समाज
गैरसमज
बाहेर च आहे असे लोक म्हणतात हे खरे आहे का ?
मूळ प्रश्न: "करणी करणे" असा काही प्रकार असतो का? असेल तर उपाय काय करायचा, नसेल तर त्या माणसांचा मनातून तो विचार कसा काढायचा?
सर्वसामान्य गुणापेक्षा जास्त सदृण दिसल्यावर ती व्यक्ती आपल्यापेक्षा वरचढ़ होऊ नये म्हणून ,या इर्षेने काही दुष्ट दुबळी माणसे करणी सारख्या अदृश्य अघोरी उपायांचा आश्रय घेऊन इतर सज्जनांना त्रास देतात. हां त्यांचा अत्यंत आवडीचा छंद असतो. यासाठी मैली विद्या जाणणाऱ्या व्यक्तिकडून श्रम व पैसा खर्च करुन ही विद्या अशा लोकांवर करीत असतात. अर्थात यात फायदा न होता लोकांचे शिव्याशाप बाधतात...इतकेच नव्हे तर त्या कुटुंबाची पिढी दारिद्र्य, दुखाने नष्ट होते...जर तुमचा जवळील व्यक्ती एखाद्यावर करणी करवयास जात असल्यास त्याला समजविण्याचे कार्य तुम्ही हातात घ्या...त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता की हा मार्ग चुकीचा आहे...यात फक्त नुकसान आहे ...स्वताचे आणि इतरांचे पण...अश्या मार्गाला जाणारे व्यक्ती नेहमी अहंकारी होऊन बसतात...मग त्यांच्याकडे कितीही पैसा श्रीमंती आली तरी त्यांना कोणाचे प्रेम माया आणि समाधान तर अजिबातच मिळत नाही...सुख पदरात असूनही त्यांना त्या सुखाची जाणीवच मुळात होत नाही...कष्ट करा...चार पैसे मेहनतीने कमवून आपले व आपल्या माणसांचे पोट भरण्यात एक गोड आनंद असतो हे त्यांना पटवून द्या...संतांचा महिमा त्यांच्या नजरेत भरा...चांगल्या गोष्टी अमलात आणायला शिकवा...ईर्ष्या, जळण, राग,द्वेष, अहंकार, वासना,संशयी याने फक्त दुखी, निराशा, चिड़चिड, असमाधानीच होऊ शकतो...पण प्रेम दया माया संयम आणि हुशारीपणा याने माणूस समाधानी असतो आणि त्याला दुःख तरी वाटेवर मिळाले तरी तो भयभीत न होता त्याचा सामना करण्यास तत्पर असतो.... मन निर्मळ आणि स्वच्छ तर माणूस आनंदीच असतो...काळजी घ्या...
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers