आयुष्य
प्रेरणा
खच्चीकरण
समस्या
मानसिक आरोग्य
मनोविज्ञान
मानसिक स्वास्थ्य
आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत, जे काही निर्णय घेतोय ते सर्व चुकतायत व कोणाची साथही नाहीये, खूप Depressed झालोय, आत्महत्या करावीशी वाटतेय (पण तसं मी करणार नाहीये) काय करू? कृपया उपाय सुचवा?
3 उत्तरे
3
answers
आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत, जे काही निर्णय घेतोय ते सर्व चुकतायत व कोणाची साथही नाहीये, खूप Depressed झालोय, आत्महत्या करावीशी वाटतेय (पण तसं मी करणार नाहीये) काय करू? कृपया उपाय सुचवा?
50
Answer link
इयत्ता ५ वी मध्ये असताना ची एक घटना... आणि तेथून सुरुवात...
मी मराठी माध्यमात शाळेत जायची... शेजारी न्यू होली मेरी स्कूल नावाची शाळा देखील होती... आमचे घराणे मध्यम वर्गातील असून मला इंग्रजी शाळेत प्रवेश देऊ शकण्याइतपत होते... पण बाबांनी मुद्दाम मराठी शाळेत प्रवेश दिलेला... लहानपणी एवढे समजले नव्हते... पण जसे मोठे होत गेले तसे जवळील मैत्रीण एका चांगल्या शाळेत आणि मी मराठी माध्यमातून शिकत आहे याचे मला वाईट वाटले...
बाबांवर रागावले होते मी...
त्यातच मी त्यांना विचारले की मला शेजारच्या शाळेत माझ्या मैत्रिणीसोबत जायचे आहे...
बाबा मला म्हणाले की तुला शाळा हवे आहे की शाळेतील शिक्षण...
मी म्हणाले, मला पण इंग्रजी शिकायचे आहे... माझ्या शाळेत फक्त मराठी शिकवतात... माझी मैत्रीण न्यू होली मेरी मध्ये जाते... तिच्याकडे खुप छान छान पुस्तके असतात...
बाबांनी मला न्यू होली मेरी इंग्लिश शाळेत मात्र प्रवेश घेऊ दिला नाही... पण त्यांनी मला इंग्रजी शिकवले...
मराठी माध्यमात शिकताना अगदी ५वी / ६वी झाल्यानंतर विद्यार्थिला किमान इंग्रजी चे किमान ज्ञान मिळायचे...
पण बाबांनी मला इंग्रजी इयत्ता ५वी मध्ये असताना शिकविले...
कामावरून आल्यावर बाबा त्यांच्या साहेबांचे सकाळी इंग्रजी वर्तमानपत्र असायचे ते रात्री घेऊन यायचे... त्यातील शब्दओळख करुन द्यायचे...
मला इंग्रजी भाषेत रस निर्माण झाले...
एके दिवस बाबांना प्रश्न ही विचारला , तुम्हाला इंग्रजी कसे येते... काय तुम्ही इंग्लिश स्कुल मध्ये होता का...
ते म्हणाले, मी शाळेला कधीच महत्त्व दिले नाही... शाळेतील शिक्षणाला महत्त्व दिले... मी मराठी शाळेतच शिकलो... इंग्रजी हे शाळेतून नाही तर व्यवहारिक भाषेतून शिकलो... कामावर मोठी मोठी माणसे बोलत असायचे... मग सातत्याने ते शब्द ऐकून सवय झाली... कधी साहेबांच्या अनुपस्थित त्यांचे वर्तमानपत्र वाचायचो...
आज माझ्या लेकीला याची गरज म्हणून साहेबांकडून रात्री मागून घेऊन येतो...
त्यांची शिकवणी नुसार माझे इंग्रजी सुलभ झाले...
शाळेत इंग्रजी भाषणासाठी मलाच उभे करायचे तेव्हा खुप छान वाटायचे...
इयत्ता १०वी झाल्यानंतर मला पूर्णपणे अधिकार होता की मी कोणत्या शाखेत आणि कोणत्या माध्यमातून शिकायचे...
पण मी थेट मराठी माध्यमातून बीए पदवी प्राप्त केली...
त्यात लिटरेचर विषय घेऊन मराठी भाषेचे ज्ञान माझ्यात अधिक दृढ़ झाले...
ललित, गद्य, पद्य, वाङ्गमय, बखरी, अलंकार या सर्वांची मी ओळख घेतली...
बाबांकडून नेहमी एक शिकले की ... शिक्षण हे फक्त शाळेत नाही मिळत ते जीवनातील प्रत्येक पाऊलावर असते... मला ती शाळा भेटु शकली नाही पण त्या शाळेतील शिक्षण नक्कीच मिळाले...
आपल्या जीवनात आपल्याला खंबीर व्हायचे असेल तर स्वतःला समजून घ्या...
त्या वेळेस जर माझ्या बाबांनी विचार केला असता की मी हिला इंग्रजी शाळेत प्रवेश नाही देऊ शकत... तिला थोड़े ओरडलो असतो... गप्प राहिली असती... पण त्यांनी तसे न करता मूळ मुद्दा हातात घेतला... शाळेत तर आपण शिकायला जातो... माझ्या मुलीला इंग्रजी शिकायचे आहे... तिला इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यापेक्षा इंग्रजी शिक्षणाचे ज्ञान देणे गरजेचे आहे...
"बाबा त्या लोकांचे प्रतिनिधित्व करत होते ज्या लोकांसमोर समस्या उभी होती पण त्या समस्येतून तोडगा काढण्याचे परिप्रयत्न करतात..."
तुम्हाला मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग करा...
मी बेरोजगार आहे... मला शिक्षण असून सुद्धा नोकरी मिळत नाही... असा विचार मनात आणला तर नेहमी नकारात्मक प्रवृत्ति मनात घर घेऊन बसेल...
मला कोणी साथ देत नाही किंवा कुठून मदतही होत नाही...
वेळप्रसंगी सर्वजण मागे फिरतात... दुष्काळात तेरावा महीना तो असा... सगळे दुःख एका मागून एक येत राहणार... त्यात बाहेरच्यांचे सोडले तर घरातले देखील विरोधात असतात...
या सर्व गोष्टी आपण मनात बोलत असतो... विचार करत असतो...
एक लक्ष्यात ठेवा प्रथम घरातूनच विरोध असतो...
कारण त्यांना तुमच्या भविष्यापेक्षा तुमची काळजी अधिक असते...
भविष्याची स्वप्न आपण पाहतो पण आई बाबा आपल्याला पाहत असतात...
तुमच्या आयुष्यात तुम्ही आता काहीच करू शकत नाही असा विचार करू नका...
तुम्ही खुप काय चांगले करू शकता याचा विचार करा...
हातात एक वही घ्या...
पेन घेऊन अनेक मुद्दे लिहा...
तुम्हाला व्यवसाय करायचा आहे का...
तुम्हाला नोकरी करायची आहे का...
का तुम्हाला काही समाजसेवा करायची आहे...
ज्यात करिअर करायचे त्याचा मागोवा घ्या...
आणि प्रत्यक्षात अंमलात आणा...
जो पर्यन्त तुम्ही तुमच्या मेंदूला चालना देऊन कोणतीही हालचाल करणार नाही तो पर्यन्त सर्व काही स्तब्धच राहणार...
म्हणून विचार करा... आणि अंमलात आणा...
मी मराठी माध्यमात शाळेत जायची... शेजारी न्यू होली मेरी स्कूल नावाची शाळा देखील होती... आमचे घराणे मध्यम वर्गातील असून मला इंग्रजी शाळेत प्रवेश देऊ शकण्याइतपत होते... पण बाबांनी मुद्दाम मराठी शाळेत प्रवेश दिलेला... लहानपणी एवढे समजले नव्हते... पण जसे मोठे होत गेले तसे जवळील मैत्रीण एका चांगल्या शाळेत आणि मी मराठी माध्यमातून शिकत आहे याचे मला वाईट वाटले...
बाबांवर रागावले होते मी...
त्यातच मी त्यांना विचारले की मला शेजारच्या शाळेत माझ्या मैत्रिणीसोबत जायचे आहे...
बाबा मला म्हणाले की तुला शाळा हवे आहे की शाळेतील शिक्षण...
मी म्हणाले, मला पण इंग्रजी शिकायचे आहे... माझ्या शाळेत फक्त मराठी शिकवतात... माझी मैत्रीण न्यू होली मेरी मध्ये जाते... तिच्याकडे खुप छान छान पुस्तके असतात...
बाबांनी मला न्यू होली मेरी इंग्लिश शाळेत मात्र प्रवेश घेऊ दिला नाही... पण त्यांनी मला इंग्रजी शिकवले...
मराठी माध्यमात शिकताना अगदी ५वी / ६वी झाल्यानंतर विद्यार्थिला किमान इंग्रजी चे किमान ज्ञान मिळायचे...
पण बाबांनी मला इंग्रजी इयत्ता ५वी मध्ये असताना शिकविले...
कामावरून आल्यावर बाबा त्यांच्या साहेबांचे सकाळी इंग्रजी वर्तमानपत्र असायचे ते रात्री घेऊन यायचे... त्यातील शब्दओळख करुन द्यायचे...
मला इंग्रजी भाषेत रस निर्माण झाले...
एके दिवस बाबांना प्रश्न ही विचारला , तुम्हाला इंग्रजी कसे येते... काय तुम्ही इंग्लिश स्कुल मध्ये होता का...
ते म्हणाले, मी शाळेला कधीच महत्त्व दिले नाही... शाळेतील शिक्षणाला महत्त्व दिले... मी मराठी शाळेतच शिकलो... इंग्रजी हे शाळेतून नाही तर व्यवहारिक भाषेतून शिकलो... कामावर मोठी मोठी माणसे बोलत असायचे... मग सातत्याने ते शब्द ऐकून सवय झाली... कधी साहेबांच्या अनुपस्थित त्यांचे वर्तमानपत्र वाचायचो...
आज माझ्या लेकीला याची गरज म्हणून साहेबांकडून रात्री मागून घेऊन येतो...
त्यांची शिकवणी नुसार माझे इंग्रजी सुलभ झाले...
शाळेत इंग्रजी भाषणासाठी मलाच उभे करायचे तेव्हा खुप छान वाटायचे...
इयत्ता १०वी झाल्यानंतर मला पूर्णपणे अधिकार होता की मी कोणत्या शाखेत आणि कोणत्या माध्यमातून शिकायचे...
पण मी थेट मराठी माध्यमातून बीए पदवी प्राप्त केली...
त्यात लिटरेचर विषय घेऊन मराठी भाषेचे ज्ञान माझ्यात अधिक दृढ़ झाले...
ललित, गद्य, पद्य, वाङ्गमय, बखरी, अलंकार या सर्वांची मी ओळख घेतली...
बाबांकडून नेहमी एक शिकले की ... शिक्षण हे फक्त शाळेत नाही मिळत ते जीवनातील प्रत्येक पाऊलावर असते... मला ती शाळा भेटु शकली नाही पण त्या शाळेतील शिक्षण नक्कीच मिळाले...
आपल्या जीवनात आपल्याला खंबीर व्हायचे असेल तर स्वतःला समजून घ्या...
त्या वेळेस जर माझ्या बाबांनी विचार केला असता की मी हिला इंग्रजी शाळेत प्रवेश नाही देऊ शकत... तिला थोड़े ओरडलो असतो... गप्प राहिली असती... पण त्यांनी तसे न करता मूळ मुद्दा हातात घेतला... शाळेत तर आपण शिकायला जातो... माझ्या मुलीला इंग्रजी शिकायचे आहे... तिला इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यापेक्षा इंग्रजी शिक्षणाचे ज्ञान देणे गरजेचे आहे...
"बाबा त्या लोकांचे प्रतिनिधित्व करत होते ज्या लोकांसमोर समस्या उभी होती पण त्या समस्येतून तोडगा काढण्याचे परिप्रयत्न करतात..."
तुम्हाला मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग करा...
मी बेरोजगार आहे... मला शिक्षण असून सुद्धा नोकरी मिळत नाही... असा विचार मनात आणला तर नेहमी नकारात्मक प्रवृत्ति मनात घर घेऊन बसेल...
मला कोणी साथ देत नाही किंवा कुठून मदतही होत नाही...
वेळप्रसंगी सर्वजण मागे फिरतात... दुष्काळात तेरावा महीना तो असा... सगळे दुःख एका मागून एक येत राहणार... त्यात बाहेरच्यांचे सोडले तर घरातले देखील विरोधात असतात...
या सर्व गोष्टी आपण मनात बोलत असतो... विचार करत असतो...
एक लक्ष्यात ठेवा प्रथम घरातूनच विरोध असतो...
कारण त्यांना तुमच्या भविष्यापेक्षा तुमची काळजी अधिक असते...
भविष्याची स्वप्न आपण पाहतो पण आई बाबा आपल्याला पाहत असतात...
तुमच्या आयुष्यात तुम्ही आता काहीच करू शकत नाही असा विचार करू नका...
तुम्ही खुप काय चांगले करू शकता याचा विचार करा...
हातात एक वही घ्या...
पेन घेऊन अनेक मुद्दे लिहा...
तुम्हाला व्यवसाय करायचा आहे का...
तुम्हाला नोकरी करायची आहे का...
का तुम्हाला काही समाजसेवा करायची आहे...
ज्यात करिअर करायचे त्याचा मागोवा घ्या...
आणि प्रत्यक्षात अंमलात आणा...
जो पर्यन्त तुम्ही तुमच्या मेंदूला चालना देऊन कोणतीही हालचाल करणार नाही तो पर्यन्त सर्व काही स्तब्धच राहणार...
म्हणून विचार करा... आणि अंमलात आणा...
16
Answer link
सर्वात पहिले तुम्ही आत्महत्येचा विचार मनातून काढून टाका.एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जीवनात दुःख पाहिल्याशिवाय आपल्याला सुखाची किंमत कळत नाही.
तुम्ही आपले सर्व problems एका कागदावर लिहा.जी प्रॉब्लेम सर्वात मोठी आहे ती प्रथम क्रमांकावर लिहा.या प्रकारे तुम्ही तुमच्या problems ची एक list बनवा.ती list तुम्ही आपल्या खोलीत एका भिंतीवर अशा प्रकारे लावा, जेणेकरून तुमचं लक्ष सहज त्यावर पडेल.
मग तुम्ही जी प्रॉब्लेम खूपच तीव्र आहे ,सर्वात अगोदर त्या प्रॉब्लेम वर लक्ष केंद्रित करा आणि सध्यासाठी बाकी प्रॉब्लेम्स ला विसरून जा.हे खरं आहे की दुःखात कोणी आपली साथ देत नाही पण हेही तेवढच खरं आहे की दुःखात आपल्या मना एवढी साथ कोणीही आपल्याला देत नाही.म्हणून आपल्या मनावर व स्वतः वर विश्वास असू द्या.
जीवनात कोणतीही गोष्ट दीर्घकाळ टिकत नाही,तसेच तुमचा Bad Patch सुद्धा लवकरच संपेल आणि चांगले दिवस येतील यावर विश्वास असू द्या.
तुम्ही आपले प्रॉब्लेम आई वडिलांशी discuss करा किंवा भावा बहिणीबरोबर चर्चा करा.लक्षात असू द्या जीवनात कितीही वाईट काळ आला तरी तुमचे आई बाबा तुमची साथ कधी सोडणार नाही.जीवनात आई वडीलांसारखा दुसरा मार्गदर्शक कोणी नाही, म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा व त्यांना आपली प्रॉब्लेम सांगा.
एका वेळी एकच प्रॉब्लेम वर लक्ष केंद्रित करा आणि तो मार्गी लागल्याशिवाय दुसऱ्या प्रॉब्लेम ला हात लावू नका.जर दोन दिवसात तुम्हाला त्याचे समाधान मिळाले नाही तर तो प्रश्न सोडून द्या आणि पुढे मार्गक्रमण करा.
लक्षात ठेवा, जीवनात सगळे प्रॉब्लेम सोडवून सुटत नसतात ; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
तुम्ही जो प्रॉब्लेम चा कागद भिंतीवर लावला,त्यामुळे तुम्हाला तुमचं उत्तर शोधण्यात मदत होईल आणि या प्रकारे तुम्ही स्वतः तुमची प्रॉब्लेम सोडवू शकाल.
तुम्ही आपले सर्व problems एका कागदावर लिहा.जी प्रॉब्लेम सर्वात मोठी आहे ती प्रथम क्रमांकावर लिहा.या प्रकारे तुम्ही तुमच्या problems ची एक list बनवा.ती list तुम्ही आपल्या खोलीत एका भिंतीवर अशा प्रकारे लावा, जेणेकरून तुमचं लक्ष सहज त्यावर पडेल.
मग तुम्ही जी प्रॉब्लेम खूपच तीव्र आहे ,सर्वात अगोदर त्या प्रॉब्लेम वर लक्ष केंद्रित करा आणि सध्यासाठी बाकी प्रॉब्लेम्स ला विसरून जा.हे खरं आहे की दुःखात कोणी आपली साथ देत नाही पण हेही तेवढच खरं आहे की दुःखात आपल्या मना एवढी साथ कोणीही आपल्याला देत नाही.म्हणून आपल्या मनावर व स्वतः वर विश्वास असू द्या.
जीवनात कोणतीही गोष्ट दीर्घकाळ टिकत नाही,तसेच तुमचा Bad Patch सुद्धा लवकरच संपेल आणि चांगले दिवस येतील यावर विश्वास असू द्या.
तुम्ही आपले प्रॉब्लेम आई वडिलांशी discuss करा किंवा भावा बहिणीबरोबर चर्चा करा.लक्षात असू द्या जीवनात कितीही वाईट काळ आला तरी तुमचे आई बाबा तुमची साथ कधी सोडणार नाही.जीवनात आई वडीलांसारखा दुसरा मार्गदर्शक कोणी नाही, म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा व त्यांना आपली प्रॉब्लेम सांगा.
एका वेळी एकच प्रॉब्लेम वर लक्ष केंद्रित करा आणि तो मार्गी लागल्याशिवाय दुसऱ्या प्रॉब्लेम ला हात लावू नका.जर दोन दिवसात तुम्हाला त्याचे समाधान मिळाले नाही तर तो प्रश्न सोडून द्या आणि पुढे मार्गक्रमण करा.
लक्षात ठेवा, जीवनात सगळे प्रॉब्लेम सोडवून सुटत नसतात ; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
तुम्ही जो प्रॉब्लेम चा कागद भिंतीवर लावला,त्यामुळे तुम्हाला तुमचं उत्तर शोधण्यात मदत होईल आणि या प्रकारे तुम्ही स्वतः तुमची प्रॉब्लेम सोडवू शकाल.
0
Answer link
मला तुमच्या भावनांची जाणीव आहे आणि तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात ते मी समजू शकतो. अशा परिस्थितीत, काही उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
जर तुम्हाला आत्महत्येचे विचार येत असतील, तर कृपया तातडीने एखाद्या तज्ञाची मदत घ्या. तुम्ही आत्महत्या हेल्पलाइन नंबर 022-27546669 वर संपर्क साधू शकता.
1. तज्ञांची मदत घ्या:
- मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकाची मदत घ्या. ते तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास आणि समस्यांवर तोडगा काढण्यास मदत करू शकतील.
- तुम्ही एखाद्या trusted मित्राची किंवा कुटुंबातील सदस्याची मदत घेऊ शकता. त्यांच्याशी बोलून तुम्हाला emotional support मिळू शकेल.
2. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा:
- नकारात्मक विचार टाळा आणि सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
- आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा.
- भूतकाळातील चुकांमधून शिका आणि भविष्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.
3. जीवनशैलीत बदल करा:
- नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे तणाव कमी होतो आणि मनःस्थिती सुधारते. Mayo Clinic
- पुरेशी झोप घ्या. झोप पूर्ण न झाल्यास तणाव वाढू शकतो.
- पौष्टिक आहार घ्या. पौष्टिक आहारामुळे शरीर आणि मन निरोगी राहते. NHS
- ध्यान आणि योगा करा. ध्यान आणि योगामुळे मन शांत राहते आणि तणाव कमी होतो.
4. छंद जोपासा:
- तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि तणाव कमी होईल.
- नवीन गोष्टी शिका. नवीन गोष्टी शिकल्याने आत्मविश्वास वाढतो.
- समाजात सहभागी व्हा. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुम्हाला इतरांची मदत करण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला एकटे वाटणार नाही.
5. धीर धरा:
- कोणतीही समस्या एका रात्रीत सुटत नाही. त्यामुळे धीर धरा आणि प्रयत्न करत राहा.
- स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही नक्कीच या परिस्थितीतून बाहेर पडू शकता.