राजकारण निवडणूक राजकारणी निवडणूक आचारसंहिता

आचारसंहिता कशामुळे लागू असते आणि कोणकोणती कामे बंद असतात?

3 उत्तरे
3 answers

आचारसंहिता कशामुळे लागू असते आणि कोणकोणती कामे बंद असतात?

5
🧐 *आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? पक्ष, उमेदवारांवर बंधनं काय?*



*आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?* : निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये, असे नियम त्यांना घालून देण्यात आले. हे Do's And Dont's म्हणजेच निवडणूक 'आचारसंहिता' होय.



*पक्ष, उमेदवारांवर काय असतात बंधनं?* :

▪ पक्षाने आपल्या प्रचारामध्ये असं कोणतंही भाषण, प्रचार सामग्री, घोषणा अथवा आश्वासन देऊ नयेत ज्यामुळं समाजातील जाती, धर्म, वंश, बोलीभाषा इत्यादींमध्ये फुट पडेल तसंच त्यांच्यात वाद निर्माण होतील.


▪ कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिपक्षावर टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, त्यांच्या धर्माबद्दल, जातीबद्दल बोलता येणार नाही. असं केल्यास त्यास आचारसंहितेचा भंग समजण्यात येतो.


▪ निवडणूकीच्या प्रचारात  मतांसाठी लोकांमध्ये पैसे वाटणं, महागड्या वस्तू देणं, मतदारांना अमिष दाखवणं, लालूच दाखवणं अशा बाबींना आचारसंहितेमध्ये गैरप्रकार म्हटलं आहे.


▪ कोणताही प्रचार रात्री 10 च्या आतच संपवणं, थांबवणं बंधनकारक आहे. तसंच नागरिकांच्या खासगी इमारतीचा, मालमत्तेचा अथवा जमिनीचा वापर परवानगीशिवाय कोणत्याही पक्षाला करता येत नाही.


▪ कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रचाराध्ये अडथळा आणण्याचा अधिकार नाही, असे केल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे.


▪ कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला परवानगीशिवाय प्रचार, भाषण करता येणार नाही. याकरिता उमेदवारानं आपल्या सभांसाठी प्रशासनाचं स्वीकृतीपत्र मिळवणं आवश्यक आहे. तसंच संबंधीत बाबींची पोलीस ठाण्यात माहिती देणं आवश्यक आहे.


▪ आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला अथवा सरकारला आर्थिक लाभाच्या, मनोरंजनात्मक योजनांची घोषणा तसेच अमंलबजावणीही करता येत नाही.


▪ आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने, विमाने, हेलिकॉप्टर इत्यादी वाहनांचा निवडणूकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही. असं केल्यास याला आचारसंहितेचा भंग मानण्यात येतो.


▪ आचारसंहिता केवळ निवडणूकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांपुरतीच मर्यादीत नसून ही आचारसंहिता मंत्र्यांवरही लागू असते.


▪ निवडणूकीवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांची बदली आपल्या आवडीच्या ठिकाणी करता येत नाही. यापैकी कोणतंही काम केल्यास ते थांबवण्याचा संपूर्ण हक्क निवडणूक आयोगाला असतो.


🧐 *सोशल मीडियावरही आचारसंहिता* :

इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियावरही आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्वर आचारसंहिते दरम्यान राजकीय पक्षांना जाहिरात पोस्ट करण्याआधी निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर ते जाहिरात पोस्ट करू शकणार आहेत.


‍♂ *तक्रारींसाठी मोबाईल अ‍ॅप्स* : 'समाधान' या वेब पोर्टलवर सामान्य जनता निवडणूक आणि प्रक्रियेबाबत आपल्या प्रतिक्रिया देऊ शकणार आहेत.


तसेच एक असेही अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे ज्याद्वारे मतदाता आचारसंहितेचा भंग होत असल्याचे ती घटना रेकॉर्ड करून निवडणूक आयोगाकडे पाठवू शकेल. यात तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. तसेच सुविधा नावाचे अ‍ॅप राजकीय पक्षांसाठी लॉन्च करण्यात आले असून याद्वारे उमेदवार, प्रतिनिधी निवडणुकीसाठी लागणार विविध परवानगी अर्ज करू शकणार आहेत.


👌 *दिव्यांगांसाठी विशेष अ‍ॅप* : दिव्यांग मतदारासाठी इलेक्शन कमीशनने पर्सन विद डिसेब्लिटी (PWD) नावाचे अ‍ॅप लॉन्च केले आहे. याद्वारे मतदान केंद्रावर अशा लोकांना वाहन सेवा, पाणी, रँप सेवा, व्हिलचेअर सेवा आणि ब्रेल बॅलेट पेपर आणि ब्रेल वोटर स्पिल अशा सुविधा पुरवण्यात येईल.
उत्तर लिहिले · 12/3/2019
कर्म · 3205
2
भारतात भारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता अथवा 'निवडणुकीची आदर्श आचारसंहिता' किंवा सामान्यपणे ज्यास निवडणुकीची आचारसंहिता असेही संबोधल्या जाते, ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून म्हणजे एखाद्या क्षेत्राची निवडणूक घोषित झाल्यापासून ते ती निवडणूक संपून निकाल बाहेर येतपर्यंत लागू असते. 
.
भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार निवडणुका निर्मळ, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी राजकीय पक्ष, केंद्र शासन आणि भारत निवडणूक आयोगाने 1960 मध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या वर्तणुकीकरता काही मार्गदर्शक तत्त्वं निश्चित केली.
कालांतराने या तत्त्वांना आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जाऊ लागलं आणि निवडणुकांच्या काळात त्यांचा वापर होऊ लागला.
उत्तर लिहिले · 12/3/2019
कर्म · 1245
0

निवडणूक आचारसंहिता (Election Model Code of Conduct) निवडणुकीच्या काळात लागू होते. निवडणुका निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाद्वारे (Election Commission of India) हे नियम लागू केले जातात.

आचारसंहिता लागू होण्याची कारणे:

  • निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात.
  • सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत अनुचित लाभ मिळू नये.
  • मतदारांना प्रलोभने देऊन প্রভাবিত करण्याचा प्रयत्न होऊ नये.
  • सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळावी.
  • शांतता आणि सुव्यवस्था राखली जावी.

आचारसंहिता लागू असताना खालील कामे साधारणपणे बंद असतात:

  1. नवीन योजनांची घोषणा: सरकार नवीन योजना किंवा प्रकल्पांची घोषणा करू शकत नाही ज्यामुळे मतदारांवर प्रभाव पडेल.
  2. नवीन कामांचे भूमिपूजन किंवा उद्घाटन: कोणत्याही नवीन विकासकामांचे भूमिपूजन किंवा उद्घाटन करता येत नाही.
  3. भरती प्रक्रिया: सरकारी नोकऱ्यांची भरती प्रक्रिया थांबवली जाते.
  4. Transfer थांबवणे: शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवल्या जातात. जर खूपच urgent असेल तर निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.
  5. सरकारी जाहिरात: सरकार स्वतःच्या कामांची जाहिरात करू शकत नाही, ज्यामुळे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होईल.

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास, निवडणूक आयोग कठोर कारवाई करू शकतो, ज्यात उमेदवाराला निवडणुकीतून अपात्र ठरवणे किंवा पक्षावर জরিমানা लावणे इत्यादींचा समावेश असू शकतो.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5280

Related Questions

आचारसंहिताच्या संघटना कोणत्या?
आचार संहिता म्हणजे काय?
आचारसंहिता म्हणजे काय? स्पष्ट करा.