3 उत्तरे
3
answers
वीर बाजी पासलकर यांच्याबद्दल माहिती मिळेल का?
6
Answer link
⚔️स्वराज्यासाठी पाहिलं बलिदान देणारे वीर बाजी पासलकर⚔️
स्मृतिदिन दिनांक – २४ मे १६४९,
समाधी स्थान – सासवड , तालुका – पुरंदर, जिल्हा – पुणे
वीर बाजी पासलकर हे छ्त्रपतींच्या स्वराज्य
संग्रामाचे पहिले सरसेनापती
छ्त्रपति शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य
स्थापन केले, जगच्या ईतिहासात एक तेजस्वी पर्व
निर्माण केले, रयतेच्या या राजाने असामान्य साहसाचे,
ऊत्कट देशभक्तीचे आणि रयतेच्या कल्याणासाठी कार्यरत
राहण्याचे व्रत आंगिकारले.
छ्त्रपति शिवरायांच्या स्वराज्य कार्यात
प्रारंभी सहभागी झालेले बाजी पासलकर हे स्वरज्याचे
पहिले सरसेनापती होते.
ह्या पराक्रमी पुरूषाचा ईतिहास प्रेरणादायी असाच
आहे.
मोसे खोर्यातील मोसे बु. गावाचे हे भुमिपुत्र 'यशवंतराव'
किताबाने कीर्तीवंत झालेले होते. ८४ मोसे खोर्यातील हे
वतानदार गोर-गरीबांचे आधार होते. रोहिड खोर्यात
आणि गुंजन मावळात
त्यांच्या सज्जनतेची आणि दिलदारपणाची ख्याती होती.
पुरंदरच्या हल्लात शत्रुला नामोहरम करणारे
वीर बाजी पासलकर खळद बेलसर जवळ धारातीर्थी पडले.
प्राणाची बाजी लावणारे बाजी पासलकर शूर वीर
होते. स्वराज्यासाठी ते जगले. गेले. अजरामत झाले.
धन्यवाद 🙏

स्मृतिदिन दिनांक – २४ मे १६४९,
समाधी स्थान – सासवड , तालुका – पुरंदर, जिल्हा – पुणे
वीर बाजी पासलकर हे छ्त्रपतींच्या स्वराज्य
संग्रामाचे पहिले सरसेनापती
छ्त्रपति शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य
स्थापन केले, जगच्या ईतिहासात एक तेजस्वी पर्व
निर्माण केले, रयतेच्या या राजाने असामान्य साहसाचे,
ऊत्कट देशभक्तीचे आणि रयतेच्या कल्याणासाठी कार्यरत
राहण्याचे व्रत आंगिकारले.
छ्त्रपति शिवरायांच्या स्वराज्य कार्यात
प्रारंभी सहभागी झालेले बाजी पासलकर हे स्वरज्याचे
पहिले सरसेनापती होते.
ह्या पराक्रमी पुरूषाचा ईतिहास प्रेरणादायी असाच
आहे.
मोसे खोर्यातील मोसे बु. गावाचे हे भुमिपुत्र 'यशवंतराव'
किताबाने कीर्तीवंत झालेले होते. ८४ मोसे खोर्यातील हे
वतानदार गोर-गरीबांचे आधार होते. रोहिड खोर्यात
आणि गुंजन मावळात
त्यांच्या सज्जनतेची आणि दिलदारपणाची ख्याती होती.
पुरंदरच्या हल्लात शत्रुला नामोहरम करणारे
वीर बाजी पासलकर खळद बेलसर जवळ धारातीर्थी पडले.
प्राणाची बाजी लावणारे बाजी पासलकर शूर वीर
होते. स्वराज्यासाठी ते जगले. गेले. अजरामत झाले.
धन्यवाद 🙏

0
Answer link
*⚔️बाजी पासलकर उर्फ यशवंतराव*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
मराठी दौलतीतील जेष्ठ अन श्रेष्ट पराक्रमी बहादुरांपैकी बाजी हे स्वराज्यांतील एक शिलेदार. https://bit.ly/42E5vtG मुळचे पौड जवळच्या तव गावातील. बाजीचे घराणे होते. खानदानी देशमुखी वळणाचे. तव प्रमाणेच मोसे गावांत त्यांचा प्रशस्त वाडा होता. त्यावेळी सबंध आख्या मोसे खोर्र्यांत बाजीसारखा वीर दिलदार व सज्जन माणूस नव्हता. लोकांचे तंटे बखेडे मिटवून सलोखा घडवावा, गोरगरिबांना उदार हाताने मदत करावी. पुढे होऊन लग्न कार्य पार पडावेत. निराधारांना आधार द्यावा. या सदगुणामुळे बाजी खोर्र्यांत लोकप्रिय होते. बाजी म्हणजे तेथील लोकांना मोठे थोरले वडाचे झाडच. त्याची सावली सर्वांनीच.

बाजी म्हणजे बुलंद देह याष्टीचा भरभक्कम मनुष्य. मोठमोठ्या भरदार मिशामुळे कमाविलेल्या शरीराला आणखीनच शोभा येई. त्यांनी १४ शूर रजपूत व शंभर नोकर चाकर पदरी ठेवले होते. बाजीचा वाडा माणसाने नेहमीच गजबजलेला असे. पै. पाहुण्यांची वाड्यांत नेहमीच वर्दळ चालू रहायची. बाजीची‘यशवंती’नावाची अबलख छानदार घोडी होती. विजापूरच्या बादशहास नजर करण्याचे हेतूनेच बाजीच्या जावयाने, लोकांनीशी छापा घालून तिला पळविले.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫पण पदरी चाकरीस असलेल्या बाजीच्या इमानी शूर एल्या मांगने छाप्यातील कित्येक लोकांना ठार काले. खुद्द दाजींनी आपल्या जावयास धरणीवर पाडले, बाजींना दोन बायका होत्या. आपली मुलगी सावित्री कान्होजी जेध्यांना देऊन बाजींनी त्यांना आपला जावई करवून घेतलेले होते. बेलसर येथे फत्तेखानाच्या छावणीवर घातलेल्या छाप्यांत मराठ्यांचे निशाण सहीसलामत आणून मराठी दौलतीची ईभ्रत राखणारा शूर पोरगा बाजी जेधे हा ह्याच कान्होजी जेध्यांचा सुपुत्र होय. शिवाजी महाराजांच्या राज्यांच्या भोवती जमा झालेल्या सर्व सवंगड्यांत सर्वात वयस्कर बाजी पासलकर होते. सर्वाना आजोबासारखे शोभणारे, वय वर्षे सुमारे ६५ च्या आसपास. शिवबाला बाजीचा केवढा आधार दादोजी कोंडदेवचे बरोबर शिवबास बाजी सल्लामसलत डावपेच सांगत; नि शिकवीत फत्तेखानाने पुरंदरवर चाळ केली त्यावेळी, बाजी पासलकर जातीनिशी त्या लढाईत तळपती समशेर चालवीत होते. स्वराज्यातील या पहिल्या लढाईत प्रत्यक्ष खाशा राज्याच्याकडे सेनापतीत्व होते. महाराजांनी हाती तलवार घेऊन खानाचा फडशा पाडला. मुसेखान पडताच खानाच्या सैन्याची दाणादाण उडून ते पळू लागले. त्याचा वीर बाजी पासलकर व कावजी मल्हार खासनीस यांनी सासवड पर्यंत पाठलाग केला, सासवड मध्ये गनिमासी हातघाईची लढाई जुंपली यवनांची डोकी उडाली. अन पराक्रमाची शर्थ झाली. पण.... पण शेवटी घात झाला. या सासवडच्या हातघाईच्या तुबंळ लढाईत बाजी लढता लढता धारातीथॅी पडला. महाराजांचा उजवा हात गेला. पंत दादोजी आधीच निवर्तले होते त्यांत बाळीरामासारखा राज्याच्या पाठीशी असणारा व राजांच्यावर अगदी पहिल्यापासून सावली धरणारा हा विशाल वटवृक्ष अकस्मात कोसळला. महारांजाचे मनी अपरिमित दु:ख झाले. सासवडला मनोहर विश्रांतीगृहाचे शेजारी असणारे दगडी मंदिर ही वीर बाजीची पवित्र समाधि. ती यशवंतरावची समाधी म्हणून ओळखली जाते. बाजींना ‘यशवंतराव’ असा पिढीजात मिळालेला किताब होता त्या वीरात्म्याच्या पवित्र स्मृतीस आमचे शतशा: प्रणाम.♏https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24
0
Answer link
वीर बाजी पासलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळातले शूर आणि विश्वासू सेनानी होते. ते शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्थापनेच्या कार्यात नेहमी त्यांच्या सोबत होते.
महत्वाची भूमिका:
- शिवाजी महाराजांनी जेव्हा पुणे आणि आसपासच्या परिसरातील किल्ले आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली, तेव्हा बाजी पासलकर यांनी त्यांना मोलाची साथ दिली.
- पुरंदरच्या किल्ल्याच्या संरक्षणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
- शिवाजी महाराजांवरील त्यांचे प्रेम आणि निष्ठा खूप मोठी होती.
मृत्यू:
बाजी पासलकर यांचे निधन एका लढाईत झाले. त्यांची समाधी पुरंदर किल्ल्याजवळ आहे.
वीर बाजी पासलकर हे स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर योद्ध्यांपैकी एक होते आणि त्यांची शौर्यगाथा आजही लोकांना प्रेरणा देते.