mecca-while-on-hajj-1546228

इकाॅनाॅमिक टाईम्स- https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/singer-turned-preacher-junaid-jamshed-feared-dead-in-pak-crash/articleshow/55857629.cms

सौजन्य checkthis@newschecker.in
_________________________

2

. दर अमावस्येला का घुमतो शनिवारवाड्यात आवाज..."काका, मला वाचवा". ⭕

*मराठा साम्राज्याला यशोशिखरावरनेणारे पेशवा बाजीराव यांनी १७४६ मध्ये एका महलाचे निर्माण केले जो आज शनिवारवाडा म्हणून ओळखला जातो. हा वाडा पुण्यात आजही आहे. सन १८१८ पर्यंत हा वाडापेशव्यांच्या अधिकारक्षेत्रात राहीला त्यानंतर या महलाचा मोठाहिस्सा आगीत होरपळला गेला.*
या वाड्याचे अनेक असे रहस्य आहेत जे आजही अनुत्तरीत आहेत.ही आग कशी लागली हेसुद्धा आजपर्यंत न उलगडलेले कोडे आहेत. पण इतकेच नाही तरयेथील स्थानिक लोकांच्या मते या महलात दर अमावस्येला एक आर्त हाक ऐकू येते जी म्हणते "काका, मला वाचवा".हा आवाज त्या व्यक्तिचा आहे ज्याची या महलात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर त्याचे प्रेत नदीत सोडून देण्यात आले होते.            

असे म्हणतात की, पेशवा बाजीराव यांच्या मृत्यूनंतर शनिवारवाड्यात राजनैतिक अव्यवस्थेचे वातावरण होते. यामुळेच डावपेच आणि सत्तेची लालसा यामुळे १८ व्या वर्षीच नारायणराव यांची हत्या शनिवारवाड्यात करण्यात आली. असे म्हणतात की, नारायणराव आजही त्यांचे काका राघोबा यांना मदतीसाठी बोलवितांना आवाज देतात "काका, मला वाचवा".पण, नारायणराव यांच्या हत्येमागे कायकारण आहे त्याचीसुद्धा एक दुःखद गोष्ट आहे.नारायणराव नानासाहेब पेशवा यांचे सर्वात लहान पुत्र होते. त्यांच्या दोन भावांच्या मृत्यूनंतर त्यांना पेशवा बनविण्यात आले होते. नारायणरावपेशवा तर बनले पण कमी वय असल्यामुळे त्यांना रघुनाथराव म्हणजेच राघोबा यांना त्यांचा संरक्षक बनविण्यात आले आणि शासन संचालकांचा कारभारही राघोबा यांच्याच हातात होता.माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,पण या व्यवस्थेमुळे राघोबा आणि त्यांची पत्नी आनंदीबाई फारसे खूश नव्हते. त्यांना सत्तेवर पूर्ण अधिकार हवा होता.राघोबांच्या या मनसुब्याची भनक नारायणराव यांना लागली होती यामुळेच या दोन्ही पक्षात खूप वाद होण्यास सुरुवात झाली. यादरम्यान रघुनाथराव यांनी सुमेर सिंह गर्दी जे भिल्लांचेसरदार होते त्यांना नारायणराव यांना ताब्यात घेण्याचा हुकुम दिला. पण या पत्राला आनंदीबाईने बदलले आणि नारायणराव यांना मारण्याचा आदेश दिला. सुमेर सिंग आणि नारायणराव यांचे संबंध चांगले नव्हते, त्यामुळेसुमेर सिंहने नारायण राववर हल्ला केला.नारायणराव काका मला वाचवा असे ओरडत शनिवारवाड्यात पळत होते आणि ते त्यांचे अखेरचे शब्द ठरले. सुमेर सिंहने त्यांच्यावर तलवारीने वार करत नारायणरावचे प्राण घेतले.असे म्हणतात की, आजही नारायणरावांची आत्मा शनिवारवाड्यात आहे आणि मदतीसाठी हाक देत आहे.

5
नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बॉलिवूड सिने-तारकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शहिदांच्या मदतीसाठी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान आणि कैलाश खेर पुढे सरसावले आहेत. या अभिनेत्यांनी कोट्यवधींचं दान केलं आहे. परंतु याचदरम्यान शाहरुख खानसंदर्भातही काही पोस्ट व्हायरल होत आहेत. शाहरुख खाननं जवानांना अद्यापही मदत न केल्यानं त्यांच्यावर टीकाही केली जातेय. शाहरुख खाननं पाकिस्तानमधल्या गॅस दुर्घटनेतील लोकांना 45 कोटींची मदत केली होती. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. परंतु ही न्यूज फेक आहे. शाहरुख खानची बदनामी करण्यासाठी अशा प्रकारच्या न्यूज पेरल्या जात असल्याचं आता समोर आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या बचावासाठी पुढे आले आहेत.

शाहरुखच्या चाहत्यांनी त्यासाठी StopFakeNewsAgainstSRK नावाचं हॅशटॅग बनवलं असून, त्यात शाहरुखसंदर्भात पसरवण्यात येणाऱ्या खोट्या वृत्ताचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ट्विटमध्ये एक चाहता लिहितो, शाहरुख जेव्हा काही दान करतो तेव्हा ते गुप्तरीत्या करत असतो.




विशेष म्हणजे यासाठी शाहिद, सिटीलाइट्स सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक हन्सल मेहताही शाहरुखला पाठिंबा दिला आहे. तसेच शाहरुखसंदर्भात चुकीच्या बातम्या पसरवू नये, अशी विनंती केली आहे.


शहिदांना मदत न दिल्यानं शाहरुखच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. गेल्या वर्षी शाहरुखसंदर्भात हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर शाहरुखला टीकाही सहन करावी लागली होती.
पण अशावेळी शाहरुखचे चाहते त्याच्या मदतीला आले आणि बघता बघता, ‘स्टॉप फेक न्यूज अगेन्स्ड एसआरके’ नावाचा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. शाहरुखच्या चाहत्यांनी अनेक ट्वीट करत, हा व्हिडिओ फेक असल्याचे सांगितले. तत्पूर्वी शाहरुखच्या टीमनेही या व्हिडिओत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
उत्तर लिहिले · 20/2/2019
कर्म · 11990
8
अफवा आहे ती. सर्वात आधी तर न्यूज मध्ये दाखवतात. पण लवकरच युद्ध सुरु होण्याचे संकेत दिसत आहेत.
उत्तर लिहिले · 11/8/2017
कर्म · 7045