2 उत्तरे
2
answers
एक दोन या अंकाचा शोध कोणी लावला?
4
Answer link
संख्या मोजणीसाठी वापरले जाणारे गणितीय एकक आहे.
प्राचीन काळातील भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक म्हटले आहे. हेच अंक म्हणजे (एक ते नऊआणि शून्य) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. शून्य ही भारताची जगाला देणगी आहे. "आसा' या वैदिक काळाच्या प्रारंभी असलेल्या वायव्य भारतात राहणाऱ्या भारतीय गणितज्ज्ञांनी सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. अंकाच्या स्थानानुसार त्याची किंमत बदलेल या 'आसा' यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा पद्धतीने लिहिलेले आकडे हिंदासा नावाने ओळखले जाऊ लागले. साधारणतः इ.स. ५०० च्या सुमारास आर्यभट्टकृत दशमान पद्धतीचा प्रसार झाला. शून्यासाठी ख या शब्दाचा वापर केला गेला. नंतर त्याला शून्य असे संबोधले गेले.
इंग्लिश पद्धतीत थाऊजंड, मिलियन, बिलियन, ट्रिलियन, क्वाड्रिलियन अशा एक हजाराच्या पटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत. भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक आहेत.
विविध कोशांमध्ये किंवा पुस्तकांत भारतीय दशमान पद्धतीनुसार आकडे खालीलप्रमाणे लिहिले जातात-
१ एक
१० दहा
१०० शंभर
१००० हजार
१०,०००दहा हजार
१०,००,०० लाख
१०,००,००० दहा लाख
१,००,००,००० कोटी
१०,००,००,००० दहा कोटी
१००,००,००,००० अब्ज
१० चा १० वा घात खर्व (दश अब्ज)
१० चा ११ वा घात निखर्व
१० चा १२ वा घात पद्म
१० चा १३ वा घात शंकु (नील)
१० चा १४ वा घात जलधी (दशनील)
१० चा १५ वा घात अंत्य
१० चा १६ वा घात मध्य
१० चा १७ वा घात परार्ध (शंख)
यातील अनेक शब्द आता वापरात नाहीत.
प्राचीन काळातील भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक म्हटले आहे. हेच अंक म्हणजे (एक ते नऊआणि शून्य) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. शून्य ही भारताची जगाला देणगी आहे. "आसा' या वैदिक काळाच्या प्रारंभी असलेल्या वायव्य भारतात राहणाऱ्या भारतीय गणितज्ज्ञांनी सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. अंकाच्या स्थानानुसार त्याची किंमत बदलेल या 'आसा' यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा पद्धतीने लिहिलेले आकडे हिंदासा नावाने ओळखले जाऊ लागले. साधारणतः इ.स. ५०० च्या सुमारास आर्यभट्टकृत दशमान पद्धतीचा प्रसार झाला. शून्यासाठी ख या शब्दाचा वापर केला गेला. नंतर त्याला शून्य असे संबोधले गेले.
इंग्लिश पद्धतीत थाऊजंड, मिलियन, बिलियन, ट्रिलियन, क्वाड्रिलियन अशा एक हजाराच्या पटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत. भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक आहेत.
विविध कोशांमध्ये किंवा पुस्तकांत भारतीय दशमान पद्धतीनुसार आकडे खालीलप्रमाणे लिहिले जातात-
१ एक
१० दहा
१०० शंभर
१००० हजार
१०,०००दहा हजार
१०,००,०० लाख
१०,००,००० दहा लाख
१,००,००,००० कोटी
१०,००,००,००० दहा कोटी
१००,००,००,००० अब्ज
१० चा १० वा घात खर्व (दश अब्ज)
१० चा ११ वा घात निखर्व
१० चा १२ वा घात पद्म
१० चा १३ वा घात शंकु (नील)
१० चा १४ वा घात जलधी (दशनील)
१० चा १५ वा घात अंत्य
१० चा १६ वा घात मध्य
१० चा १७ वा घात परार्ध (शंख)
यातील अनेक शब्द आता वापरात नाहीत.
0
Answer link
शून्याचा (०) आणि दशांश पद्धतीचा शोध प्राचीन भारतीय गणितज्ञांनी लावला.
परंतु 'एक' (१) आणि 'दोन' (२) या विशिष्ट संख्यांचा शोध कोणी लावला हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. कारण संख्या आणि त्यांची चिन्हे ही हजारो वर्षांच्या मानवी संस्कृतीच्या विकासानंतर उदयास आली आहेत.
अंकांची उत्क्रांती ही एका दीर्घ प्रक्रियेतून झाली आहे, ज्यामध्ये अनेक संस्कृती आणि गणितज्ञांचे योगदान आहे. त्यामुळे, 'एक' आणि 'दोन' चा शोध एखाद्या विशिष्ट व्यक्तीने लावला असे म्हणता येणार नाही.
अधिक माहितीसाठी: