भूगोल भविष्य अंदाज

पुढील ५० वर्षे कशी असतील?

2 उत्तरे
2 answers

पुढील ५० वर्षे कशी असतील?

16
📙 *भूतलावरची येती पन्नास वर्षे* 📙
************************************

५० वर्षांनी काय घडेल, असा प्रश्न विचारला असता अनेकांचे अनेक उत्तरे येतील. सत्ताधारी स्वतःच्या सत्तेवरच्या पुढच्या पिढीबद्दल बोलेल, ज्योतिषी ग्रहांच्या युत्यांची गणिते मांडेल, शेतकरी कमी पडणाऱ्या पाण्याची चिंता करेल, तर सामान्य वाचक नातवाच्या अॅडमिशनची चिंता व्यक्त करेल !

कोणताही शास्त्रज्ञ मात्र या प्रश्नाकडे अत्यंत गंभीरपणे बघून नक्कीच विचारात गढून जाईल. त्याची कारणे तशीच आहेत. औद्योगिक प्रगतीचा वेग, त्यातून निर्माण होणारे रासायनिक प्रदूषणाचे प्रश्न, शहरातील बदलती राहणीची पद्धती, शेती, पाणीपुरवठा या विविध बाबींनी या प्रश्नाला इतके गंभीर स्वरूप आले आहे की कोणीही शास्त्रज्ञ या प्रश्नाला लगेच काहीच उत्तर देऊ शकणार नाही. एकमेकांत विचित्रपणे गुंतलेले असंख्य प्रश्न या पन्नास वर्षात काय काय घडणार आहे, याचे ठोक स्वरूप समोर येऊ देत नाहीत.

प्रथम सध्याचे भीषण स्वरूपाचे प्रश्न कोणते, याची केवळ यादी बघू या -

१. पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण.
१८५० साली हे प्रमाण २६५ पार्टस पर मिलियन किंवा पीपीएम होते, तर १९८८ साली नासाने केलेल्या मोजणीत ते ३५० पीपीएम इतके वाढले आहे. यामुळे पृथ्वीवरील तापमान १ अंश फॅरनहाइटने वाढ झाली आहे. असेच प्रमाण वाढत गेले, तर ५० वर्षांनी ४ अंश फॅरनहाइटने तापमान वाढेल, असा प्राथमिक अंदाज आहे.

२. सीएफसी किंवा क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोनचा थर कमी होत आहे. सूर्याच्या अतिनील किरणांना पृथ्वीवर प्रवेश करायला त्यामुळे जास्त संधी मिळणार आहे. ओझोनच्या थराने या किरणांपासून आपल्याला संरक्षण मिळत असते. याखेरीज पृथ्वीवरील तापमान वाढण्यास कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाच्या जोडीला ही बाब मदतच करेल, असे वाटते.

३. एकूण तापमान वाढ झाल्यास ध्रुवीय बर्फसाठा वितळून समुद्र पातळी किमान पाच फुटांनी वाढण्याची शक्यता उद्भवते. मुळात जगातील सर्व बंदरे समुद्रपातळीलाच असल्याने पाच फुटांनी वाढलेली पातळी अनेक मोठ्या औद्योगिक शहरात हलकल्लोळ माजवेल. तसेच जगातील अनेक बेटे व बेटसदृश देश नष्टच होण्याची शक्यता आहे. उदारणार्थ आपल्या जवळची मालदीव बेटे.

४. लोकसंख्यावाढीने सध्याच जगाला हैराण केले आहे. पण हा प्रश्न ५० वर्षांनी वेगळ्या पद्धतीने सुटेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. एका ठरावीक काळाने म्हणजे अजून चाळीसएक वर्षांनी जगाची लोकसंख्या स्थिरावेल.

५. अन्नधान्य, रोगराई प्रश्न दुय्यम राहून एड्सचा प्रसार हा प्रश्न मात्र भयानकरित्या समोर उभा ठाकणार आहे. अॅक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम हा प्रकार नवनवीन विषाणूंच्या स्वरुपात पृथ्वीवर ठाण मांडून राहणार आहे, असे दिसते.

या प्रश्नांच्या अनुषंगाने व सध्याची आपली संशोधनातील गती बघता काय घडेल, याचा एक ओझरता आराखडा समोर येतो. त्यानुसार ५० वर्षांनी :
जेनेटिक्समधील संशोधन खूपच प्रगत होत जाईल. सर्व प्रकारची बियाणे ही रोगराईला तोंड देण्यास समर्थ असतील, त्यामुळे रासायनिक औषधे फवारे मारणे बंद होईल. धान्योत्पादन दरवर्षी गरजेप्रमाणे केले जाऊ शकेल. पेट्रोलऐवजी अनेक ठिकाणी अल्कोहोलचा वापर सुरू झालेला असेल. आफ्रिका खंडात दुष्काळ जरी वाढला असला, तरी लोकसंख्यानियंत्रणाने व तेथील पाळीव जनावरांच्या मांसामुळे खाण्याची व अन्नाची टंचाई भासणार नाही. दुष्काळाने मृत्यू बंद झालेले असतील. पाण्याची पातळी वाढल्याने बांगलादेश, गंगेच्या तोंडाजवळील त्रिभुज प्रदेश, कच्छचे रण, केरळ व ओरिसाचा बराच भाग हा कायमचा पाण्याखाली गेलेला असेल. उन्हाळ्यामध्ये गंगेचा पूर हा स्थायी स्वरूपाची गोष्ट होऊ लागेल. वयाची नव्वदी गाठणे ही नित्याची बाब असल्याने हा मजकूर वाचलेले अनेकजण सत्तरी ओलांडलेली असूनही कामामध्ये व्यग्र असतील व त्यांच्या ताब्येतीही अगदी उत्तम असतील. निवृत्तीचे वय त्या वेळी बहुधा पंचाहत्तर असेल. विविध शहरांमध्ये शंभरमजली इमारतीवजा छोटी गावेच उभी असून तेथे राहणाऱ्यांचा 'दुसऱ्या अशाच गावांशी', क्वचित प्रत्यक्ष संबंध येत असेल; तर घर, शाळा, दुकान, पार्क, थिएटर, ऑफिस सर्व काही एकाच 'गावा'त असल्याने फक्त मजले बदलण्याचाच प्रश्न दिवसाकाठी वरचेवर येत राहील. या बहुउद्देशीय प्रचंड इमारतींचा विजेचा पुरवठा सर्वस्वी सूर्यऊर्जेपासून होत असल्याने भल्यामोठय़ा तारांचे जाळे सार्‍या शहरभर पसरवण्याची गरजच राहणार नाही. त्याचप्रमाणे दळणवळणासाठी थेट उपग्रहाद्वारेच दळणवळण साधने जात असल्याने टेलिफोन, टीव्ही केबल टीव्ही इत्यादींच्याही तारांचे जंजाळ कुठे आढळणार नाही. कागदी वृत्तपत्र हा प्रकार बंद झालेला असून आवडीचे वृत्तपत्र आयपॅडच्या पडद्यावरच वाचले जाईल.

५० वर्षांचा काळ मानवी जीवनात फार मोठा आहे. पण शास्त्राच्या प्रगतीच्या दृष्टीने तो अगदीच थोडा कालावधी आहे. त्यातूनही विसाव्या शतकातील प्रगतीचा वेग सर्वांनाच भोवंड आणणारा आहे. ५० वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्या काळी आजच्या घडणाऱ्या अनेक गोष्टींची शक्यता तर सोडाच, पण स्वप्नेही कोणी पाहिली नव्हती. मग अजून ५० वर्षांनी होणारी प्रगती कशी असेल, याचा अंदाज बांधायला तर काहीच हरकत नसावी, नाही काय ?

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
उत्तर लिहिले · 10/12/2018
कर्म · 569245
0

पुढील ५० वर्षांमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान, सामाजिक बदल, आणि पर्यावरणातील बदलांमुळे जग मोठ्या प्रमाणात बदलू शकते. खाली काही संभाव्य बदल दिले आहेत:

तंत्रज्ञान (Technology):
  • कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence): AI चा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढेल, ज्यामुळे ऑटोमेशन (Automation) आणि डेटा विश्लेषण (Data analysis) अधिक सोपे होईल.
  • रोबोटिक्स (Robotics): रोबोट्सचा वापर उत्पादन, आरोग्यसेवा आणि घरांमध्ये वाढेल.
  • बायोटेक्नोलॉजी (Biotechnology): मानवी आरोग्य सुधारण्यासाठी नवीन उपचार पद्धती आणि औषधे विकसित होतील.
  • नॅनो टेक्नोलॉजी (Nanotechnology): नॅनो टेक्नोलॉजीमुळे मटेरियल सायन्स (Material science) आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये (Electronics) मोठी प्रगती होईल.
पर्यावरण (Environment):
  • हवामान बदल (Climate Change): हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्ती वाढू शकतात, ज्यामुळे शेती आणि पाण्यावर परिणाम होईल.
  • नवीकरणीय ऊर्जा (Renewable Energy): सौर ऊर्जा (Solar energy) आणि पवन ऊर्जा (Wind energy) यांसारख्या पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर वाढेल.
  • पर्यावरण संरक्षण (Environmental conservation): प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी अधिक उपाययोजना केल्या जातील.
सामाजिक बदल (Social Changes):
  • शहरीकरण (Urbanization): शहरांची वाढ होईल, ज्यामुळे ग्रामीण भागातून शहरांकडे लोकांचे स्थलांतर वाढेल.
  • लोकसंख्या बदल (Demographic Changes): जगाची लोकसंख्या वाढेल आणि वृद्ध लोकांची संख्या देखील वाढेल.
  • शिक्षण (Education): ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढेल आणि शिक्षणाच्या पद्धतींमध्ये बदल होतील.
आरोग्य (Health):
  • आरोग्य सेवा (Healthcare): आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि तंत्रज्ञानावर आधारित असतील.
  • आयुष्यमान (Life expectancy): लोकांचे सरासरी आयुष्यमान वाढेल, ज्यामुळे वृद्धांची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरेल.

हे सर्व बदल एकत्रितपणे जगाला अधिकConnected, Smart आणि Sustainable बनवतील.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1620

Related Questions

पाऊस पडण्याबद्दल कोणते मंदिर सूचना देते?
प्राक्कलन म्हणजे काय?
महाराष्ट्र सैनिक मध्यम मौसम विषय?
पाऊस कधी पडणार?
पाऊस कधी पडेल?
यंदा पाऊस पडण्याची हवामान खात्याने कोणती तारीख दिली आहे?
या वर्षी पाऊस कोणत्या महिन्यात येण्याची शक्यता आहे?