2 उत्तरे
2
answers
मधुमाश्या गुंजारव का करतात?
1
Answer link

त्या आवाजावरून पक्ष्याची ओळखही पटते आणि तसा आवाज पक्षी का काढतात याचीही माहिती आता मिळालेली आहे.एकमेकांशी दळणवळण साधण्यासाठी संवादासाठी पक्षी आवाज काढतात मधमाशाही तसाच एकमेकींशी संवाद साधण्यासाठी हा गुंजारव करत असतील, अशीच समजूत झाल्यास मग नवल नाही.प्रत्यक्षात मात्र मधमाशांचा हा आवाज त्यांच्या तोंडातून येत नाही. तो त्यांच्या पंखांचा फडफडाट असतो त्या एकाच जागी स्थिर असताना, मोहोळात राहुन आपापलं काम करत असताना हा गुंजारव आपल्याला ऐकू येत नाही.
पंखांच्या या फडफडाटाचं रुपांतर होत आवाजात
त्या जेव्हा मोहोळातून बाहेर पडून उडायला लागतात तेव्हाच त्यांचा गुंजारव ऐकू येतो त्यावरून हा त्यांच्या पंखांचा फडफडाट असावा, हे ध्यानात यायला हवं. उडणाऱ्या सर्वच कीटकांना आपले पंख फडफडावे लागतात. त्यामुळे तिथल्या हवेत कंपनं सुरू होतात हवेच्या कंपनामुळेच ध्वनी निर्माण होत असल्याने पंखांच्या या फडफडाटाचं रुपांतर आवाजात होत असतं मात्र तो आवाज आपल्याला ऐकू येणं हे त्या कंपनांच्या वेगावर आणि त्यात असलेल्या ऊर्जेवर अवलंबून असतं. निरनिराळ्या कीटकांच्या पंखांच्या फडफडण्याचा वेग मात्र वेगवेगळा असतो. फुलपाखरंही उडताना आपले पंख फडफडवत असतात.
मात्र त्यांचा वेग मंद असतो. एका सेकंदाला फार फार तर सहा ते दहा वेळा त्यांचे पंख फडफडतात त्यामुळे होणाऱ्या हवेच्या कंपनापोटी आपल्याला ऐकू येईल एवढा आवाज निर्माण होत नाही.डासांच्या पंखांचं फडफडणं मात्र वेगात होतं पण ते अतिशय लहान असल्यामुळे त्यापोटी निर्माण होणाऱ्या हवेच्या कंपनांचा आवाज जर ते डास आपल्या कानाच्या अगदी जवळ असतील तरच ऐकू येतो. मधमाश्यांचे पंख त्या मानाने मोठे असतात आणि त्यांच्या फडफडण्याचा वेगही जास्त असतो. एका सेकंदात ३०० ते ४०० वेळा हे पंख फडफडतात
साहजिकच त्यापोटी हवेत उठणारी कंपनंही जोमदार असतात. त्यांचाच आवाज गुंजारवाच्या स्वरूपात आपल्या कानी पडतो.
डाॅ.बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन
0
Answer link
मधुमाश्या गुंजारव (Buzzing) अनेक कारणांमुळे करतात, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- पंखांची हालचाल: मधमाशीच्या पंखांची जलद गतीने हालचाल होते. एका सेकंदात सुमारे 200 वेळा त्यांचे पंख फडफडतात, ज्यामुळे गुंजारवाचा आवाज येतो.
- संपर्क: मधमाश्या वसाहतीमध्ये संवाद साधण्यासाठी गुंजारवाचा वापर करतात. धोक्याची सूचना देणे, अन्नाचा स्रोत शोधणे किंवा इतर महत्वाच्या सूचना देण्यासाठी गुंजारव केला जातो.
- तापमान नियंत्रण: जेव्हा तापमान वाढते, तेव्हा मधमाश्या पंखांच्या साहाय्याने हवेला थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे गुंजारव निर्माण होतो.
- उष्णता निर्माण करणे: थंडीच्या दिवसात मधमाश्या एकत्र येऊन पंखांच्या साहाय्याने उष्णता निर्माण करतात, ज्यामुळे वसाहतीतील तापमान वाढण्यास मदत होते आणि गुंजारव ऐकू येतो.