सरपटणारे प्राणी प्राणी कीटकशास्त्र

जन्म दिल्यानंतर विंचू मरतो का?

3 उत्तरे
3 answers

जन्म दिल्यानंतर विंचू मरतो का?

18
विंचू त्याच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच मुले जन्माला घालतो व त्यानंतर लगेचच मरून जातो.


*‼🦂विंचवी म्हणजे मातृत्वेचे एक उत्तम उदाहरण*

_* मादी विंचू 🦂 हिच्या आयुष्याची एक भयानक कथा आहे....*_

ती मुलांना जन्म दिला की ती तिचे आयुष्य त्याच क्षणी फक्त आणि फक्त आपल्या पिल्लाना वाचविण्यासाठी पूर्णपणे समर्पित करते ...

🦂••◆ विंचू ◆••🦂

विंचवाविषयी आपल्याला काय माहीत आहे?

विंचू डंख मारतो, इतकेच ना?

तुमच्या माहितीत एक अजुन भर घालणार आहे. विंचवाची मादी विंचवी म्हणू यात तिला.

श्रेष्ठ मातृत्व समजायचचे असेल तर विंचवीला भेटलेच पाहिजे.

विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिले होतात, गदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी. काही तासांनी पिलांना भूक लागते, निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी.

तिच्याकडे पिलांचे पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही. कासवाविषयी आपल्याला माहीत असेलच; कासवाची आणि पिलांची केवळ नजरानजर झाली की पिलांचे पोट भरते. इथे त्याहूनही गंभीर समस्या आहे. विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही. आता हळुहळु पिलांची भूक अनावर होऊ लागते. विंचवी बिचारी कासावीस होते, पण द्यायला तर काहीच नाही. पिले तिला चावा घ्यायला सुरुवात करतात. ती अंग चोरून निमूट बसून रहाते. आता पिलांची भूक अनावर होते, ते विंचवीचेच लचके तोडायला सुरुवात करतात, पहाता पहाता पिले पोट भरून तृप्त झालेली असतात, आणि विंचवी.............विंचवी..........

हो ती स्वतःच्या पिलांना तृप्त करण्यासाठी स्वतः संपूर्णपणे समर्पित झालेली असते!

याला म्हणायचे आईचे आईपण. "आई "मग ती मुंगी, शेळी, वाघीण, गाय असो की तुमची माझी माय असो, आईपण तेच ! मातृत्व अशी जादू आहे की जिच्या दातृत्वापुढे देवही फिके आहेत. ज्याला आई समजली त्याला विश्व समजले.
उत्तर लिहिले · 5/3/2020
कर्म · 0
3
विंचू (इंग्रजी: scorpion) एक विषारी प्राणी. याने मनुष्यास दंश केला असता शरीराची आग होते. भारतात सुमारे १२० प्रकारचे विंचू आढळतात. त्यापैकी सर्वात मोठा विंचू हा १८ ते २० सेंटिमीटर लांबीचा असतो. ऑर्थोकायरस बस्तवडेई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत. महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात, काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा असतो. परंतु हा कमी घातक असतो. काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळून येतो. लाल विंचू मुख्यत:कोकणात सापडणारा आहे. हा जास्त घातक असून ह्याने नांगी मारल्यास माणूस दगावू शकतो.

विंचवांच्या दंशाने बहुधा मरण येत नाही. लाल विंचवाचे लॅटिन नाव Mesobuthus tamulus असे आहे.

या विंचवाच्या विषावरचा उतारा (अँटी-सिरम) मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूट येथे उपलब्ध आहे.

हे औषध उपलब्ध नसले तरी योग्य उपचाराने उपाय होऊ शकतो. महाड येथील डॉ. बावसकरांनी या बाबतीत अभ्यास केला आहे. (हिंमतराव आणि प्रमोदिनी बावसकर दंपती, यांचे महाड येथे इस्पितळ आहे.)

आढळ

विंचवांचा आढळ कौले, घराची छते, जुने कपडे, काढून ठेवलेल्या चपला, बूट, अडगळ अशा ठिकाणी असतो. छतातून रात्री विंचू खाली पडतात. अंधारात स्वसंरक्षणाच्या प्रयत्नात दंश करतात. यासाठी कौलारू छत असेल तर त्याखाली लाकडाचे अजून एक स्तराचे छत असणे महत्त्वाचे असते. शेतीमध्ये काम करताना हातात जाड हात मोजे वापरणे योग्य असते. गुंडाळून ठेवलेली अंथरुणे पांघरूण झटकून मगच झोपणे श्रेयस्कर असते.

विषबाधेचे स्वरूप

विंचवाच्या विषातील रासायनिक तत्त्वाने एका विशिष्ट प्रकारचे मज्जातंतू उद्दीपित होतात व होतच जातात. त्या उद्दीपनाच्या अतिरेकाचा दुष्परिणाम होतो. या प्रकारच्या "ऑटोनोमिक" मज्जातंतूंच्या अतिरेकामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते दंशातून शरीरात किती विष गेले आहे त्यावर अवलंबून आहे. कमी प्रमाणात गेले असले, तर दंशाच्या ठिकाणी दुखते, वाढत्या प्रमाणात दंशापासून दूर दूर परिणाम होतो. अर्थात विषाचा प्रभाव आपोआप उतरताना दुरून जवळपर्यंत दुखणे नाहीसे होते. त्याहून जास्त प्रमाणात विष शरीरात जाता शरीरभर "ऑटोनोमिक" मज्जातंतूंचे अतिरेकी उद्दीपन होते. याला "ऑटोनोमिक वादळ" म्हणतात.

"ऑटोनोमिक" मज्जातंतूंचे दोन प्रकार असतात - सिंपथेटिक आणि पॅरासिंपथेटिक. दोन्ही प्रकारच्या तंतूचे उद्दीपन होत असले तरी सिंपथेटिक अतिरेकाचा प्रभाव (या ठिकाणी) जास्त घातक असतो. सिंपथेटिक प्रणालीचे योग्य उद्दीपन "लढा किंवा पळा" परिस्थितीत होते. हृदयाची धडधड वाढणे, रक्तदाब वाढणे, श्वासोच्छ्वासाची गती वाढते. त्यामुळे विंचू चढणे हे त्वेष चढणे किंवा भयभीत होण्याची लक्षणे दाखवते. याचा अतिरेक झाला की हृदय/रक्तपुरवठा हवे तसे काम देत नाही. शिवाय फुफ्फुसात लस (रक्तातला पाण्याचा अंश) स्रवून फुप्फुसे आपल्या नियत कार्यासाठी फुगू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मृत्यू येऊ शकतो ("वादळ" उठलेल्यांपैकी, उपचार केला नसल्यास २५-३०%). मृत्यू न आल्यास विष हळूहळू आपोआप नष्ट होते आणि शरीर पूर्ववत होते ("वादळ" उठलेल्यांपैकी, ७०-७५%). "वादळ" उठण्याइतपत विषाची मात्रा शरीरात गेली नसल्यास, विष आपोआप १००% उतरते.

उपचार

कोकणातील विंचू उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक विषारी असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. ‘हाफकिन’ या संस्थेने यावर उपाय ठरणारी बनवलेली विंचू प्रति विषजल लस निश्चित उपयुक्त असल्याने, शासनाने कोकणात असंख्य आरोग्य केंद्रात उपलब्ध केली आहे. बावसकरांच्या उपचार-प्रणाली (ॲल्गोरिदम)ने २५-३०% ऐवजी २-३% "वादळी" रुग्ण दगावतात, आणि तेही इस्पितळात येण्यास उशीर झाला म्हणून, असे बावसकर म्हणतात. ज्या रुग्णास "वादळ" उठले नाही, त्याला ॲस्पिरिन (किंवा तत्सम) वेदनाशामक आणि काम्पोझ (किंवा तत्सम) काळजीशामक देतात. विष आपोआप उतरते.

ज्यास "वादळ" उठले आहे, त्यास सिंपथेटिक मज्जातंतूंचे एका विशिष्ट प्रकारे दमन करणारे "प्राझोसिन" हे औषध देतात व पाणी प्यावयास देतात.शिवाय आमायनोफायलीन हे फुफ्फुसांचा निचरा करण्यास मदत करणारे औषध देतात. सुरू झालेले वादळ शमवण्यास अँटी-सिरम उपयोगी पडत नाही, असा बावसकरांचा अनुभव आहे. त्यांच्या प्रणालीने उपचार केल्याने अन्य डॉक्टरांनाही विंचू चावल्याचे मृत्यू टाळण्यात यश आले आहे, असे डॉ. बावसकर सांगतात.

म्हणून सर्व जातीच्या विंचवांचा दंश घातक नसतो, आणि लाल विंचवाचा दंश शरीरात गेेलेल्या विषाच्या मात्रेवर अवलंबून घात करतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते.

रोचक तथ्य

विंचू त्याच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच मुले जन्माला घालतो व त्यानंतर लगेचच मरून जातो.*‼🦂विंचवी म्हणजे मातृत्वेचे एक उत्तम उदाहरण*

_* मादी विंचू 🦂 हिच्या आयुष्याची एक भयानक कथा आहे....*_

ती मुलांना जन्म दिला की ती तिचे आयुष्य त्याच क्षणी फक्त आणि फक्त आपल्या पिल्लाना वाचविण्यासाठी पूर्णपणे समर्पित करते ...

🦂••◆ विंचू ◆••🦂

विंचवाविषयी आपल्याला काय माहीत आहे?

विंचू डंख मारतो, इतकेच ना?

तुमच्या माहितीत एक अजुन भर घालणार आहे. विंचवाची मादी विंचवी म्हणू यात तिला.

श्रेष्ठ मातृत्व समजायचचे असेल तर विंचवीला भेटलेच पाहिजे.

विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिले होतात, गदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी. काही तासांनी पिलांना भूक लागते, निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी.

तिच्याकडे पिलांचे पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही. कासवाविषयी आपल्याला माहीत असेलच; कासवाची आणि पिलांची केवळ नजरानजर झाली की पिलांचे पोट भरते. इथे त्याहूनही गंभीर समस्या आहे. विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही. आता हळुहळु पिलांची भूक अनावर होऊ लागते. विंचवी बिचारी कासावीस होते, पण द्यायला तर काहीच नाही. पिले तिला चावा घ्यायला सुरुवात करतात. ती अंग चोरून निमूट बसून रहाते. आता पिलांची भूक अनावर होते, ते विंचवीचेच लचके तोडायला सुरुवात करतात, पहाता पहाता पिले पोट भरून तृप्त झालेली असतात, आणि विंचवी.............विंचवी..........

हो ती स्वतःच्या पिलांना तृप्त करण्यासाठी स्वतः संपूर्णपणे समर्पित झालेली असते!

याला म्हणायचे आईचे आईपण. "आई "मग ती मुंगी, शेळी, वाघीण, गाय असो की तुमची माझी माय असो, आईपण तेच ! मातृत्व अशी जादू आहे की जिच्या दातृत्वापुढे देवही फिके आहेत. ज्याला आई समजली त्याला विश्व समजले.

या जगात तुमचा कोणताही अपराध पोटात घालण्याची ताकद फक्त तुमच्या आईबाबांमधे आहे.कारण ते कुठल्याही स्वार्थाशिवाय तुमच्यावर प्रेम करतात. आपल्या आईबाबांना खूप प्रेम द्या...... :- वैभव जगदाळे



उत्तर लिहिले · 9/3/2020
कर्म · 3860
0

नाही, जन्म दिल्यानंतर विंचू मरत नाही.

विंचू हा विविध परिस्थितीत तग धरून राहणारा प्राणी आहे. तो अनेक दिवस अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो.

विंचिणी (मादी विंचू) पिलांना जन्म देते. विंचिणी साधारणपणे 2 ते 3 वर्षे जगते आणि ती 20 ते 40 पिलांना जन्म देऊ शकते. पिलांना जन्म दिल्यानंतर ती मरत नाही, तर त्यांची काळजी घेते.

विंचवांबद्दल अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040

Related Questions

अतिनील किरणांना बघून डास आकर्षित होतात का?
माणसाला चावल्यानंतर मधमाश्या खरोखरच मरतात का?
मधमाशीची नजर तीक्ष्ण असते का?
दुर्मिळ कीटकांची माहिती?
मधमाशांच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात?
डासांचे जीवनचक्र कसे असते?
मधुमाश्या गुंजारव का करतात?