Topic icon

श्राद्ध

0

हिंदू धर्मानुसार, पितरांना जेऊ घालण्याचा विधी साधारणपणे श्राद्ध पक्षात केला जातो. श्राद्ध पक्ष भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेनंतर सुरू होतो आणि अमावस्येपर्यंत असतो.

श्राद्ध पक्षाचा कालावधी: साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस किंवा मध्यभागी श्राद्ध पक्ष सुरू होतो.

मृत्यू तिथीनुसार श्राद्ध: ज्या तिथीला व्यक्तीचा मृत्यू होतो, त्याच तिथीला श्राद्ध केले जाते. त्यामुळे, 8 जुलै रोजी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध पुढील वर्षी श्राद्ध पक्षामध्ये त्याच तिथीला करावे.

अधिक माहितीसाठी: तुम्ही तुमच्या जवळच्या पुरोहित किंवा धार्मिक व्यक्तीकडून अधिक माहिती घेऊ शकता.

उत्तर लिहिले · 7/9/2025
कर्म · 2820
0

पितरांना जेवण भरवण्याचा दिवस विशेषतः पितृ पक्षातील असतो. पितृ पक्ष हा भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेनंतर सुरू होतो आणि आश्विन महिन्यातील अमावस्येपर्यंत असतो. या दरम्यान, पितरांना श्राद्ध विधी करून भोजन अर्पण केले जाते.

पितृपक्षात श्राद्ध करण्याचे दिवस:

  • सर्व पितृ अमावस्या: हा दिवस पितरांना जेवण देण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. ज्या पितरांची तिथी माहीत नाही, त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाते.
  • भरणी श्राद्ध: भरणी नक्षत्राच्या दिवशी श्राद्ध करणे देखील महत्त्वाचे मानले जाते.
  • व्यतीपात योग: या योगात केलेले श्राद्ध अक्षय्य मानले जाते.
  • द्वादशी श्राद्ध: ज्या पितरांचा मृत्यू द्वादशी तिथीला झाला असेल, त्यांचे श्राद्ध या दिवशी करतात.

या व्यतिरिक्त, कुटुंबाच्या परंपरेनुसार आणि सोयीनुसार, पितृ पक्षातील कोणत्याही दिवशी पितरांना जेवण दिले जाऊ शकते.

अधिक माहितीसाठी आपण एखाद्या धार्मिक विधी करणाऱ्या व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता.

उत्तर लिहिले · 6/9/2025
कर्म · 2820
0
हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पितृपक्षामध्ये लोक आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्ध करतात. २०२५ मध्ये पितृपक्ष ७ सप्टेंबर पासून सुरु होऊन २१ सप्टेंबर पर्यंत चालेल.
उत्तर लिहिले · 6/9/2025
कर्म · 2820
2
सुतक असताना वर्षश्राद्ध करावयास चालते का तर नाही सुतक किंवा सोयर असल्यास दरवर्षी करावयाचे श्राद्ध सुतक, सोयर संपल्यानंतर लगेच करावे. सुतक संपल्यानंतर लगेचच वर्षे श्राद्ध करावे. ब्राह्मण तुम्हाला कधी करावे ते सांगतात. सुतक सोयर घरातील असो किंवा भावकीतील असो सुतक सोयर संपल्यावर वर्ष श्राद्ध करावे.
उत्तर लिहिले · 6/1/2024
कर्म · 53750
3
द्वादशी ला तुमच्या वडिलांचा मृत्यू आहे तर श्राध्दासाठी तिथी द्वादशी महालय या दिवशी तुम्हाला श्राद्ध करावे लागेल
मृत व्यक्ती ची तिथी कशी काढावी तर जेव्हा व्यक्ती चा मृत्यू होतो तेव्हा तेव्हा तारखेच्या वरती दिलेल असतं शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष तिथे अंक असतात.द्वितिया , तृतीया चतुर्थी,पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी असे असते तर आपल्याला पितृपक्षात  तर ते बघुन आपल्याला तिथीत श्राद्ध करावे लागते कधी कधी व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा काही तिथी नसते तेव्हा काय श्राद्ध कसं करावं तर अनंत चतुर्दशी झाल्यावर लगेच महालय आरंभ होतो तेव्हा आपण कधी ही श्राद्ध करू शकतो.
 ज्यांची जशी तिथी त्या प्रमाणे पितृपक्षात तिथी धरून श्राद्ध करावे एकादशी ला श्राद्ध करत नाही तर ते बरोबर आहे  द्वादशीला करावे     द्वादशी तिथी योग्य आहे
एक महत्त्वाच ज्या व्यक्तीचा मृत्यू पितृपक्षात झालेला आहे  त्या व्यक्तीना तिथी नाही . ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झालेला आहे त्या दिवशी ची तिथीला त्यांच श्राद्ध करावे 

तुमचं उत्तर आहे द्वादशी योग्य आहे.
उत्तर लिहिले · 20/9/2022
कर्म · 53750
3
अमावस्या व पौर्णिमेस मृत झालेल्यांचे श्राद्ध અમાવસ्येસ करतात. भाद्रपद कृष्ण चतुर्दशीस शस्त्राघाताने मृत्यू पावलेल्यांचे श्राद्ध करतात. पितृपक्षात अन्नदान व गोग्रास यांचेही महत्त्व मानतात. अधिक मासात मृत्यू पावलेल्याचे श्राद्धही महालयात (पितृपक्षात) त्याच तिथीवर करतात.
उत्तर लिहिले · 19/9/2022
कर्म · 1975
2

जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवां साठी व जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.

जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा "मनुष्य" लाऊ शकतो परंतु फक्त "वड" व "पिंपळ" या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त "कावळे"खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ कावळेच, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या "पोटातच" ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे "विष्ठा" करतात तेथेच "वड" किंवा "पिंपळ" हे वृक्ष येतात.

या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे फक्त "भाद्रपद" महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना "घराघरातून" पोषक आहार या काळात "प्रत्येक" "सु-संस्कारी" मानवांनीच दिला ? तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच "संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.

आपल्या संस्कृतीतील "ऋषि-मुनि" हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल "विद्वान"होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही "दोनच" झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार "कावळ्यांना" देण्याची प्रथा सुरु करण्यात आली. आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे ! फक्त ती समजून घ्यायची आपली "कुवत" कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं "पितृपक्ष" आला की "कावळ्यावर" टुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो... *प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व आति-सुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धी ची कीव करावीशी वाटते. .

खबरदार जर कोणी "आपल्या" प्रथांची टींगल केली ? आणि "ऐकून"+ "पाहून" सहन केली तर ? त्याचे पण त्याच्याचच समोर "श्राध्द" करा ?

नाही तरी "कोरोनाने" मागे "आँक्सीजन" बद्दलचे महत्त्व समाजाला पटवून दिलेच आहे. जर का कावळ्यांना घरा घरातून "पितरांच्या" नावाने खायला नै मिळाले ? तर आपल्या मागील "वंशाचे" नातू+पणतूंचे काय हाल होतील याची कल्पना करा ? कधीच ? व कुठेही ? कोणतेही ? सरकार "आँक्सीजनची" पुर्व तयारी करा ? हे सांगणार नाही ? हेच "वैज्ञानिक" स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा.....

उत्तर लिहिले · 24/9/2021
कर्म · 121765