Topic icon

मुघल साम्राज्य

0

भारतामध्ये मुघल साम्राज्याची स्थापना जहिरुद्दीन मुहम्मद बाबर याने केली.

बाबरने इ.स. 1526 मध्ये दिल्ली सल्तनतचा शेवटचा शासक इब्राहिम लोदी याचा पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभव केला आणि मुघल साम्राज्याची स्थापना केली.

बाबर हा तैमूर आणि चंगेज खान या दोन प्रसिद्ध conquerors चा वंशज होता.

त्याने मध्य आशियातील फरगाना खोऱ्यातून आपले साम्राज्य स्थापन करायला सुरुवात केली आणि हळूहळू भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5060
0
बाबरचा मृत्यू २६ डिसेंबर १५३० रोजी आग्रा येथे झाला.
उत्तर लिहिले · 21/9/2021
कर्म · 61495
2
शहाजहान यांचा मृत्यू 22 जानेवारी 1666 रोजी झाला. 

त्यांचा जन्म पाकिस्तानातील लाहोर प्रांतात झाला होता. त्यांचे जन्मनाव खुर्रम होते. खुर्रमचा अर्थ आनंददायी असा होतो. 

         
                               शहाजहान 

भारतावर निर्विवाद सत्ता गाजवणाऱ्या मुगल राजघराण्यातील ते पाचवा राजा होते. त्यांनी 1628 पासून 30 वर्षे भारतातील बहुतांश भागावर अधिसत्ता गाजवली.


अकबर आणि जोधा यांचा मुलगा जहांगिर आणि त्यांची हिंदु राजपूत पत्नी मानमती ऊर्फ ताज बिबी बिल्किस मकानी यांचा ते पुत्र होते. मारवाडचा राजा उदयसिंह यांची मानमती कन्या होती. 

भारतीय सभ्यतेत शहाजहानचे शासन सूवर्ण युग आणि सर्वांत समृद्ध समजले जाते. 1627 मध्ये वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ते सिंहासनावर बसले. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी तो कायम प्रयत्नशिल होते. 

1658 मध्ये ते आजारी पडले. त्यानंतर त्यांचा मुलगा औरंगजेबाने त्यांना कैद करून आग्र्याच्या किल्ल्यात कैद केले. मृत्यूपर्यंत शहाजहान याच किल्ल्यात कैद होते.

त्या काळी तब्बल 32 कोटी रुपये खर्च करून ताजमहाल बांधणाऱ्या या सम्राटाचे अंतिम दिवस आग्र्याच्या किल्ल्यातून ताजमहल बघण्यात गेले. औरंगजेबाने नजरकैद केले असल्याने अंतिम दिवसांमध्ये ताजमहालाला स्पर्श करणेही त्यांना शक्य नव्हते.
उत्तर लिहिले · 26/8/2021
कर्म · 25850
1
* अधिकारकाळ =
इ.स. १५५६-इ.स. १६०५

* पूर्ण नाव =
जलालुद्दीन मुहम्मद अकबर

* पदव्या = 
1. अल-सुलतान अल-आजम वल खक़म अल-मुकर्रम, 2. इमाम-इ-'आदिल 
3.  सुलतान उल-इस्लाम काफ्फात्त उल-अनम
4. आमीर उल-मु'मिनीन
5.  खलीफत उल-मुता'अली साहिब-इ-झमन
6. पदशहा गाझी जीउअल्ला: 'आर्ष-अश्यानी
7. शहनश-ए-सुल्तनत उई हिंदिया वल मुघलीया
त8.  एम्परर ऑफ इंडिया 


                      अकबर 

* जन्म = 
ऑक्टोबर १५, इ.स. १५४२
उमरकोट, सिंध, पाकिस्तान

* मृत्यू =
ऑक्टोबर १२, इ.स. १६०५
आग्रा, उत्तर प्रदेश, भारत

* पूर्वाधिकारी = 
हुमायूॅं

* उत्तराधिकारी = 
जहांगीर

* वडील = 
हुमायूॅं

* आई = 
हमीदा बानू बेगम

* पत्नी = 
रुकय्या सुलतान बेगम

* इतर पत्नी = 
1. सलीमा सुलतान बेगम
2. जोधा बाई तथा मरियम-उझ-झमानी
3. सकीना बानू बेगम

* संतती = 
1. शाहझादा नुरुद्दीन मोहम्मद सलीम तथा जहांगीर, पुत्र
2. शाहझादा शाह मुराद, पुत्र
3. शाहझादा दन्याल, पुत्र
4. शाहझादा खुसरो, पुत्र
5. शाहझादा शाह मुराद, पुत्र
6. शाहझादी खनीम सुलतान, पुत्री
7. शाहझादी शक्रुन्निसा बेगम, पुत्री
8. शाहझादी आराम बानू बेगम, पुत्री
9. शाहझादी जहान बेगम, पुत्री
10. शाहझादी झिमिनी बेगम, पुत्री

* राजघराणे =
मुघल

अकबर  हा 1556 पासून मृत्यूपर्यंत मुघल सम्राट होता.[ हा भारताचा चा तिसरा मुघल सम्राट होता. याला अकबर-ए-आझम (महान अकबर/ अकबर द ग्रेट) असेही संबोधले जाते.

उत्तर लिहिले · 23/8/2021
कर्म · 25850
0

औरंगजेबाच्या एकूण 5 मुले होती, त्यापैकी 4 मुलगे आणि 1 मुलगी होती.

मुलांची नावे:
  • मुहम्मद सुलतान
  • मुहम्मद मुअज्जम (शहा आलम पहिला)
  • मुहम्मद आझम शाह
  • मुहम्मद अकबर
मुलीचे नाव:
  • झेबुন্নিসা
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5060
0

पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाने विजापूरविरुद्ध मोहीम हाती घेतली.

अधिक माहिती:

  • मिर्झा राजे जयसिंग हे मुघल शासक औरंगजेबाच्या सेवेत होते.
  • पुरंदरच्या तहानंतर, औरंगजेबाने त्यांना विजापूर सल्तनत जिंकण्यासाठी पाठवले.
  • विजापूर ही आदिलशाही राजवट होती आणि मुघलांना ती आपल्या साम्राज्यात सामील करायची होती.
  • जयसिंगाने विजापूरवर आक्रमण केले, परंतु त्याला निर्णायक विजय मिळवता आला नाही.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5060
0

अकबरच्या काळात सोन्याच्या नाण्याला मोहर असे म्हणतात.

अकबरच्या काळात 'मोहर' हे सर्वात प्रचलित सोन्याचे नाणे होते. हे नाणे त्यावेळच्या Standard Gold Coin (प्रमाणित सोन्याचे नाणे) म्हणून वापरले जाई.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5060