3 उत्तरे
3
answers
मनातील नकारात्मक विचार घालवण्यासाठी काय करावे?
21
Answer link
*नकारात्मक विचार कसे थांबवायचे?*
* Motivation*
एका रिसर्चनुसार, सर्वसामान्यपणे एक व्यक्ती दिवसाला 60 ते 65 हजार विचार करतो. सामान्य माणसाचे त्यातील 90% विचार नकारात्मक किंवा अनावश्यक असतात. विशेष गोष्ट हि कि, बऱ्याचदा माणसाला आपण निगेटिव्ह विचार करत असतो हेच माहित नसते.
लक्षात घ्या, शारीरिक थकव्यापेक्षा आपल्याला मानसिक थकवाच जास्त असतो. त्यामुळे आपले विचार काय आहेत? हे महत्वाचे आहे. त्यामुळे आज आपण चांगले विचार करणे आणि नकारात्मक विचार करणे यात फरक काय? हे जाणून घेऊयात...
😊 *चांगले विचार* : आपण निश्चित ध्येयासाठी विचार करत असू तर ते आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर आहेत त्यांना चांगले विचार म्हणतात. हे विचार आपल्याला ध्येयासाठी प्रेरणा देऊन उत्तेजित करतात.
🤨 *नकारात्मक विचार* : ज्या गोष्टीवर आपण काही करू शकत नाही. पण आपण निष्कारण त्या गोष्टीवर विचार करतो त्याला नकारात्मक विचार म्हणतात. हे विचार आपल्या मनामध्ये टेन्शन, नैराश्य, मानसिक ताण निर्माण करतात.
👉 *नकारात्मक विचार कसे थांबवता येतील?* :
1) आपण आपल्या विचारांवर लक्ष ठेवले पाहिजे. आपण काय विचार करतोय हे ध्यानात असायला हवे. हे करायला थोडा वेळ लागेल. पण हे शक्य आहे. कारण यामुळे तुम्हाला कळेल कि तुम्ही किती योग्य आणि अनावश्यक गोष्टीवर विचार करता ते.
2) जे आहे ते स्वीकार करता यायला हवे. आपल्याला गोष्टी धरून ठेवायची सवय असते यामुळे मन अशांत होते. त्यामुळे मनाविरुद्ध घडलेली गोष्ट स्वीकारायला शिकायला हवे.
3) आपले नियंत्रण फक्त आपल्या कृतीवर आहे, हे लक्षात घ्या. यामुळे तुम्ही दुसऱ्याला दोष देणे थांबवून कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
4) रोज किमान 10 मिनिटे तरी ध्यानधारणा केली पाहिजे. यामुळे मन आणि विचार संयमित होतात. तसेच विचार पूर्वक निर्णय घ्यायला आपले मन तयार होते.
#Forwarded Message
* Motivation*
एका रिसर्चनुसार, सर्वसामान्यपणे एक व्यक्ती दिवसाला 60 ते 65 हजार विचार करतो. सामान्य माणसाचे त्यातील 90% विचार नकारात्मक किंवा अनावश्यक असतात. विशेष गोष्ट हि कि, बऱ्याचदा माणसाला आपण निगेटिव्ह विचार करत असतो हेच माहित नसते.
लक्षात घ्या, शारीरिक थकव्यापेक्षा आपल्याला मानसिक थकवाच जास्त असतो. त्यामुळे आपले विचार काय आहेत? हे महत्वाचे आहे. त्यामुळे आज आपण चांगले विचार करणे आणि नकारात्मक विचार करणे यात फरक काय? हे जाणून घेऊयात...
😊 *चांगले विचार* : आपण निश्चित ध्येयासाठी विचार करत असू तर ते आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर आहेत त्यांना चांगले विचार म्हणतात. हे विचार आपल्याला ध्येयासाठी प्रेरणा देऊन उत्तेजित करतात.
🤨 *नकारात्मक विचार* : ज्या गोष्टीवर आपण काही करू शकत नाही. पण आपण निष्कारण त्या गोष्टीवर विचार करतो त्याला नकारात्मक विचार म्हणतात. हे विचार आपल्या मनामध्ये टेन्शन, नैराश्य, मानसिक ताण निर्माण करतात.
👉 *नकारात्मक विचार कसे थांबवता येतील?* :
1) आपण आपल्या विचारांवर लक्ष ठेवले पाहिजे. आपण काय विचार करतोय हे ध्यानात असायला हवे. हे करायला थोडा वेळ लागेल. पण हे शक्य आहे. कारण यामुळे तुम्हाला कळेल कि तुम्ही किती योग्य आणि अनावश्यक गोष्टीवर विचार करता ते.
2) जे आहे ते स्वीकार करता यायला हवे. आपल्याला गोष्टी धरून ठेवायची सवय असते यामुळे मन अशांत होते. त्यामुळे मनाविरुद्ध घडलेली गोष्ट स्वीकारायला शिकायला हवे.
3) आपले नियंत्रण फक्त आपल्या कृतीवर आहे, हे लक्षात घ्या. यामुळे तुम्ही दुसऱ्याला दोष देणे थांबवून कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
4) रोज किमान 10 मिनिटे तरी ध्यानधारणा केली पाहिजे. यामुळे मन आणि विचार संयमित होतात. तसेच विचार पूर्वक निर्णय घ्यायला आपले मन तयार होते.
#Forwarded Message
12
Answer link
विचारांचं सामथ्र्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. सामान्यपणे आपलं आपल्या विचारांकडे लक्ष नसतं; किंबहुना विचारांच्या बाबतीत जेवढी सजगता असायला हवी तेवढी आपल्यामध्ये नसते. एखादी चांगली गोष्ट करताना मनात येणारा पहिला सृजनशील विचार पकडून ठेवता आला पाहिजे, तशी सवयच लावून घ्यायला हवी व तात्काळ कृतीच्या अंमलबजावणीची रूपरेषा ठरवली गेली पाहिजे. मनात येणाऱ्या पहिल्या विचारालाच नकारात्मक विचारांचे मळभ लाभले की कार्यसिद्धीला ग्रहण लागलंच म्हणून समजा. पाणी ज्याप्रमाणे उताराकडे वाहतं तसे बहुसंख्य वेळेला माणूस नकारात्मक विचार करताना दिसतो. बहुतेक वेळेला खालील प्रकारचे विचार कार्यप्रवण होण्यामध्ये आणि चांगल्या विचारांना प्रत्यक्षात सिद्ध होण्यामध्ये अडसर ठरतात. उदाहरणार्थ,
* मी केल्याने काय फरक पडणार आहे?
* मला जमण्यासारखं नाही ते.
* मीच का म्हणून करू?
* योग्य वेळ आल्यावर करू, आत्ताच काही घाई नाही.
* लोक काय म्हणतील, हसणार तर नाहीत ना?
* पण योजना असफल झाली तर?
* करायला हरकत नाही, पण मला नशीब कधीच साथ देत नाही.
पहिल्या विचारावर कार्यप्रवण होण्यामध्ये जरा काळ गेला की असे असंख्य विचार अडचणींचे डोंगर उभे करतात आणि चांगल्या विचाराची हत्या होते. थोर व्यक्तींच्या चरित्राचं परिशीलन केलं असता असं लक्षात येतं की, प्रतिकूल परिस्थितीतही केवळ सकारात्मक विचारांची साथ न सोडल्यामुळे ते असामान्य कार्य करू शकले.
स्व-प्रतिमाग, विधायक विचार
स्वत:बद्दल व्यक्तीचं चांगलं मत असणं हे सृजनात्मक विचारांच्या जोपासनेसाठी, आत्मविश्वास निर्मितीसाठी व सुदृढ मानसिक स्वास्थ्यासाठी अग्रक्रमाची गोष्ट ठरत ‘स्व’ची ओळख होणं ही या प्रक्रियेतील महत्त्वाचा व सुरुवातीचा टप्पा आहे. सकारात्मक विचार करण्याची सवय लागली की आपोआपच स्वत:विषयी आदर निर्माण होतो व सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होते. चांगली स्व-प्रतिमा निर्माण होण्यासाठी स्वत:चं चिकित्सक अवलोकन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबरच सकारात्मक विचारांचा पाया म्हणून ओळखली जाणारी सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. सकारात्मक स्व-प्रतिमा असणारे व्यक्ती स्वत:बद्दल जागृत असतात. स्वत:च्या गुण-दोषांबद्दल त्यांना जाणीव असते. स्वत:बद्दल चांगली भावना योग्य निर्णय घेण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यासाठी महत्त्वाची आहे.
स्वत:ला स्वीकारणं
बऱ्याच वेळा व्यक्ती स्वत:च्या रंग, रूप, उंची यानुसार स्वत:चं मूल्यमापन करतो. वर्ण काळा असेल, उंची कमी असेल तर स्वत:बद्दल नकारात्मक विचार निर्माण होतात. क्वचित प्रसंगी आलेल्या अपयशाने खचून न जाता अपयशाच्या कारणांचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही निसर्गाची अद्वितीय कलाकृती असते, त्यामुळे इतरांशी तुलना करून स्वत:ला कमी लेखण्यापेक्षा स्वत:मध्ये सातत्याने सुधार कसा होईल, याचा प्रयत्न केला पाहिजे.
स्वत:शी संवाद साधणं
स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. स्वत:ला स्वत:मध्ये असणाऱ्या गुण-दोषांसहित स्वीकारणं म्हणजेच सकारात्मक स्व-प्रतिमा निवडण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल होय. इतर व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात, त्यांना आपण कसे वाटतो, यावरून स्वत:ची किमत करू नये. कारण आपणच स्वत:ला चांगले ओळखू शकतो.
सकारात्मक स्व-सूचना
आधुनिक मानसशास्त्राने असे सिद्ध केले आहे की सकारात्मक स्व-सूचनांचा व्यक्तिमत्त्व विकासात चांगला परिणाम दिसून येतो. हे एक प्रकारचे सकारात्मक विचारांचे प्रशिक्षणच आहे. नियोजन करताना, निर्णय घेताना, कार्याची अंमलबजावणी करीत असताना सकारात्मक स्व-सूचनांचा निश्चित फायदा होतो. स्वत:मध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून ही स्व-सूचनांचा उपयोग करता येतो. उदाहरणार्थ,
* मी प्रत्येक काम आत्मविश्वासाने करीत आहे.
* माझी एकाग्रता वाढली आहे.
* माझा सर्वाशी सुसंवाद आहे.
* माझे जीवन अर्थपूर्ण व ध्येयनिष्ठ आहे.
* मी सकारात्मक आहे.
* स्वत:ला स्वीकारणे.
बऱ्याच वेळेला आपण जसे नाहीत तसे इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो; परंतु यातून येणारी निराशा फार मोठी असते. तसेच यामध्ये आपण स्वत:लाच एक प्रकारे फसवत असतो. त्यामुळे आपण जसे आहोत तसे प्रदर्शित होणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने स्वत:वरचा विश्वास व आदर वाढतो.
नावीन्यत
जीवन जगत असताना नावीन्याचा सातत्याने पाठपुरावा केला तर सर्जनशीलतेचा विकास होण्यास हातभार लागतो. दैनंदिन कृती करताना एखादी समस्या सोडवताना यामध्ये आणखी काय नवीन करता येईल, याचा विचार केला तर अनेक मार्ग अजून सुचू शकतील. अगदी बोलतानाही अचूक, समर्पक अथवा नेहमी वापरतो त्यापेक्षा वेगळ्या शब्दांचा शोध घेतला तर भाषाही समृद्ध होईल. नावीन्य ही मनाची ओढ असली तरीही प्रत्यक्षात कृती करताना व्यक्ती नवीन मार्ग अवलंबायला तसा धजावत नाही. सकारात्मक विचारांमुळे या विचारसरणीमध्ये निश्चित बदल होऊ शकतो. नव्या दृष्टिकोनातून विचार केला म्हणूनच आईनस्टाईन, बिल गेट्स, जेम्स वॅट, एडिसन, गौतम बुद्ध, जगदीशचंद्र बोस यांसारख्या महान व्यक्ती ज्ञानाच्या कक्षांची क्षितिजे विस्तारण्यात यशस्वी झाल्या.
इतरांसाठी चांगल्या गोष्टी करणे
स्वत:साठी तर सगळेच जगतात; परंतु जो इतरांसाठी काही तरी चांगले करतो त्याला सकारात्मक ऊर्जेचे दालन खुले होते, स्वत:मध्ये आत्मप्रतिष्ठा निर्माण होते. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांचा विचार केला तरच समाजाचा आणि राष्ट्राचा विकास साध्य होऊ शकेल.
आनंदी राहणे
जीवनातील विसंगतींना अनुसरून थोडासा विनोद करणे, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे, उत्तम कलाकृती, नाटके, साहित्य यांचे रसग्रहण करणे, थोडक्यात समग्रपणे जीवन जगणे यातूनच आनंदी वृत्ती तयार होते, जी जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते.
स्वत:च्या क्षमतांचा पूर्णपणे उपयोग करायचा असेल तर स्वत:ची ओळख होणे व सकारात्मक विचारांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचारसरणी असणारी सृजनशील माणसे समाजात आपले योगदान प्रभावीपणे देऊ शकतात. चला तर मग, सकारात्मक विचारांच्या माध्यमातून स्वत:ची प्रतिमा उंचावण्याचा निर्धार करून राष्ट्र निर्माणाच्या कार्यास सिद्ध होऊ या.
* मी केल्याने काय फरक पडणार आहे?
* मला जमण्यासारखं नाही ते.
* मीच का म्हणून करू?
* योग्य वेळ आल्यावर करू, आत्ताच काही घाई नाही.
* लोक काय म्हणतील, हसणार तर नाहीत ना?
* पण योजना असफल झाली तर?
* करायला हरकत नाही, पण मला नशीब कधीच साथ देत नाही.
पहिल्या विचारावर कार्यप्रवण होण्यामध्ये जरा काळ गेला की असे असंख्य विचार अडचणींचे डोंगर उभे करतात आणि चांगल्या विचाराची हत्या होते. थोर व्यक्तींच्या चरित्राचं परिशीलन केलं असता असं लक्षात येतं की, प्रतिकूल परिस्थितीतही केवळ सकारात्मक विचारांची साथ न सोडल्यामुळे ते असामान्य कार्य करू शकले.
स्व-प्रतिमाग, विधायक विचार
स्वत:बद्दल व्यक्तीचं चांगलं मत असणं हे सृजनात्मक विचारांच्या जोपासनेसाठी, आत्मविश्वास निर्मितीसाठी व सुदृढ मानसिक स्वास्थ्यासाठी अग्रक्रमाची गोष्ट ठरत ‘स्व’ची ओळख होणं ही या प्रक्रियेतील महत्त्वाचा व सुरुवातीचा टप्पा आहे. सकारात्मक विचार करण्याची सवय लागली की आपोआपच स्वत:विषयी आदर निर्माण होतो व सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होते. चांगली स्व-प्रतिमा निर्माण होण्यासाठी स्वत:चं चिकित्सक अवलोकन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबरच सकारात्मक विचारांचा पाया म्हणून ओळखली जाणारी सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. सकारात्मक स्व-प्रतिमा असणारे व्यक्ती स्वत:बद्दल जागृत असतात. स्वत:च्या गुण-दोषांबद्दल त्यांना जाणीव असते. स्वत:बद्दल चांगली भावना योग्य निर्णय घेण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यासाठी महत्त्वाची आहे.
स्वत:ला स्वीकारणं
बऱ्याच वेळा व्यक्ती स्वत:च्या रंग, रूप, उंची यानुसार स्वत:चं मूल्यमापन करतो. वर्ण काळा असेल, उंची कमी असेल तर स्वत:बद्दल नकारात्मक विचार निर्माण होतात. क्वचित प्रसंगी आलेल्या अपयशाने खचून न जाता अपयशाच्या कारणांचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही निसर्गाची अद्वितीय कलाकृती असते, त्यामुळे इतरांशी तुलना करून स्वत:ला कमी लेखण्यापेक्षा स्वत:मध्ये सातत्याने सुधार कसा होईल, याचा प्रयत्न केला पाहिजे.
स्वत:शी संवाद साधणं
स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. स्वत:ला स्वत:मध्ये असणाऱ्या गुण-दोषांसहित स्वीकारणं म्हणजेच सकारात्मक स्व-प्रतिमा निवडण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल होय. इतर व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात, त्यांना आपण कसे वाटतो, यावरून स्वत:ची किमत करू नये. कारण आपणच स्वत:ला चांगले ओळखू शकतो.
सकारात्मक स्व-सूचना
आधुनिक मानसशास्त्राने असे सिद्ध केले आहे की सकारात्मक स्व-सूचनांचा व्यक्तिमत्त्व विकासात चांगला परिणाम दिसून येतो. हे एक प्रकारचे सकारात्मक विचारांचे प्रशिक्षणच आहे. नियोजन करताना, निर्णय घेताना, कार्याची अंमलबजावणी करीत असताना सकारात्मक स्व-सूचनांचा निश्चित फायदा होतो. स्वत:मध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून ही स्व-सूचनांचा उपयोग करता येतो. उदाहरणार्थ,
* मी प्रत्येक काम आत्मविश्वासाने करीत आहे.
* माझी एकाग्रता वाढली आहे.
* माझा सर्वाशी सुसंवाद आहे.
* माझे जीवन अर्थपूर्ण व ध्येयनिष्ठ आहे.
* मी सकारात्मक आहे.
* स्वत:ला स्वीकारणे.
बऱ्याच वेळेला आपण जसे नाहीत तसे इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो; परंतु यातून येणारी निराशा फार मोठी असते. तसेच यामध्ये आपण स्वत:लाच एक प्रकारे फसवत असतो. त्यामुळे आपण जसे आहोत तसे प्रदर्शित होणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने स्वत:वरचा विश्वास व आदर वाढतो.
नावीन्यत
जीवन जगत असताना नावीन्याचा सातत्याने पाठपुरावा केला तर सर्जनशीलतेचा विकास होण्यास हातभार लागतो. दैनंदिन कृती करताना एखादी समस्या सोडवताना यामध्ये आणखी काय नवीन करता येईल, याचा विचार केला तर अनेक मार्ग अजून सुचू शकतील. अगदी बोलतानाही अचूक, समर्पक अथवा नेहमी वापरतो त्यापेक्षा वेगळ्या शब्दांचा शोध घेतला तर भाषाही समृद्ध होईल. नावीन्य ही मनाची ओढ असली तरीही प्रत्यक्षात कृती करताना व्यक्ती नवीन मार्ग अवलंबायला तसा धजावत नाही. सकारात्मक विचारांमुळे या विचारसरणीमध्ये निश्चित बदल होऊ शकतो. नव्या दृष्टिकोनातून विचार केला म्हणूनच आईनस्टाईन, बिल गेट्स, जेम्स वॅट, एडिसन, गौतम बुद्ध, जगदीशचंद्र बोस यांसारख्या महान व्यक्ती ज्ञानाच्या कक्षांची क्षितिजे विस्तारण्यात यशस्वी झाल्या.
इतरांसाठी चांगल्या गोष्टी करणे
स्वत:साठी तर सगळेच जगतात; परंतु जो इतरांसाठी काही तरी चांगले करतो त्याला सकारात्मक ऊर्जेचे दालन खुले होते, स्वत:मध्ये आत्मप्रतिष्ठा निर्माण होते. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांचा विचार केला तरच समाजाचा आणि राष्ट्राचा विकास साध्य होऊ शकेल.
आनंदी राहणे
जीवनातील विसंगतींना अनुसरून थोडासा विनोद करणे, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे, उत्तम कलाकृती, नाटके, साहित्य यांचे रसग्रहण करणे, थोडक्यात समग्रपणे जीवन जगणे यातूनच आनंदी वृत्ती तयार होते, जी जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते.
स्वत:च्या क्षमतांचा पूर्णपणे उपयोग करायचा असेल तर स्वत:ची ओळख होणे व सकारात्मक विचारांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचारसरणी असणारी सृजनशील माणसे समाजात आपले योगदान प्रभावीपणे देऊ शकतात. चला तर मग, सकारात्मक विचारांच्या माध्यमातून स्वत:ची प्रतिमा उंचावण्याचा निर्धार करून राष्ट्र निर्माणाच्या कार्यास सिद्ध होऊ या.
0
Answer link
मनातील नकारात्मक विचार घालवण्यासाठी काही उपाय:
-
विचार बदला: नकारात्मक विचार posit सकारात्मक विचारांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करा.
उदाहरणार्थ, "मी हे करू शकत नाही" ऐवजी "मी प्रयत्न करेन" असा विचार करा.
-
नकारात्मक विचारांचे मूळ शोधा: नकारात्मक विचार कुठून येत आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करा.
त्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करा.
-
ध्यान करा: रोज थोडा वेळ ध्यान केल्याने मन शांत राहते आणि नकारात्मक विचार कमी होतात.
Guidance साठी हे ॲप वापरू शकता: Meditation App
- नकारात्मक लोकांपासून दूर राहा: जे लोक नेहमी नकारात्मक बोलतात किंवा विचार करतात त्यांच्यापासून दूर राहा.
-
सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा: आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या.
ज्या गोष्टींसाठी आपण आभारी आहोत, त्या गोष्टींची नोंद ठेवा.
- व्यायाम करा: नियमित व्यायाम केल्याने तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते.
- पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
- आहार चांगला ठेवा: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.
- मनोरंजन करा: चित्रपट पाहणे, संगीत ऐकणे किंवा मित्रांबरोबर गप्पा मारणे यासारख्या गोष्टींमधून आनंद मिळवा.
- मदत मागा: जर नकारात्मक विचार खूप जास्त येत असतील, तर एखाद्या समुपदेशकाची (Counselor) मदत घ्या.
हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मनातील नकारात्मक विचार कमी करू शकता. कोणता उपाय तुमच्यासाठी सर्वोत्तम काम करतो हे शोधण्यासाठी प्रयोग करा आणि आपल्या जीवनशैलीत आवश्यक बदल करा.