3 उत्तरे
3
answers
शिका, संघर्ष करा व संघटित व्हा हे कोणाचे ब्रीदवाक्य होते?
16
Answer link
बाबासाहेबांनी आम्हाला जी यंत्रणा शिकवली ती आम्ही या साठ वर्षांत अजूनही शिकलेलो नाही. कुठल्याही विहारात जा किंवा एखादा बैनर फलक पहा, किंवा अगदी एखाद्या शिक्षण संस्थेतही पहा बाबासाहेबांचा एक संदेश मोठ्या दिमाखाने झळकत असतो. "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा." मागे एकदा आमच्या इथल्या चैतन्य विहारात याबद्दल मी बोलत असताना मला अनेक वयस्क माणसांनी विरोध केला मात्र जेव्हा त्यांना विनंती करून विनयपूर्वक मुद्दा पटवून दिला तेव्हा तो त्यांना पटला. मात्र इतकी वर्षे ते हाच उपरोक्त संदेश प्रमाण मानून जगत होती, कदाचित त्यामुळेही आजची ही विदारक अवस्था समाजाने आपल्यावर ओढावून घेतलेली असावी.
Educate, Agitate and Organise असा तो मूळ इंग्रजी संदेश आहे. अर्थात शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. आपण हा क्रम चुकवत आलो आहोत, आणि हा क्रम चुकवण ही साधी गोष्ट नसून भयंकर प्रमाद आहे असे मी मानतो. बाबासाहेबांनी प्रत्येक लढ्यात किंवा त्यांच्या भाषणात लिखाणात एक मैकेनिज्म तयार करून दिलाय. एक यंत्रणा निर्माण करण्याचे तंत्र निर्माण करून दिलेय. आमची पिढी पैंथरला प्रमाण मानून लढा उभा करण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याच्या उद्दिष्टपूर्तीची शंका माझ्या मनात निर्माण होत राहते. का नाही आपण बाबासाहेबांनी केलेल्या सत्याग्रहांवर आधारीत एखादा लढा उभा करण्याचा प्रयत्न करत? दगड फेकून क्रांती होते ही त्यांची शिकवण नाही म्हणूनच की काय चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी सत्याग्रहींवर जो हल्ला झाला त्याला प्रतिउत्तरात लाठ्याकाठ्यांचा हल्ला न करता अगदी शांतपणे मात्र अत्यंत विचारपूर्वकपणे बाबासाहेबांनी त्याच भूमीत नऊ महिन्यांनी त्या विषमतेचा समूळ धिक्कार केला आणि तोही असा की हल्लेखोरांसोबत हल्लेखोरांचे टेक्नोक्रैट जे आहेत त्यांचेही दात घशात घातले जातील.
नेहमी वाटत आले आहे की रीडिंग बाबासाब इज वन थिंग अँड लर्निंग बाबासाब इज वन थिंग. त्यामुळेच शिका संघर्ष करा संघटित व्हा याचा क्रम आपण चुकीचा लावला.
बाबासाहेब म्हणतात Educate - शिका, म्हणून आम्ही नुसत्या डिग्र्या घेत सुटण्याला अर्थ नाही. शिका म्हणजे औपचारिक शिक्षणासोबतच परिवर्तनाचा लढाही शिका. सीमेवरती लढाईला कुणीही सामान्य नागरिक जाऊ शकतो का? नाही. कारण त्या लढाईचे तंत्रशुद्ध शिक्षण घेणे गरजेचे आहे. कुणीही हृदयाची शस्त्रक्रिया करू शकत नाही त्याला अथक शिक्षणाची आवश्यकता आहे. मग केवळ आपण बौद्ध किंवा मागासवर्गीय किंवा तत्सम कुटुंबात जन्माला आलो, त्रिसरण पंचशील आणि जयभीम म्हणत वाढलो म्हणून आम्ही आंबेडकरी झालो का? किंवा आंबेडकरी लढाई लढण्यासाठी पात्र झालो का? तर माझ्यामते नाही. कारण अजूनही आम्ही बाबासाहेबांचा विचार नेमकेपणाने आत्मसात केलेला नाही. तो आत्मसात करणे आणि येणाऱ्या पिढ्यांकडे ट्रांसफर करणे म्हणजे बाबासाहेबांच्या संदेशाच्या दृष्टीने "शिका" आहे असे मला वाटते.
मग येते Agitate - संघर्ष करा. आता हा संघर्ष कशासाठी? या देशात स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि लोकशाहीमूलक समाज आणि राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी संघर्ष करणे. परिवर्तनासाठी किंवा त्यांच्याच भाषेत प्रतिक्रांतिशी मुकाबला करणारी क्रांति निर्माण करण्यासाठीचा संघर्ष. संघर्ष करा या संदेशात उपरोक्त सर्व अंतर्भूत होईल यात दुमत असण्याचे कारण नाही. पण मग हा संघर्ष नेमका करायचा कसा?
यासाठी बाबासाहेबांच्या संदेशातील अंतिम शब्द महत्वाचा आहे. "संघटित व्हा". मला वाटत बाबासाहेबांच्या संदेशातील "संघर्ष करा" हा संदेश "संघटित होण्यासाठी संघर्ष करा" या अर्थाने आहे.
Orgnise - संघटित व्हा. संघटित कुणी व्हायचे आहे? बौद्ध समाजाने? आंबेडकरी समाजाने? की आणखी कुणी? संघटित व्हायचे आहे या देशातील त्या ८५% जनतेने जी आजवर शोषित वंचित, प्रगतीच्या दृष्टीने मागास राहिली आहे. त्यात केवळ SC च नाही तर या देशातील OBC, SC, ST, NT, VJ या सर्वांनी संघटित होऊन जे १५% लोक आजवर सत्ता, शास्त्र, शस्त्र आणि संपत्ती याच्या जोरावर राज्य करत आलेत, अन्याय करत आलेले आहेत त्या ब्राम्हणवादी, भांडवलवादी, विषमतावादी लोकांविरुद्ध संघर्ष करायचा आहे. म्हणजे लाठ्याकाठ्यांचा संघर्ष नाही तर या संघटित शक्तीने या देशात स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायप्रणव समाजव्यवस्था निर्माण करणे आणि या देशाची राजसत्ता काबिज करणे हे होय. जोपर्यंत या देशाचा शोषित वंचित घटक देशाच्या सत्तेत येत नाही तोपर्यंत या देशात लोकशाही टिकणे आणि वाढणे अशक्य आहे.
म्हणूनच शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश नसून शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा असा बाबसाहेबांचा संदेश आहे. ज्या दिवशी या देशातील ८५% जनता संघटित होईल त्यादिवशी तिला कुठलाही वेगळा संघर्ष करायची गरज नाही. पण संघर्ष करावा लागणार आहे तो ही ८५% जनता संघटित करण्यासाठी. त्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे, विचारधारा समजून घेणे गरजेचे आहे आणि ती कृतीत उतरवून ती यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे जिचा बाबासाहेब आग्रह धरतात.
एखाद्या संघटनेतील कार्यकर्ते स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरून योग्य काय अयोग्य काय हे समजून घेत नसतील आणि जे अयोग्य आहे त्याविरोधात ठाम भूमिका घ्यायला अक्षम असतील तर अशी संघटना ही लोकशाहीला मारक आणि हुकुमशाहीला पूरक ठरत असते. आंबेडकरवादी विचारांचा दावा करणाऱ्या संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये हा सद्सद्विवेकबुद्धीने विचार करणारा कार्यकर्ता नसल्याने ह्या संघटना अथवा पक्ष सतत अपयशी ठरत आलेले आहेत. हा सद्सद्विवेकबुद्धीचा कार्यकर्ता निर्माण करणे ही पहिली गरज आहे. कुणीतरी ढकलत जातेय आणि आपण ढकलले जातोय अशी परिस्थिती आहे.
म्हणूनच १९५४ साली गोखले इंस्टिट्यूट पुणे येथे लोकशाही आणि लोकशाहीच्या यशस्वितेच्या सात अटी सांगताना शेवटचे दोन अटी बाबासाहेब सांगतात,
६) नितीमान समाजाची गरज.
७) सार्वजनिक विवेकबुध्दी हे लोकशाहीचे आश्रयस्थान.
आज हुकुमशाही वृत्ती बळावू पाहणाऱ्या शक्तींना आवर घालण्यासाठी स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरणारा नीतिमान समाज निर्माण करण्याची गरज आहे. अन्यथा या देशातील ८५% शोषित वंचित समाजाची असंघटितता आणि उदासीनता ही लोकशाहीला मारक आणि हुकुमशाहीला पूरक ठरणारी आहे. बाबासाहेबांचा विचार समजून तो कृतीत आणण्याची नितांत आवश्यकता आज आहे.
जयभीम, नमो बुद्धाय.
राजे

Educate, Agitate and Organise असा तो मूळ इंग्रजी संदेश आहे. अर्थात शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. आपण हा क्रम चुकवत आलो आहोत, आणि हा क्रम चुकवण ही साधी गोष्ट नसून भयंकर प्रमाद आहे असे मी मानतो. बाबासाहेबांनी प्रत्येक लढ्यात किंवा त्यांच्या भाषणात लिखाणात एक मैकेनिज्म तयार करून दिलाय. एक यंत्रणा निर्माण करण्याचे तंत्र निर्माण करून दिलेय. आमची पिढी पैंथरला प्रमाण मानून लढा उभा करण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याच्या उद्दिष्टपूर्तीची शंका माझ्या मनात निर्माण होत राहते. का नाही आपण बाबासाहेबांनी केलेल्या सत्याग्रहांवर आधारीत एखादा लढा उभा करण्याचा प्रयत्न करत? दगड फेकून क्रांती होते ही त्यांची शिकवण नाही म्हणूनच की काय चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी सत्याग्रहींवर जो हल्ला झाला त्याला प्रतिउत्तरात लाठ्याकाठ्यांचा हल्ला न करता अगदी शांतपणे मात्र अत्यंत विचारपूर्वकपणे बाबासाहेबांनी त्याच भूमीत नऊ महिन्यांनी त्या विषमतेचा समूळ धिक्कार केला आणि तोही असा की हल्लेखोरांसोबत हल्लेखोरांचे टेक्नोक्रैट जे आहेत त्यांचेही दात घशात घातले जातील.
नेहमी वाटत आले आहे की रीडिंग बाबासाब इज वन थिंग अँड लर्निंग बाबासाब इज वन थिंग. त्यामुळेच शिका संघर्ष करा संघटित व्हा याचा क्रम आपण चुकीचा लावला.
बाबासाहेब म्हणतात Educate - शिका, म्हणून आम्ही नुसत्या डिग्र्या घेत सुटण्याला अर्थ नाही. शिका म्हणजे औपचारिक शिक्षणासोबतच परिवर्तनाचा लढाही शिका. सीमेवरती लढाईला कुणीही सामान्य नागरिक जाऊ शकतो का? नाही. कारण त्या लढाईचे तंत्रशुद्ध शिक्षण घेणे गरजेचे आहे. कुणीही हृदयाची शस्त्रक्रिया करू शकत नाही त्याला अथक शिक्षणाची आवश्यकता आहे. मग केवळ आपण बौद्ध किंवा मागासवर्गीय किंवा तत्सम कुटुंबात जन्माला आलो, त्रिसरण पंचशील आणि जयभीम म्हणत वाढलो म्हणून आम्ही आंबेडकरी झालो का? किंवा आंबेडकरी लढाई लढण्यासाठी पात्र झालो का? तर माझ्यामते नाही. कारण अजूनही आम्ही बाबासाहेबांचा विचार नेमकेपणाने आत्मसात केलेला नाही. तो आत्मसात करणे आणि येणाऱ्या पिढ्यांकडे ट्रांसफर करणे म्हणजे बाबासाहेबांच्या संदेशाच्या दृष्टीने "शिका" आहे असे मला वाटते.
मग येते Agitate - संघर्ष करा. आता हा संघर्ष कशासाठी? या देशात स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि लोकशाहीमूलक समाज आणि राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी संघर्ष करणे. परिवर्तनासाठी किंवा त्यांच्याच भाषेत प्रतिक्रांतिशी मुकाबला करणारी क्रांति निर्माण करण्यासाठीचा संघर्ष. संघर्ष करा या संदेशात उपरोक्त सर्व अंतर्भूत होईल यात दुमत असण्याचे कारण नाही. पण मग हा संघर्ष नेमका करायचा कसा?
यासाठी बाबासाहेबांच्या संदेशातील अंतिम शब्द महत्वाचा आहे. "संघटित व्हा". मला वाटत बाबासाहेबांच्या संदेशातील "संघर्ष करा" हा संदेश "संघटित होण्यासाठी संघर्ष करा" या अर्थाने आहे.
Orgnise - संघटित व्हा. संघटित कुणी व्हायचे आहे? बौद्ध समाजाने? आंबेडकरी समाजाने? की आणखी कुणी? संघटित व्हायचे आहे या देशातील त्या ८५% जनतेने जी आजवर शोषित वंचित, प्रगतीच्या दृष्टीने मागास राहिली आहे. त्यात केवळ SC च नाही तर या देशातील OBC, SC, ST, NT, VJ या सर्वांनी संघटित होऊन जे १५% लोक आजवर सत्ता, शास्त्र, शस्त्र आणि संपत्ती याच्या जोरावर राज्य करत आलेत, अन्याय करत आलेले आहेत त्या ब्राम्हणवादी, भांडवलवादी, विषमतावादी लोकांविरुद्ध संघर्ष करायचा आहे. म्हणजे लाठ्याकाठ्यांचा संघर्ष नाही तर या संघटित शक्तीने या देशात स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायप्रणव समाजव्यवस्था निर्माण करणे आणि या देशाची राजसत्ता काबिज करणे हे होय. जोपर्यंत या देशाचा शोषित वंचित घटक देशाच्या सत्तेत येत नाही तोपर्यंत या देशात लोकशाही टिकणे आणि वाढणे अशक्य आहे.
म्हणूनच शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश नसून शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा असा बाबसाहेबांचा संदेश आहे. ज्या दिवशी या देशातील ८५% जनता संघटित होईल त्यादिवशी तिला कुठलाही वेगळा संघर्ष करायची गरज नाही. पण संघर्ष करावा लागणार आहे तो ही ८५% जनता संघटित करण्यासाठी. त्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे, विचारधारा समजून घेणे गरजेचे आहे आणि ती कृतीत उतरवून ती यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे जिचा बाबासाहेब आग्रह धरतात.
एखाद्या संघटनेतील कार्यकर्ते स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरून योग्य काय अयोग्य काय हे समजून घेत नसतील आणि जे अयोग्य आहे त्याविरोधात ठाम भूमिका घ्यायला अक्षम असतील तर अशी संघटना ही लोकशाहीला मारक आणि हुकुमशाहीला पूरक ठरत असते. आंबेडकरवादी विचारांचा दावा करणाऱ्या संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये हा सद्सद्विवेकबुद्धीने विचार करणारा कार्यकर्ता नसल्याने ह्या संघटना अथवा पक्ष सतत अपयशी ठरत आलेले आहेत. हा सद्सद्विवेकबुद्धीचा कार्यकर्ता निर्माण करणे ही पहिली गरज आहे. कुणीतरी ढकलत जातेय आणि आपण ढकलले जातोय अशी परिस्थिती आहे.
म्हणूनच १९५४ साली गोखले इंस्टिट्यूट पुणे येथे लोकशाही आणि लोकशाहीच्या यशस्वितेच्या सात अटी सांगताना शेवटचे दोन अटी बाबासाहेब सांगतात,
६) नितीमान समाजाची गरज.
७) सार्वजनिक विवेकबुध्दी हे लोकशाहीचे आश्रयस्थान.
आज हुकुमशाही वृत्ती बळावू पाहणाऱ्या शक्तींना आवर घालण्यासाठी स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरणारा नीतिमान समाज निर्माण करण्याची गरज आहे. अन्यथा या देशातील ८५% शोषित वंचित समाजाची असंघटितता आणि उदासीनता ही लोकशाहीला मारक आणि हुकुमशाहीला पूरक ठरणारी आहे. बाबासाहेबांचा विचार समजून तो कृतीत आणण्याची नितांत आवश्यकता आज आहे.
जयभीम, नमो बुद्धाय.
राजे

0
Answer link
शिका, संघर्ष करा व संघटित व्हा हे ब्रीदवाक्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिक्षण घेण्यास, अन्यायाविरुद्ध लढण्यास आणि एकत्र येऊन शक्ती निर्माण करण्यास प्रोत्साहित केले.
हे ब्रीदवाक्य त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांचे प्रतीक आहे.
अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता: