Topic icon

वैयक्तिक स्वच्छता

0

मी तुमच्या प्रश्नाची नोंद घेतली आहे, परंतु मला नक्की कशाबद्दल मदत करायची आहे, हे स्पष्ट होत नाही आहे. अधिक उपयुक्त प्रतिसाद देण्यासाठी, कृपया तुमचा उद्देश अधिक स्पष्ट करा.


उदाहरणार्थ, तुम्ही खालीलपैकी काहीतरी विचारत असाल:

  • नवरा आजारी असल्यास त्याला कसे न्हाऊ घालावे?
  • नवऱ्याला आरामदायक स्नान कसे द्यावे?
  • नवऱ्याला न्हाऊ घालण्याची योग्य पद्धत काय आहे?

तुम्ही तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट केल्यास, मी तुम्हाला अधिक चांगली मदत करू शकेन.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440
3

 अंघोळ करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, शरीराला होतील अनेक फायदे!
    
दररोज आंघोळ केल्याने आपले शरीर शुद्ध होतेच, परंतु यामुळे आपल्याला त्वचेला तजेलाही मिळतो.

अंघोळ करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, शरीराला होतील अनेक फायदे!
अंघोळ करण्याची ही आहे योग्य वेळ, अनेक रोग दूर राहतील!
 
मुंबई : नियमित आंघोळ करणे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. दररोज आंघोळ केल्याने आपले शरीर शुद्ध होतेच, परंतु यामुळे आपल्याला त्वचेला तजेलाही मिळतो. परंतु, आंघोळ करताना पाण्यात काही गोष्टी मिसळल्या, तर त्या तुमच्या त्वचेला चांगला फायदा देतात आणि तुमची थकवाही कमी करतात. चला तर जाणून घेऊया पाण्याबरोबर कोणत्या गोष्टी मिसळून आंघोळ केल्याने तुम्हाला अधिक स्फूर्ति मिळेल आणि तुमचा दिवस उत्तम बनेल! (Bathing Tips for healthy skin and body)

गुलाब पाणी
आंघोळीच्या पाण्यात गुलाबाचे पाणी मिसळल्याने शरीर ताजेतवाने होते. त्याचबरोबर गुलाब पाणी आपल्या शरीरातून घामाचा दुर्गंध देखील दूर करते. जर, तुम्हाला चमकदार आणि नितळ त्वचा हवी असेल, तर अंघोळीच्या पाण्यात गुलाबाचे पाणी घालणे खूप फायदेशीर ठरेल.


बेकिंग सोडा
आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडाचा वापर केल्याने शरीरातील टॉक्सिक घटक दूर होण्यास मदत होते. आंघोळीच्या पाण्यात चार चमचे बेकिंग सोडा टाकून स्नान करावे. यामुळे आपला थकवा देखील दूर होईल (Bathing Tips for healthy skin and body).

कडुलिंबाची पाने
पाण्यात कडूलिंबाची पाने मिसळून आंघोळ केली, तर तुम्हाला तजेला येईल. हे पाणी थकवा दूर करण्याबरोबरच आपल्या त्वचेसंदर्भातील समस्या दूर करण्यात देखील हे प्रभावी आहे. म्हणून, आंघोळ करताना किमान 8 ते 10 पाने पाण्यात उकळा आणि हे पाणी गाळून त्याने अंघोळ करा. यामुळे तुमच्या शरीराची सूज देखील कमी होते.

तुरटी व सैंधव मीठ
तुरटी व सैंधव मीठ या दोन गोष्टींमध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत, परंतु बर्‍याच लोकांना याबद्दल माहिती नाही. जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तुरटी आणि थोडीसे सैंधव मीठ मिसळले तर ते तुमच्या शरीरातील थकवा देखील दूर करते आणि तुमचे रक्त परिसंचरण सुरळीत ठेवते. या व्यतिरिक्त, हे आपल्या स्नायूंमध्ये वेदना दूर करण्यात देखील उपयुक्त आहे.

कापूर
आंघोळीच्या पाण्यात कापूर घाला आणि या पाण्याने स्नान करा. याचा तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. यासाठी कापूरचे 2 ते 3 तुकडे आंघोळीच्या पाण्यात मिसळा. यामुळे शरीर आणि डोकेदुखी देखील कमी होते.

(टीप : कोणत्याही टिप्स ट्राय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(
उत्तर लिहिले · 1/10/2021
कर्म · 121765
0

साबण किती वापरावा हे काही गोष्टींवर अवलंबून असते:

  • त्वचेचा प्रकार: तुमची त्वचा तेलकट, कोरडी, संवेदनशील किंवा सामान्य आहे का? तेलकट त्वचेसाठी जास्त साबण लागू शकतो, तर कोरड्या त्वचेसाठी कमी.
  • साबणाचा प्रकार: काही साबण जास्त प्रभावी असतात, त्यामुळे ते कमी प्रमाणात वापरले तरी पुरेसे होते.
  • तुम्ही किती घाणेरडे आहात: जर तुम्ही खूप घाणेरडे असाल, तर तुम्हाला जास्त साबण लागेल.
  • तुमच्या आवडीनुसार: काही लोकांना जास्त फेस आवडतो, त्यामुळे ते जास्त साबण वापरतात.

सामान्य मार्गदर्शक तत्त्वे:

  • हात धुण्यासाठी:
    • द्रव साबण: १-२ पंप पुरेसे आहेत.
    • साबण बार: पुरेसा फेस येईपर्यंत चोळा.
  • शरीर धुण्यासाठी:
    • द्रव साबण: १-२ चमचे पुरेसे आहेत.
    • साबण बार: पुरेसा फेस येईपर्यंत चोळा.

टीप:

  • खूप जास्त साबण वापरल्याने त्वचा कोरडी होऊ शकते.
  • सौम्य साबण वापरा.
  • साबण वापरल्यानंतर त्वचा पूर्णपणे धुवा.

मला आशा आहे की हे तुम्हाला मदत करेल!

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440
0
मी डॉक्टर नाही, त्यामुळे मी तुम्हाला वैद्यकीय सल्ला देऊ शकत नाही. तरीही, अंघोळ करायची की नाही हे ठरवण्यासाठी खालील गोष्टी विचारात घ्या:
  • तुमची दिनचर्या: तुम्ही दररोज सकाळी अंघोळ करत असाल, तर आजसुद्धा करणे फायदेशीर ठरू शकते.
  • तुमची त्वचा: तुमची त्वचा तेलकट असेल, तर अंघोळ केल्याने ताजेतवाने वाटेल.
  • तुमची इच्छा: तुम्हाला ताजेतवाने आणि स्वच्छ वाटण्याची इच्छा असल्यास, अंघोळ करणे हा एक चांगला पर्याय आहे.

अंघोळ करण्याचे फायदे:

  • त्वचा स्वच्छ होते.
  • रक्त परिसंचरण सुधारते.
  • शरीर ताजेतवाने होते.

अंघोळ करण्याचे तोटे:

  • त्वचा कोरडी होऊ शकते (जर तुम्ही जास्त गरम पाणी वापरले तर).
  • वेळेचा अपव्यय होऊ शकतो.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440
3
हो. यात काही वाईट नाही बघा.
फक्त वास येतोय की नाही एवढं बघण्यापुरताच वास घ्या. आणि हे करताना आपण एखाद्या खाजगी ठिकाणी आहोत, जिथे आपल्याला कुणी पाहत नाहीये याची काळजी घ्या. म्हणजे तुमची नाचक्की कमी होईल.
पण असे करायची सवय लागली असेल किंवा आवड म्हणून असे करावे वाटत असेल तर डॉक्टरांना दाखवून घ्या, हा काहीतरी मानसिक आजार असू शकतो.
उत्तर लिहिले · 21/3/2021
कर्म · 61495
4


​आपण फक्त उन्हाळ्यात गार पाण्याने अंघोळ करतो. परंतु जर आपण नियमित गार पाण्याने अंघोळ केली तर अनेक फायदे होऊ शकतात. दिवसभर ताजेतवाने राहयचे असेल तर दिवसाची सुरुवात गार पाण्याने अंघोळ करुन करावी. गार पाण्याने अंघोळ केल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहता. याव्यतिरिक्त शारीरिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी गार पाण्याची अंघोळ फादेशीर असते. तुम्हाला हे वाचुन आश्चर्य वाटेल की, गरम पाण्याने अंघोळ केल्याने रक्तप्रवाह सुरुवातिला उत्तेजित होतो परंतु नंतर मंद पडते. या उलट गार पाण्याने अंघोळ केल्यावर रक्तप्रवाह सुरुवातीला मंद असतो आणि नंतर उत्तेजित होतो जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. येवढेच नाही तर गार पाण्याने स्नान केल्याने आळस, थकवा आणि वेदना नष्ट होतात, झोप चांगली लागते. हे प्रत्येक प्रकारची जळजळ आणि खाज दूर करते. यामुळे त्वचा उजळते आणि रक्त स्वच्छ होते. चला तर मग पहुया गार पाण्याने अंघोळ करण्याचे कोणते फायदे आहेत...
1. गार पाण्याने अंघोळ केल्याने फॅट बर्न होतात
आपल्या शरीरात दोन प्रकारचे फॅट असतात. एक म्हणजे व्हाइट फॅट जो आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. दूसरा म्हणजे ब्राऊन फॅट जो आपल्या शरीरासाठी चांगला असतो. व्हाइट फॅट म्हणजे असा फॅट जो आपण भोजनात खातो. हा फॅट आपली कंबर, पाठ आणि खालच्या भागातील फॅट वाढवतो. जो दूर करण्यासाठी आपल्याला खुप मेहनत करावी लागते. तर ब्राऊन फॅट आपल्या शरीरासाठी चांगला असतो. हे आपल्या शरीराला गरम ठेवते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा गार पाण्याने अंघोळ करतो तेव्हा आपल्या कॅलरी बर्न होतात.
उत्तर लिहिले · 21/4/2020
कर्म · 1510
1
सुरुवातीला तळपायावर पाणी घेऊन नंतर पोटरी, मांडी, पोट, छाती, खांदे आणि शेवटी डोक्यावरून पाणी टाकावे. ही खरी अंघोळ करण्याची पद्धत आहे आणि प्रत्येकाने हीच पद्धत वापरून अंघोळ केली पाहिजे.
उत्तर लिहिले · 19/4/2019
कर्म · 10880