राजकारण संविधान व्यवस्थापन

भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

3 उत्तरे
3 answers

भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

7
भारताला १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच देशाच्या राज्यकारभारासाठी घटना समिती नेमण्याचे ठरले. त्याप्रमाणे २८ ऑगस्ट १९४७ रोजी महात्मा गांधी यांनी सत्यनारायण सिन्हा यांना बोलावून घेतले आणि घटनेचा मसुदा बनविणार्‍या आगामी समितीच्या सदस्यांच्या नावांचा कागद त्यांच्याकडे सुपूर्द केला. दुसर्‍याच दिवशी घटना समितीच्या बैठकीत गांधीजींचा संदर्भ देऊन सिन्हांनी मसुदा समिती सदस्य म्हणून सात नावांची घोषणा केली. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी व सर्व सदस्यांनी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कन्हैयालाल मुनशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मित्तल अणि डी.पी. खेतान या सात नावांना मान्यता दिली. ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेबांची एकमताने निवड झाली. त्यांनी त्याच दिवसापासून मसुदा समितीचे कामकाज सुरू केले.
उत्तर लिहिले · 10/10/2018
कर्म · 1160
0
सतेंद्र सिन्हा हे सुरवतीचे अध्यक्ष होते पण नंतर डॉ राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष झाले होते.
तसेच मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 85
0

भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते.

डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती देखील होते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5180

Related Questions

सन 1948 च्या राष्ट्रसंघ आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?
मानव अधिकाराचा जिनेवा करार 1949 सविस्तरपणे स्पष्ट करा?
मानो अधिकारांसह अधिकारासाठीच सार्क संघटनेचे कार्य?
संयुक्त राष्ट्र संघाची आमसभा सविस्तरपणे स्पष्ट करा?
संयुक्त राष्ट्रांची महासभा सविस्तरपणे स्पष्ट करा?
सन 1948 च्या राष्ट्रसंघ सनदेतील उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?
सन 1945 च्या राष्ट्रसंघ सनदेतील उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?