2 उत्तरे
2
answers
अंघोळ करण्याचे फायदे कोणते?
4
Answer link

आपण फक्त उन्हाळ्यात गार पाण्याने अंघोळ करतो. परंतु जर आपण नियमित गार पाण्याने अंघोळ केली तर अनेक फायदे होऊ शकतात. दिवसभर ताजेतवाने राहयचे असेल तर दिवसाची सुरुवात गार पाण्याने अंघोळ करुन करावी. गार पाण्याने अंघोळ केल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहता. याव्यतिरिक्त शारीरिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी गार पाण्याची अंघोळ फादेशीर असते. तुम्हाला हे वाचुन आश्चर्य वाटेल की, गरम पाण्याने अंघोळ केल्याने रक्तप्रवाह सुरुवातिला उत्तेजित होतो परंतु नंतर मंद पडते. या उलट गार पाण्याने अंघोळ केल्यावर रक्तप्रवाह सुरुवातीला मंद असतो आणि नंतर उत्तेजित होतो जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. येवढेच नाही तर गार पाण्याने स्नान केल्याने आळस, थकवा आणि वेदना नष्ट होतात, झोप चांगली लागते. हे प्रत्येक प्रकारची जळजळ आणि खाज दूर करते. यामुळे त्वचा उजळते आणि रक्त स्वच्छ होते. चला तर मग पहुया गार पाण्याने अंघोळ करण्याचे कोणते फायदे आहेत...
1. गार पाण्याने अंघोळ केल्याने फॅट बर्न होतात
आपल्या शरीरात दोन प्रकारचे फॅट असतात. एक म्हणजे व्हाइट फॅट जो आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. दूसरा म्हणजे ब्राऊन फॅट जो आपल्या शरीरासाठी चांगला असतो. व्हाइट फॅट म्हणजे असा फॅट जो आपण भोजनात खातो. हा फॅट आपली कंबर, पाठ आणि खालच्या भागातील फॅट वाढवतो. जो दूर करण्यासाठी आपल्याला खुप मेहनत करावी लागते. तर ब्राऊन फॅट आपल्या शरीरासाठी चांगला असतो. हे आपल्या शरीराला गरम ठेवते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा गार पाण्याने अंघोळ करतो तेव्हा आपल्या कॅलरी बर्न होतात.
0
Answer link
अंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
- स्वच्छता: अंघोळ केल्याने आपल्या शरीरावरील धूळ, घाण आणि घाम निघून जातो आणि आपण स्वच्छ राहतो.
- त्वचेसाठी फायदेशीर: अंघोळ केल्याने त्वचेवरील मृत पेशी (dead cells) निघून जातात, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी आणि चमकदार दिसते.
- रक्त परिसंचरण सुधारते: थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्तवाहिन्या (blood vessels) आकुंचन पावतात आणि गरम पाण्याने त्या रुंदावतात, ज्यामुळे रक्त परिसंचरण सुधारते.
- रोगप्रतिकारशक्ती वाढते: नियमित अंघोळ केल्याने शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी (white blood cells) वाढतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
- तणाव कमी होतो: अंघोळ केल्याने ताण कमी होतो आणि मन शांत होते.
- नैसर्गिक तेल उत्पादन: अंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल उत्पादन सुधारते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.
- शरीराची दुर्गंधी कमी होते: घामामुळे येणारी शरीराची दुर्गंधी अंघोळ केल्याने कमी होते.
टीप: अंघोळ करताना पाण्याचे तापमान आणि साबणाचा वापर आपल्या त्वचेनुसार असावा.