
शिक्षक दिन
*शिक्षक दीन...*
आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस... हाच दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन यांच्या मते “शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, चांगला शिक्षक तोच असतो ज्याच्यामधला विद्यार्थी सदैव जीवंत असतो.”
विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वावर शिक्षकांकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती तसेच आदर असे अनेक पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
युनेस्कोचे घोषवाक्य आहे - ‘शिक्षकांबाबत निश्चित भूमिका घ्या’ (Take a stand for Teachers!) निश्चित भूमिका म्हणजे नेमके काय करावे? तर शिक्षकांना योग्य प्रशिक्षण द्यावे, व्यावसायिक विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि शिक्षकांच्या हक्कांच्या संरक्षणाची हमी द्यावी!
सद्या ‘समाजातील उच्च गुणवत्ताधारक तसेच बुद्धिमान विद्यार्थ्यांनी शिक्षकी पेशाकडे वळणे ही काळाची गरज आहे. सक्षम आणि ध्येयनिष्ठ बुद्धिमान शिक्षकांशिवाय गुणवत्तायुक्त शिक्षण शक्य होणार नाही.
पु. ल. देशपांडे यांची ‘एका मोर्चाची गोष्ट’ नावाची कथा आहे. त्यात पु. लं. लिहितात, “... आमची एकच विनंती. उपाशी ठेवून ‘गुरुजी’ वगैरे नका म्हणू...”
म्हणून शेवटी वाटते,
शिक्षक दिन... की शिक्षक दीन...
*संपादक मधुकर घायदार, नाशिक यांचा रोखठोक लेख वाचा उद्याच्या अंकात...*
_संकेतस्थळ_
https://www.shikshakdhyey.com/
_टेलीग्राम_
https://t.me/shikshak_dhyey
_फेसबुक_
https://tinyurl.com/ycsa774s
_व्हाट्सअॅप_
https://chat.whatsapp.com/JVBWifFuc3MCfBtCSRppBk
फैलाने ज्ञान का प्रकाश
न भूख उसे किसी दौलत की
न कोई लालच न आस
उसे चाहिए, हमारी उपलब्धियां
उंचाईयां,
जहां हम जब खड़े होकर
उनकी तरफ देखें पलटकर
तो गौरव से उठ जाए सर उनका
हो जाए सीना चौड़ा
हर वक्त साथ चलता है गुरु
करता हममें गुणों की तलाश
फिर तराशता है शिद्दत से
और बना देता है सबसे खास
उसे नहीं चाहिए कोई वाहवाही
बस रोकता है वह गुणों की तबाही
आणि सहेजतो हममें
एक नेक आणि काबिल इंसान को
सुरुवात:
-
स्वागत समारंभ: शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा.
-
प्रस्तावना: शिक्षक दिनाचे महत्त्व सांगा.
कार्यक्रम:
-
शिक्षकांचे भाषण: शिक्षकांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी द्या.
-
विद्यार्थ्यांचे भाषण: विद्यार्थी शिक्षकांबद्दल आपले विचार व्यक्त करू शकतात.
-
सांस्कृतिक कार्यक्रम:
-
गायन: शिक्षकांसाठी गाणी सादर करा.
-
नृत्य: पारंपरिक किंवा आधुनिक नृत्य सादर करा.
-
नाटिका: शिक्षकांच्या जीवनावर आधारित लघुनाटिका सादर करा.
-
एकांकिका: सामाजिक संदेश देणारी एकांकिका सादर करा.
-
-
खेळ: शिक्षकांसाठी मनोरंजक खेळ आयोजित करा.
विशेष कार्यक्रम:
-
गुरु वंदना: शिक्षकांची पूजा करून त्यांचा सन्मान करा.
-
पुरस्कार वितरण: उत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करा.
शेवट:
-
आभार प्रदर्शन: कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार माना.
-
राष्ट्रगीत: राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करा.
इतर गोष्टी:
-
Decoration: कॉलेजला सजवा.
-
निमंत्रण: शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना निमंत्रण पत्रिका पाठवा.
-
फोटो आणि व्हिडिओ: कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ काढा.
-
Social Media: सोशल मीडियावर कार्यक्रमाची माहिती शेअर करा.
