औषधे आणि आरोग्य
आजार
आरोग्य व उपाय
त्वचा रोग
आरोग्य
नागीण आजार कशामुळे होतो? त्यावरील घरगुती उपचार काय?
2 उत्तरे
2
answers
नागीण आजार कशामुळे होतो? त्यावरील घरगुती उपचार काय?
16
Answer link
कशामुळे होतो नागीण आजार ? जाणून घ्या त्यावरचे घरगुती उपचार
नागीण नावाच्या आजाराचे आयुर्वेदिक नाव विसर्प असे आहे. सापाप्रमाणे गती असलेला आजार म्हणजे विसर्प. आयुर्वेदानुसार पित्त वाढल्याने हा रोग होतो, खरेतर हा एक त्वचा रोग आहे.आधुनिक शास्त्रानुसार याचे नाव ‘हर्पिझ झोस्तर’ असे आहे. हा एक संसर्ग आहे. हा आजार मज्जातंतूच्या मार्गानुसार पसरत जा तो. आजार जसजसा वाढत जातो तसतशी नर्व रूट व्यस्त होत जाते, नर्वचा मार्ग पूर्ण झाला किंवा विळखा जर पूर्ण झाला तर आजार जास्तच बळावतो व माणूस दगावण्याचा धोका असतो म्हणून ही गैरसमजूत बोकाळली आहे.
हा आजार पूर्ण शरीरावर कुठेही होतो. जास्तकरून चेहरा छाती पोट व हात या अवयवांवर हा आढळतो. शरीरात कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती व पित्ताची वाढती मात्रा यांचे प्रतिक म्हणजेच नागीण होय. सततची जागरणे, पित्त वाढवणारा आहार,जेवणाच्या अनियमित वेळा,या सगळ्यांमुळे शरीरातलं पित्त वाढून नागिण होते. या रोगात खूप खाज व दाह जाणवतो. खाजेने अगदी त्रस्त व्हायला होते, ही खाज कमी होत नाही. नवीन शास्त्रानुसार यावर ‘असायक्लोवीर’ नावाचे औषध सांगितलेले आहे. याने आजार लगेच बारा होतो पण त्यानंतर बराच काळ दाह व खाज जाणवत राहते. याच कारणाने आयुर्वेदिक तज्ञांचे मतही विचारात घेतले जायला हवे.
जोपर्यंत शरीर पित्तापासून व दुषित रक्तापासून पूर्णपणे मुक्त होत नाही तोपर्यंत आजार बरा झाला असे म्हणता येणार नाही. आयुर्वेदात यावर रक्तमोक्षण, जालौवाकारक्षण असे काही उपाय सुचवले गेले आहेत. याने पित्त शुद्ध होऊन दाह कमी होतो. कः लेप व पंचकर्म केल्यानेही या आजारापासून सुटका मिळू शकते. तांदळाच्या पिठात दुर्वांचा लेप करून लावल्यास नागीण बरी होते. कोणतेही लेप वापरताना वैद्यकीय सल्ला घेतलेला चांगला.
http://aaosairam.blogspot.com
कांजिण्यांच्या विषाणूमुळे हा आजार पसरतो. कांजिण्या होऊन गेल्यानंतर काहींच्या शरीरात हे विषाणू तसेच राहिलेले असतात. काही वर्षानंतर हे विषाणू चेताराज्जुतून नसेतून पसरतात व त्वचेवर फोड तयार होतात. वाढत्या वयाबरोबर या आजाराची तीव्रता वाढते. म्हातारपणात नागिणीचा त्रास जास्त होतो. चेतातंतूच्या रेषेवर विषाणूंची वाढ होते, या जागेवर सुरुवातीला खूप वेदना होतात. नंतर तिकडची त्वचा लाल होते व फोडपण येतात. काही दिवसानंतर फोडांवर खपल्या धरतात. हे फोड नष्ट झाल्यानंतर वेदना थांबतात. काही वेळा वेदना काही काळ राहतात. याचे वाईट परिणाम तर होत नाहीत पण जर फोड डोळ्यात येत असतील तर नजर जाऊ शकते.
उपचार
या आजारावर असायक्लोवीर नावाचे गुणकारी औषध आहे. वेळेत इलाज सुरु केल्यास नागिण वेळीच बरी होऊ शकते. हे औषध महाग आहे. ज्याला आजार झाला आहे त्याला दिलासा द्यावा. जास्त दुखत असल्यास अस्पिरीन द्यावी. आजार लवकर बरा होतो. त्यानंतरही जर दुखत राहिले तर तज्ञांना दाखवावे.
काही आजाराची नावे ही त्याच्या स्वरूपानुसार, गतीप्रमाणे ठेवलेली असतात पण म्हणून त्याचा संबंध एखाद्या प्राण्याशी असतोच असे नाही. नागीण झाली म्हणजे तुम्ही एखाद्या नागाला मारले होते किंवा नागाची पूजा करायला हवी या सगळ्या अंधश्रद्धा आहेत.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗ संकलन: नितीन जाधव
║██║ स्रोत:- निसर्ग उपचार
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
*http://aaosairam.blogspot.com*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*
*!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!*
नागीण नावाच्या आजाराचे आयुर्वेदिक नाव विसर्प असे आहे. सापाप्रमाणे गती असलेला आजार म्हणजे विसर्प. आयुर्वेदानुसार पित्त वाढल्याने हा रोग होतो, खरेतर हा एक त्वचा रोग आहे.आधुनिक शास्त्रानुसार याचे नाव ‘हर्पिझ झोस्तर’ असे आहे. हा एक संसर्ग आहे. हा आजार मज्जातंतूच्या मार्गानुसार पसरत जा तो. आजार जसजसा वाढत जातो तसतशी नर्व रूट व्यस्त होत जाते, नर्वचा मार्ग पूर्ण झाला किंवा विळखा जर पूर्ण झाला तर आजार जास्तच बळावतो व माणूस दगावण्याचा धोका असतो म्हणून ही गैरसमजूत बोकाळली आहे.
हा आजार पूर्ण शरीरावर कुठेही होतो. जास्तकरून चेहरा छाती पोट व हात या अवयवांवर हा आढळतो. शरीरात कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती व पित्ताची वाढती मात्रा यांचे प्रतिक म्हणजेच नागीण होय. सततची जागरणे, पित्त वाढवणारा आहार,जेवणाच्या अनियमित वेळा,या सगळ्यांमुळे शरीरातलं पित्त वाढून नागिण होते. या रोगात खूप खाज व दाह जाणवतो. खाजेने अगदी त्रस्त व्हायला होते, ही खाज कमी होत नाही. नवीन शास्त्रानुसार यावर ‘असायक्लोवीर’ नावाचे औषध सांगितलेले आहे. याने आजार लगेच बारा होतो पण त्यानंतर बराच काळ दाह व खाज जाणवत राहते. याच कारणाने आयुर्वेदिक तज्ञांचे मतही विचारात घेतले जायला हवे.
जोपर्यंत शरीर पित्तापासून व दुषित रक्तापासून पूर्णपणे मुक्त होत नाही तोपर्यंत आजार बरा झाला असे म्हणता येणार नाही. आयुर्वेदात यावर रक्तमोक्षण, जालौवाकारक्षण असे काही उपाय सुचवले गेले आहेत. याने पित्त शुद्ध होऊन दाह कमी होतो. कः लेप व पंचकर्म केल्यानेही या आजारापासून सुटका मिळू शकते. तांदळाच्या पिठात दुर्वांचा लेप करून लावल्यास नागीण बरी होते. कोणतेही लेप वापरताना वैद्यकीय सल्ला घेतलेला चांगला.
http://aaosairam.blogspot.com
कांजिण्यांच्या विषाणूमुळे हा आजार पसरतो. कांजिण्या होऊन गेल्यानंतर काहींच्या शरीरात हे विषाणू तसेच राहिलेले असतात. काही वर्षानंतर हे विषाणू चेताराज्जुतून नसेतून पसरतात व त्वचेवर फोड तयार होतात. वाढत्या वयाबरोबर या आजाराची तीव्रता वाढते. म्हातारपणात नागिणीचा त्रास जास्त होतो. चेतातंतूच्या रेषेवर विषाणूंची वाढ होते, या जागेवर सुरुवातीला खूप वेदना होतात. नंतर तिकडची त्वचा लाल होते व फोडपण येतात. काही दिवसानंतर फोडांवर खपल्या धरतात. हे फोड नष्ट झाल्यानंतर वेदना थांबतात. काही वेळा वेदना काही काळ राहतात. याचे वाईट परिणाम तर होत नाहीत पण जर फोड डोळ्यात येत असतील तर नजर जाऊ शकते.
उपचार
या आजारावर असायक्लोवीर नावाचे गुणकारी औषध आहे. वेळेत इलाज सुरु केल्यास नागिण वेळीच बरी होऊ शकते. हे औषध महाग आहे. ज्याला आजार झाला आहे त्याला दिलासा द्यावा. जास्त दुखत असल्यास अस्पिरीन द्यावी. आजार लवकर बरा होतो. त्यानंतरही जर दुखत राहिले तर तज्ञांना दाखवावे.
काही आजाराची नावे ही त्याच्या स्वरूपानुसार, गतीप्रमाणे ठेवलेली असतात पण म्हणून त्याचा संबंध एखाद्या प्राण्याशी असतोच असे नाही. नागीण झाली म्हणजे तुम्ही एखाद्या नागाला मारले होते किंवा नागाची पूजा करायला हवी या सगळ्या अंधश्रद्धा आहेत.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗ संकलन: नितीन जाधव
║██║ स्रोत:- निसर्ग उपचार
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
*http://aaosairam.blogspot.com*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*
*!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!*
0
Answer link
नागीण (Herpes Zoster) हा 'व्हॅरिसेला-झोस्टर' नावाच्या विषाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. हा विषाणू लहानपणी कांजण्या (Chickenpox) झालेल्या व्यक्तीच्या शरीरात सुप्त अवस्थेत राहतो आणि काही वर्षांनंतर पुन्हा सक्रिय होऊन नागिणीच्या रूपात त्रास देतो.
नागीण होण्याची कारणे:
- रोगप्रतिकारशक्ती कमी होणे: वृद्धत्व, ताणतणाव, कुपोषण किंवा काही आजारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास हा विषाणू सक्रिय होऊ शकतो.
- औषधोपचार: काही औषधे, विशेषतः स्टेरॉइड्स (steroids) किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे घेतल्याने नागिणीचा धोका वाढतो.
- एचआयव्ही (HIV): एचआयव्हीमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास नागिण होण्याची शक्यता वाढते.
- कर्करोग: कर्करोगामुळे किंवा कर्करोगाच्या उपचारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास नागिण होऊ शकतो.
नागीण आजारावरील काही घरगुती उपचार:
- बर्फ (Ice): नायटा झालेल्या भागावर दिवसातून अनेक वेळा बर्फ लावल्यास आराम मिळतो.
- कोरफड (Aloe vera): कोरफडीचा गर नायटा झालेल्या भागावर लावल्याने दाह कमी होतो आणि त्वचा थंड राहते.
- मध (Honey): मधामध्ये बॅक्टेरियाविरोधी आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे मध लावल्याने आराम मिळतो.
- कडुलिंब (Neem): कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने नायटा धुतल्यास फायदा होतो.
- लसूण (Garlic): लसणामध्ये असलेले अँटीव्हायरल गुणधर्म विषाणूंचा नायनाट करतात. लसणीच्या पाकळ्या बारीक करून नायट्यावर लावल्याने आराम मिळतो.
- हळद (Turmeric): हळदीमध्ये दाह कमी करणारे आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. हळद पाण्यात मिसळून नायट्यावर लावल्याने फायदा होतो.
इतर उपाय:
- पुरेशी विश्रांती घ्या.
- तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
- आहार संतुलित ठेवा.
- डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.