
धार्मिक उत्सव
1
Answer link
महाराष्ट्राच्या पेण, उरण आणि पनवेल या तालुक्यांतील प्रामुख्याने आगरी समाजात साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर चार-पाच दिवसांनी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला (साखर चतुर्थीला) गणेशमूर्तींची स्थापना होते. दुसऱ्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. काही साखरचौथ गणपती अडीच ते पाच दिवसांचेही असतात. या साखरचौथीला बसणाऱ्या गणपतींना गौरा गणपती असेही म्हणतात.
याचवेळी २१ दिवसांचे काही गणपतीही या उत्सवात असतात. पनवेल शहरात एकूण ६८ साखरचौथ गणपती आहेत.
4
Answer link
महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव सोहळा म्हणून पंढरीची वारी जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टाळ मृदूंगाच्या तालावर संतांच्या पालख्यांसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरला पायी जातात. यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे पंढरीची ही पायी वारी होणार नाही आहे. सरकारने कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी पायी ज्या संतांच्या पादुका पालखीतून नेल्या जातात. त्या यावर्षी वाहनातून नेल्या जाणार आहेत. वारीमध्ये जवळपास १५० संतांच्या पालख्या असतात. त्यात सात पालख्या या मानाच्या मानल्या जातात.
1️⃣श्री संत ज्ञानेश्वर माउली ही पालखी आळंदीवरून निघते.
2️⃣श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्याजवळील देहूवरुन निघते.
3️⃣श्री संत एकनाथ महाराज ही पालखी पैठण वरून निघते.
4️⃣श्री संत निवृत्ती महाराज यांची पालखी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून निघते.
5️⃣श्री संत मुक्ताई यांची पालखी जळगाव जवळील मेहूण या गावावरून निघते.
6️⃣श्री संत सोपानदेव यांची पालखी पुण्याजवळील सासवड या गावातून निघते.
7️⃣तर श्री संत नामदेव यांची पालखी ही पंढरपूर येथूनच निघते. कार्तिकी वारीला ही पालखी आळंदीला जाते. आषाढी वारीला इतर पालख्यांच्या स्वागताला ती पंढरपूरच्या सीमेवर येते. तर या महाराष्ट्रातील मानाच्या सात पालख्या मानल्या जातात.
👉वारीतही संतांची वारी आणि देवाची वारी असे प्रकार आहेत. संत देवाला भेटायला ती ती देवाची वारी आणि संत संतांना भेटायला जातात ती संतांची वारी म्हंटले जाते. आषाढी वारी ही देवाची वारी मानली जाते. कारण महाराष्ट्रभरातून सर्व संत विठुरायाच्या भेटीला येतात. तर कार्तिकी वारी संतांची वारी मानली जाते कारण संत आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला जातात.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
1️⃣श्री संत ज्ञानेश्वर माउली ही पालखी आळंदीवरून निघते.
2️⃣श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्याजवळील देहूवरुन निघते.
3️⃣श्री संत एकनाथ महाराज ही पालखी पैठण वरून निघते.
4️⃣श्री संत निवृत्ती महाराज यांची पालखी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून निघते.
5️⃣श्री संत मुक्ताई यांची पालखी जळगाव जवळील मेहूण या गावावरून निघते.
6️⃣श्री संत सोपानदेव यांची पालखी पुण्याजवळील सासवड या गावातून निघते.
7️⃣तर श्री संत नामदेव यांची पालखी ही पंढरपूर येथूनच निघते. कार्तिकी वारीला ही पालखी आळंदीला जाते. आषाढी वारीला इतर पालख्यांच्या स्वागताला ती पंढरपूरच्या सीमेवर येते. तर या महाराष्ट्रातील मानाच्या सात पालख्या मानल्या जातात.
👉वारीतही संतांची वारी आणि देवाची वारी असे प्रकार आहेत. संत देवाला भेटायला ती ती देवाची वारी आणि संत संतांना भेटायला जातात ती संतांची वारी म्हंटले जाते. आषाढी वारी ही देवाची वारी मानली जाते. कारण महाराष्ट्रभरातून सर्व संत विठुरायाच्या भेटीला येतात. तर कार्तिकी वारी संतांची वारी मानली जाते कारण संत आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला जातात.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
2
Answer link
कुंभपर्व’ नावाच्या पुण्यकारक ग्रहयोगाच्या निमित्ताने दर बारा वर्षांनी चार तीर्थक्षेत्रांच्या स्थानी हिंदू भाविकांचा जो मेळावा जमतो, त्यास कुंभमेळा म्हणतात.
हा मेळावा प्रयाग (अलाहाबाद ), हरीद्वार, नाशीक व उज्जयिनी (उज्जैन) या ठिकाणी भरतो. प्रत्येक ठिकाणचा कुंभयोग निरनिराळा असून तो पुढीलप्रमाणे येतो: (१) प्रयाग—मकर राशीत चंद्र-सूर्य, वृषभ राशीत गुरू आणि अमावास्या तिथी असता; (२) हरीद्वार – गुरू कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असता; (३) नाशिक—गुरू सिंह राशीत आणि चंद्र-सूर्य कर्क राशीत असता; (४) उज्जयिनी—सूर्य आणि गुरू अनुक्रमे तुला आणि वृश्चिक राशीत असता. प्रयागमधील कुंभपर्वात मकर संक्रांती, अमावास्या आणि वसंतपंचमी ही तीन उपपर्वे आहेत. त्यांपैकी अमावास्या हे प्रमुख पर्व असून त्याला‘पूर्णकुंभ’ हे नाव आहे गुरूला राशिचक्र भोगण्यास बारा वर्षे लागत असल्यामुळे, दर बारा वर्षांनी कुंभयोग येतो. कुंभपर्वाच्या वेळी प्रयागादी क्षेत्रांत स्नान केले असता, अनंत पुण्यलाभ होतो, ह्या भावनेने लाखो भाविक लोक तसेच शेकडो मठाधिपती व साधुसंत, आपापल्या घोडे, उंट, हत्ती इ. सरंजामासह त्या त्या ठिकाणी जमतात.
कुंभपर्वाबाबत पौराणिक आख्यायिका आहे, ती अशी : समुद्रमंथनाच्या वेळी अमृतकुंभ हातात घेऊन धन्वंतरी वर आला, तेव्हा दैत्यांना अमृत मिळू नये म्हणून, देवांनी इंद्रपुत्र जयंताकरवी अमृतकुंभ पळविला. त्यावेळी देवदैत्यांचे युद्ध झाले. त्यात बारा ठिकाणी अमृतकुंभ खाली पडला. त्यांपैकी वरील चार स्थाने भूलोकात व अन्य स्थाने इतर लोकांत आहेत
हा मेळावा प्रयाग (अलाहाबाद ), हरीद्वार, नाशीक व उज्जयिनी (उज्जैन) या ठिकाणी भरतो. प्रत्येक ठिकाणचा कुंभयोग निरनिराळा असून तो पुढीलप्रमाणे येतो: (१) प्रयाग—मकर राशीत चंद्र-सूर्य, वृषभ राशीत गुरू आणि अमावास्या तिथी असता; (२) हरीद्वार – गुरू कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असता; (३) नाशिक—गुरू सिंह राशीत आणि चंद्र-सूर्य कर्क राशीत असता; (४) उज्जयिनी—सूर्य आणि गुरू अनुक्रमे तुला आणि वृश्चिक राशीत असता. प्रयागमधील कुंभपर्वात मकर संक्रांती, अमावास्या आणि वसंतपंचमी ही तीन उपपर्वे आहेत. त्यांपैकी अमावास्या हे प्रमुख पर्व असून त्याला‘पूर्णकुंभ’ हे नाव आहे गुरूला राशिचक्र भोगण्यास बारा वर्षे लागत असल्यामुळे, दर बारा वर्षांनी कुंभयोग येतो. कुंभपर्वाच्या वेळी प्रयागादी क्षेत्रांत स्नान केले असता, अनंत पुण्यलाभ होतो, ह्या भावनेने लाखो भाविक लोक तसेच शेकडो मठाधिपती व साधुसंत, आपापल्या घोडे, उंट, हत्ती इ. सरंजामासह त्या त्या ठिकाणी जमतात.
कुंभपर्वाबाबत पौराणिक आख्यायिका आहे, ती अशी : समुद्रमंथनाच्या वेळी अमृतकुंभ हातात घेऊन धन्वंतरी वर आला, तेव्हा दैत्यांना अमृत मिळू नये म्हणून, देवांनी इंद्रपुत्र जयंताकरवी अमृतकुंभ पळविला. त्यावेळी देवदैत्यांचे युद्ध झाले. त्यात बारा ठिकाणी अमृतकुंभ खाली पडला. त्यांपैकी वरील चार स्थाने भूलोकात व अन्य स्थाने इतर लोकांत आहेत