2 उत्तरे
2
answers
कुंभमेळा कोणत्या राज्यांमध्ये भरतो?
2
Answer link
कुंभपर्व’ नावाच्या पुण्यकारक ग्रहयोगाच्या निमित्ताने दर बारा वर्षांनी चार तीर्थक्षेत्रांच्या स्थानी हिंदू भाविकांचा जो मेळावा जमतो, त्यास कुंभमेळा म्हणतात.
हा मेळावा प्रयाग (अलाहाबाद ), हरीद्वार, नाशीक व उज्जयिनी (उज्जैन) या ठिकाणी भरतो. प्रत्येक ठिकाणचा कुंभयोग निरनिराळा असून तो पुढीलप्रमाणे येतो: (१) प्रयाग—मकर राशीत चंद्र-सूर्य, वृषभ राशीत गुरू आणि अमावास्या तिथी असता; (२) हरीद्वार – गुरू कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असता; (३) नाशिक—गुरू सिंह राशीत आणि चंद्र-सूर्य कर्क राशीत असता; (४) उज्जयिनी—सूर्य आणि गुरू अनुक्रमे तुला आणि वृश्चिक राशीत असता. प्रयागमधील कुंभपर्वात मकर संक्रांती, अमावास्या आणि वसंतपंचमी ही तीन उपपर्वे आहेत. त्यांपैकी अमावास्या हे प्रमुख पर्व असून त्याला‘पूर्णकुंभ’ हे नाव आहे गुरूला राशिचक्र भोगण्यास बारा वर्षे लागत असल्यामुळे, दर बारा वर्षांनी कुंभयोग येतो. कुंभपर्वाच्या वेळी प्रयागादी क्षेत्रांत स्नान केले असता, अनंत पुण्यलाभ होतो, ह्या भावनेने लाखो भाविक लोक तसेच शेकडो मठाधिपती व साधुसंत, आपापल्या घोडे, उंट, हत्ती इ. सरंजामासह त्या त्या ठिकाणी जमतात.
कुंभपर्वाबाबत पौराणिक आख्यायिका आहे, ती अशी : समुद्रमंथनाच्या वेळी अमृतकुंभ हातात घेऊन धन्वंतरी वर आला, तेव्हा दैत्यांना अमृत मिळू नये म्हणून, देवांनी इंद्रपुत्र जयंताकरवी अमृतकुंभ पळविला. त्यावेळी देवदैत्यांचे युद्ध झाले. त्यात बारा ठिकाणी अमृतकुंभ खाली पडला. त्यांपैकी वरील चार स्थाने भूलोकात व अन्य स्थाने इतर लोकांत आहेत
हा मेळावा प्रयाग (अलाहाबाद ), हरीद्वार, नाशीक व उज्जयिनी (उज्जैन) या ठिकाणी भरतो. प्रत्येक ठिकाणचा कुंभयोग निरनिराळा असून तो पुढीलप्रमाणे येतो: (१) प्रयाग—मकर राशीत चंद्र-सूर्य, वृषभ राशीत गुरू आणि अमावास्या तिथी असता; (२) हरीद्वार – गुरू कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असता; (३) नाशिक—गुरू सिंह राशीत आणि चंद्र-सूर्य कर्क राशीत असता; (४) उज्जयिनी—सूर्य आणि गुरू अनुक्रमे तुला आणि वृश्चिक राशीत असता. प्रयागमधील कुंभपर्वात मकर संक्रांती, अमावास्या आणि वसंतपंचमी ही तीन उपपर्वे आहेत. त्यांपैकी अमावास्या हे प्रमुख पर्व असून त्याला‘पूर्णकुंभ’ हे नाव आहे गुरूला राशिचक्र भोगण्यास बारा वर्षे लागत असल्यामुळे, दर बारा वर्षांनी कुंभयोग येतो. कुंभपर्वाच्या वेळी प्रयागादी क्षेत्रांत स्नान केले असता, अनंत पुण्यलाभ होतो, ह्या भावनेने लाखो भाविक लोक तसेच शेकडो मठाधिपती व साधुसंत, आपापल्या घोडे, उंट, हत्ती इ. सरंजामासह त्या त्या ठिकाणी जमतात.
कुंभपर्वाबाबत पौराणिक आख्यायिका आहे, ती अशी : समुद्रमंथनाच्या वेळी अमृतकुंभ हातात घेऊन धन्वंतरी वर आला, तेव्हा दैत्यांना अमृत मिळू नये म्हणून, देवांनी इंद्रपुत्र जयंताकरवी अमृतकुंभ पळविला. त्यावेळी देवदैत्यांचे युद्ध झाले. त्यात बारा ठिकाणी अमृतकुंभ खाली पडला. त्यांपैकी वरील चार स्थाने भूलोकात व अन्य स्थाने इतर लोकांत आहेत
0
Answer link
कुंभमेळा भारतातील खालील राज्यांमध्ये भरतो:
- उत्तर प्रदेश: प्रयागराज (अलाहाबाद) येथे त्रिवेणी संगमावर.
- उत्तराखंड: हरिद्वार येथे गंगा नदीच्या काठी.
- महाराष्ट्र: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या काठी.
- मध्य प्रदेश: उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठी.
कुंभमेळा दर 12 वर्षांनी या चारही ठिकाणी आलटून-पालटून भरतो.
अधिक माहितीसाठी:
कुंभमेळ्याबद्दल माहिती (इंग्रजी)