2 उत्तरे
2
answers
आट्यापाट्या खेळाबद्दल माहिती मिळेल का?
6
Answer link
आट्यापाट्याचे बदलते रंग
Updated Nov 27, 2011, 12:19 AM IST
> अश्विनी गो-हे । नाशिक
आट्यापाट्या हा एक *शिवकालीन* मैदानी खेळ आहे.
मराठी मातीत खेळला जाणारा आट्यापाट्या हा खेळ आता तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाईल, त्या दृष्टीने अनेक प्रयत्न सुरू आहे. हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जावा, यासाठी अनेक बदल करण्यात आले आहे. आट्यापाट्या या खेळाच्या बदलाविषयी थोडसं....
............
आट्यापाट्या हा धाडसी आणि रोमहर्षक खेळ आहे. भारतीय मूळ असलेला आट्यापाट्या हा अतिशय प्राचीन काळापासून खेळला जाणारा एक महत्त्वाचा खेळ आहे. पण आज अनेक भारतीयांना तो खेळ कसा खेळला जातो, याची माहिती नसून शाळेतील मुलांना अशा नावाचा खेळ पूर्वी खेळला जात होता हे माहिती नाही.
या खेळाचे स्वरूप हे पूर्वीपेक्षा बदलत असून पूर्वी या खेळामध्ये ९ खेळाडू एकदम धावात व त्यामुळे खेळामध्ये गोंधळ उडत असे. हा खेळ त्याकाळी गल्लोगल्ली खेळला जात असल्यामुळे तेव्हा तो भारतामध्ये प्रचलित खेळ मानला जाई. या खेळाला आतंरराष्ट्रीय स्थान प्राप्त व्हावे तसेच या खेळातील त्रुटी भरून काढण्यासाठी खेळाचे स्वरूप बदलविण्यात आले आहे. त्यामुळे १९८२पासून आट्या-पाट्या फेडरेशन ऑफ इंडियाने या खेळाची नियमावली तयार केली आहे.
बदलेल्या खेळानुसार या खेळाचा सामना दोन डावांचा असतो. प्रत्येक डावाच्या दोन पाळ्या असतात अशा एकूण चार पाळ्यामध्ये तो खेळला जातो. एक पाळी सात मिनिटांची असते. संघामध्ये १२ खेळाडूंचा समावेश असून प्रत्येक पाळीनंतर तीन मिनिटांचा मध्यांतर केला जातो. तीन सर्वोत्कृष्ट पाळ्यांच्या आधारे सामन्याचा निर्णय होतो. आक्रमकांनी तीन पाटी ओलांडली तर प्रत्येक आक्रमणाला एक गुण मिळतो. पूर्वी हा गेम नऊ खेळाडूच्या धाव्यात असायच्या पण आता त्यामध्ये दोन बॅच करण्यात आले आहे. पहिली पाचची बॅच व दुसरी चारची बॅच असते. यामुळे पूर्वी हा खेळ खेळतांना जो गोंगाट होत असे तो आता कमी होऊन या खेळातील खेळाडूचे कौशल्य खेळातून बघायला मिळते. या खेळासाठी फक्त १०० बॉय ५० फूटांच्या मैदानावर हा खेळ कोणतेही साधनसामग्री नसतांना खेळता येतो.
प्राचीन काळापासून विविध नावांनी, अनेकानेक सुधारणा करीत देशाच्या विविध भागांत आट्यापाट्या हा खेळ खेळला जातो. पण अजूनही या खेळाला जिल्हा शालेय क्रीडा विभागाने शालेय खेळ म्हणून मान्यता दिली नसल्यामुळे या खेळाचा प्रसार कमी प्रमाणात होत आहे. महाराष्ट्र संघाचा प्रवीण रामकृष्ण वाहाले या खेळाडूने या खेळाचा विकास होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तो म्हणतो की, हा खेळ मराठमोळ्या असून या खेळासाठी वेग, तंत्र चपळता व डावपेचाची आखणी हि फार गरजेची असते. तरच या खेळामध्ये खेळाडू जिंकू शकतो. मूळचा नागपूरचा असणारा प्रवीण वाहाले हा १९९०पासून हा खेळ खेळत असून त्याने या खेळासाठी २००५-२००६ सालाचा छत्रपती पुरस्कार मिळवला आहे. त्याबरोबर त्याने नागपूर जिल्हा उत्कृष्ट आट्यापाट्या खेळाडू व विदर्भ स्पोर्टस् पुरस्काराचा मान त्याने पटकावला आहे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतांनाही या खेळात करिअर करण्याचे त्याने ठरवले. लहानपणापासून खो-खो व आट्यापाट्या हा खेळ खेळण्याची त्याला आवड आहे. आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडियाने जी खेळाची नियमावली तयार केली आहे. त्यात अनेक छोटेमोठे बदल करण्यात आले व त्यामुळे हा खेळ सोप्पा झाला.
खो-खो, कबड्डी, मल्लखांब या देशी खेळांप्रमाणे आट्यापाट्या हा खेळही मराठी मातीतला पण महाराष्ट्रात तो दुर्लक्षित राहिलेला आहे अशी खंत आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडियाने स्पष्ट केले. एका संघातील खेळांडूनी दुस-या संघातील खेळाडूंना ठराविक जागेमध्ये अडविणे व अडविलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटून जाणे, अशी स्थूल रूपरेषा असलेल्या हा महाराष्ट्रीय खेळ. या मैदानी खेळात कोंडी, हुलकावणी, शिवाशिवी अशा प्रकारांचा समावेश होतो. या खेळासाठी साधनसामुग्री ही कमी प्रमाणात लागते तरीही हा खेळ शालेय खेळामध्ये समाविष्ट होत नाही. हा खेळ मनोरंजक, भरपूर व्यायाम करून देणारा व बिनखर्ची आहे. यात वैयक्तिक व सांघिक कौशल्य याची कसोटी लागत असते. म्हणूनच या खेळासाठी आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडिया हे एशियन व आल्मिम्पिक खेळासाठी मान्यता मिळावी, यासाठी ते प्रयत्न करत आहे. तसेच नेपाळ, भूतान, श्रीलंका यांच्याशी या खेळाविषयी चर्चा सुरू आहे. आता तरी हा खेळ आतंरराष्ट्रीय खेळामध्ये आपले स्थान निर्माण करेल, अशी आशा वाटते.

Updated Nov 27, 2011, 12:19 AM IST
> अश्विनी गो-हे । नाशिक
आट्यापाट्या हा एक *शिवकालीन* मैदानी खेळ आहे.
मराठी मातीत खेळला जाणारा आट्यापाट्या हा खेळ आता तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाईल, त्या दृष्टीने अनेक प्रयत्न सुरू आहे. हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जावा, यासाठी अनेक बदल करण्यात आले आहे. आट्यापाट्या या खेळाच्या बदलाविषयी थोडसं....
............
आट्यापाट्या हा धाडसी आणि रोमहर्षक खेळ आहे. भारतीय मूळ असलेला आट्यापाट्या हा अतिशय प्राचीन काळापासून खेळला जाणारा एक महत्त्वाचा खेळ आहे. पण आज अनेक भारतीयांना तो खेळ कसा खेळला जातो, याची माहिती नसून शाळेतील मुलांना अशा नावाचा खेळ पूर्वी खेळला जात होता हे माहिती नाही.
या खेळाचे स्वरूप हे पूर्वीपेक्षा बदलत असून पूर्वी या खेळामध्ये ९ खेळाडू एकदम धावात व त्यामुळे खेळामध्ये गोंधळ उडत असे. हा खेळ त्याकाळी गल्लोगल्ली खेळला जात असल्यामुळे तेव्हा तो भारतामध्ये प्रचलित खेळ मानला जाई. या खेळाला आतंरराष्ट्रीय स्थान प्राप्त व्हावे तसेच या खेळातील त्रुटी भरून काढण्यासाठी खेळाचे स्वरूप बदलविण्यात आले आहे. त्यामुळे १९८२पासून आट्या-पाट्या फेडरेशन ऑफ इंडियाने या खेळाची नियमावली तयार केली आहे.
बदलेल्या खेळानुसार या खेळाचा सामना दोन डावांचा असतो. प्रत्येक डावाच्या दोन पाळ्या असतात अशा एकूण चार पाळ्यामध्ये तो खेळला जातो. एक पाळी सात मिनिटांची असते. संघामध्ये १२ खेळाडूंचा समावेश असून प्रत्येक पाळीनंतर तीन मिनिटांचा मध्यांतर केला जातो. तीन सर्वोत्कृष्ट पाळ्यांच्या आधारे सामन्याचा निर्णय होतो. आक्रमकांनी तीन पाटी ओलांडली तर प्रत्येक आक्रमणाला एक गुण मिळतो. पूर्वी हा गेम नऊ खेळाडूच्या धाव्यात असायच्या पण आता त्यामध्ये दोन बॅच करण्यात आले आहे. पहिली पाचची बॅच व दुसरी चारची बॅच असते. यामुळे पूर्वी हा खेळ खेळतांना जो गोंगाट होत असे तो आता कमी होऊन या खेळातील खेळाडूचे कौशल्य खेळातून बघायला मिळते. या खेळासाठी फक्त १०० बॉय ५० फूटांच्या मैदानावर हा खेळ कोणतेही साधनसामग्री नसतांना खेळता येतो.
प्राचीन काळापासून विविध नावांनी, अनेकानेक सुधारणा करीत देशाच्या विविध भागांत आट्यापाट्या हा खेळ खेळला जातो. पण अजूनही या खेळाला जिल्हा शालेय क्रीडा विभागाने शालेय खेळ म्हणून मान्यता दिली नसल्यामुळे या खेळाचा प्रसार कमी प्रमाणात होत आहे. महाराष्ट्र संघाचा प्रवीण रामकृष्ण वाहाले या खेळाडूने या खेळाचा विकास होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तो म्हणतो की, हा खेळ मराठमोळ्या असून या खेळासाठी वेग, तंत्र चपळता व डावपेचाची आखणी हि फार गरजेची असते. तरच या खेळामध्ये खेळाडू जिंकू शकतो. मूळचा नागपूरचा असणारा प्रवीण वाहाले हा १९९०पासून हा खेळ खेळत असून त्याने या खेळासाठी २००५-२००६ सालाचा छत्रपती पुरस्कार मिळवला आहे. त्याबरोबर त्याने नागपूर जिल्हा उत्कृष्ट आट्यापाट्या खेळाडू व विदर्भ स्पोर्टस् पुरस्काराचा मान त्याने पटकावला आहे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतांनाही या खेळात करिअर करण्याचे त्याने ठरवले. लहानपणापासून खो-खो व आट्यापाट्या हा खेळ खेळण्याची त्याला आवड आहे. आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडियाने जी खेळाची नियमावली तयार केली आहे. त्यात अनेक छोटेमोठे बदल करण्यात आले व त्यामुळे हा खेळ सोप्पा झाला.
खो-खो, कबड्डी, मल्लखांब या देशी खेळांप्रमाणे आट्यापाट्या हा खेळही मराठी मातीतला पण महाराष्ट्रात तो दुर्लक्षित राहिलेला आहे अशी खंत आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडियाने स्पष्ट केले. एका संघातील खेळांडूनी दुस-या संघातील खेळाडूंना ठराविक जागेमध्ये अडविणे व अडविलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटून जाणे, अशी स्थूल रूपरेषा असलेल्या हा महाराष्ट्रीय खेळ. या मैदानी खेळात कोंडी, हुलकावणी, शिवाशिवी अशा प्रकारांचा समावेश होतो. या खेळासाठी साधनसामुग्री ही कमी प्रमाणात लागते तरीही हा खेळ शालेय खेळामध्ये समाविष्ट होत नाही. हा खेळ मनोरंजक, भरपूर व्यायाम करून देणारा व बिनखर्ची आहे. यात वैयक्तिक व सांघिक कौशल्य याची कसोटी लागत असते. म्हणूनच या खेळासाठी आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडिया हे एशियन व आल्मिम्पिक खेळासाठी मान्यता मिळावी, यासाठी ते प्रयत्न करत आहे. तसेच नेपाळ, भूतान, श्रीलंका यांच्याशी या खेळाविषयी चर्चा सुरू आहे. आता तरी हा खेळ आतंरराष्ट्रीय खेळामध्ये आपले स्थान निर्माण करेल, अशी आशा वाटते.

0
Answer link
आट्यापाट्या हा महाराष्ट्रातील पारंपरिक खेळाचा एक प्रकार आहे. हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. या खेळात चपळता, दमसास आणि सांघिक भावना या गुणांची आवश्यकता असते.
आट्यापाट्या खेळाची माहिती:
- आट्यापाट्या हा खेळ मैदानी खेळ आहे.
- हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो, ज्यात प्रत्येक संघात साधारणतः ९ खेळाडू असतात.
- या खेळात एक मध्य रेषा असते आणि दोन्ही संघाचे खेळाडू आळीपाळीने प्रतिस्पर्धी खेळाडूंना स्पर्श करून बाद करण्याचा प्रयत्न करतात.
- जो संघ प्रतिस्पर्धी संघातील अधिक खेळाडूंना बाद करतो, तो संघ विजयी घोषित केला जातो.
- या खेळात शारीरिक क्षमता आणि युक्तीचा वापर महत्त्वाचा असतो.
नियम:
- आट्यापाट्या खेळताना काही नियम असतात, ज्यांचे पालन करणे आवश्यक असते.
- खेळाडूने श्वास रोखून प्रतिस्पर्धी खेळाडूला स्पर्श करायचा असतो आणि ‘आट्यापाट्या’ असे बोलत राहायचे असते. श्वास तुटल्यास तो खेळाडू बाद होतो.
महत्व:
- आट्यापाट्या खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती सुधारते.
- हा खेळ सांघिक भावनेला प्रोत्साहन देतो.
- यात त्वरित निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
आट्यापाट्या हा खेळ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये विशेष लोकप्रिय आहे आणि तो आजही अनेक ठिकाणी खेळला जातो.