3 उत्तरे
3
answers
आषाढी एकादशी का साजरी करतात?
16
Answer link
आषाढ शुद्ध
हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रम्हधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.
धार्मिक कथा
पौराणिक काळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन मृदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतो व त्याचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व ती मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला. परस्परावर प्रेम करणे, प्राणिमात्र, अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. मराठी हिंदूंच्या दृष्टीने हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.
4
Answer link
*⚜ आषाढी एकादशी*
🚩 आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्रातून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात.
🚩 अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेवर देशातच नाही तर जागतिक स्तरावरही अभ्यास सुरु आहे.या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात.
🚩 या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते.
🚩 आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी (देवांच्या निद्रेची) एकादशी असे म्हणतात.
🚩 देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते.
🚩 या दिवशी रोजच्या पुजेबरोबरच श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते.
🚩 वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे. पंढरपुरात आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
0
Answer link
आषाढी एकादशी: महत्व आणि इतिहास
आषाढी एकादशी हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात.
आषाढी एकादशी साजरी करण्याची कारणे:
- भगवान विष्णूची पूजा: या दिवशी विठ्ठलाची (विष्णूचा अवतार) विशेष पूजा केली जाते. भक्त उपवास करतात आणि रात्रभर भजन-कीर्तन करतात.
- चातुर्मासाची सुरुवात: आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मासातamentation, marriage, and other celebrations are restricted.
- पंढरपूरची वारी: महाराष्ट्रातून लाखो भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात.
- पापांपासून मुक्ती: असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने आणि विठ्ठलाची पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते.
आषाढी एकादशीचा इतिहास:
आषाढी एकादशीची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांसारख्या संतांनी विठ्ठलभक्तीचा प्रसार केला. त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
अधिक माहितीसाठी: