2 उत्तरे
2 answers

शिवाजी महाराजांची वंशावळ पूर्ण डिटेल मध्ये सांगा?

9
हे घराणे दॊलताबाद वेरुळच्या बाजुने  अहमदनगरच्या दक्षिणेला दॊंड जवळ पांडे-वडगाव या ठिकाणी आले.हे गाव अदिलशहा व निजामशहा यांच्या सरहद्दीवर असल्याने तेथील जहागिरी संभाळण्याचे काम थोडे जोखमीचे होते.त्याच्या पराक्रमाला जोड मिळाली ती फ़लटणच्या निंबाळ्काराचे चालुन आलेले स्थळ.
मालोजीचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते.मालोजीस लवकर संतान होइना म्हणुन मालोजी व दिपाबाई यांना वाईट वाटत होते.त्यांनी नगरचा पिरशहा शरीफ़ यांस नवस केला.व त्याच्या अनुग्रहाने दिपाबाईला १५९४ व १५९७ ला दोन मुले झाली.त्यांची नावे शहाजी व शरीफ़जी ठेवण्यात आले.पुढे शहाजीना संभाजी, शिवाजी व व्यंकोजी ही ३ मुले झाली.
मालोजीचा मुलगा शहाजी व लखुजी जाधवाची मुलगी जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळ्त असत.पण घरातील विरोधामुळे त्यांनी संबंध नाकारले. मालोजीला कमी लेखले गेले.मालोजी पुन्हा वेरुळला येऊन शेती करु लागले.तेथे त्यांना देवीचा दृष्टांत होऊन द्रव्याने भरलेला हंडा सापड्ला.त्या पॆशांच्या उपयोग करुन मालोजीनी हजारो घोडे घेतले व आपली फ़ॊज तयार करुन सरदार बनले.निजामशाहीवर मोगलाचे संकट आल्याने मालोजी भोसले निजामशाहीत कर्तबगार सरदार बनले.व लखुजी जाधवाने आपली मुलगी शहाजीना देऊन सोयरीक जमवली.

भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदीराचा जीर्णोध्दार करुन मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते अभिषेक करण्यात आले मंदीरच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो. मालोजीनी सातारातील श्रीशिखरशिंगणापुरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधुन त्याने तलाव तयार केला ,यात्रेकरुचा दुवा मिळवला.निजामशाहीने ऒरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’असे भोसले घराण्याच्या नावे दोन पेठा वसवल्या.मालोजीचा पराक्रम वाढतच गेला.
आपल्या उपयुक्त कामगिरीने मालोजीनी बुह्राणपुरच्या निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहदवरील इंदापुरच्या बाजुच्या शत्रुचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवले.या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवुन रणक्षेत्रावर मरण पावले.भोसले घराण्यातील वीरतेचे ’पहिले स्मारक’ मालोजीची छ्त्रीरुपाने इंदापुरभुमीवर स्थापन झाले.जरी मालोजीचा अंत झाला तरी भोसले घराण्याच्या पराक्र्माची सुरवात केले.व शिवाजींना स्वराज्य स्थापण्यासाठी मोठी प्रेरणा दिली.


संदर्भ

उत्तर लिहिले · 13/3/2017
कर्म · 20855
0

शिवाजी महाराजांची वंशावळ खालीलप्रमाणे आहे:

वंशावळ:

  1. क्षत्रियकुलावतंस श्री वीर शिव छत्रपती: (१९ फेब्रुवारी १६३० - ३ एप्रिल १६८०)
    • पत्नी: सईबाई ( first wife of Shivaji Maharaj )
      • पुत्र: संभाजी महाराज (१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९)
    • पत्नी: सोयराबाई
      • पुत्र: राजाराम महाराज (२४ फेब्रुवारी १६७० - ३ मार्च १७००)
  2. संभाजी महाराज:
    • पत्नी: येसूबाई
      • पुत्र: शाहू महाराज (१८ मे १६८२ - १५ डिसेंबर १७४९)
  3. राजाराम महाराज:
    • पत्नी: ताराबाई
      • पुत्र: शिवाजी II (शिवाजीराजे भोसले) (१६९६ - १७२६)
  4. शाहू महाराज: (यांनी दत्तक पुत्र घेतले)
    • दत्तक पुत्र: रामराजा (१८ मे १७४९)

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1240

Related Questions

पल्लव घराण्याच्या राजधानी कोणती होती?
पल्लव घराण्याची राजधानी कोणती होती?
शकांचा पराभव झाल्यावर विक्रमादित्य हे बिरुद कोणी धारण केले?
वेरुळचे प्रसिद्ध मंदिर _______या राजाच्या काळात खोदवले?
वाकाटक घराण्यातील पहिला राजा संस्थापक कोण?
टिपा लिहा: चेन्ला राज्य, उत्तर?
शिरपूर येथे कोणत्या घराण्याची सत्ता होती?