भारत भूगोल सामान्य ज्ञान शहरे

भारतामध्ये सर्वात मोठे शहर कोणते?

2 उत्तरे
2 answers

भारतामध्ये सर्वात मोठे शहर कोणते?

9
भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर हे मुंबई आहे . 
मुंबई ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील सर्वांत श्रीमंत शहर असून दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून सागरी मार्गाने होणारी भारताची ५०% मालवाहतूक होते.
उत्तर लिहिले · 5/1/2018
कर्म · 458560
0

भारतामध्ये सर्वात मोठे शहर मुंबई आहे.

मुंबई हे शहर महाराष्ट्राची राजधानी असून ते देशातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे शहर आहे. हे शहर आर्थिक, व्यापार, मनोरंजन आणि संस्कृतीचे केंद्र आहे.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1440

Related Questions

महाराष्ट्रातील खेड्यांच्या वसाहतीचे प्रमुख प्रकार स्पष्ट करा?
आदिवासींच्या स्थळ घटकावर थोडक्यात माहिती लिहा?
पृथ्वीचे अंतरंग किती व कोणत्या थरांपासून बनलेले आहे? याविषयी सविस्तर माहिती लिहा.
खारे वारे (Land breeze) आणि मतलई वारे (Sea breeze) संकल्पना आकृतीसह स्पष्ट करा?
ज्वालामुखी ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा?
पृथ्वीचे अंतरंग कोणत्या थरांपासून बनलेले आहे याविषयी सविस्तर माहिती लिहा?
स्थलांतराचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा?