2 उत्तरे
2
answers
भर खते आणि जोर खते म्हणजे काय?
0
Answer link
*भरखते आणि जोर खते*
भरखतांच्या वापराने जमिनीची घडण सुधारते, जलधारणशक्ती वाढते. जोर खतामध्ये पोषणद्रव्याचे प्रमाण अधिक असते. हे लक्षात घेऊन जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विविध एकात्मिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे.
*_भर खते -_*
पोषणद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने भर खते मोठ्या प्रमाणात वापरावी लागतात. तसेच ही खते पिकांना सावकाशपणे लागू पडतात. भरखते वापरल्याने जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होते. त्यामुळे जमिनीची घडण सुधारते, जलधारणशक्ती वाढते. जमिनीचे आरोग्य सुधारते.
*_जोर खते -_*
यात पोषणद्रव्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ही खते कमी प्रमाणात द्यावी लागतात. उदा. सर्व प्रकारच्या पेंडी, हाडांचा चुरा, मासळी खत इत्यादी.
*_सेंद्रिय खतातील प्रमुख अन्नद्रव्यांचे प्रमाण_*
हिरवळीच्या खतासाठी ताग, शेवरी, चवळी, गवार किंवा धैंचा ही पिके घ्यावीत. पेरणीनंतर एक ते दीड महिन्याने जमिनीत गाडावीत. गिरिपुष्प व सुबाभूळ याचा पाला सुद्धा हिरवळीच्या खतासाठी वापरता येतो. हिरवळीच्या खतापासून हेक्टरी 60-90 किलो नत्र मिळते. जिरायती अथवा कोरडवाहू क्षेत्रात पाच टन प्रति हेक्टर आणि बागायत क्षेत्रात 10 टन प्रति हेक्टर सेंद्रिय खते द्यावीत.
भरखतांच्या वापराने जमिनीची घडण सुधारते, जलधारणशक्ती वाढते. जोर खतामध्ये पोषणद्रव्याचे प्रमाण अधिक असते. हे लक्षात घेऊन जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विविध एकात्मिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे.
*_भर खते -_*
पोषणद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने भर खते मोठ्या प्रमाणात वापरावी लागतात. तसेच ही खते पिकांना सावकाशपणे लागू पडतात. भरखते वापरल्याने जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होते. त्यामुळे जमिनीची घडण सुधारते, जलधारणशक्ती वाढते. जमिनीचे आरोग्य सुधारते.
*_जोर खते -_*
यात पोषणद्रव्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ही खते कमी प्रमाणात द्यावी लागतात. उदा. सर्व प्रकारच्या पेंडी, हाडांचा चुरा, मासळी खत इत्यादी.
*_सेंद्रिय खतातील प्रमुख अन्नद्रव्यांचे प्रमाण_*
हिरवळीच्या खतासाठी ताग, शेवरी, चवळी, गवार किंवा धैंचा ही पिके घ्यावीत. पेरणीनंतर एक ते दीड महिन्याने जमिनीत गाडावीत. गिरिपुष्प व सुबाभूळ याचा पाला सुद्धा हिरवळीच्या खतासाठी वापरता येतो. हिरवळीच्या खतापासून हेक्टरी 60-90 किलो नत्र मिळते. जिरायती अथवा कोरडवाहू क्षेत्रात पाच टन प्रति हेक्टर आणि बागायत क्षेत्रात 10 टन प्रति हेक्टर सेंद्रिय खते द्यावीत.
0
Answer link
भर खते:
भर खते म्हणजे शेतात पेरणी करण्यापूर्वी जमिनीत मिसळलेली खते. यांचा उद्देश जमिनीची सुपीकता वाढवणे, तिची संरचना सुधारणे आणि आवश्यक पोषक तत्वे पुरवणे हा असतो. ही खते बहुधा सेंद्रिय (Organic) असतात, जसे की शेणखत, कंपोस्ट खत, किंवा हिरवळीची खते.
- शेणखत: जनावरांच्या शेणाचा वापर करून तयार केलेले खत.
- कंपोस्ट खत: विविध सेंद्रिय वस्तू एकत्र करून कुजवून तयार केलेले खत.
- हिरवळीची खते: विशिष्ट प्रकारची झाडे जमिनीत गाडून तयार केलेले खत.
जोर खते:
जोर खते म्हणजे पिकाच्या वाढीच्या काळात ठराविक वेळी दिलेली खते. यांचा उद्देश पिकाला आवश्यक असणारे पोषक तत्वे पुरवणे, वाढ सुधारणे आणि उत्पादन वाढवणे हा असतो. ही खते रासायनिक (Chemical) किंवा सेंद्रिय असू शकतात.
- युरिया: नायट्रोजनचा (Nitrogen) स्रोत.
- डीएपी (DAP): फॉस्फोरस (Phosphorus) आणि नायट्रोजनचा स्रोत.
- पोटॅश: पोटॅशियमचा (Potassium) स्रोत.
मुख्य फरक:
- भर खते पेरणीपूर्वी वापरली जातात, तर जोर खते पिकाच्या वाढीच्या काळात वापरली जातात.
- भर खते जमिनीची सुपीकता वाढवतात, तर जोर खते पिकाला त्वरित पोषक तत्वे पुरवतात.