2 उत्तरे
2
answers
जोतिबा देवाची माहिती सांगा?
6
Answer link
🌐 वाड़ीरत्नागिरी येथील श्री ज्योतिबादेवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे.स्थानसमुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंचीवरील याज्योतिबाडोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्यावैभवात तसेच भोतिक व ऐहिक ऎश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वागीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि. मी. वर आहे.सह्याद्रीचा जो फाटापन्हाळगड, पावनगडअसा गेला आहे. त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो, तोच ज्योतिबाचा डोंगर ! या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्धअसलेले हे ज्योतिबाबाचे पुरातन मंदिर आहे.महत्त्वदक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यातकीर्द असलेल्या करवीरपीठास धर्मशास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे.दख्खनचा राजा श्री.जोतिबा श्री जोतिबा ,श्री कात्यायनी देवी ,नृसिंहवाडीयेथीलश्रीक्षेत्र दत्तात्रय मंदीर,बाहुबलीयेथील जैन धर्मियांचे पवित्र क्षेत्र त्याचप्रमाणेविशाळगडदर्गा आदि धर्मस्थळांमुळे कोल्हापूरचा लौकिक त्रिखंडात झाला आहे.त्यामुळे कोल्हापूरास अलौकिक स्थान महात्म्य प्राप्त झाले आहे.या धर्मस्थळांपैकीवाडी रत्नागिरीयेथीलश्री जोतिबा देवस्थानमहाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे.समुद्रसपाटीपासुन सुमाले ३१०० फूट उंचीवरील याजोतिबाडोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भौतिक व एतहासिक एश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आ स्थान माहात्म्य व पूर्वपीठिका. डोंगरावरील उंच-सखल भागात वाडी रत्नागिरीचे गावठाण वसले असून , सुमारे५ हजार लोकवस्तीच्या या गावात ९९ लोक गुरव समाजाचे आहे.देवताकृत्य तसेच नारळ,गुलाल व मेवामिठाई दुकाने यावरच त्यांची गुजराण होते.वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि.मी.वर आहे.सह्याद्रीचा जो फाटापन्हाळगड,पावनगडअसा गेला आहे.त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो,तोच जोतिबाचा डोंगर या डोंगरावर प्राचीन काळापूसन प्रसिद्ध असलेले हे जोतिबाचे पुरातन मंदीर आहे.श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे.ब्रह्मा,विष्णू,महेशआणिजमदग्नीया सर्वाचा मिळून एक तेज:पुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ! ज्योतिबा यानावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश ! वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा ज्योतिबा !पौगंड ऋषीच्यावंशाला दिवा नव्हता.त्यांनी तपश्चर्या करूनब्रदिनाथांनासंतुष्ट केले.ब्रदिनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले त्याप्रमाणे चैत्र शुद्ध पष्ठीच्या मुहूर्तावर स्वता आठ वर्षांची बालमुर्ती होऊन ब्रदिनाथ हे ऋषी दांपत्यासमोर अवतरले ही बालमुर्ती ब्रदिनाथांची प्राणज्योती । म्हणून त्यांचे नाव जोतिबा असे ठेवले.आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमलांबुजाची तीव्र इच्छा होती,त्याप्रमाणे तिच्या ओंजळीतकेदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली,तेच जोचिबाचे रूप होय.श्री जोतिबाला गुलाल,दवणा,खोबरे व खारका प्रिय। त्याच्या दवण्याला गंध हा सत्व,रज,तम गुणयुक्त आहे.पुजाश्री जोतिबा हेबद्रिकेदाराचेरूप.ब्रह्मा,विष्णू,महेशआणिजमदग्नीया सर्वांचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच जोतिबा होय. जोतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली आहे. जोतिबा देव दख्खन केदार, सौदागर, खवळनाथ या नावांनीही ओळखला जातो. जोतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडेचार फूट उंचीची आहे. मूर्ती बटू भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या हातीखड्ग,त्रिशूल,डमरूअसून त्यांचे वाहनघोडाआहे.जोतिबा देवाची रोज तीन वेळा पूजा बांधली जाते. पहिली साधी पूजा सकाळच्यामहाभिषेकापूर्वी, दुसरी खडी पूजा अभिषेकानंतर तर तिसरी पूजा बैठी असते. ती दुपारनंतर बांधण्यात येते. दरशनिवारी"श्रीं'ची दुपारी बारा ते तीन वेळेत घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते. सर्व पूजा डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या असतात. दक्षिण मोहिमेत श्री केदारनाथ व औंदासूर या राक्षसाची समोरासमोर भेट झाली. निकराचेयुद्धझाले; परंतु औंदासुराचा वध मूळ माया श्रीयमाईदेवीच्याहस्ते असल्याने जोतिबा देवांनी देवीस "यमाई' अशी साद घातली. तेव्हापासून देवीचे नाव यमाई असे रूढ झाले. यमाई ही जोतिबाचीबहीणआहे.चैत्रयात्रेदिवशीसासनकाठीवपालखीसोहळा सर्व लवाजमा यमाईदेवीच्या भेटीस जातो. देवीस मीठ-पीठ वाहण्याची पर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेलेदांपत्य मंदिरासमोर दगडांच्या व खापरांच्या उतरंडी लावतात. ही उतरंड म्हणजे चौदा चौक कड्या व सात समुद्ररूपी विश्वाचे प्रतीक. "आम्ही नवजीवनाची सुरवात तुझ्या दारातून करतो, तेव्हा आमचा संसार सुखी कर' असे साकडे घालून भाविक देवीसमीठ-पीठअर्पण करतात. यमाईदेवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत. ही शिल्पे माणसाने, माणसाशी माणसासारखे वागावे ही शिकवण देतात. बहीण भावाचे, अर्धपशूचे,कृष्णवदुधाचे माठ घेऊन जाणाऱ्या गवळणी, रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी शिल्पे आहेत. जोतिबाच्या धार्मिक विधीतउंट, घोडे,हत्तीलापूर्वीपासून मोठा मान आहे. पालखी सोहळा, धूपारती यातप्राण्यांचा सहभाग असतो.सासनकाठी मिरवणुकरत्नासुरवकोल्हासुरया राक्षसांनी अत्याचार सुरू केला होता. तेव्हाकरवीरनिवासनी श्रीमहालक्ष्मीनेकेदारनाथांचा (जोतिबा) धावा केला. तेव्हा जोतिबा देवाने राक्षसांचा संहार केला. हे राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा राज्याभिषेक केदारनाथांनी केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले, तेव्हामहालक्ष्मीवचोपडाई देवीनेत्यांना वाडी रत्नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला. सोहळ्यास यमाई देवीस निमंत्रण देण्याचे विसरल्याने त्या रुसल्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औंध गावी जात होते. त्यावेळी यमाई देवीने केदारनाथांना सांगितले की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरीवरील चाफेबनात येते. तेव्हापासून केदारनाथचैत्रपौर्णिमेस श्री यमाई देवीची भेट घेण्यासाठी सासनकाठी लवाजम्यासह जातात. हीच चैत्र यात्रा होय.चैत्र यात्रेतगुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते.. सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात.हलगी,पिपाणी,तुतारी,सनईच्यातालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविल्या जातात. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात जोतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो.हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो,त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार फक्तसंत नावजीनाथच्याकिवळकाठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण् देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान इनामपाडळी(जि.सातारा) या सासनकाठीचा,त्यानंतर मौजेविहे(ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती,कसबा डिग्रज(ता.मिरज),कसबा सांगाव(ता.कागल),किवळ(जि.सातारा),कवठेएकंद(जि.सांगली) यांच्या मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतात. मान नसलेल्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठ्यांच्या मिरवणुकीसप्रारंभ होतो. यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होते.फक्तसंत नावजीनाथकिवळ(जि. सातारा) याच सासनकाठीला यमाई मंदिराच्या दारात उभे राहण्याचा मान आहे.सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरातयमाईदेवीवजमदग्नीयांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होतो. त्यानंतर 'श्रीं'ची पालखी व संत नावजीनाथांची सासन काठी परत श्री जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होते.मंदिरमंदिरश्री जोतिबाचे आज जे मोठे मंदीर दिसते आहेत्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते.मूळमंदीरकराडजवळच्याकिवळयेथीलनावजीबुवा साळुंखे-किवळकर(संत नावजीनाथ) नामक भक्ताने बांधले व त्याचे नंतर आजचे देवालय आहे ते इ.स.१७३० मध्येग्वाल्हेरचेमहाराजराणोजीराव शिंदेयांनी मुळच्या ठिकाणीभव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले.मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्यावेसाल्टदगडात करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या वायव्य दिशेस साडेसतरा किलोमीटर अंतरावरवाडीरत्नागिरीयेथे दख्खनचा राजा जोतिबाचे भव्य पुरातन असे मंदिर आहे. हे तीर्थ ज्या पर्वतावर वसलेले आहे, त्या डोंगराचे मूळ नावमौनागिरी. डोंगरावर उत्तरेकडील बाजूस खोलगट भागामध्ये जोतिबाचे मंदिर आहे. मंदिरहेमाडपंती स्थापत्यशैलीशैलीतील असून,या ठिकाणी तीन मंदिरांचा समूह आहे. मुख्य मंदिर हे प्राचीन असून उर्वरित दोन मंदिरे ही अठराव्या शतकात बांधल्याचा उल्लेख आढळतो. प्रत्येक मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. जोतिबा मंदिर हे अतिप्राचीन असून ते महालक्ष्मी मंदिराच्या बरोबरीचे आहे. पन्हाळा राजधानी असलेल्या शिलाहार या राजाने ते बांधल्याची आख्यायिका आहे. जोतिबाचे परमभक्त नावजी यांनी मंदिर बांधल्याचा उल्लेखही आढळतो. आजचे देवालय हे1730मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मूळ ठिकाणी भव्य रूपात पुर्नचित करून बांधले. मंदिर उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना आहे. मंदिराचा दगड मंदिरातील तापमान संतुलित राखण्याचे काम करतो. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये गाभाऱ्याबरोबरच मंदिराच्या बाहेर व मंडपात भाविकांना गारव्याचा अनुभव घेता येतो. जोतिबावरील नंदीचे दक्षिणाभिमुख मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. असे मंदिर क्वचित आढळते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एकाऐवजी दोन नंदी आहेत. हे दोन्ही नंदी म्हणजे ईश्वराच्या सगुण, निर्गुणाच्या भक्तीचे प्रतीक होय. या मंदिरासमोरील महादेव मंदिराला जोडूनचआदीमाया चोपडाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराभोवती अष्टप्रधानांची स्थापना केलेली आहे. या शिवायगोरक्षनाथ(आदिनाथ),रामेश्वर,शंखभैरव,हरिनारायणमंदिर,दत्तमंदिर आहेत. दुसरे केदारेश्वराचे देवालय.विशेष म्हणजे ते खांबाच्या आधाराशिवाय उभे आहे.हे मंदीर इ.स.१८०८ मध्येदौलतराव शिंदेयांनी बांधले.केदारलिंग व केदारेश्वर यामध्ये चर्पंटावा म्हणजे चोपडाई देवालय आहे.इ.स.१७५० मध्ये प्रीतीराव चव्हाण (हिम्मतबहादूर) यांनी बांधले. यी तीन देवळांचा एक गट होतो.चौथे सामाश्वरीचे देवालय हे इ.स.१७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी बांधले.सण उत्त्सवजोतिबावर सरता रविवार, लळित सोहळा, नगरप्रदक्षिणा, अकरा मारुती दिंडी, नवरात्रोत्सव, पालखी सोहळे, श्रावण षष्ठी यात्रा असे अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. जोतिबाचे मंदिर हे ठरावीक दिवसांसाठीच रात्रंदिवस खुले असते. चैत्र यात्राकाळात तीन दिवस, श्रावण षष्ठी यात्रेत, चैत्र षष्ठीस, लळित सोहळ्यास, विजयादशमीचा जागर या दिवशी ते रात्रंदिवस खुले असते.भक्तजोतिबाच्या दक्षिणद्वारी कापूर-अगरबत्ती जेथे लावली जाते, त्या पायरीला लागून आडवी मूर्ती आणि ज्यावर भक्तिभावानेगुलाल-फुले वाहिली जातातत्यापादुकापरमभक्तनावजी बुवांच्या.देवाच्या दारी पायरीजवळ अजरामर होऊन राहण्याचा मानकिवळ(ता. कराड) येथीलनावजी ससे (पाटील)यांना लाभला आहे. या पायरीवर दक्षिण बाजूलाच देवालयाच्या शिखरावरनावजींचाबैठ्या स्वरूपातीलपुतळाआहे.
0
Answer link
जोतिबा देव: एक परिचय
जोतिबा हे महाराष्ट्र राज्यातील एक लोकप्रिय दैवत आहे. जोतिबा हे खंडोबा, काळभैरव आणि यमाई या तीन देवांचे एकत्रित रूप मानले जाते. हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
स्थान:
- हे मंदिर कोल्हापूर शहरापासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर रत्नागिरी-पंढरपूर मार्गावर ज्योतिबा डोंगरावर वसलेले आहे.
इतिहास:
- जोतिबा देवाची उत्पत्ती आणि इतिहास अनेक आख्यायिका आणि पौराणिक कथांशी जोडलेला आहे.
- जोतिबा देवाने रत्नासुर नावाच्या राक्षसाचा वध केला, अशी मान्यता आहे.
मंदिराची रचना:
- जोतिबा मंदिराची रचना पारंपरिक हेमाडपंथी शैलीत आहे.
- मंदिराच्या परिसरात अनेक लहान मोठी मंदिरे आहेत.
यात्रा आणि उत्सव:
- चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते, ज्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात.
- यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
पूजा आणि परंपरा:
- जोतिबा देवाची पूजा पारंपरिक पद्धतीने केली जाते.
- नवस बोलणारे भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.
महत्व:
- जोतिबा देव हे सत्य आणि न्यायाचे प्रतीक मानले जातात.
- अनेक लोक आपल्या अडचणी आणि समस्या दूर करण्यासाठी जोतिबा देवाकडे प्रार्थना करतात.
अधिक माहितीसाठी: