व्यक्तिमत्व व्यक्ती इतिहास

मिर्झा राजे जयसिंग यांचा इतिहास काय आहे?

2 उत्तरे
2 answers

मिर्झा राजे जयसिंग यांचा इतिहास काय आहे?

4
शिवकालीन इतिहासामधे पुरंदरच्या तहामुळे मराठ्यांच्या इतिहासामधे वारंवार उल्लेख येतो तो मिर्झाराजे जयसिंग यांचा. मिर्झाराजे हे मोगल बादशहा औरंगजेबाचे सरदार होते. त्यांना शिवाजी महाराजांच्या मोहीमेवर पाठवले होते.......
हे जयपुरचे राजपुत (कछवाह) घराणे तीन चार पिढ्यां मोगलांशी घरोबा करुन आणि इमान राखुन होते. अकबर बादशहाच्या दरबारातील प्रसिध्द राजा मानसिंग हे जयसिंगाचे आज़ोबा होय. शहाजहानच्या काळात शहजादा शहाशुजाबरोबर ते अफघानिस्तानच्या मोहीमेत सहभागी होते.काबुल कंदहारच्या परिसरावर विजय मिळवुन तेथील सुभेदारी ही जयसिंग यांना मिळाली होती.....
हा पराक्रमी योध्दा सात हजारी मनसबदार झाला.मोगल दरबारातील रितीरिवाज आणि शिष्ठाचारात मिर्झाराजे पारंगत होते. उर्दु, तुर्की आणि फारसी भाषांचे ते उत्तम जाणकार होते. औरंगजेबाने साजशृंगारीत घोडा, हत्ती,मोत्यांची माळ आणि मिर्झाराजा ही पदवी बहाल केली.हा मान फक्त शहजादे यांनाच मिळत असे. एवढा मान मरतब मिळवणाऱ्या रणधुरंधर,युद्ध कुशल सेनानीला दख्खन जिंकण्यासाठी आणि मराठयांचे राज्य आणि राजा यांचा बिमोड करण्यासाठी पाठविण्यात आले.
माझ्याजागी मी तुम्हाला दख्खनेत पाठवित आहे असा संदेश औरंगजेबाने मिर्झाराजांना दिला होता. एवढे निष्ठावान मिर्झाराजे जयसिंग असूनही औरंगजेब बादशहाच्या मनात संशय होताच. एवढी मोठी युद्ध सामग्री,प्रचंड सेनासागर आणि मोठा खजीना एका युद्धकुशल हिंदू सेनापती बरोबर पाठवणे धोक्याचे ठरेल. जर हिंदू म्हणून दोघेही एकत्र आले तर मोगलांच्या साम्राज्याला धक्का बसेल. औरंगजेबाने आपल्या बापावर, भावांवर, बहीणीवर आणि मुलांवर विश्वास ठेवला नव्हता तो परक्यावर कसा ठेवील.म्हणून औरंगजेबाने मिर्झाराजेवर अंकुश ठेवण्यासाठी दिलेरखानाला सोबतीला पाठवल होते....... 
दक्षिणेतील कामगिरीत पुर्णपणे यश मिळवता आले नाही. पण शिवाजी महाराजांना काहीसा आवर घालण्यात त्यांना यश आले.......... पुढे महाराज औरंगजेबाला भेटण्यासाठी आगऱ्याला गेले.......... नजर कैदेत अडकले....... आणि त्यातून निसटून राजगडावर परतले......
औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंगाला परत बोलावून घेतले.बुरहानपुरला येताना हातनूरजवळ ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला......मिर्झाराजे विषप्रयोगाने मृत्यु पावले असा संशय त्यांचा मुलगा कीरतसिंह याला आला.हा विषप्रयोग त्यांचा मुंशी उदयराज याने औरंगजेबाच्या सांगण्यावरुन केला या संशयावरून त्याने उदयराजची सर्व मालमत्ता जप्त करुन त्याला ठार मारण्यासाठी निघाला. पण उदयराज मुन्शी सावध होवून निसटला आणि त्याने बुरहानपुरच्या सुभेदाराच्या घरात आश्रय घेतला....
आपल्या वडीलांच्या खुन्याला सोडणार नाही ही भुमिका कीरतसिंगाने घेतली. एक चमत्कार झाला आणि मिर्झाराजे जयसिंग यांचा मुन्शी उदयराज दोन दिवसांनी सुभेदाराच्या घरातून बाहेर पडला.उदयराजने मुस्लिम धर्म स्विकारल्यामुळे किरतसिंगाला काही करता आले नाही......
मिर्झाराजांची छत्री बुरहानपुर येथे बांधण्याची औरंगजेबाची आज्ञा झाली. तापी आणि मोहना नदीच्या संगमावर बोहरडा गावाजवळ ही छत्री बांधण्यात आली. उंच चौथऱ्यावर ३६ स्तंभाची ही छत्री वरील घुमटांमुळे दूर वरुनही लक्ष वेधून घेते. तसेच जयपुर जवळील आमेर किल्ल्याच्या पायथ्यालाही राजपरिवारातील छत्र्यामधेही मिर्झाराजे यांची छत्री आहे. आयुष्यभर मोगलांची प्रामाणिक पणे सेवा करुन त्यांची झालेली मृत्युची कहाणी मनाला चटका लावून जाते. म्हणून म्हणतात ' असंगाशी संग प्राणाशी गाठ ' जयपुर, जोधपुर आणि मेवाड एकत्र आले असते तर देशाचा इतिहास आणि भुगोल आज वेगळा असता. अर्थात त्यासाठी युगपुरुष जन्माला यावा लागतो..... 
( हा लेख प्रमोद पांडे यांचा आहे)
उत्तर लिहिले · 1/8/2017
कर्म · 99520
0
मिर्झा राजे जयसिंग (इ.स. १६११ - १६६७) हे मुघल साम्राज्याचे एक महत्त्वाचे सेनापती होते. ते आमेरच्या (आताचे जयपूर) कछवाहा राजपूत घराण्याचे होते. त्यांनी मुघल सैन्यात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि आपल्या शौर्याने आणि मुत्सद्देगिरीने साम्राज्य विस्तारण्यात मोलाची भूमिका बजावली.
Mirజా राजे जयसिंगांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना:
  1. जन्म आणि प्रारंभिक जीवन: मिर्झा राजे जयसिंग यांचा जन्म १६११ मध्ये झाला. ते लहानपणापासूनच शूर आणि युद्धकला निपुण होते.
  2. मुघल सेवेत प्रवेश: त्यांनी लहान वयातच मुघल सैन्यात प्रवेश केला आणि लवकरच ते आपल्या पराक्रमाने महत्त्वाच्या पदांवर पोहोचले.
  3. शिवाजी महाराजांविरुद्ध मोहीम: १६६५ मध्ये, मुघल बादशाह औरंगजेबने त्यांना शिवाजी महाराजांविरुद्ध मोठी मोहीम सोपवली. मिर्झा राजे जयसिंग यांनी पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला आणि महाराजांना पुरंदरचा तह करण्यास भाग पाडले. (महाराष्ट्र टाइम्स)
  4. पुरंदरचा तह: या तहानुसार, शिवाजी महाराजांना आपले बरेच किल्ले मुघलांना द्यावे लागले आणि स्वतः औरंगजेबाच्या दरबारात उपस्थित राहावे लागले.
  5. दक्षिण भारतामधील मोहीम: मिर्झा राजे जयसिंग यांनी दक्षिण भारतातही मुघल साम्राज्याची सत्ता वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
  6. मृत्यू: १६६७ मध्ये मिर्झा राजे जयसिंग यांचा मृत्यू झाला.
मिर्झा राजे जयसिंग हे एक शूर सेनानी, कुशल प्रशासक आणि मुत्सद्दी होते. त्यांची मुघल साम्राज्यासाठीची निष्ठा आणि समर्पण अतुलनीय होते.
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 2200

Related Questions

राव बाजी जाधवराव यांची माहिती सांगा?
लखुजीराव यांचे वडील जगदेवराव यांच्याबद्दल माहिती द्या?
पाष्टे आडनावाचे कोणी सरदार शिवकाळात होते का?
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐनवरे गावातील रामजी जाधव यांच्याबद्दल माहिती द्या?
जगातील सर्वात लहान माणूस किंवा स्त्री कोण आहे?
जगात सर्वात जास्त उंच माणूस कोण?
डॉ. स. ना. सेन यांचे कार्य 20 ते 25 ओळीत लिहा?