सरकार
नोकरी
सरकारी योजना
मोबाईल अँप्स
तक्रार
महाराष्ट्र शासन कर्मचारी
सरकारी नोकरी
सरकारी कर्मचाऱ्याची तक्रार करायची असेल तर कुठे करावी? काही ॲप्स आहेत का?
3 उत्तरे
3
answers
सरकारी कर्मचाऱ्याची तक्रार करायची असेल तर कुठे करावी? काही ॲप्स आहेत का?
8
Answer link
हॅलो जी,
लेख जरा लांबलचक आहें, पण कृपया संपूर्ण माहिती विचारात घेणे आवश्यक आहे,
त्यासाठी
शॉर्टकट नको, सरळ जा
"सरकारी काम अन सहा महिने थांब" अशी आपल्याकडे म्हण आहे.
पण सरकारी कार्यालयात गेल्यावर आपली कामे वेळेवर आणि योग्य मुदतीत होण्यासाठी काय केले पाहिजे हे न समजल्यामुळे अनेकांची कामे खोळंबतात. अमूक एक काम आहे, त्यासाठी तमूक एका सरकारी कार्यालयात गेलो, पण काम काही होत नाही. आज या, उद्या या असे सांगून परत पाठवतात, अशा तक्रारी अनेकजण करतात. पण काही लोकांची कामे सहज आणि वेळेवर होतात. काही लोकं पैसे देउन कामे करून घेण्यात धन्यता मानतात. ही सवय आपणच लावतो आणि नंतर भ्रष्टाचाराचे नावाने ओरडत बसतो अशी परिस्थिती आहे.
काही गोष्टी फोनवरून केल्या जात असतील तर त्याबाबत काही भान आपल्याला पाळावे लागते.
उदा. एखाद्या भागातील वीजेची तार तुटल्यामुळे त्या भागातील विद्युत पुरवठा बंद होतो. अंधारामुळे किंवा दिवस असेल तर उकाड्यामुळे माणसे हैराण होतात पण वीज पुरवठा कशाने खंडीत झाला आहे याबाबत लक्ष घालत नाहीत. अंधार पडू लागल्यावर बाकीच्या घरात उजेड चमकू लागतो तेव्हा लक्षात येते फक्त आपल्याच घरातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. किंवा त्या विशिष्ठ इमारतीतील काही लोकांचा विज पुरवठा खंडीत झाला आहे. अशावेळी कोणीतरी वीज वितरण कंपनीच्या संबंधीत कार्यालयात फोन लावतो आणि सांगतो, लाईट गेलीय, बघा काही होते का म्हणून. तो पलिकडून बोलणारा हो म्हणतो आणि फोन ठेवून जातो. काही झाले तरी दुरूस्तीला कोणी येत नाही. सगळेजण त्या विजवितरण कंपनीच्या नावाने ओरडू लागतात. हा प्रकार अनेक ठिकाणी घडतो. पण प्रत्यक्षात काय झालेले असते तर आपण केलेली तक्रारच तिथे नोंदवलेली नसते.
सरकारी कामाची दिरंगाई ही अशी होते.
यामध्ये संबंधीत नागरिकाने तक्रार करताना, त्या व्यक्तिचे नाव, हुद्दा जाणून घेणे आवश्यक असते. आपली लेखी तक्रार नोंदवली आहे की नाही याची खात्री करून घेतल्यावर तक्रार क्रमांक किती आहे हे विचारले पाहिजे आणि ही तक्रार सोडवायला कोण येणार आहे त्या वायरमनचे नाव विचारून घेतले तर आपले काम पटकन होते. प्रत्यक्ष गेल्यावर तीथे त्या रजिस्टरमध्ये आपली लेखी तक्रार नोंदवून घेण्याची आणि तक्रार क्रमांक आपल्याकडे लिहून ठेवला म्हणजे होणारी दिरंगाई टळते.
या साध्या साध्या गोष्टी असतात पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे माणसे स्वत:ला त्रास करून घेतात. आज बहुतेक सरकारी खात्यांमधून केंद्र असो वा राज्य सरकार असो लेखीटाकी करायला माणसे टाळाटाळ करतात. आमची तक्रार तुम्ही नोंदवा म्हणून आपण आग्रही राहीलो तर आपली तक्रार लवकर निवारण होते. पण तक्रार नोंदवह्याच ठेवायच्या नाहीत असा अलिखित नियम सरकारी कार्यालयांतून दिसत आहे. अशा परिस्थितीत वरिष्ठांना भेटून तक्रार नोदवही का नाही, सूचना वही का नाही याची चौकशी करणे गरजेचे आहे, तरच आपली कामे रेंगाळत नाहीत. एखाद्या कामासाठी आपण एखाद्या सरकारी कार्यालयात पत्र देतो. ते पत्र दिल्यावर त्याचे उत्तर अनेक दिवस मिळत नाही म्हणून आपण वैतागून जातो. पण त्याचवेळी आपल्या मागाहून पत्र दिलेल्यांची कामे झाल्याचे लक्षात येते. अशा परिस्थितीत आपले कुठे चुकले आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आपण पत्र देताना त्या संबंधीत व्यक्तिची पोहोच घ्यावी. ते पत्र त्या कार्यालयात आवक झाले आहे याची खात्री करून घ्यावी आणि आवक क्रमांक व तारिख आपल्याकडे लिहून ठेवावी. पोहोच न दिलेली पत्रे ही आवक वहीत नोंदवायची तसदी घेतली जात नाही. त्यामुळे अनेक पत्र अनुत्तरीत राहतात.
प्रशासनाला कामाला लावायचे असेल तर आपण जागृत असणे गरजेचे आहे. कोणती छिद्र बाकी आहेत काय याचा विचार करून कर्मचार्यांना पळवाटा काढायला संधी आपणच दिली नाही तर कामे वेळेवर होतील. सरकारी कार्यालयात कोणत्याही लेखी नोंदीचा विचार आधी केला जातो. कानोकानी किंवा निरोप पाठवून तोंडी व्यवहाराला थारा नसतो. लेखी नोंदी करायला अनेकवेळा कर्मचारीवर्ग टाळाटाळ करतो, पण ती त्याची सोय असते. ठिक आहे. पाठवतो माणूस. असे सांगून तो अधिकारी तात्पुरती बोळवण करेल, पण काम लवकर झाले नाही म्हणून आपण विचारायला गेल्यावर तोच कर्मचारी प्रश्न करेल की, तुमची लेखी कंप्लेंट आहे काय? आधीच्या लेखी कंप्लेंट आम्हाला पूर्ण करायच्या आहेत, त्या झाल्यावर तुमचं काम करतो म्हणून पुन्हा पिटाळून लावेल. यासाठी दफ्तरी नोंद करणे या वाक्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. एखादा घर खरेदीचा व्यवहार होतो तेव्हा खरेदीखत झाल्यावर त्याची नोद घराच्या आठ अच्या उतार्यावर, 7/12 वर किंवा शहरी भागात मिळकतीच्या कार्डावर( प्रॉपर्टी कार्ड) नोंद करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी विशिष्ठ प्रकारचा स्टँप व्हेंडरकडून अर्ज लिहून घेउन त्यावर कोर्ट फी स्टँप लावून आपण तो नोंदवण्यासाठी सिटी सर्व्हेकडे देणे आवश्यक असते. मात्र अनेकजण खरेदीपत्र झाल्यावर आपले काम झाले, आपण मालक झालो समजून अंधारात राहतात. त्या मुख्य उतार्यावर नोंद होणे महत्त्वाचे असते हे लक्षात न घेतल्यामुळे एका जागेचे, एका घराचे अनेक व्यवहार करण्याचे प्रकार घडतात. सिटी सर्व्हेने दोन दोन महिने नोंद केली नाही म्हणून लोक ओरड करतात. पण सिटी सर्व्हेला दिलेल्या पत्राची पोहोच न घेतल्यामुळे हे प्रकार घडत असतात.
काही लोक उगाचच सरकारी कार्यालयात नको तिथे जातात. या टेबलवरून त्या टेबलवर फिरत राहतात. प्रत्येक टेबलवरचा माणूसे वेगळ्या माणसाकडे बोट दाखवत राहतो. हा प्रकार टाळण्यासाठी चौकशी लिहीलेल्या टेबलवर जर आधी हे काम नक्की कोणाकडे गेल्यावर पूर्ण होईल हे विचारून त्या चौकशी टेबलवर माहिती दिलेल्या व्यक्तिकडे जावे, म्हणजे आपला वेळ वाचतो. तरीही त्या व्यक्तिने माझ्याकडे नाही तर दुसर्या टेबलवर जा असे सांगितले तर आक्रमकपणा दाखवावा लागेल. तुमच्या कार्यालयातील चौकशी टेबलावर माहिती विचारल्यावर त्या व्यक्तिने तुमच्याकडून काम होईल सांगितले आहे. अशी चुकीची माहिती देणारावर मी काय कारवाई करावी असे खडसावून विचारल्यावर तो अधिकारी नरमाईची भूमिका घेईल आणि तुमचे काम पटकन करून देईल. आपण योग्य त्या मार्गाने आलो आहोत हे दाखवून दिल्यानंतर सरकारी कार्यालयांना त्यांचे काम योग्य पद्धतीने करणे भाग पडते हे ध्यानात घेतले पाहिजे.
अनेक लोकांना शासकीय कार्यालयातील शिपायांशी ओळख वाढवून त्यांच्यामार्फत कामे करून घेण्याची सवय असते. शिपायामार्फत अनेक फायलींमधून आपली फाईल घुसवायची आणि त्याला मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न करायची सवय असते. त्या अधिकार्यापर्यंत फाईल पोहोचवली म्हणून शिपायाला खूष करायचे आणि अधिकार्यांच्या केबिनमध्ये घुसायचे असे प्रकार अनेकजण करतात.
हे प्रकार प्रत्येकाने टाळले पाहिजेत.
फाईल जेथून येत असतात त्या फाईलवर काहीतरी प्रत्येक टेबलने शेरे मारलेले असतात. त्याची छाननी केलेली असते. ती पुढे पाठवण्यास योग्य असली तरच ती पुढे पाठवली जाते. अशी शेरे न मारता आलेली मध्येच घुसलेली फाईल आली की त्यात अनेक चुका निघतात, त्याची बोलणी ज्याने फाईली पाठवल्या त्या व्यक्तिला खावी लागतात. ती फाईल पुढे कशी गेली हे त्याला समजत नसते. त्यामुळे अशा फाईलवर वरपासून खालपर्यंत राग निघतो आणि ते काम रखडते. सरकारी कार्यालयातील कामे लवकर होण्यासाठी नागरिकांनाही विशेष साक्षर करण्याची गरज आहे. याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन वर्ग आयोजित होणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात होणार्या वसंत व्याख्यानमालांमधून ठिकठिकाणी या विषयावर चर्चा झाली पाहिजे. विविध खात्यांच्या अधिकार्यांना यासाठी आमंत्रित करून त्यांची मते जाणून घेतली पाहिजेत. आपली कामे रखडण्यात आपली एखादी तडजोड नाही ना हे आपण समजून घेतले पाहिजे. त्या कामासाठी आवश्यक ते दाखले, कागदपत्रे आपण त्या कार्यालयाच्या मागणीप्रमाणे दिली आहेत काय? याचा विचार केला पाहिजे. त्या कागदपत्रांसाठी काही पर्याय आपण दिले आहेत काय आणि त्यास त्यांची स्वीकृती आहे काय याचा विचार करावा लागेल. नियमबाह्य काम आपण करून घेत नाही ना याचा तपास करावा आणि सगळं व्यवस्थित असतानाही कामाला खरोखरच दिरंगाई होत आहे काय याचा तपास घ्यावा लागेल. प्रत्यक्षात योग्प पद्धतीने निवेदन झाले तर काम वेळेतच होणार याची खात्री बाळगायला हवी आणि मगच संघर्ष करायला सिद्ध व्हावे. यासाठी सरकारी कामाची पद्धती समजून घेणे आवश्यक आहे.
शॉर्टकट काढायला गेलो तर काम रेंगाळत राहणार.
आशा करतो की तुम्हाला वरील माहिती समजली असणार.
धन्यवाद🌹
लेख जरा लांबलचक आहें, पण कृपया संपूर्ण माहिती विचारात घेणे आवश्यक आहे,
त्यासाठी
शॉर्टकट नको, सरळ जा
"सरकारी काम अन सहा महिने थांब" अशी आपल्याकडे म्हण आहे.
पण सरकारी कार्यालयात गेल्यावर आपली कामे वेळेवर आणि योग्य मुदतीत होण्यासाठी काय केले पाहिजे हे न समजल्यामुळे अनेकांची कामे खोळंबतात. अमूक एक काम आहे, त्यासाठी तमूक एका सरकारी कार्यालयात गेलो, पण काम काही होत नाही. आज या, उद्या या असे सांगून परत पाठवतात, अशा तक्रारी अनेकजण करतात. पण काही लोकांची कामे सहज आणि वेळेवर होतात. काही लोकं पैसे देउन कामे करून घेण्यात धन्यता मानतात. ही सवय आपणच लावतो आणि नंतर भ्रष्टाचाराचे नावाने ओरडत बसतो अशी परिस्थिती आहे.
काही गोष्टी फोनवरून केल्या जात असतील तर त्याबाबत काही भान आपल्याला पाळावे लागते.
उदा. एखाद्या भागातील वीजेची तार तुटल्यामुळे त्या भागातील विद्युत पुरवठा बंद होतो. अंधारामुळे किंवा दिवस असेल तर उकाड्यामुळे माणसे हैराण होतात पण वीज पुरवठा कशाने खंडीत झाला आहे याबाबत लक्ष घालत नाहीत. अंधार पडू लागल्यावर बाकीच्या घरात उजेड चमकू लागतो तेव्हा लक्षात येते फक्त आपल्याच घरातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. किंवा त्या विशिष्ठ इमारतीतील काही लोकांचा विज पुरवठा खंडीत झाला आहे. अशावेळी कोणीतरी वीज वितरण कंपनीच्या संबंधीत कार्यालयात फोन लावतो आणि सांगतो, लाईट गेलीय, बघा काही होते का म्हणून. तो पलिकडून बोलणारा हो म्हणतो आणि फोन ठेवून जातो. काही झाले तरी दुरूस्तीला कोणी येत नाही. सगळेजण त्या विजवितरण कंपनीच्या नावाने ओरडू लागतात. हा प्रकार अनेक ठिकाणी घडतो. पण प्रत्यक्षात काय झालेले असते तर आपण केलेली तक्रारच तिथे नोंदवलेली नसते.
सरकारी कामाची दिरंगाई ही अशी होते.
यामध्ये संबंधीत नागरिकाने तक्रार करताना, त्या व्यक्तिचे नाव, हुद्दा जाणून घेणे आवश्यक असते. आपली लेखी तक्रार नोंदवली आहे की नाही याची खात्री करून घेतल्यावर तक्रार क्रमांक किती आहे हे विचारले पाहिजे आणि ही तक्रार सोडवायला कोण येणार आहे त्या वायरमनचे नाव विचारून घेतले तर आपले काम पटकन होते. प्रत्यक्ष गेल्यावर तीथे त्या रजिस्टरमध्ये आपली लेखी तक्रार नोंदवून घेण्याची आणि तक्रार क्रमांक आपल्याकडे लिहून ठेवला म्हणजे होणारी दिरंगाई टळते.
या साध्या साध्या गोष्टी असतात पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे माणसे स्वत:ला त्रास करून घेतात. आज बहुतेक सरकारी खात्यांमधून केंद्र असो वा राज्य सरकार असो लेखीटाकी करायला माणसे टाळाटाळ करतात. आमची तक्रार तुम्ही नोंदवा म्हणून आपण आग्रही राहीलो तर आपली तक्रार लवकर निवारण होते. पण तक्रार नोंदवह्याच ठेवायच्या नाहीत असा अलिखित नियम सरकारी कार्यालयांतून दिसत आहे. अशा परिस्थितीत वरिष्ठांना भेटून तक्रार नोदवही का नाही, सूचना वही का नाही याची चौकशी करणे गरजेचे आहे, तरच आपली कामे रेंगाळत नाहीत. एखाद्या कामासाठी आपण एखाद्या सरकारी कार्यालयात पत्र देतो. ते पत्र दिल्यावर त्याचे उत्तर अनेक दिवस मिळत नाही म्हणून आपण वैतागून जातो. पण त्याचवेळी आपल्या मागाहून पत्र दिलेल्यांची कामे झाल्याचे लक्षात येते. अशा परिस्थितीत आपले कुठे चुकले आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आपण पत्र देताना त्या संबंधीत व्यक्तिची पोहोच घ्यावी. ते पत्र त्या कार्यालयात आवक झाले आहे याची खात्री करून घ्यावी आणि आवक क्रमांक व तारिख आपल्याकडे लिहून ठेवावी. पोहोच न दिलेली पत्रे ही आवक वहीत नोंदवायची तसदी घेतली जात नाही. त्यामुळे अनेक पत्र अनुत्तरीत राहतात.
प्रशासनाला कामाला लावायचे असेल तर आपण जागृत असणे गरजेचे आहे. कोणती छिद्र बाकी आहेत काय याचा विचार करून कर्मचार्यांना पळवाटा काढायला संधी आपणच दिली नाही तर कामे वेळेवर होतील. सरकारी कार्यालयात कोणत्याही लेखी नोंदीचा विचार आधी केला जातो. कानोकानी किंवा निरोप पाठवून तोंडी व्यवहाराला थारा नसतो. लेखी नोंदी करायला अनेकवेळा कर्मचारीवर्ग टाळाटाळ करतो, पण ती त्याची सोय असते. ठिक आहे. पाठवतो माणूस. असे सांगून तो अधिकारी तात्पुरती बोळवण करेल, पण काम लवकर झाले नाही म्हणून आपण विचारायला गेल्यावर तोच कर्मचारी प्रश्न करेल की, तुमची लेखी कंप्लेंट आहे काय? आधीच्या लेखी कंप्लेंट आम्हाला पूर्ण करायच्या आहेत, त्या झाल्यावर तुमचं काम करतो म्हणून पुन्हा पिटाळून लावेल. यासाठी दफ्तरी नोंद करणे या वाक्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. एखादा घर खरेदीचा व्यवहार होतो तेव्हा खरेदीखत झाल्यावर त्याची नोद घराच्या आठ अच्या उतार्यावर, 7/12 वर किंवा शहरी भागात मिळकतीच्या कार्डावर( प्रॉपर्टी कार्ड) नोंद करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी विशिष्ठ प्रकारचा स्टँप व्हेंडरकडून अर्ज लिहून घेउन त्यावर कोर्ट फी स्टँप लावून आपण तो नोंदवण्यासाठी सिटी सर्व्हेकडे देणे आवश्यक असते. मात्र अनेकजण खरेदीपत्र झाल्यावर आपले काम झाले, आपण मालक झालो समजून अंधारात राहतात. त्या मुख्य उतार्यावर नोंद होणे महत्त्वाचे असते हे लक्षात न घेतल्यामुळे एका जागेचे, एका घराचे अनेक व्यवहार करण्याचे प्रकार घडतात. सिटी सर्व्हेने दोन दोन महिने नोंद केली नाही म्हणून लोक ओरड करतात. पण सिटी सर्व्हेला दिलेल्या पत्राची पोहोच न घेतल्यामुळे हे प्रकार घडत असतात.
काही लोक उगाचच सरकारी कार्यालयात नको तिथे जातात. या टेबलवरून त्या टेबलवर फिरत राहतात. प्रत्येक टेबलवरचा माणूसे वेगळ्या माणसाकडे बोट दाखवत राहतो. हा प्रकार टाळण्यासाठी चौकशी लिहीलेल्या टेबलवर जर आधी हे काम नक्की कोणाकडे गेल्यावर पूर्ण होईल हे विचारून त्या चौकशी टेबलवर माहिती दिलेल्या व्यक्तिकडे जावे, म्हणजे आपला वेळ वाचतो. तरीही त्या व्यक्तिने माझ्याकडे नाही तर दुसर्या टेबलवर जा असे सांगितले तर आक्रमकपणा दाखवावा लागेल. तुमच्या कार्यालयातील चौकशी टेबलावर माहिती विचारल्यावर त्या व्यक्तिने तुमच्याकडून काम होईल सांगितले आहे. अशी चुकीची माहिती देणारावर मी काय कारवाई करावी असे खडसावून विचारल्यावर तो अधिकारी नरमाईची भूमिका घेईल आणि तुमचे काम पटकन करून देईल. आपण योग्य त्या मार्गाने आलो आहोत हे दाखवून दिल्यानंतर सरकारी कार्यालयांना त्यांचे काम योग्य पद्धतीने करणे भाग पडते हे ध्यानात घेतले पाहिजे.
अनेक लोकांना शासकीय कार्यालयातील शिपायांशी ओळख वाढवून त्यांच्यामार्फत कामे करून घेण्याची सवय असते. शिपायामार्फत अनेक फायलींमधून आपली फाईल घुसवायची आणि त्याला मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न करायची सवय असते. त्या अधिकार्यापर्यंत फाईल पोहोचवली म्हणून शिपायाला खूष करायचे आणि अधिकार्यांच्या केबिनमध्ये घुसायचे असे प्रकार अनेकजण करतात.
हे प्रकार प्रत्येकाने टाळले पाहिजेत.
फाईल जेथून येत असतात त्या फाईलवर काहीतरी प्रत्येक टेबलने शेरे मारलेले असतात. त्याची छाननी केलेली असते. ती पुढे पाठवण्यास योग्य असली तरच ती पुढे पाठवली जाते. अशी शेरे न मारता आलेली मध्येच घुसलेली फाईल आली की त्यात अनेक चुका निघतात, त्याची बोलणी ज्याने फाईली पाठवल्या त्या व्यक्तिला खावी लागतात. ती फाईल पुढे कशी गेली हे त्याला समजत नसते. त्यामुळे अशा फाईलवर वरपासून खालपर्यंत राग निघतो आणि ते काम रखडते. सरकारी कार्यालयातील कामे लवकर होण्यासाठी नागरिकांनाही विशेष साक्षर करण्याची गरज आहे. याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन वर्ग आयोजित होणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात होणार्या वसंत व्याख्यानमालांमधून ठिकठिकाणी या विषयावर चर्चा झाली पाहिजे. विविध खात्यांच्या अधिकार्यांना यासाठी आमंत्रित करून त्यांची मते जाणून घेतली पाहिजेत. आपली कामे रखडण्यात आपली एखादी तडजोड नाही ना हे आपण समजून घेतले पाहिजे. त्या कामासाठी आवश्यक ते दाखले, कागदपत्रे आपण त्या कार्यालयाच्या मागणीप्रमाणे दिली आहेत काय? याचा विचार केला पाहिजे. त्या कागदपत्रांसाठी काही पर्याय आपण दिले आहेत काय आणि त्यास त्यांची स्वीकृती आहे काय याचा विचार करावा लागेल. नियमबाह्य काम आपण करून घेत नाही ना याचा तपास करावा आणि सगळं व्यवस्थित असतानाही कामाला खरोखरच दिरंगाई होत आहे काय याचा तपास घ्यावा लागेल. प्रत्यक्षात योग्प पद्धतीने निवेदन झाले तर काम वेळेतच होणार याची खात्री बाळगायला हवी आणि मगच संघर्ष करायला सिद्ध व्हावे. यासाठी सरकारी कामाची पद्धती समजून घेणे आवश्यक आहे.
शॉर्टकट काढायला गेलो तर काम रेंगाळत राहणार.
आशा करतो की तुम्हाला वरील माहिती समजली असणार.
धन्यवाद🌹
0
Answer link
सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी काही मार्ग वापरू शकता:
1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti-Corruption Bureau):
जर तुम्हाला असे वाटत असेल की सरकारी कर्मचाऱ्याने लाच मागितली आहे किंवा भ्रष्ट मार्गाने काम करत आहे, तर तुम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार करू शकता. ACB ही संस्था भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB)
2. संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी:
तुम्ही ज्या सरकारी कर्मचाऱ्याबद्दल तक्रार करू इच्छिता, त्या कर्मचाऱ्याच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार करू शकता. प्रत्येक विभागात तक्रार निवारण करण्यासाठी एकdesignated अधिकारी असतो.
3. मुख्यमंत्री तक्रार निवारण कक्ष:
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तक्रार निवारण कक्ष सुरू केला आहे. येथे तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तक्रार दाखल करू शकता.
मुख्यमंत्री तक्रार निवारण कक्ष
4. माहिती अधिकार (Right to Information):
जर तुम्हाला कोणत्याही सरकारी कामाबद्दल माहिती हवी असेल आणि ती मिळत नसेल, तर तुम्ही माहिती अधिकार कायद्याचा वापर करू शकता.
माहिती अधिकार
ॲप्स (Apps):
* RTI Online: हे ॲप तुम्हाला माहिती अधिकार अर्ज ऑनलाइन भरण्यास मदत करते.
* MahaAcb : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यासाठी हे ॲप उपयुक्त आहे.
इतर मार्ग:
तुम्ही लेखी स्वरूपात तक्रार तयार करून संबंधित कार्यालयात पोस्टाने पाठवू शकता. तुमच्या तक्रारीत तपशीलवार माहिती, घटनाक्रम आणि पुरावे सादर करणे महत्त्वाचे आहे.