व्यक्तिमत्व संत इतिहास

तुकाराम महाराजांचा खून झाला होता की वैकुंठाला गेले?

2 उत्तरे
2 answers

तुकाराम महाराजांचा खून झाला होता की वैकुंठाला गेले?

17
काही समाजकंटक आम्हाला सांगतात कि जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नसून त्यांची हत्या झाली आहे. सर्वस्वी खोटं आहे हे...

ऐतिहासिक पुराव्यानुसार, तुकोबा, "फाल्गुन वद्य द्वितीया" म्हणजेच "तुकाराम बीज" या दिवशी देहू येथे गोपाळपुर्यातील नांदुरकीच्या झाडाखाली कीर्तन करताना अचानक अदृश्य झाले.
(आजही तुकाराम बीजच्या दिवशी तसूभरही वारा नसताना हा नांदुरकी वृक्ष सळसळ करत जोराने हलतो..हे आतासुद्धा अनेकांनी याची देही याची डोळा पाहिले आहे...अनुभवले आहे.)

आता तुकोबांचे कीर्तन म्हटल्यावर तुम्हीच विचार करा कि साधारण किती लोक तिथे उपस्थित असतील? आपण साधारण १०० ते १५० लोक तिथे उपस्थित होते असे समजून चालूया.

मग आता मला सांगा, जर मंबाजी भटाने जर तुकोबांचा खून केला असता तर या १००-१५० लोकांनी त्याला धरून झोडपला नसता का?

तुकोबांचा खून झाला असता तर त्यांचे मृत शरीर देखील तिथेच मिळाले असते मग त्यावर त्या १००-१५० लोकांनी अंत्यसंस्कार कुठे केला हे देखील कळू द्या. पण असा काही अंत्यसंस्कार झाला नसल्याची माहिती आहे. म्हणजेच तुकोबांचा खून झाला नाही हेदेखील निश्चित.

तुकोबांचा खून होतो आणि त्याची माहिती त्यांचे परमशिष्य छत्रपति शिवरायांना मिळत नाही असे होऊच शकत नाही. कारण महाराजांचे खबरे अगदी दिल्लीतल्या बातम्या आणत असत. मग १२ कोसावरच्या देहुतल्या खुनाची बातमी त्यांना मिळणार नाही असे होऊच शकत नाही.
स्वराज्यात अगदी साध्यातल्या साध्या माणसाला हात लावायची हिम्मत सुद्धा कोण्या ब्राह्मणात नव्हती. मग इथे तर साक्षात छत्रपतींचे गुरु तुकोबा उभे आहेत. मग त्यांचा खून होईल हि शक्यता १% सुद्धा नाही.
जर तुकोबांचा खून झाला असता तर त्यांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या खबर्याकडून काहीतरी खबर नक्कीच मिळाली असती, आणि मग त्यांनी त्या खुन्याला (मंबाजी) लगेच पकडून त्याला देहदंड दिला असता. पण असेदेखील काहीही झालेले नाही. म्हणजेच तुकोबांचा खून झाला नाही.

काहीजण म्हणतात कि तुकोबांचा रातोरात खून झाला. हे कसे शक्य आहे? कारण तुकोबा १००-१५० लोकांसमोर अदृश्य झाले असे सांगितले जाते. मग रातोरात खून होईलच कसा? रातोरात खून झाला असे म्हणणारे एकतर मूर्ख आहेत आणि त्यांचे ऐकून ब्राह्मणांना शिव्या देणारे स्वतःची अक्कल गहाण ठेवून बसले आहेत.
काहीजण म्हणतात कि धुळवडीच्या दिवशी तुकोबांचा खून झाला, या मुर्खांनी धुळवड आणि तुकाराम बीज याची तिथी ताडून पहा. किती अंतर आहे ते कळेल.
काहीजण यावरसुद्धा कडी करतात. ते विचारतात, याआधी कोणीही सदेह वैकुंठाला गेल्याचे पुरावे नाहीत. मग तुकोबाच वैकुंठाला गेले याचा काय पुरावा?
पण मला सांगा, संत नामदेवांनी लहानपणी स्वतःच्या हाताने विठ्ठलाला खाऊ घातले असे म्हणतात. मग त्यावेळी असा प्रश्न उपस्थित का नाही करत?
कारण नामदेवांच्या त्या कथेत ब्राह्मणांचा संदर्भ येउच शकत नाही म्हणून. तुकोबांचा खून ब्राह्मणांनी केला असे सांगायचे आणि जनतेला ब्राह्मणद्वेष करायला भाग पाडायचे अशी हलकट कामे खेडेकरी टोळी करत आहे.

तुकोबांच्या अभंग गाथेतील काही अभंग प्रसिद्ध आहेत.

सरकारी गाथेतील अभंग क्र. ३६०६ मध्ये तुकोबा म्हणतात,
"आता दिसो नये जना । ऐसी करा नारायणा"
म्हणजेच तुकोबा स्वतः देवाकडे विनवणी करत आहेत कि देव तू असे काहीतर कर कि मी या लोकांना अजिबात दिसू नये. आपण ज्याला वैकुंठगमन म्हणतो तेच हे 'असे काहीतरी' आहे.

सरकारी गाथेतील अभंग क्र. ३६१३ मध्ये तुकोबा म्हणतात,
"अपुल्या माहेर मी जाईन आता । निरोप या संता हाती आला ।
या अभंगात तुकोबा म्हणतात कि मी आता माझ्या माहेरी जात आहे, तसा मला निरोप आला आहे.
म्हणजेच तुकोबांना आपल्या वैकुंठगमनाची चाहूल बरीच आधी लागली होती हे कळते.

अभंग क्र. ३६२५ -
"हाती धरोनिया देवे नेले तुका । जेथे नाही लोका परिश्रम ।
या अभंगातून लगेच कळू शकते कि देवाने त्यांना हाताला धरून अशा ठिकाणी नेले जिथे त्यांना काहीच परिश्रम नाहीत. हे ठिकाण म्हणजेच वैकुंठ होय.

तुकोबांच्या जिवनचरित्रात त्यांच्या काही व्यक्तींचा समावेश आहे. तुकोबांच्या वैकुंठगमनानंतर त्यापैकी ३ व्यक्तींना तुकोबांनी स्वप्नात दृष्टांत दिला होता. जर तुकोबांचा खून झाला असता तर तुकोबांनी त्यांना आपला खून झाला आहे असे स्वप्नात सांगितले असते. पण याची नोंद कुठेच दिसत नाही.
त्या तीन व्यक्तींपैकी एक होते निळोबाराय पिंपळनेरकर. तुकोबांच्या नंतर लौकिकअर्थाने त्यांचा भगवदभक्तीच्या प्रसाराचा वारसा निळोबांकडे आला असे मानले जाते. याचा अर्थ निळोबा हे उच्चप्रतीचे व्यक्ती होते. म्हणजेच ते खोटे बोलणार नाहीत. त्यांना देखील स्वप्नात तुकोबांचा दृष्टांत झाला परंतु आपला खून झाला असे तुकोबांनी त्यांना किंवा अजून कुणालाही त्या दृष्टांतात सांगितले नाही.
म्हणजेच यावरूनदेखील तुकोबांचा खून झाला नाही हे स्पष्ट आहे.

तुकोबांचे वैकुंठगमन होण्याअगोदरची काही वर्षे ते अत्यंत प्रसिद्ध झाले होते. त्यांनी असंख्य व्यक्तींना भगवदभक्तीची गोडी लावली होती. त्यामुळे त्या काळात ते कुठेही एकटे जाणे अगदीच अशक्य होते..

आता काय खरे मानायचे ते तुम्हीच ठरवा..
उत्तर लिहिले · 28/4/2017
कर्म · 20475
0
तुकाराम महाराजांचा खून झाला नव्हता, तर ते इंद्रायणी नदीच्या डोहात बुडून वैकुंठाला गेले, असे मानले जाते.

अधिक माहिती:

  • देहू गावातून प्रस्थान: तुकाराम महाराज फाल्गुन वद्य द्वितीया शके १५७१ (इ.स. १६४९) रोजी देहू गावातून वैकुंठाला गेले, असे मानले जाते. Wikipedia

  • इंद्रायणी नदी: तुकाराम महाराजांनी देहू जवळील इंद्रायणी नदीत जलसमाधी घेतली.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1620

Related Questions

पृथ्वीवर पहिले कोण आले?
छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते?
छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय?
सिंधु संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर करत नव्हते?
आराम हराम है हे घोषवाक्य कोणाचे आहे?
स्वतंत्र भारताचा अर्थमंत्री कोण?
सामाजिक सांस्कृतिक इतिहास लेखन पद्धत सविस्तर लिहा?