3 उत्तरे
3
answers
भोगी म्हणजे काय? भोगी सण का साजरा करतात?
14
Answer link
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी. भोगी हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण आहे._
_हा सण जानेवारीत मध्यान्हात येतो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारावा उपभोगणारा!_
_या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे म्हणतात._
_काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते._
_हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतात._
_संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत._
_*तामिळनाडूत हा सण “पोंगल” व आसाम मध्ये “भोगली बिहू” ,पंजाब मध्ये “लोहिरी “, राजस्थान मध्ये “उत्तरावन” म्हणून साजरा केला जातो.*_
_या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) तीळ लावलेलीबाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे._
_बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजीही तिळाचा कूट घालूनकेली जाते._
______________________
_'मकर संक्रांती'च्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो.या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार जेवणाचा बेत आखला जातो._
*_◾भोगीमागचा उद्देश_*
माणसांच्या परस्पर संबंधांमध्ये स्नेह व माधुर्य यावे, असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो. उत्तर भारतात संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात. विशेष करुन पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला 'लोहरी' हा सण जल्लोषात साजरा केला जातो. तर बंगालमध्ये संक्रांतीला तिळुआ संक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात. दक्षिणेत याच वेळी पोंगळ (पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो.
*_🤔भोगी सण कसा साजरा करतात?_*
भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी या सर्वांची मिळून भाजी करतात. या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी. बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते. घरातील देवांची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. भोगीच्या दिवशी केस धुऊन स्नान करण्याची परंपरा आहे.
*_🤔भोगी देणे म्हणजे काय ?_*
भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सुवासिनींना जेवणासाठी बोलावले जाते. शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.
----------------------------------------------------
🤔 _*जाणून घ्या भोगी म्हणजे काय?*_
आज 'भोगी'. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला 'भोगी' असे म्हणतात. 'भोगी' शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. 'भोगी' हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. तसेच सासरच्या मुली 'भोगी'चा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.
'भोगी' हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो. म्हणून या दिवशी 'भोगी'ची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला 'खिंगाट' म्हणतात. या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणार्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खर्डा, सर्व शेंगभाज्या, पावटय़ाचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत उपभोगायचा असतो.
'भोगी'ची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरीसोबत भाजीची चव चाखणं हे केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्याला पोषक आहे. यामध्ये कफनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते.
तसेच या दिवशी देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात. सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिला तेल, शिकेकाईने नहावयास घालतात. जेवणानंतर विडा, दक्षिणा दिली जाते. घरातील सर्व स्त्रियाही ह्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात. भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच 'भोगी' देणे म्हणतात.
*भोगी*
*मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी.*
भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे. हा पहिला सण जानेवारीत मध्यान्हात येतो. 'न खाई भोगी तो सदा रोगी' हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.
भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा! या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे, कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे! जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात, याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात! या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरा सभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात.
*भोगी साजरी का करावी?*
या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो.मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन ऊबदाररूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो, त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतात. मराठवाड्यात या भाजीला 'खेंगट' म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासूनच नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरूवात होते. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण "पोंगल " व आसाम मध्ये " भोगली बिहू " आणि पंजाब मध्ये " लोहिरी " ,राजस्थान मध्ये " उत्तरावन " म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या नव्याला अंगिकारलं जातं. नवा बदल केला जातो. म्हणूनच जुनं वाईट ते सगळं संपवून नव्या आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी करायची. या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे.
या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडाबहुत फरक असतो. म्हणजे तुम्ही वसई-पालघरकडे वाडवळांकडे जेवायला गेलात, तर त्यांनी पद्धत एकदम भिन्न असलेली दिसते. किंबहुना त्यांची पद्धत उंधियुच्या एकदम जवळ जाणारी आहे आणि त्यांनी या भाजीला दिलेलं नावही भन्नाट आहे-उकडहंडी. भोगीची भाजी करायची अजून एक पद्धत आहे. ही पद्धत कोकणातल्या मासेखाऊंची आहे. भाज्या सगळ्या वरच्याच असल्या तरी, कोकणात केली जाणारी भोगीची भाजी ही भाजलेल्या कांद्या-खोबऱ्याचं वाटण लावून केली जाते. थेट मटणासाठी वापरला जाणारा मसालाच या भाजीसाठी वापरत असल्यामुळे घरात मटण शिजत असल्याचाचा भास होतो. पण प्रत्यक्षात चिकन-मटण नसलं तरी काही फरक पडत नाही. कोकणी घरात शिजलेली ही भोगीची भाजीच इतकी फर्मास असते की, त्यापुढे चिकन-मटणही फिके पडेल.
*भोगीची चारोळी *
भोगी सण आनंद उपभोगाचे तत्व,
सवाष्ण महिलेचे पुजिले जावे सत्व;
भोगी सण सांगे नारीशक्तीचे ममत्व,
सवाष्णला दिलेल्या दानाचे महत्व!
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
*भोगीची भाजी.*
साहित्य:- तीन-चार प्रकारच्या पापडी शेंगा व त्यांचे दाणे, छोटी वांगी, बटाटे, गाजर, मेथी, बेसन, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, धणे-जिरे पूड, काळा गोडा मसाला, हळद, मोहरी, हिंग, गूळ, अर्धी वाटी तीळ, नारळाच्या अध्र्या करवंटीचा चव, दहा-बारा कढीपत्ता पाने, कोथिंबीर, आल्याचा तुकडा, तीन-चार हिरव्या मिरच्या आणि तेल (प्रत्येक भाजी कमी-जास्त प्रमाणात घ्यावी. उदा. दोन बटाटे, दोन गाजर या नुसार)
कृती:-
*मुटके* मेथीची भाजी धुऊन घेऊन बारीक चिरावी. त्यात तिखट, मीठ, तीळ, धणे-जिरे पावडर, हळद आणि एक चमचा तेल घालावे. हे सगळं भाजीला व्यवस्थित लावल्यावर भाजीला पाणी सुटेल. त्या पाण्यात मावेल इतकेच बेसन घालून त्याचा घट्ट गोळा तयार करावा. दीड ते दोन इंच लांबट आकाराचे मुटके तयार करून पॅनमध्ये तेल घालून सर्व बाजूंनी मंदाग्निवर शिजवून घ्यावे.
*भाजी* गाजर व बटाटे यांची साले काढून त्यांच्या वेगवेगळ्या आकाराच्या फोडी कराव्यात. शेंगा सोलून त्याचे दाणे व सालेही घ्यावीत. ऐका वांग्याच्या दोनच फोडी कराव्या. सर्व भाज्या स्वच्छ धुऊन निथळत ठेवाव्या. तेल व फोडणीचे सामान सोडून वरील सर्व मसाल्याचे घटक पदार्थ मिक्सरमधून चांगले बारीक वाटून घ्यावे. कढईत नेहमीपेक्षा जास्त तेल घालून मोहरी, हळद, हिंगाची फोडणी तयार करावी. त्यावर निथळत ठेवलेल्या भाज्या घालून, परतून, झाकून पाच मिनिटे मंदाग्निवर ठेवावे. वाटलेल्या मसाल्याचा गोळा घालून त्या गोळ्यात भाजी चांगली परतून घ्यावी. भाजीला जितका रस्सा हवा असेल त्या बेताने गरम पाणी घालावे, थोडा गुळाचा खडा घालून भाजी पाणी आटेपर्यंत मंदाग्निवर शिजवावी. भाजी उतरवण्यापूर्वी पाच ते सात मिनिटे अगोदर बनवून ठेवलेले मेथीचे मुटके त्यात घालावे. भाजी हलवताना मुटके मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. ही भाजी बाजरी भाकरीसोबत छान लागते.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
*बाजरीची भाकरी*
साहित्य - बाजरीचे पीठ, मीठ, पांढरे तीळ
कृती - बाजरीचे पीठ व मीठ एकत्र करून पीठ भिजवावे. त्याची भाकरी थापून तव्यावर टाकावी. जरा गरम झाली की पाणी फिरवावे. पाणी सुकले की भाकरी उलटावी. जरावेळाने उलथणे फिरवून पहावे. भाकरी तव्यावरून सुटली की तवा उतरवून गॅसवर शेकावी. छान पदर सुटेल. ही भाकरी पांढरे तीळ लावूनही करता येते.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
*तिळाची खिचडी*
साहित्य:- अर्धा कप तांदूळ, पाव वाटी मुगाची डाळ अर्धा तास भिजवून, पाव कप तीळ, तूप, कढीपत्ता, मोहरी, जिरे, हिंग, हळद, काळे मीठ, हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, खोबरे, तूप.
कृती:- पाव कप तीळ भाजून घ्या. कढईत तीन-चार चमचे तूप तापवून त्यात फोडणी करा.
नंतर त्यात डाळ, तांदूळ व तीळ घालून चांगले परता. त्यात दोन कप पाणी घालून शिजायला ठेवा.
शिजताना त्यात काळे मीठ, एक-दोन अख्ख्या हिरव्या मिरच्या व पाव इंच आल्याचे तुकडे घाला.
खिचडी झाल्यावर वरून कोथिंबीर, खोबरे भुरभुरा. गरम असतानाच तूप घालून सर्व्ह करा.
कॉपी पेस्ट -संजीव वेलणकर यांच्या पोस्टवरून
_हा सण जानेवारीत मध्यान्हात येतो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारावा उपभोगणारा!_
_या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे म्हणतात._
_काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते._
_हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतात._
_संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत._
_*तामिळनाडूत हा सण “पोंगल” व आसाम मध्ये “भोगली बिहू” ,पंजाब मध्ये “लोहिरी “, राजस्थान मध्ये “उत्तरावन” म्हणून साजरा केला जातो.*_
_या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) तीळ लावलेलीबाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे._
_बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजीही तिळाचा कूट घालूनकेली जाते._
______________________
_'मकर संक्रांती'च्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो.या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार जेवणाचा बेत आखला जातो._
*_◾भोगीमागचा उद्देश_*
माणसांच्या परस्पर संबंधांमध्ये स्नेह व माधुर्य यावे, असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो. उत्तर भारतात संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात. विशेष करुन पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला 'लोहरी' हा सण जल्लोषात साजरा केला जातो. तर बंगालमध्ये संक्रांतीला तिळुआ संक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात. दक्षिणेत याच वेळी पोंगळ (पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो.
*_🤔भोगी सण कसा साजरा करतात?_*
भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी या सर्वांची मिळून भाजी करतात. या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी. बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते. घरातील देवांची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. भोगीच्या दिवशी केस धुऊन स्नान करण्याची परंपरा आहे.
*_🤔भोगी देणे म्हणजे काय ?_*
भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सुवासिनींना जेवणासाठी बोलावले जाते. शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.
----------------------------------------------------
🤔 _*जाणून घ्या भोगी म्हणजे काय?*_
आज 'भोगी'. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला 'भोगी' असे म्हणतात. 'भोगी' शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. 'भोगी' हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. तसेच सासरच्या मुली 'भोगी'चा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.
'भोगी' हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो. म्हणून या दिवशी 'भोगी'ची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला 'खिंगाट' म्हणतात. या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणार्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खर्डा, सर्व शेंगभाज्या, पावटय़ाचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत उपभोगायचा असतो.
'भोगी'ची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरीसोबत भाजीची चव चाखणं हे केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्याला पोषक आहे. यामध्ये कफनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते.
तसेच या दिवशी देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात. सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिला तेल, शिकेकाईने नहावयास घालतात. जेवणानंतर विडा, दक्षिणा दिली जाते. घरातील सर्व स्त्रियाही ह्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात. भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच 'भोगी' देणे म्हणतात.
*भोगी*
*मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी.*
भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे. हा पहिला सण जानेवारीत मध्यान्हात येतो. 'न खाई भोगी तो सदा रोगी' हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.
भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा! या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे, कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे! जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात, याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात! या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरा सभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात.
*भोगी साजरी का करावी?*
या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो.मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन ऊबदाररूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो, त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतात. मराठवाड्यात या भाजीला 'खेंगट' म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासूनच नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरूवात होते. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण "पोंगल " व आसाम मध्ये " भोगली बिहू " आणि पंजाब मध्ये " लोहिरी " ,राजस्थान मध्ये " उत्तरावन " म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या नव्याला अंगिकारलं जातं. नवा बदल केला जातो. म्हणूनच जुनं वाईट ते सगळं संपवून नव्या आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी करायची. या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे.
या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडाबहुत फरक असतो. म्हणजे तुम्ही वसई-पालघरकडे वाडवळांकडे जेवायला गेलात, तर त्यांनी पद्धत एकदम भिन्न असलेली दिसते. किंबहुना त्यांची पद्धत उंधियुच्या एकदम जवळ जाणारी आहे आणि त्यांनी या भाजीला दिलेलं नावही भन्नाट आहे-उकडहंडी. भोगीची भाजी करायची अजून एक पद्धत आहे. ही पद्धत कोकणातल्या मासेखाऊंची आहे. भाज्या सगळ्या वरच्याच असल्या तरी, कोकणात केली जाणारी भोगीची भाजी ही भाजलेल्या कांद्या-खोबऱ्याचं वाटण लावून केली जाते. थेट मटणासाठी वापरला जाणारा मसालाच या भाजीसाठी वापरत असल्यामुळे घरात मटण शिजत असल्याचाचा भास होतो. पण प्रत्यक्षात चिकन-मटण नसलं तरी काही फरक पडत नाही. कोकणी घरात शिजलेली ही भोगीची भाजीच इतकी फर्मास असते की, त्यापुढे चिकन-मटणही फिके पडेल.
*भोगीची चारोळी *
भोगी सण आनंद उपभोगाचे तत्व,
सवाष्ण महिलेचे पुजिले जावे सत्व;
भोगी सण सांगे नारीशक्तीचे ममत्व,
सवाष्णला दिलेल्या दानाचे महत्व!
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
*भोगीची भाजी.*
साहित्य:- तीन-चार प्रकारच्या पापडी शेंगा व त्यांचे दाणे, छोटी वांगी, बटाटे, गाजर, मेथी, बेसन, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, धणे-जिरे पूड, काळा गोडा मसाला, हळद, मोहरी, हिंग, गूळ, अर्धी वाटी तीळ, नारळाच्या अध्र्या करवंटीचा चव, दहा-बारा कढीपत्ता पाने, कोथिंबीर, आल्याचा तुकडा, तीन-चार हिरव्या मिरच्या आणि तेल (प्रत्येक भाजी कमी-जास्त प्रमाणात घ्यावी. उदा. दोन बटाटे, दोन गाजर या नुसार)
कृती:-
*मुटके* मेथीची भाजी धुऊन घेऊन बारीक चिरावी. त्यात तिखट, मीठ, तीळ, धणे-जिरे पावडर, हळद आणि एक चमचा तेल घालावे. हे सगळं भाजीला व्यवस्थित लावल्यावर भाजीला पाणी सुटेल. त्या पाण्यात मावेल इतकेच बेसन घालून त्याचा घट्ट गोळा तयार करावा. दीड ते दोन इंच लांबट आकाराचे मुटके तयार करून पॅनमध्ये तेल घालून सर्व बाजूंनी मंदाग्निवर शिजवून घ्यावे.
*भाजी* गाजर व बटाटे यांची साले काढून त्यांच्या वेगवेगळ्या आकाराच्या फोडी कराव्यात. शेंगा सोलून त्याचे दाणे व सालेही घ्यावीत. ऐका वांग्याच्या दोनच फोडी कराव्या. सर्व भाज्या स्वच्छ धुऊन निथळत ठेवाव्या. तेल व फोडणीचे सामान सोडून वरील सर्व मसाल्याचे घटक पदार्थ मिक्सरमधून चांगले बारीक वाटून घ्यावे. कढईत नेहमीपेक्षा जास्त तेल घालून मोहरी, हळद, हिंगाची फोडणी तयार करावी. त्यावर निथळत ठेवलेल्या भाज्या घालून, परतून, झाकून पाच मिनिटे मंदाग्निवर ठेवावे. वाटलेल्या मसाल्याचा गोळा घालून त्या गोळ्यात भाजी चांगली परतून घ्यावी. भाजीला जितका रस्सा हवा असेल त्या बेताने गरम पाणी घालावे, थोडा गुळाचा खडा घालून भाजी पाणी आटेपर्यंत मंदाग्निवर शिजवावी. भाजी उतरवण्यापूर्वी पाच ते सात मिनिटे अगोदर बनवून ठेवलेले मेथीचे मुटके त्यात घालावे. भाजी हलवताना मुटके मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. ही भाजी बाजरी भाकरीसोबत छान लागते.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
*बाजरीची भाकरी*
साहित्य - बाजरीचे पीठ, मीठ, पांढरे तीळ
कृती - बाजरीचे पीठ व मीठ एकत्र करून पीठ भिजवावे. त्याची भाकरी थापून तव्यावर टाकावी. जरा गरम झाली की पाणी फिरवावे. पाणी सुकले की भाकरी उलटावी. जरावेळाने उलथणे फिरवून पहावे. भाकरी तव्यावरून सुटली की तवा उतरवून गॅसवर शेकावी. छान पदर सुटेल. ही भाकरी पांढरे तीळ लावूनही करता येते.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
*तिळाची खिचडी*
साहित्य:- अर्धा कप तांदूळ, पाव वाटी मुगाची डाळ अर्धा तास भिजवून, पाव कप तीळ, तूप, कढीपत्ता, मोहरी, जिरे, हिंग, हळद, काळे मीठ, हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, खोबरे, तूप.
कृती:- पाव कप तीळ भाजून घ्या. कढईत तीन-चार चमचे तूप तापवून त्यात फोडणी करा.
नंतर त्यात डाळ, तांदूळ व तीळ घालून चांगले परता. त्यात दोन कप पाणी घालून शिजायला ठेवा.
शिजताना त्यात काळे मीठ, एक-दोन अख्ख्या हिरव्या मिरच्या व पाव इंच आल्याचे तुकडे घाला.
खिचडी झाल्यावर वरून कोथिंबीर, खोबरे भुरभुरा. गरम असतानाच तूप घालून सर्व्ह करा.
कॉपी पेस्ट -संजीव वेलणकर यांच्या पोस्टवरून
2
Answer link
भोगी म्हणजे काय ?
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी भोगी चा अर्थ म्हणजे आनंद व पु घेणारा असा आहे त्या दिवशी विविध पदार्थांचा आस्वाद घेणे अभिप्रेत असते
भोगी कोणत्या दिवशी आहे 2022
भोगी 2022 मध्ये 13 जानेवारी 2022 रोजी आहे
भोगी सणाची माहिती मराठी भोगीचे महत्व
भोगी मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी येतो तो सण म्हणजे भोगी, भोगी साजरी करण्याची वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे , भोगी हा सण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी भोगीची भाजी प्रसिद्ध भाजी बनवली जाते मुळातच भोगी हा सण जानेवारी महिन्यात येत असल्यामुळे या महिन्यात थंडी जास्त पडलेली असते त्यामुळेच भोगीच्या भाजी मध्ये असलेले उष्णता गुणधर्म यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी नक्कीच फायदा होतो . भोगीच्या भाजीमध्ये ऊस हुरडा बोर वांगे शेंगदाणे पावटे हरभरा तसेच ज्वारी किंवा बाजरीची भाकर त्यावर तीळ लावून भाजली जाते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते अशा या भोगी ची थोडक्यात माहिती मराठी मध्ये सांगितली आहे , तुम्हा सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा.
अधिक माहिती साठी खालची लिंक उघडा
0
Answer link
भोगी म्हणजे काय?
भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी शेतात आलेल्या नवीन धान्याची आणि भाजीपाल्याचीmixed vegetable भाजी बनवून देवाला नैवेद्य दाखवला जातो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पालेभाजी आणि वांग्याचे भरीत हे भोगीच्या जेवणाचे खास पदार्थ आहेत.
भोगी सण का साजरा करतात?
- भोगी हा सण नवीन पिकाच्या आगमनानिमित्त साजरा केला जातो. या काळात शेतात नवीन धान्य आणि भाजीपाला येतो, त्यामुळे समृद्धी आणि आनंदाचे वातावरण असते.
- हा सण इंद्र देवाला समर्पित आहे. चांगल्या पावसासाठी आणि भरपूर पिकांसाठी इंद्र देवाची पूजा केली जाते.
- भोगी हा कृषी संस्कृतीचा एक भाग आहे. शेतकरी या दिवशी आपल्या कामातून विश्रांती घेतात आणि आनंद साजरा करतात.
- हा सण कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा करण्याचा दिवस आहे. लोक एकत्र येतात, जेवण बनवतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात.
अधिक माहितीसाठी: