मंदिर अध्यात्म देव तीर्थयात्रा

जर आपल्याला विठ्ठलाचे दर्शन होत नाही, तर आपण पंढरपूरला का जातो?

3 उत्तरे
3 answers

जर आपल्याला विठ्ठलाचे दर्शन होत नाही, तर आपण पंढरपूरला का जातो?

30

*पत्रकार :* बाबाजी, तुमचे वय किती आहे ?
*वारकरी :* ६५ वर्षे आहे बेटा.
*पत्रकार :* तुम्ही किती वर्षापासून पंढरपूरला येत आहात ?
*वारकरी :* जवळपास ५० वर्षापासून.
*पत्रकार :* तुम्हाला विठ्ठल दिसला का..? एकदा तरी..?
*वारकरी :* नाही बेटा, नाही दिसला.
*पत्रकार :* तरमग तुम्ही का बरे येता दरवर्षी?

*वारकरी : गावाकडे आम्ही घरात कुत्रा पाळतो, तुमच्यासारखा फॅशन म्हणून नव्हे तर चोरांपासून संरक्षणासाठी.*
*रात्रीच्यावेळी एका कुत्र्याला चोर दिसला की तो जोरात भुंकायला लागतो, ते ऐकून आजूबाजूच्या घरातले २० कुत्रेपण भुंकायला लागतात.*

*२०पैकी १९ कुत्र्यांनी चोराला बघितलेले नसते, पण पहिल्या कुत्र्यावर विश्वास ठेवून ते भुंकायला सुरूवात करतात. जर जनावरं एकमेकांवर विश्वास ठेवू शकतात तर माणूस माणसावर का नाही?*

*संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि अशा अनेकांनी विठोबा पाहिला आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे, की एक दिवस मलाही विठ्ठलाचे दर्शन होईल.

    *"जय हरी विठ्ठल"*

हे वाचून आपले विचार बदलायला पाहिजे.
धन्यवाद
उत्तर लिहिले · 16/5/2018
कर्म · 44255
6
माऊली भगवंत तुमच्यातच आहे व ती अनुभवण्याची गोष्ट आहे.
अहो जवळ पडलेली सुई या डोळ्यांना दिसत नाही आणि देव पहायला या डोळ्यांवर विसंबणे म्हणजे मूर्खपणाच आहे.
भगवंत जाणून घ्यायचा असेल ,त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सदगुरुंशिवाय दुसरा पर्याय नाही.
आत्मप्राप्ती, आत्मसाक्षात्कार, भगवद्प्राप्ती या सर्व संज्ञा यासंबंधीच्याच आहेत.
सर्व संत,देव यांनीही  हेच सांगितले आहे.
संतांच्या सर्व वाङमयाचा , अभंग गौळणणींचा अर्थ हा आत्मसाक्षात्काराल धरुनच आहे पण तो समजावून सांगणारे भलतंच काहीतरी सांगतात आणि आपली दिशाभूल करतात.
असो आपण सावध राहिले पाहिजे.
🙏सदगुरुनाथ भगवान की जय🙏
उत्तर लिहिले · 16/5/2018
कर्म · 2180
0

जर आपल्याला विठ्ठलाचे दर्शन होत नाही, तरीही आपण पंढरपूरला अनेक कारणांसाठी जातो:

  • श्रद्धा आणि भक्ती:

    विठ्ठलावर नितांत श्रद्धा आणि भक्ती असणारे अनेक भाविक केवळ दर्शनासाठी नव्हे, तर त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी पंढरपूरला जातात.

  • वारकरी परंपरा:

    पंढरपूरची वारी ही एक मोठी परंपरा आहे. अनेक लोक पिढ्यानपिढ्या या वारीत सहभागी होतात. त्यामुळे, दर्शनापेक्षा वारीच्या परंपरेचा भाग होणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते.

  • सकारात्मक ऊर्जा:

    पंढरपूर हे एक पवित्र स्थान आहे. तिथे गेल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे, मानसिक शांती आणि आत्मिक समाधान मिळवण्यासाठी लोक तिथे जातात.

  • सामाजिक एकोपा:

    पंढरपूरच्या वारीमध्ये विविध जाती-धर्माचे लोक एकत्र येतात. यातून सामाजिक एकोपा वाढतो. अनेक लोक या सामाजिक एकोप्याचा भाग होण्यासाठी पंढरपूरला जातात.

  • सांस्कृतिक महत्त्व:

    पंढरपूर हे महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. येथील स्थानिक उत्सव आणि परंपरा यांचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक आणि अभ्यासक पंढरपूरला भेट देतात.

  • मनःशांती आणि विश्रांती:

    रोजच्या धावपळीच्या जीवनातून काही दिवस विश्रांती मिळावी आणि मनःशांती अनुभवावी, यासाठी अनेक जण पंढरपूरला जातात.

या कारणांमुळे, जरी विठ्ठलाचे दर्शन झाले नाही, तरी भाविक पंढरपूरला जातात आणि तेथील वातावरणाचा अनुभव घेतात.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1440

Related Questions

नर्मदा परिक्रमा का करतात?
काशीयात्रे विषयी माहिती मिळेल का?
कोणी चार धाम यात्रेला जात आहे? चार धाम म्हणजे काय आहे?
मक्का मदिनाचे तिकीट काय आहे?
अमरनाथ यात्रा व शिवलिंग काय प्रकरण आहे?
अमरनाथ यात्रेबद्दल कुणाला माहिती आहे का? ती कधीपासून सुरू झाली आहे आणि शिवलिंग कधीपासून आहे? सविस्तर माहिती द्या.
मला पाकिस्तानमध्ये तीर्थाटन करण्यासाठी जायचे आहे, तर त्यासाठी काय काय करावे लागेल?