2 उत्तरे
2
answers
पितृ पक्षाबद्दल व श्राद्धाबद्दल माहिती द्या?
5
Answer link
माता-पिता तसेच निकटवर्तीय हयात असताना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो. त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते, असे भारतीय संस्कृती सांगते. या कर्तव्यपूर्तीची सुसंधी आपल्याला श्राद्धाच्या निमित्ताने मिळते. आपल्या प्रिय निकटवर्तीयांचा मृत्युतर प्रवास हा सुखमय व क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यासाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण. ही चार ऋण फेडणे होय. यापैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. श्राद्धविधी हा हिंदुधर्माचा अविभाज्य भाग आहे व धर्मशास्त्रात श्राद्ध हे गृहस्थाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितले आहे.
भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपयर्ंतच्या हिंदू वर्षातील काळाला 'पितृपक्ष' म्हणतात. या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. या काळात श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात. त्यामुळे प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे; पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. हे श्राद्ध पितृत्रई म्हणजेच पिता, पितामह (आजोबा) व प्रपितामहा (पणजोबा); मातृत्रयी म्हणजे माता, पितामही, प्रपितामही; सापत्न माता, मातामह (आईचे वडील), मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही (आईची आई), मातृपितामही, मातृप्रपितामही, पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य (काका), मातूल (मामा), बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, उपाध्याय, गुरू, मित्र, शिष्य या सर्वांच्या प्रीत्यर्थ करायचे असते. जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.
भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपयर्ंतच्या हिंदू वर्षातील काळाला 'पितृपक्ष' म्हणतात. या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. या काळात श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात. त्यामुळे प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे; पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. हे श्राद्ध पितृत्रई म्हणजेच पिता, पितामह (आजोबा) व प्रपितामहा (पणजोबा); मातृत्रयी म्हणजे माता, पितामही, प्रपितामही; सापत्न माता, मातामह (आईचे वडील), मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही (आईची आई), मातृपितामही, मातृप्रपितामही, पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य (काका), मातूल (मामा), बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, उपाध्याय, गुरू, मित्र, शिष्य या सर्वांच्या प्रीत्यर्थ करायचे असते. जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.
0
Answer link
पितृ पक्ष आणि श्राद्धाबद्दल माहिती खालीलप्रमाणे:
पितृ पक्ष:
- पितृ पक्ष हा पितरांना समर्पित केलेला पंधरवडा असतो.
- या काळात, लोक आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतात.
- पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेनंतर सुरू होतो आणि अमावस्येपर्यंत असतो.
- या दरम्यान, पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध विधी केले जातात.
श्राद्ध:
- श्राद्ध हा एक विधी आहे जो पितरांना अन्नदान करण्यासाठी केला जातो.
- श्राद्धामध्ये, पिंड बनवले जातात आणि ते पितरांना अर्पण केले जातात.
- तसेच, ब्राह्मण भोजन दिले जाते आणि दानधर्म केला जातो.
- श्राद्ध विधीमुळे पितरांना मुक्ती मिळते आणि कुटुंबाला आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे.
पितृ पक्षाचे महत्त्व:
- पितृ पक्ष हा आपल्या पूर्वजांप्रती आदर व्यक्त करण्याची वेळ आहे.
- या काळात केलेले श्राद्ध आणि दानधर्म पितरांना शांती देतात आणि कुटुंबाला समृद्धी प्रदान करतात.
- असे मानले जाते की पितृ पक्षात पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबांकडून अन्नाची अपेक्षा करतात.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: