व्यक्तिमत्व मुघल साम्राज्य इतिहास

मुघल राजा अकबर विषयी माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

मुघल राजा अकबर विषयी माहिती मिळेल का?

4

जलालुद्दीन मुहम्मद अकबर (جلال الدین محمد اکبر ) (ऑक्टोबर १५इ.स. १५४२:उमरकोटपाकिस्तान -ऑक्टोबर १२इ.स. १६०५:आग्रा) हा इ.स. १५५६ पासून मृत्यूपर्यंत मुघल सम्राट होता.[१][२][३] हा भारताचा चा तिसरा मुघल सम्राट होता. याला अकबर-ए-आझम असेही संबोधले जाते.

अकबर
बादशाह
Akbar.jpg
कैसर अकबर या पुस्तकातील मुखचित्र
अधिकारकाळइ.स. १५५६-इ.स. १६०५
पूर्ण नावजलालुद्दीन मुहम्मद अकबर
पदव्याअल-सुलतान अल-आजम वल खक़म अल-मुकर्रम, इमाम-इ-'आदिल, सुलतान उल-इस्लाम काफ्फात्त उल-अनम, आमीर उल-मु'मिनीन, खलीफत उल-मुता'अली साहिब-इ-झमन,पदशहा गाझी जीउअल्ला: 'आर्ष-अश्यानी, शहनश-ए-सुल्तनत उई हिंदिया वल मुघलीया, एम्परर ऑफ इंडिया [१]
जन्मऑक्टोबर १५इ.स. १५४२
उमरकोट,सिंध,पाकिस्तान
मृत्यूऑक्टोबर १२इ.स. १६०५
आग्राउत्तर प्रदेशभारत
पूर्वाधिकारीहुमायूँ
उत्तराधिकारीजहांगीर
वडीलहुमायूँ
आईहमीदा बानू बेगम
पत्नीरुकय्या सुलतान बेगम
इतर पत्नीसलीमा सुलतान बेगम
संतती* शाहझादानुरुद्दीन मोहम्मद सलीम तथाजहांगीर, पुत्र
राजघराणेमुघल

अकबर तीमुरीद घराण्यातील नसिरुद्दीन हुमायूँचा पुत्र आणि भारतात मुघल घराण्याची स्थापना करणाऱ्या झाहीरुद्दिन मुहम्मद बाबर चा नातू व वारसदार होता. अकबरचा राज्यकाळ १६०५ साली संपण्या अगोदर, शेवटच्या वर्षानमध्ये मुघल साम्राज्याने जवळ जवळ संपूर्ण उत्तर आणि मध्य भारत व्यापला होता, व ते तत्कालीन शक्तिशाली राज्यांपैकी एक होते."विस्तीर्ण राज्य"

हुमायूंच्या मृत्यूपश्चात वयाच्या १३व्या वर्षी सम्राटपदी आलेला अकबर मुघल वंशाचा सगळ्यात महान सम्राट गणला जातो.[४] आपल्या राज्यकाळादरम्यान त्याने शेरशाह सूरीचा पाडाव केला व पानिपतच्या दुसऱ्या लढाईत हिंदूराजा सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य ऊर्फ हेमूचा पराभव केला.[५][६] पुढे संपूर्ण उत्तर आणि मध्ये भारत त्याच्या एकत्रित सत्तेत आणायला जवळ जवळ वीस वर्ष लागली. अर्थातच संपूर्ण भारतीय उपमहाद्विपावर त्याचा ठळक प्रभाव पडला. सम्राट असताना त्याने आपले राज्य आणखीन बळकट करण्यासाठी तत्कालीन बलाढ्य हिंदू राजपूतजातीशी सुत जुलावण्याचेही प्रयत्न केले. त्यासाठी त्याने राजपूत राजकन्येला आपल्या हारेम मध्ये दाखल केले.[५][७]अकबर चा एकूण देशाच्या संस्कृतीवर बराच प्रभाव पडला.[८] अकबराला स्वत:ला रंग्कामांत भरपूर रुची होती, व त्याच्या महालांच्या भिंती आखीव कलाकृतींनी सजवलेल्या असायच्या. मुघल कले बरोबरच त्याने युरोपिअन कलानाही प्रोत्साहन दिले. स्वतः साहित्याचा रसिक असल्याने त्यांनी बरेच संस्कृत साहित्य पर्शियन मध्ये आणि पर्शियन साहित्त्य संस्कृत मध्ये भाषांतर करून घेतले. हिंदू आणि इस्लामेतर धर्मान विषयीचा त्याचा असहिष्णू दृष्टीकोन, राजपूत राजकन्येशी वैवाहिक बोलणी सुरू झाल्यानंतर बराच बदलला, व नंतर तो इस्लामेतर धर्मांविषयी बरीच सहनशीलता बाळगून राहिला.[९][१०][११] त्याच्या प्रशासनात बरेच हिंदू जमीनदार, वकील आणि सेनापती होते. पुढे त्यांनी धार्मिक चर्चा सुरू केल्या, ज्यात मुसलीम विद्वान सिख, हिंदू,चार्वाकनास्तिकज्यूपोर्तुगीज आणि ख्रिश्चन विद्वानांबरोबर धार्मिक विषयांवर चर्चा करत असत. ह्या सगळ्या विद्वानांचा तो सन्मान करत असे.[१२] त्याच्या सहनशीलतेचे उदाहरण म्हणजे त्याने मुघल झेंड्यावर कॅथोलिक अल्पसंख्यकांच्या सन्मानार्थ ख्रिस्ती क्रॉस कार्यरत केला.संदर्भ हवा ] पुढे त्यानेदीन-ए-इलाही या धर्माची स्थापना केली. दुर्दैवाने हा धर्मम्हणजे व्यक्तीप्रभावित पंथच ठरला व त्याच्या मृत्यूनंतर नाहीसा झाला

संदर्भ विकीपेडीया 

उत्तर लिहिले · 9/8/2017
कर्म · 80350
0

अकबर (जलालुद्दीन मुहम्मद अकबर; १५ ऑक्टोबर, इ.स. १५४२ - २७ ऑक्टोबर, इ.स. १६०५) हा इ.स. १५५६ ते इ.स. १६०५ पर्यंत भारतावर राज्य करणारा मुघल सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत मुघल साम्राज्याचा खूप विस्तार झाला. अकबराने आपल्या पराक्रमाने राज्य वाढवले आणि त्याला सुसंघटित केले.

सुरुवातीचे जीवन:

  • अकबराचा जन्म १५ ऑक्टोबर, इ.स. १५४२ रोजी सिंध प्रांतातील अमरकोट येथे झाला.
  • हुमायून, जो त्यावेळेस सिंहासन गमावून निर्वासित जीवन जगत होता, त्याचा पुत्र म्हणजे अकबर.
  • अकबराचे बालपण असुरक्षित वातावरणात गेले. त्याचे शिक्षण व्यवस्थित झाले नाही, परंतु तो एक हुशार आणि पराक्रमी योद्धा बनला.

राजकीय कारकीर्द:

  • १५५६ मध्ये हुमायूंनच्या मृत्यूनंतर अकबर केवळ १३ वर्षांचा असताना त्याचा राज्याभिषेक झाला.
  • बैराम खानने त्याचे संरक्षक म्हणून काम पाहिले आणि सुरुवातीच्या काळात राज्यकारभारात मदत केली.
  • अकबराने अनेक लढाया जिंकून मुघल साम्राज्याचा विस्तार केला, ज्यात पानिपतची दुसरी लढाई (१५५६) महत्त्वाची होती.
  • त्याने राजपूत राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आणि त्यांच्या राजकन्यांशी विवाह केले.

प्रशासन आणि सुधारणा:

  • अकबराने जमीन महसूल प्रणालीत सुधारणा केली, जी 'जब्ती प्रणाली' म्हणून ओळखली जाते.
  • त्याने मनसबदारी पद्धती सुरू केली, ज्यात सैन्यातील अधिकाऱ्यांची श्रेणी निश्चित केली जात असे.
  • अकबराने 'दीन-ए-इलाही' नावाचा एक नवीन धर्म सुरू करण्याचा प्रयत्न केला, ज्यात सर्व धर्मांच्या चांगल्या गोष्टींचा समावेश होता.

कला आणि संस्कृती:

  • अकबराच्या काळात कला, साहित्य आणि स्थापत्यशास्त्र यांचा विकास झाला.
  • त्याने फतेहपूर सिक्री हे नवीन शहर वसवले आणि तेथे अनेक सुंदर इमारती बांधल्या.
  • अकबराच्या दरबारात नवरत्न होते, ज्यात तानसेन, बिरबल आणि अबुल फजल यांसारख्या विद्वानांचा समावेश होता.

मृत्यू:

  • २७ ऑक्टोबर, इ.स. १६०५ रोजी अकबराचा मृत्यू झाला. त्याला आग्राजवळील सिकंदरा येथे दफन करण्यात आले.

अकबर हा एक महान शासक होता. त्याने मुघल साम्राज्याला stability दिली आणि भारतीय इतिहासात आपले नाव अजरामर केले.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5060

Related Questions

भारतामध्ये मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली?
बाबराचा मृत्यू कधी झाला?
शहाजहानचा अंत केव्हा झाला?
अकबराचा जन्म कधी झाला?
औरंगजेबाच्या मुलांची नावे काय आहेत?
पुरंदरच्या तहानंतर जयसिंगने कोणती मोहीम हाती घेतली?
अकबरच्या काळात सोन्याच्या नाण्याला काय म्हणतात?