3 उत्तरे
3
answers
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांविषयी माहिती मिळेल का?
7
Answer link
💥
*🙏डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा प्रेरणादायी प्रवास👏*
-------------------------------------
📖 _अब्दुल कलाम यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आणण्याचा व्यवसाय करीत. मुलाच्या काॅलेजच्या प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्या आत्याने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्या काॅलेजातून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले._
💫 _अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस 'जागतिक विद्यार्थी दिवस' म्हणून साजरा केला जातो. तसेच कलाम यांना भारत सररकारने 'पद्मविभूषण', 'पद्मभूषण' आणि १९९८ साली 'भारतरत्न' या सर्वोष्कृष्ट किताबानी सन्मानित केले होते._
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती आहे. भारताचा माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन अशा अनेक नावांनी त्यांना ओळखलं जातं. एका नावाड्याचा मुलगा, वैज्ञानिक आणि देशाचा राष्ट्रपती, कलामांची ही वाटचाल थक्क करणारी आहे.
डॉ. कलाम यांनी अॅरोनॉटिकल इंजिनीअर म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली असली तरी शाळेच्या दिवसात त्यांनी घराघरात पेपर टाकण्याचं काम केलं होतं. पेपर टाकण्यापासून देशाला शक्तीशाली देश बनवणं आणि त्यानंतर भारताचे राष्ट्रपती बनणं हे मोठं यश आहे.
🙏🏻 _*भारतरत्न, सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम*_
🎯 *भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आजही आपल्या प्रेरणादायी विचारांसाठी ओळखले जातात.* जर असं म्हटलं की, कलामांची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे भारतीयांच्या त्या पिढ्या आहेत ज्यांना त्यांनी स्वप्न पहाण्यासोबतच ती सत्यात उतरवून पुढे जाण्यास शिकवलं, तर वावगं ठरणार नाही.
👉 डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव *अवुल पाकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम* असे आहे. 27 जुलै 2015मध्ये शिलाँग मधील आयआयएम- शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम स्टेजवर कोसळले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जाणून घेऊयात त्यांचे काही प्रेरणादायी विचार. जे तुमच्यातील नकारात्म विचारांना बाहेर काढून तुमच्यातील सकारात्मक विचारांना प्रेरणा देतील...
🔸काळा रंग अशुभ समजला जातो. पण काळ्या रंगाचाच फळा अनेक विद्यार्थांचे भविष्य उज्वल करतो.
🔸अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधं आहेत.
🔸पावसात इतर पक्षी आपल्या संरक्षणासाठी आसरा शोधत असतात. पण गरूड मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्याही वरती जावून उडत असतो. आपली समस्या एकच असते, फक्त दृष्टीकोन वेगळा असतो.
🔸यशस्वी लोकांच्या किंवा त्यांच्या यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन कल्पना मिळतील.
🔸तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही. आणि तुमच्या सहभागासोबत तुम्ही कधीही अपयशी होणार नाही.
*🔹देशाच्या दोन मोठ्या यंत्रणांचे प्रमुख*
▪अब्दुल कलाम भारताच्या दोन मोठ्या यंत्रणांचे, अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)चे प्रमुख होते.
▪दोन्ही यंत्रणांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलं होतं.
▪भारताचं पहिलं रॉकेट एसएलव्ही-3 बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही) बनवण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.
▪त्याशिवाय भारताचं पहिलं क्षेपणास्त्र 'पृथ्वी' आणि त्यानंतर 'अग्नी' क्षेपणास्त्र बनवण्यातही डॉक्टर अब्दुल कलाम यांचं मोलाचं योगदान होतं.
*🔹अण्वस्त्र कार्यक्रमात भूमिका*
▪भारताने 1998 मध्ये जी अण्वस्त्र चाचणी केली होती, त्यातही डॉ. कलाम यांची भूमिका होती. त्यावेळी ते डीआरडीओचे प्रमुख होते.
▪भारताला शक्तीशाली देश बनवण्यात अब्दुल कलाम यांची मोठी भूमिका आहे.
▪जगातील मोजकेच राष्ट्राध्यक्ष असे असतील जे उच्चविद्याविभूषित असतील. जागतिक राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. ते मानवतावादी होते.
▪इतकंच नाही तर ते मृत्यूदंडाच्याविरोधात होते, विशेषत: न्यायालयामार्फत देण्यात येणारी शिक्षा.
*🔹त्यांच्यासारखा दुसरा होणं अशक्य*
▪कलाम हे त्यांच्यासारखे एकमेव होते. त्यांच्यासारखं दुसरं होणं अशक्य आहे. मुलांशी असलेलं त्यांचं नातं हे अवर्णनीय होतं.
▪ते मोठे वैज्ञानिक तर होतेच पण राष्ट्रपती बनल्यानंतरही त्यांना मुलांमध्ये रमत होते. ते मुलांसोबत लहान मुलांसारखंच बोलत असत.
▪डॉ. कलाम जन्माने मुस्लिम होते, पण त्यांचा जन्म हिंदूबहुल रामेश्वरम शहरात झाला होता.
▪कलाम यांचं 'अग्निपंख' हे पुस्तक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या भाषणांनी ते तरुणांमध्ये नवी उमेद जागी करत.
▪ज्यांचे विचार थोर असतील आणि विज्ञानात रस असेल, तेच असं कार्य करु शकतात.
*_👌भारतरत्न' अब्दुल कलाम यांचे 10 विचार; जगण्याचा नवा मंत्र देणारे!_*
◼यशस्वी लोकांच्या किंवा त्यांच्या यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन कल्पना मिळतील.
◼काळा रंग अशुभ समजला जातो. पण काळ्या रंगाचाच फळा अनेक विद्यार्थांचे भविष्य उजळवतो.
◼अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधं आहेत.
◼आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात, त्या तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणूनच, कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कणखर आहात.
◼शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.
◼झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून स्वप्नं ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपूच देत नाही.
◼पावसात इतर पक्षी आपल्या संरक्षणासाठी आसरा शोधत असतात. गरूड मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्याही वर जाऊन उडत असतो. आपली समस्या एकच असते, फक्त दृष्टिकोन वेगळा असतो.
◼तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचं भविष्य बदलतील.
◼तुमच्या पहिल्या यशानंतर अजिबात थांबू नका. कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात.
◼आकाशाकडे बघा, आपण एकटे अजिबात नाही. संपूर्ण ब्रम्हांड तुमचा मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देतं जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो
खालील लिंक उघडून पहा.
डॉ.ए पी जे अब्दुल कलाम माहिती?
💐 *डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन*
*🙏डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा प्रेरणादायी प्रवास👏*
-------------------------------------
📖 _अब्दुल कलाम यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आणण्याचा व्यवसाय करीत. मुलाच्या काॅलेजच्या प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्या आत्याने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्या काॅलेजातून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले._
💫 _अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस 'जागतिक विद्यार्थी दिवस' म्हणून साजरा केला जातो. तसेच कलाम यांना भारत सररकारने 'पद्मविभूषण', 'पद्मभूषण' आणि १९९८ साली 'भारतरत्न' या सर्वोष्कृष्ट किताबानी सन्मानित केले होते._
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती आहे. भारताचा माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन अशा अनेक नावांनी त्यांना ओळखलं जातं. एका नावाड्याचा मुलगा, वैज्ञानिक आणि देशाचा राष्ट्रपती, कलामांची ही वाटचाल थक्क करणारी आहे.
डॉ. कलाम यांनी अॅरोनॉटिकल इंजिनीअर म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली असली तरी शाळेच्या दिवसात त्यांनी घराघरात पेपर टाकण्याचं काम केलं होतं. पेपर टाकण्यापासून देशाला शक्तीशाली देश बनवणं आणि त्यानंतर भारताचे राष्ट्रपती बनणं हे मोठं यश आहे.
🙏🏻 _*भारतरत्न, सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम*_
🎯 *भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आजही आपल्या प्रेरणादायी विचारांसाठी ओळखले जातात.* जर असं म्हटलं की, कलामांची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे भारतीयांच्या त्या पिढ्या आहेत ज्यांना त्यांनी स्वप्न पहाण्यासोबतच ती सत्यात उतरवून पुढे जाण्यास शिकवलं, तर वावगं ठरणार नाही.
👉 डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव *अवुल पाकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम* असे आहे. 27 जुलै 2015मध्ये शिलाँग मधील आयआयएम- शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम स्टेजवर कोसळले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जाणून घेऊयात त्यांचे काही प्रेरणादायी विचार. जे तुमच्यातील नकारात्म विचारांना बाहेर काढून तुमच्यातील सकारात्मक विचारांना प्रेरणा देतील...
🔸काळा रंग अशुभ समजला जातो. पण काळ्या रंगाचाच फळा अनेक विद्यार्थांचे भविष्य उज्वल करतो.
🔸अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधं आहेत.
🔸पावसात इतर पक्षी आपल्या संरक्षणासाठी आसरा शोधत असतात. पण गरूड मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्याही वरती जावून उडत असतो. आपली समस्या एकच असते, फक्त दृष्टीकोन वेगळा असतो.
🔸यशस्वी लोकांच्या किंवा त्यांच्या यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन कल्पना मिळतील.
🔸तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही. आणि तुमच्या सहभागासोबत तुम्ही कधीही अपयशी होणार नाही.
*🔹देशाच्या दोन मोठ्या यंत्रणांचे प्रमुख*
▪अब्दुल कलाम भारताच्या दोन मोठ्या यंत्रणांचे, अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)चे प्रमुख होते.
▪दोन्ही यंत्रणांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलं होतं.
▪भारताचं पहिलं रॉकेट एसएलव्ही-3 बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही) बनवण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.
▪त्याशिवाय भारताचं पहिलं क्षेपणास्त्र 'पृथ्वी' आणि त्यानंतर 'अग्नी' क्षेपणास्त्र बनवण्यातही डॉक्टर अब्दुल कलाम यांचं मोलाचं योगदान होतं.
*🔹अण्वस्त्र कार्यक्रमात भूमिका*
▪भारताने 1998 मध्ये जी अण्वस्त्र चाचणी केली होती, त्यातही डॉ. कलाम यांची भूमिका होती. त्यावेळी ते डीआरडीओचे प्रमुख होते.
▪भारताला शक्तीशाली देश बनवण्यात अब्दुल कलाम यांची मोठी भूमिका आहे.
▪जगातील मोजकेच राष्ट्राध्यक्ष असे असतील जे उच्चविद्याविभूषित असतील. जागतिक राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. ते मानवतावादी होते.
▪इतकंच नाही तर ते मृत्यूदंडाच्याविरोधात होते, विशेषत: न्यायालयामार्फत देण्यात येणारी शिक्षा.
*🔹त्यांच्यासारखा दुसरा होणं अशक्य*
▪कलाम हे त्यांच्यासारखे एकमेव होते. त्यांच्यासारखं दुसरं होणं अशक्य आहे. मुलांशी असलेलं त्यांचं नातं हे अवर्णनीय होतं.
▪ते मोठे वैज्ञानिक तर होतेच पण राष्ट्रपती बनल्यानंतरही त्यांना मुलांमध्ये रमत होते. ते मुलांसोबत लहान मुलांसारखंच बोलत असत.
▪डॉ. कलाम जन्माने मुस्लिम होते, पण त्यांचा जन्म हिंदूबहुल रामेश्वरम शहरात झाला होता.
▪कलाम यांचं 'अग्निपंख' हे पुस्तक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या भाषणांनी ते तरुणांमध्ये नवी उमेद जागी करत.
▪ज्यांचे विचार थोर असतील आणि विज्ञानात रस असेल, तेच असं कार्य करु शकतात.
*_👌भारतरत्न' अब्दुल कलाम यांचे 10 विचार; जगण्याचा नवा मंत्र देणारे!_*
◼यशस्वी लोकांच्या किंवा त्यांच्या यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन कल्पना मिळतील.
◼काळा रंग अशुभ समजला जातो. पण काळ्या रंगाचाच फळा अनेक विद्यार्थांचे भविष्य उजळवतो.
◼अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधं आहेत.
◼आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात, त्या तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणूनच, कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कणखर आहात.
◼शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.
◼झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून स्वप्नं ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपूच देत नाही.
◼पावसात इतर पक्षी आपल्या संरक्षणासाठी आसरा शोधत असतात. गरूड मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्याही वर जाऊन उडत असतो. आपली समस्या एकच असते, फक्त दृष्टिकोन वेगळा असतो.
◼तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचं भविष्य बदलतील.
◼तुमच्या पहिल्या यशानंतर अजिबात थांबू नका. कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात.
◼आकाशाकडे बघा, आपण एकटे अजिबात नाही. संपूर्ण ब्रम्हांड तुमचा मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देतं जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो
खालील लिंक उघडून पहा.
डॉ.ए पी जे अब्दुल कलाम माहिती?
💐 *डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन*
4
Answer link
डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (ऑक्टोबर १५, इ.स. १९३१ - २७ जुलै, इ.स. २०१५) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७[१]) होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.
ए.पी.जे. अब्दुल कलाम
पूर्ण नावअवूल पाकीर ज़ैनुलाबदिन अब्दुल कलामजन्म१५ ऑक्टोबर, १९३१
रामेश्वरमृत्यू२७ जुलै, २०१५ (वय ८३)
शिलाँगनागरिकत्वभारतीयराष्ट्रीयत्वभारतीयधर्मइस्लामकार्यसंस्थासंरक्षण संशोधन आणि विकास संस्थाप्रशिक्षणमद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीख्यातीशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपतिपुरस्कारपद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्नवडीलजैनुलाबदिन अब्दुल
शिक्षणसंपादन करा
त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.
कार्यसंपादन करा
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
गौरवसंपादन करा
अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
Year of Award or HonorName of Award or HonorAwarding Organization१९८१पद्मभूषणभारत सरकार [२][३]१९९०पद्मविभूषणभारत सरकार [२][३]१९९७भारतरत्नभारत सरकार[३][४]१९९७इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारभारत सरकार [३]१९९८वीर सावरकर पुरस्कारभारत सरकार२०००रामानुजम पुरस्कारमद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर[३]२००७किंग चार्ल्स (दुसरा) पदकब्रिटिश रॉयल सोसायटी[५][६]२००७डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवीवॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठ, U.K[७]२००८डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग (Honoris Causa)नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर[८]२००९हूवर पदकASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)[९]२००९आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कारअमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A[१०]२०१०डॉक्टर ऑफ इंजिनिरिंगवॉटरलू विद्यापीठ[११]२०११न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व.IEEE[१२]
डॉ. कलामांची कारकीर्दसंपादन करा

मार्क हॉपकिन्स आणि अब्दुल कलाम.
जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
शिक्षण : श्वार्ट्झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).
१९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
१९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
१९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
१९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
१९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
१९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
१९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
१९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
१९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
१९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
१९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
२५ नोव्हें. १९९८ : भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त.
२००१ : सेवेतून निवृत्त.
२००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.
कलामांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा
अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
इग्नाइटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); 'भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध' या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया - माय-ड्रीम
उन्नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)
एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन :
फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.
सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
टर्निंग पॉइंट्स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
टार्गेट ३ मिलियन (सहलेखक - सृजनपालसिंग)
ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक - अरुण तिवारी)
दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक - व्ही. पोतराज, मराठी अनुवाद - अशोक पाध्ये)
ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).
बियाँण्ड २०१० : अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक वाय.एस. राजन, मराठी अनुवाद-सकाळप्रकाशन)
स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस ( सहलेखक – अरुण तिवारी. मराठी अनुवाद : सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस – भारतीय प्रबोधनपर्व – वैभवशाली भारताची आगामी दिशा. अनुवादक : संजय माळी, बुकगंगा पब्लिकेशन्स ) अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक खूप छान आहे व त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण त्याला मत देऊ शकतो हे त्यातून समजते
ए.पी.जे. अब्दुल कलाम
पूर्ण नावअवूल पाकीर ज़ैनुलाबदिन अब्दुल कलामजन्म१५ ऑक्टोबर, १९३१
रामेश्वरमृत्यू२७ जुलै, २०१५ (वय ८३)
शिलाँगनागरिकत्वभारतीयराष्ट्रीयत्वभारतीयधर्मइस्लामकार्यसंस्थासंरक्षण संशोधन आणि विकास संस्थाप्रशिक्षणमद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीख्यातीशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपतिपुरस्कारपद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्नवडीलजैनुलाबदिन अब्दुल
शिक्षणसंपादन करा
त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.
कार्यसंपादन करा
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
गौरवसंपादन करा
अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
Year of Award or HonorName of Award or HonorAwarding Organization१९८१पद्मभूषणभारत सरकार [२][३]१९९०पद्मविभूषणभारत सरकार [२][३]१९९७भारतरत्नभारत सरकार[३][४]१९९७इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारभारत सरकार [३]१९९८वीर सावरकर पुरस्कारभारत सरकार२०००रामानुजम पुरस्कारमद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर[३]२००७किंग चार्ल्स (दुसरा) पदकब्रिटिश रॉयल सोसायटी[५][६]२००७डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवीवॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठ, U.K[७]२००८डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग (Honoris Causa)नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर[८]२००९हूवर पदकASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)[९]२००९आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कारअमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A[१०]२०१०डॉक्टर ऑफ इंजिनिरिंगवॉटरलू विद्यापीठ[११]२०११न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व.IEEE[१२]
डॉ. कलामांची कारकीर्दसंपादन करा

मार्क हॉपकिन्स आणि अब्दुल कलाम.
जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
शिक्षण : श्वार्ट्झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).
१९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
१९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
१९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
१९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
१९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
१९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
१९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
१९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
१९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
१९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
१९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
२५ नोव्हें. १९९८ : भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त.
२००१ : सेवेतून निवृत्त.
२००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.
कलामांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा
अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
इग्नाइटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); 'भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध' या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया - माय-ड्रीम
उन्नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)
एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन :
फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.
सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
टर्निंग पॉइंट्स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
टार्गेट ३ मिलियन (सहलेखक - सृजनपालसिंग)
ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक - अरुण तिवारी)
दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक - व्ही. पोतराज, मराठी अनुवाद - अशोक पाध्ये)
ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).
बियाँण्ड २०१० : अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक वाय.एस. राजन, मराठी अनुवाद-सकाळप्रकाशन)
स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस ( सहलेखक – अरुण तिवारी. मराठी अनुवाद : सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस – भारतीय प्रबोधनपर्व – वैभवशाली भारताची आगामी दिशा. अनुवादक : संजय माळी, बुकगंगा पब्लिकेशन्स ) अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक खूप छान आहे व त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण त्याला मत देऊ शकतो हे त्यातून समजते
0
Answer link
नक्कीच, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांविषयी माहिती खालीलप्रमाणे:
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे विचार:
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, ज्यांना 'भारताचे मिसाइल मॅन' म्हणून ओळखले जाते, ते एक महान शास्त्रज्ञ, शिक्षक आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांचे विचार आजही लोकांना प्रेरणा देतात.
1. शिक्षण आणि ज्ञान:
- शिक्षणाने माणसाला अधिक सक्षम बनवते.
- ज्ञान हे शक्ती आहे.
- सतत नवीन गोष्टी शिकत राहणे महत्त्वाचे आहे.
2. स्वप्ने आणि ध्येय:
- स्वप्ने ती नव्हे जी झोपेत पडतात, स्वप्ने ती आहेत जी तुम्हाला झोपू देत नाहीत.
- ध्येय निश्चित करा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा.
- ध्येय साध्य करण्यासाठी अपयश आले तरी निराश होऊ नका.
3. देशप्रेम आणि राष्ट्रनिर्माण:
- देशासाठी आपले जीवन समर्पित करा.
- राष्ट्रनिर्माणामध्ये सक्रिय सहभाग घ्या.
- भारत एक महासत्ता बनेल, असा विश्वास बाळगा.
4. विज्ञान आणि तंत्रज्ञान:
- विज्ञानाचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी करा.
- तंत्रज्ञानाचा विकास देशासाठी आवश्यक आहे.
- नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी तयार राहा.
5. नैतिकता आणि प्रामाणिकपणा:
- जीवन valuesणिकतेने जगा.
- आपल्या कामात प्रामाणिक राहा.
- नेहमी सत्य बोला.
Related Questions
कोंबडी शिवाय उरूस नाही....अन् भानगडी शिवाय पुरुष नाही.. हे व पु.काळे यांनी म्हंटले होते काय?
1 उत्तर