
अंदाज
3
Answer link
⭕. अदभूत! भारतातील हे मंदिर ७ दिवस अगोदर देते पाऊस येण्याचे संकेत! ⭕
े कानपूरच्या जनपथमधील जगन्नाथ देवांचे मंदिर! जे एका अनोख्या विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे. ह्या मंदिराचे वेगळेपण असे आहे की, हे मंदिर पाऊसयेण्याची सूचना ७ दिवस आधीच देते.तुमचा यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही, पण ही अगदी खरी गोष्ट आहे!
जगन्नाथ देवांचे हे मंदिर कानपूर मधील जनपथच्या भीतरगाव विकासखंड मुख्यालय पासून तीन किलोमीटरवर बेंहटा गावात आहे. असे म्हटले जाते की, ह्या मंदिराचे हे वैशिष्ट्य आहे, की पाऊस येण्याच्या ७ दिवस अगोदर ह्याच्या छतावरून पावसाचे काही थेंब आपोआप पडायला सुरवात होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट, हे रहस्य जाणून घेण्यासाठी खूप वेळा प्रयत्न करण्यात आले आहेत. पण या मंदिराचे रहस्य पुरातत्व खात्यालाही उलगडता आलेले नाही.एवढंच नाही, माहित पडले आहे की, मंदिराचा शेवटचा जीर्णोद्धार ११ व्या शतकात झाला होता. त्याच्या आधी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला होता हे अजूनही माहित झालेले नाही. पाऊस येण्याची माहिती आधीच समजत असल्याने येथील शेतकऱ्यांना मात्र खूप फायदा होतो.
ह्या मंदिरात भगवान जगन्नाथ,बलदेव आणि बहिण सुभद्रा यांच्या काळ्या दगडाच्या मूर्ती स्थापन आहेत. तसेच सूर्य आणि पद्मनाभम देवांच्या मूर्ती देखील आहेत.मंदिराच्या भिंती १४ फुट रुंद आहेत. सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. या मंदिरातून तशीच रथयात्रा निघते जशी पुरी उडीसा मधील जगन्नाथ देवांच्या मंदिरातून निघते.मान्सूनचा पाऊस येण्याच्या एक आठवड्यापूर्वी ह्या मंदिराच्या गर्भ ग्रहच्या छतातून मान्सूनी दगडातून घनत्वाकारचे थेंब पडतात, जश्या प्रकारचा पाऊस पडणार आहे अगदी तसे. जसा पाऊस सुरु होतो तसा हा दगड सुकून जातो.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=495218004209461&id=100011637976439
मंदिराचा आकार बौद्ध मठाप्रमाणे आहे. त्यामुळे लोक मानतात की, हे मंदिर सम्राट अशोकाने बनवले असेल,परंतु मंदिराच्या बाहेर असलेल्या मोर आणि चक्र यांच्या आकृती वरून काही लोकांना वाटते किह्या मंदिराचे निर्माण सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात झाले असावे.कधी कानपूरला भेट दिलीत तर नक्कीचया मंदिराचे दर्शन घ्या!!
आभार marathipijha
े कानपूरच्या जनपथमधील जगन्नाथ देवांचे मंदिर! जे एका अनोख्या विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे. ह्या मंदिराचे वेगळेपण असे आहे की, हे मंदिर पाऊसयेण्याची सूचना ७ दिवस आधीच देते.तुमचा यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही, पण ही अगदी खरी गोष्ट आहे!
जगन्नाथ देवांचे हे मंदिर कानपूर मधील जनपथच्या भीतरगाव विकासखंड मुख्यालय पासून तीन किलोमीटरवर बेंहटा गावात आहे. असे म्हटले जाते की, ह्या मंदिराचे हे वैशिष्ट्य आहे, की पाऊस येण्याच्या ७ दिवस अगोदर ह्याच्या छतावरून पावसाचे काही थेंब आपोआप पडायला सुरवात होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट, हे रहस्य जाणून घेण्यासाठी खूप वेळा प्रयत्न करण्यात आले आहेत. पण या मंदिराचे रहस्य पुरातत्व खात्यालाही उलगडता आलेले नाही.एवढंच नाही, माहित पडले आहे की, मंदिराचा शेवटचा जीर्णोद्धार ११ व्या शतकात झाला होता. त्याच्या आधी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला होता हे अजूनही माहित झालेले नाही. पाऊस येण्याची माहिती आधीच समजत असल्याने येथील शेतकऱ्यांना मात्र खूप फायदा होतो.
ह्या मंदिरात भगवान जगन्नाथ,बलदेव आणि बहिण सुभद्रा यांच्या काळ्या दगडाच्या मूर्ती स्थापन आहेत. तसेच सूर्य आणि पद्मनाभम देवांच्या मूर्ती देखील आहेत.मंदिराच्या भिंती १४ फुट रुंद आहेत. सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. या मंदिरातून तशीच रथयात्रा निघते जशी पुरी उडीसा मधील जगन्नाथ देवांच्या मंदिरातून निघते.मान्सूनचा पाऊस येण्याच्या एक आठवड्यापूर्वी ह्या मंदिराच्या गर्भ ग्रहच्या छतातून मान्सूनी दगडातून घनत्वाकारचे थेंब पडतात, जश्या प्रकारचा पाऊस पडणार आहे अगदी तसे. जसा पाऊस सुरु होतो तसा हा दगड सुकून जातो.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=495218004209461&id=100011637976439
मंदिराचा आकार बौद्ध मठाप्रमाणे आहे. त्यामुळे लोक मानतात की, हे मंदिर सम्राट अशोकाने बनवले असेल,परंतु मंदिराच्या बाहेर असलेल्या मोर आणि चक्र यांच्या आकृती वरून काही लोकांना वाटते किह्या मंदिराचे निर्माण सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात झाले असावे.कधी कानपूरला भेट दिलीत तर नक्कीचया मंदिराचे दर्शन घ्या!!
आभार marathipijha
16
Answer link
📙 *भूतलावरची येती पन्नास वर्षे* 📙
************************************
५० वर्षांनी काय घडेल, असा प्रश्न विचारला असता अनेकांचे अनेक उत्तरे येतील. सत्ताधारी स्वतःच्या सत्तेवरच्या पुढच्या पिढीबद्दल बोलेल, ज्योतिषी ग्रहांच्या युत्यांची गणिते मांडेल, शेतकरी कमी पडणाऱ्या पाण्याची चिंता करेल, तर सामान्य वाचक नातवाच्या अॅडमिशनची चिंता व्यक्त करेल !
कोणताही शास्त्रज्ञ मात्र या प्रश्नाकडे अत्यंत गंभीरपणे बघून नक्कीच विचारात गढून जाईल. त्याची कारणे तशीच आहेत. औद्योगिक प्रगतीचा वेग, त्यातून निर्माण होणारे रासायनिक प्रदूषणाचे प्रश्न, शहरातील बदलती राहणीची पद्धती, शेती, पाणीपुरवठा या विविध बाबींनी या प्रश्नाला इतके गंभीर स्वरूप आले आहे की कोणीही शास्त्रज्ञ या प्रश्नाला लगेच काहीच उत्तर देऊ शकणार नाही. एकमेकांत विचित्रपणे गुंतलेले असंख्य प्रश्न या पन्नास वर्षात काय काय घडणार आहे, याचे ठोक स्वरूप समोर येऊ देत नाहीत.
प्रथम सध्याचे भीषण स्वरूपाचे प्रश्न कोणते, याची केवळ यादी बघू या -
१. पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण.
१८५० साली हे प्रमाण २६५ पार्टस पर मिलियन किंवा पीपीएम होते, तर १९८८ साली नासाने केलेल्या मोजणीत ते ३५० पीपीएम इतके वाढले आहे. यामुळे पृथ्वीवरील तापमान १ अंश फॅरनहाइटने वाढ झाली आहे. असेच प्रमाण वाढत गेले, तर ५० वर्षांनी ४ अंश फॅरनहाइटने तापमान वाढेल, असा प्राथमिक अंदाज आहे.
२. सीएफसी किंवा क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोनचा थर कमी होत आहे. सूर्याच्या अतिनील किरणांना पृथ्वीवर प्रवेश करायला त्यामुळे जास्त संधी मिळणार आहे. ओझोनच्या थराने या किरणांपासून आपल्याला संरक्षण मिळत असते. याखेरीज पृथ्वीवरील तापमान वाढण्यास कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाच्या जोडीला ही बाब मदतच करेल, असे वाटते.
३. एकूण तापमान वाढ झाल्यास ध्रुवीय बर्फसाठा वितळून समुद्र पातळी किमान पाच फुटांनी वाढण्याची शक्यता उद्भवते. मुळात जगातील सर्व बंदरे समुद्रपातळीलाच असल्याने पाच फुटांनी वाढलेली पातळी अनेक मोठ्या औद्योगिक शहरात हलकल्लोळ माजवेल. तसेच जगातील अनेक बेटे व बेटसदृश देश नष्टच होण्याची शक्यता आहे. उदारणार्थ आपल्या जवळची मालदीव बेटे.
४. लोकसंख्यावाढीने सध्याच जगाला हैराण केले आहे. पण हा प्रश्न ५० वर्षांनी वेगळ्या पद्धतीने सुटेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. एका ठरावीक काळाने म्हणजे अजून चाळीसएक वर्षांनी जगाची लोकसंख्या स्थिरावेल.
५. अन्नधान्य, रोगराई प्रश्न दुय्यम राहून एड्सचा प्रसार हा प्रश्न मात्र भयानकरित्या समोर उभा ठाकणार आहे. अॅक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम हा प्रकार नवनवीन विषाणूंच्या स्वरुपात पृथ्वीवर ठाण मांडून राहणार आहे, असे दिसते.
या प्रश्नांच्या अनुषंगाने व सध्याची आपली संशोधनातील गती बघता काय घडेल, याचा एक ओझरता आराखडा समोर येतो. त्यानुसार ५० वर्षांनी :
जेनेटिक्समधील संशोधन खूपच प्रगत होत जाईल. सर्व प्रकारची बियाणे ही रोगराईला तोंड देण्यास समर्थ असतील, त्यामुळे रासायनिक औषधे फवारे मारणे बंद होईल. धान्योत्पादन दरवर्षी गरजेप्रमाणे केले जाऊ शकेल. पेट्रोलऐवजी अनेक ठिकाणी अल्कोहोलचा वापर सुरू झालेला असेल. आफ्रिका खंडात दुष्काळ जरी वाढला असला, तरी लोकसंख्यानियंत्रणाने व तेथील पाळीव जनावरांच्या मांसामुळे खाण्याची व अन्नाची टंचाई भासणार नाही. दुष्काळाने मृत्यू बंद झालेले असतील. पाण्याची पातळी वाढल्याने बांगलादेश, गंगेच्या तोंडाजवळील त्रिभुज प्रदेश, कच्छचे रण, केरळ व ओरिसाचा बराच भाग हा कायमचा पाण्याखाली गेलेला असेल. उन्हाळ्यामध्ये गंगेचा पूर हा स्थायी स्वरूपाची गोष्ट होऊ लागेल. वयाची नव्वदी गाठणे ही नित्याची बाब असल्याने हा मजकूर वाचलेले अनेकजण सत्तरी ओलांडलेली असूनही कामामध्ये व्यग्र असतील व त्यांच्या ताब्येतीही अगदी उत्तम असतील. निवृत्तीचे वय त्या वेळी बहुधा पंचाहत्तर असेल. विविध शहरांमध्ये शंभरमजली इमारतीवजा छोटी गावेच उभी असून तेथे राहणाऱ्यांचा 'दुसऱ्या अशाच गावांशी', क्वचित प्रत्यक्ष संबंध येत असेल; तर घर, शाळा, दुकान, पार्क, थिएटर, ऑफिस सर्व काही एकाच 'गावा'त असल्याने फक्त मजले बदलण्याचाच प्रश्न दिवसाकाठी वरचेवर येत राहील. या बहुउद्देशीय प्रचंड इमारतींचा विजेचा पुरवठा सर्वस्वी सूर्यऊर्जेपासून होत असल्याने भल्यामोठय़ा तारांचे जाळे सार्या शहरभर पसरवण्याची गरजच राहणार नाही. त्याचप्रमाणे दळणवळणासाठी थेट उपग्रहाद्वारेच दळणवळण साधने जात असल्याने टेलिफोन, टीव्ही केबल टीव्ही इत्यादींच्याही तारांचे जंजाळ कुठे आढळणार नाही. कागदी वृत्तपत्र हा प्रकार बंद झालेला असून आवडीचे वृत्तपत्र आयपॅडच्या पडद्यावरच वाचले जाईल.
५० वर्षांचा काळ मानवी जीवनात फार मोठा आहे. पण शास्त्राच्या प्रगतीच्या दृष्टीने तो अगदीच थोडा कालावधी आहे. त्यातूनही विसाव्या शतकातील प्रगतीचा वेग सर्वांनाच भोवंड आणणारा आहे. ५० वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्या काळी आजच्या घडणाऱ्या अनेक गोष्टींची शक्यता तर सोडाच, पण स्वप्नेही कोणी पाहिली नव्हती. मग अजून ५० वर्षांनी होणारी प्रगती कशी असेल, याचा अंदाज बांधायला तर काहीच हरकत नसावी, नाही काय ?
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
************************************
५० वर्षांनी काय घडेल, असा प्रश्न विचारला असता अनेकांचे अनेक उत्तरे येतील. सत्ताधारी स्वतःच्या सत्तेवरच्या पुढच्या पिढीबद्दल बोलेल, ज्योतिषी ग्रहांच्या युत्यांची गणिते मांडेल, शेतकरी कमी पडणाऱ्या पाण्याची चिंता करेल, तर सामान्य वाचक नातवाच्या अॅडमिशनची चिंता व्यक्त करेल !
कोणताही शास्त्रज्ञ मात्र या प्रश्नाकडे अत्यंत गंभीरपणे बघून नक्कीच विचारात गढून जाईल. त्याची कारणे तशीच आहेत. औद्योगिक प्रगतीचा वेग, त्यातून निर्माण होणारे रासायनिक प्रदूषणाचे प्रश्न, शहरातील बदलती राहणीची पद्धती, शेती, पाणीपुरवठा या विविध बाबींनी या प्रश्नाला इतके गंभीर स्वरूप आले आहे की कोणीही शास्त्रज्ञ या प्रश्नाला लगेच काहीच उत्तर देऊ शकणार नाही. एकमेकांत विचित्रपणे गुंतलेले असंख्य प्रश्न या पन्नास वर्षात काय काय घडणार आहे, याचे ठोक स्वरूप समोर येऊ देत नाहीत.
प्रथम सध्याचे भीषण स्वरूपाचे प्रश्न कोणते, याची केवळ यादी बघू या -
१. पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण.
१८५० साली हे प्रमाण २६५ पार्टस पर मिलियन किंवा पीपीएम होते, तर १९८८ साली नासाने केलेल्या मोजणीत ते ३५० पीपीएम इतके वाढले आहे. यामुळे पृथ्वीवरील तापमान १ अंश फॅरनहाइटने वाढ झाली आहे. असेच प्रमाण वाढत गेले, तर ५० वर्षांनी ४ अंश फॅरनहाइटने तापमान वाढेल, असा प्राथमिक अंदाज आहे.
२. सीएफसी किंवा क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोनचा थर कमी होत आहे. सूर्याच्या अतिनील किरणांना पृथ्वीवर प्रवेश करायला त्यामुळे जास्त संधी मिळणार आहे. ओझोनच्या थराने या किरणांपासून आपल्याला संरक्षण मिळत असते. याखेरीज पृथ्वीवरील तापमान वाढण्यास कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाच्या जोडीला ही बाब मदतच करेल, असे वाटते.
३. एकूण तापमान वाढ झाल्यास ध्रुवीय बर्फसाठा वितळून समुद्र पातळी किमान पाच फुटांनी वाढण्याची शक्यता उद्भवते. मुळात जगातील सर्व बंदरे समुद्रपातळीलाच असल्याने पाच फुटांनी वाढलेली पातळी अनेक मोठ्या औद्योगिक शहरात हलकल्लोळ माजवेल. तसेच जगातील अनेक बेटे व बेटसदृश देश नष्टच होण्याची शक्यता आहे. उदारणार्थ आपल्या जवळची मालदीव बेटे.
४. लोकसंख्यावाढीने सध्याच जगाला हैराण केले आहे. पण हा प्रश्न ५० वर्षांनी वेगळ्या पद्धतीने सुटेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. एका ठरावीक काळाने म्हणजे अजून चाळीसएक वर्षांनी जगाची लोकसंख्या स्थिरावेल.
५. अन्नधान्य, रोगराई प्रश्न दुय्यम राहून एड्सचा प्रसार हा प्रश्न मात्र भयानकरित्या समोर उभा ठाकणार आहे. अॅक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम हा प्रकार नवनवीन विषाणूंच्या स्वरुपात पृथ्वीवर ठाण मांडून राहणार आहे, असे दिसते.
या प्रश्नांच्या अनुषंगाने व सध्याची आपली संशोधनातील गती बघता काय घडेल, याचा एक ओझरता आराखडा समोर येतो. त्यानुसार ५० वर्षांनी :
जेनेटिक्समधील संशोधन खूपच प्रगत होत जाईल. सर्व प्रकारची बियाणे ही रोगराईला तोंड देण्यास समर्थ असतील, त्यामुळे रासायनिक औषधे फवारे मारणे बंद होईल. धान्योत्पादन दरवर्षी गरजेप्रमाणे केले जाऊ शकेल. पेट्रोलऐवजी अनेक ठिकाणी अल्कोहोलचा वापर सुरू झालेला असेल. आफ्रिका खंडात दुष्काळ जरी वाढला असला, तरी लोकसंख्यानियंत्रणाने व तेथील पाळीव जनावरांच्या मांसामुळे खाण्याची व अन्नाची टंचाई भासणार नाही. दुष्काळाने मृत्यू बंद झालेले असतील. पाण्याची पातळी वाढल्याने बांगलादेश, गंगेच्या तोंडाजवळील त्रिभुज प्रदेश, कच्छचे रण, केरळ व ओरिसाचा बराच भाग हा कायमचा पाण्याखाली गेलेला असेल. उन्हाळ्यामध्ये गंगेचा पूर हा स्थायी स्वरूपाची गोष्ट होऊ लागेल. वयाची नव्वदी गाठणे ही नित्याची बाब असल्याने हा मजकूर वाचलेले अनेकजण सत्तरी ओलांडलेली असूनही कामामध्ये व्यग्र असतील व त्यांच्या ताब्येतीही अगदी उत्तम असतील. निवृत्तीचे वय त्या वेळी बहुधा पंचाहत्तर असेल. विविध शहरांमध्ये शंभरमजली इमारतीवजा छोटी गावेच उभी असून तेथे राहणाऱ्यांचा 'दुसऱ्या अशाच गावांशी', क्वचित प्रत्यक्ष संबंध येत असेल; तर घर, शाळा, दुकान, पार्क, थिएटर, ऑफिस सर्व काही एकाच 'गावा'त असल्याने फक्त मजले बदलण्याचाच प्रश्न दिवसाकाठी वरचेवर येत राहील. या बहुउद्देशीय प्रचंड इमारतींचा विजेचा पुरवठा सर्वस्वी सूर्यऊर्जेपासून होत असल्याने भल्यामोठय़ा तारांचे जाळे सार्या शहरभर पसरवण्याची गरजच राहणार नाही. त्याचप्रमाणे दळणवळणासाठी थेट उपग्रहाद्वारेच दळणवळण साधने जात असल्याने टेलिफोन, टीव्ही केबल टीव्ही इत्यादींच्याही तारांचे जंजाळ कुठे आढळणार नाही. कागदी वृत्तपत्र हा प्रकार बंद झालेला असून आवडीचे वृत्तपत्र आयपॅडच्या पडद्यावरच वाचले जाईल.
५० वर्षांचा काळ मानवी जीवनात फार मोठा आहे. पण शास्त्राच्या प्रगतीच्या दृष्टीने तो अगदीच थोडा कालावधी आहे. त्यातूनही विसाव्या शतकातील प्रगतीचा वेग सर्वांनाच भोवंड आणणारा आहे. ५० वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्या काळी आजच्या घडणाऱ्या अनेक गोष्टींची शक्यता तर सोडाच, पण स्वप्नेही कोणी पाहिली नव्हती. मग अजून ५० वर्षांनी होणारी प्रगती कशी असेल, याचा अंदाज बांधायला तर काहीच हरकत नसावी, नाही काय ?
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
0
Answer link
प्राक्कलन म्हणजे भविष्यात अपेक्षित असलेल्या खर्चाचा किंवा उत्पन्नाचा अंदाज.
हे अंदाज आकडेवारीवर आधारित असतात. प्राक्कलन तयार करण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात, जसे की ऐतिहासिक डेटा विश्लेषण, ट्रेंड विश्लेषण आणि मॉडेलिंग.
प्राक्कलनाचे काही उपयोग:
- अर्थसंकल्प तयार करणे.
- गुंतवणुकीचे निर्णय घेणे.
- व्यवसायाचे नियोजन करणे.
- धोरण ठरवणे.
प्राक्कलनाचे प्रकार:
- खर्च प्राक्कलन
- उत्पन्न प्राक्कलन
- विक्री प्राक्कलन
- रोख प्रवाह प्राक्कलन
प्राक्कलन हे एक महत्त्वाचे साधन आहे जे व्यक्ती आणि संस्थांना चांगले निर्णय घेण्यास मदत करते.
5
Answer link
मित्रा, तुला जो प्रश्न सतावतो आहे तोच प्रश्न सध्या सर्वांना सतावतो आहे, याचे उत्तर ना हवामान खात्याकडे आहे ना सरकारकडे.
7
Answer link
आकाशातून पडणारा पाऊस हा फारच अनियमित असतो. तो कोठे, किती व कधी पडेल, या प्रश्नांची उत्तरे देणे कठीण आहे. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात पडणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तवणे, ही आणखीनच कठीण बाब आहे, असे या क्षेत्रातले जाणकार म्हणतात. पर्जन्यमापकाच्या मदतीने चोवीस तासांतील, महिन्यातील, वर्षभरातील पाऊस मोजला जातो.
दरवर्षी एखाद्या ठिकाणी पडणारा पाऊस हा सारखा नसतो. साधारणत: तीस ते पस्तीस वर्षांच्या वार्षकि पर्जन्यमानावरून सरासरी वार्षकि पावसाचे प्रमाण काढले जाते. ज्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, त्याला तुटीचे आणि ज्या वर्षी जास्त पाऊस पडतो, त्याला चांगल्या पावसाचे वर्ष संबोधले जाते. ज्या वर्षी सरासरीइतकाच पाऊस पडतो, त्याला पावसाचे सर्वसाधारण वर्ष म्हटले जाते.
भारतात वेगवेगळ्या प्रदेशांत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण फारच असमान आहे. ईशान्य भारतात चेरापुंजी येथे पडणाऱ्या पावसाची वार्षकि सरासरी १२००० मिलिमीटरच्या आसपास आहे, तर देशाच्या वायव्य भागात राजस्थानमध्ये पावसाची सरासरी १०० मिलिमीटरच्या जवळपास आहे.
पाऊस पडणे ही पूर्णत: नसíगक प्रक्रिया आहे. पावसाने कुठे आणि किती पडावे, यावर आपले नियंत्रण नाही. पण पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी त्या त्या विभागात सरासरी पाऊस पडतो किती? याचे मोजमाप करणे आवश्यक आहेच पण जमिनीवर पडणारा पाऊस जातो कुठे? त्याची विभागणी कशी होते, याचेही मोजमाप करणे महत्त्वाचे ठरते.
जमिनीवर पडणारा पाऊस अनेक घटकांमध्ये विभागला जातो. पडणाऱ्या पावसाचा मोठा घटक हा बाष्पीभवन आहे. बाष्पीभवनामुळेच पाणी परत आकाशामध्ये जाते. त्यातील दुसरा महत्त्वाचा घटक जमिनीवरून वाहणाऱ्या पावसाचा आहे. याला अपधाव (रनऑफ) असे म्हटले जाते. तिसरा घटक जमिनीमध्ये मुरणारा आणि भूजलात रूपांत होणारा आहे. चवथा घटक हा पृष्ठभागावरील मातीच्या कणामध्ये अडकून राहणारा आहे. याला मातीची आद्र्रता (सॉइल मॉइश्चर) म्हटले जाते; आणि पाचवा घटक म्हणजे वातावरणातील आद्र्रता हा आहे. बाष्पीभवन या घटकामध्ये जमिनीतून, वनस्पतीद्वारे आणि जलसाठय़ातून होणाऱ्या पाण्याच्या ऱ्हासाचा समावेश असतो.
या पाचही घटकांचे प्रमाण हे भूस्तर रचना, मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, वृक्षाच्छादन, हवामान, इत्यादींवर अवलंबून असतो. बाष्पीभवनाद्वारे होणारा ऱ्हास पावसाच्या निम्म्याइतका असू शकतो.लवकरच पाऊस येईल आणि बलीराजासः सगळ्यांच्या चिंता दूर होतील अशी अशा बाळगूया.
दरवर्षी एखाद्या ठिकाणी पडणारा पाऊस हा सारखा नसतो. साधारणत: तीस ते पस्तीस वर्षांच्या वार्षकि पर्जन्यमानावरून सरासरी वार्षकि पावसाचे प्रमाण काढले जाते. ज्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, त्याला तुटीचे आणि ज्या वर्षी जास्त पाऊस पडतो, त्याला चांगल्या पावसाचे वर्ष संबोधले जाते. ज्या वर्षी सरासरीइतकाच पाऊस पडतो, त्याला पावसाचे सर्वसाधारण वर्ष म्हटले जाते.
भारतात वेगवेगळ्या प्रदेशांत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण फारच असमान आहे. ईशान्य भारतात चेरापुंजी येथे पडणाऱ्या पावसाची वार्षकि सरासरी १२००० मिलिमीटरच्या आसपास आहे, तर देशाच्या वायव्य भागात राजस्थानमध्ये पावसाची सरासरी १०० मिलिमीटरच्या जवळपास आहे.
पाऊस पडणे ही पूर्णत: नसíगक प्रक्रिया आहे. पावसाने कुठे आणि किती पडावे, यावर आपले नियंत्रण नाही. पण पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी त्या त्या विभागात सरासरी पाऊस पडतो किती? याचे मोजमाप करणे आवश्यक आहेच पण जमिनीवर पडणारा पाऊस जातो कुठे? त्याची विभागणी कशी होते, याचेही मोजमाप करणे महत्त्वाचे ठरते.
जमिनीवर पडणारा पाऊस अनेक घटकांमध्ये विभागला जातो. पडणाऱ्या पावसाचा मोठा घटक हा बाष्पीभवन आहे. बाष्पीभवनामुळेच पाणी परत आकाशामध्ये जाते. त्यातील दुसरा महत्त्वाचा घटक जमिनीवरून वाहणाऱ्या पावसाचा आहे. याला अपधाव (रनऑफ) असे म्हटले जाते. तिसरा घटक जमिनीमध्ये मुरणारा आणि भूजलात रूपांत होणारा आहे. चवथा घटक हा पृष्ठभागावरील मातीच्या कणामध्ये अडकून राहणारा आहे. याला मातीची आद्र्रता (सॉइल मॉइश्चर) म्हटले जाते; आणि पाचवा घटक म्हणजे वातावरणातील आद्र्रता हा आहे. बाष्पीभवन या घटकामध्ये जमिनीतून, वनस्पतीद्वारे आणि जलसाठय़ातून होणाऱ्या पाण्याच्या ऱ्हासाचा समावेश असतो.
या पाचही घटकांचे प्रमाण हे भूस्तर रचना, मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, वृक्षाच्छादन, हवामान, इत्यादींवर अवलंबून असतो. बाष्पीभवनाद्वारे होणारा ऱ्हास पावसाच्या निम्म्याइतका असू शकतो.लवकरच पाऊस येईल आणि बलीराजासः सगळ्यांच्या चिंता दूर होतील अशी अशा बाळगूया.
1
Answer link
6 जुन ...........................................................................................