शिक्षण परीक्षा स्पर्धा परीक्षा

स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व गरज सांगा?

2 उत्तरे
2 answers

स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व गरज सांगा?

7
स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थी यांना आता वेगळे करता येणार नाही. गेल्या तीसएक वर्षांपासून या दोघांमधील संबंध दृढ होत चालले आहेत. कालपर्यंत स्पर्धा परीक्षांना टाळणारेच ‘स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाही’ हे म्हणताना आढळतात. तीस वर्षांपूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात बराच फरक पडत चाललेला आहे. १९८०-८१ पासून महाराष्ट्र शासनाने इयत्ता चौथीपासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास भाग पाडलेले आहे. उत्तम करिअर, चांगली नोकरी, पदव्युत्तर चांगला अभ्यासक्रम, मानसन्मान, प्रतिष्ठा, पारितोषिके, बक्षिसे इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्राप्त होते. प्राथमिक शालेय शिक्षणापासून ते उच्च पदाच्या नोकरीची निवड करण्यापर्यंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागते. आता तर काही खासगी संस्थांनी अगदी तिसऱ्या इयत्तेपासूनच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्पर्धा तीव्र होत चालली आहे तरीसुद्धा ही स्पर्धा निकोप राहावी असेच सर्वाचे म्हणणे आहे.
चौथी व सातवी स्कॉलरशिप, गणित-संबोध, प्रावीण्य व प्रज्ञा, डॉ. होमी भाभा परीक्षा, सी. व्ही. रामन परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञा शोध

परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा या शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा तसेच इंजिनीअरिंग, वैद्यकीय, आयआयटी, मॅनेजमेंट क्षेत्रातील पदवीसाठी प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्याव्याच लागतात. रेल्वे, बँक, विमा कंपन्या, प्रॉव्हिडंट फंड, केंद्र व राज्य सरकारातील नोकरी, महानगरपालिकेची नोकरी, काही खासगी कंपन्यांतील नोकरी या सर्व नोकऱ्यांसाठी परीक्षा घेतल्या जातात आणि आता तर अगदी चतुर्थ श्रेणीतील पदासाठी ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांचे आज फार महत्त्व वाढले आहे आणि त्यामुळेच स्पर्धा परीक्षेचे तंत्र जे प्राप्त करतील अशा विद्यार्थ्यांना आपले करीअर उत्कृष्ट करून जीवनमान उंचावता येणार आहे.
बऱ्याचदा पदवी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत सरकारी नोकरी मिळते कशी? त्यासाठी पात्रता कोणती असते? अर्ज कोठे मिळतात? नोकरी मिळण्यासाठी वेगळा कोर्स करावा लागतो का? परीक्षा असेल तर त्यासाठी अभ्यासक्रम कोणता असतो? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना उमेदीच्या काळात सतावतात आणि पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा असतो तो पैसे मिळविण्याकडे. म्हणजे लगेच नोकरी मिळविण्याकडे. त्यासाठी ते स्पर्धा परीक्षांची वाटदेखील पाहायला तयार नसतात आणि यामुळेच हुशार असणारे विद्यार्थीही उत्तम नोकरी मिळविण्यापासून वंचित राहतात. स्पर्धा परीक्षांचे हे जग असे वेगळेच आहे. काहींना अगदी पहिल्या प्रयत्नात यश मिळते तर काहींसाठी सरकारी नोकरी हे स्वप्नच राहते.
स्पर्धा परीक्षांची सर्व माहिती मिळवल्यानंतरही परिपूर्ण म्हणजेच यश मिळविता येईल असा अभ्यास सर्वजण करतातच असे नाही. उमेदवारांचा समज असा झालेला असतो की आता पदवी परीक्षेपर्यंत अभ्यास केलेला आहे तर आता परत अभ्यासाची गरज काय? या संभ्रमातच अपयशाचे धनी होतात व त्या दरम्यान कोणत्यातरी खासगी क्षेत्रात करिअरला म्हणजेच नोकरीला सुरुवात करतात व त्या ठिकाणी नोकरी करताकरता रविवारी वेळ आहे म्हणून परीक्षा द्यायची इतके माहीत असते. बरं हीच मुले पुढे असे सांगताना आढळतात की, बऱ्याच परीक्षा दिल्या परंतु काही उपयोग नाही आणि या मुलांमुळेदेखील स्पर्धा परीक्षांबाबत गैरसमज पसरतात.
उत्तर लिहिले · 20/11/2019
कर्म · 4390
0

स्पर्धा परीक्षांचे महत्त्व आणि गरज खालीलप्रमाणे:

1. योग्य उमेदवाराची निवड:

  • स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून योग्य, सक्षम आणि गुणवंत उमेदवारांची निवड केली जाते.
  • उदाहरणार्थ, UPSC (Union Public Service Commission) परीक्षांच्या माध्यमातून IAS (Indian Administrative Service) आणि IPS (Indian Police Service) अधिकाऱ्यांची निवड होते, जे देशाच्या प्रशासनात आणि कायदा व सुव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

2. समान संधी:

  • स्पर्धा परीक्षा सर्वांना समान संधी उपलब्ध करून देतात.
  • जाati, लिंग, धर्म, किंवा आर्थिक पार्श्वभूमीचा कोणताही अडथळा न येता, प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार यश मिळवू शकतो.

3. सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्या:

  • अनेक सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अनिवार्य आहेत.
  • बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी या परीक्षा महत्त्वाच्या ठरतात.

4. उच्च शिक्षण:

  • चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा आवश्यक आहेत.
  • IIT (Indian Institutes of Technology) आणि IIM (Indian Institutes of Management) यांसारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE (Joint Entrance Examination) आणि CAT (Common Admission Test) परीक्षा द्याव्या लागतात.

5. कौशल्ये आणि ज्ञान वाढवणे:

  • स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये विकसित होतात.
  • वेळेचे व्यवस्थापन, अचूकता, समस्या- निराकरण (Problem-solving) आणि निर्णय क्षमता (Decision making) सुधारतात, ज्यामुळे ते अधिक सक्षम बनतात.

6. आत्मविश्वास वाढवणे:

  • स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.
  • ते अधिक ध्येयनिष्ठ बनतात आणि जीवनातील आव्हानांना तोंड देण्यास सज्ज होतात.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1620

Related Questions

इयत्ता दहावी, शास्त्रीय कारणे: सगळ्या पुस्तकांतील?
एका परीक्षा केंद्रामध्ये एका वर्गामध्ये 7 रांगा आहेत असे एकूण 3 वर्ग आहेत. एका रांगेत 25 विद्यार्थी बसतात, एका रांगेसाठी 2 शिक्षक आणि एका वर्गासाठी एक पर्यवेक्षक आहे. तर एका केंद्रप्रमुखासह परीक्षाकेंद्रामध्ये एकूण किती लोक उपस्थित आहेत?
ITI परीक्षा कधी आहे?
Badati mhnje kay badatiche uddhesh spshta kara?
बदती म्हणजे काय? बदतीचे उद्देश स्पष्ट करा?
मुद्दे: शिक्षणाचे तत्त्वे?
प्रशिक्षणाचे प्रकार स्पष्ट करा?