-
जलपान: कार्यक्रमाच्या शेवटी जलपान ठेवा.
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`
आज ५ सप्टेंबर... शिक्षक दिन... शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते... त्याचमुळे या दिवसाला फार महत्त्व आहे.
आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस... हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती.... शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.
शिक्षक दिन हा केवळ भारतातच साजरा केला जातो असं नाही... जगभरात वेगवेगळ्या दिवशी का होईना पण हा दिवस साजरा करतात. युनेस्कोनं ५ ऑक्टोबर हा आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केलाय. पण, भारतात मात्र राधाकृष्ण यांच्या सन्मानार्थ ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९६२ साली ते राष्ट्रपतीपदावर विराजन झाले होते. तेव्हा काही शिष्य आणि प्रशंसकांनी त्यांना त्यांचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. ‘माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणं माझ्यासाठी गौरवास्पद आहे’ असं त्यावेळी राधाकृष्ण यांनी सांगितलं. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, असं त्यांचं म्हणणं होतं...
जगभरातील शिक्षक दिन...
चीनमध्ये १९३१ मध्ये ‘नॅशनल सेन्ट्रल यूनिव्हर्सिटी’मध्ये शिक्षक दिनाची सुरूवात करण्यात आली. चीनी सरकारकडून मात्र १९३२ मध्ये या दिवसाला स्वीकृती मिळाली.
त्यानंतर १९३९ मध्ये कन्फ्यूशिअसचा जन्मदिवस, २७ ऑगस्ट हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला... पण त्यानंतर पुन्हा १९५१मध्ये हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतर १९८५ मध्ये १० सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला.
आता मात्र पुन्हा एकदा अनेक लोकं कन्फ्युशिअसचाच वाढदिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्याची मागणी करत आहेत. रशियामध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत ऑक्टोबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता. १९९४ सालापासून युनेस्कोच्या निर्णयानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्वीकारला.
*क्रांतिसूर्य राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या नावाने शिक्षक दिवस साजरा करण्यात यावा.
डॉ. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतो पण हा दिवस लोकउत्सवाच्या रुपाने साजरा होत नाही तर शासकीय पातळीवर साजरा होतो. ज्या महापुरुषांनी परिवर्तनाचे प्रामाणिक कार्य केले आहे त्यांचेच उत्सव लोकउत्सवाच्या रुपाने साजरे होतात डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षकदिन म्हणून साजरा करतो.परंतु बहुजनांच्या शिक्षणाचे कैवाली राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या नावाने शिक्षक दिवस साजरा करावा
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली झाला. तर डॉ.राधाकृष्णन यांचा जन्म २० सप्टेंबर १८८७ रोजी झाला ५ सप्टेंबर १८८८ हा दिवस चुकीचा आहे.असे डॉ. राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी नमूद केला आहे.म्हणजे जोतीराव फुले यांच्यापेक्षा डॉ. राधाकृष्णन हे ६० वर्षांनी लहान होते जोतीराव फुले यांनी १८४८ साली देशातील पहिली मुलींसाठी शाळा सुरु केलि १८५२ साली बहुजन मुलांसाठी शाळा सुरु केली म्हणजे डॉ.राधाकृष्णन यांच्या जन्माच्या अगोदर ४० वर्षापूर्वी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी देशातील पहिली शाळा सुरु केलि. म्हणजे जोतीराव फुले हेच भारतीय शिक्षणाचे आद्याजनक आहेत हे निर्विवाद सत्य होते जोतीराव फुले यांनी शाळा सुरु करण्यापूर्वी या देशात बहुजनांसाठी कोणीही शाळा सुरु केलि नाही राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्यामुलेच भारतीयांना शिक्षणाची संधि मिळाली शिक्षणाचा महत्व सांगणारे अत्यंत हृदयस्पर्शी विचार भारतात प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले म्हणून राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या नावाने शिक्षक दिवस मनुन साजरा करावा.
शिक्षणाअभावी देशातील बहुजनांची कशी वाईट अवस्था झालेली आहे याचे विदारक चित्र प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले आणि एका वर्षातच २० शाळा सुरु केल्या यावेळी डॉ. राधाकृष्णन यांचा तिर्थारुपांचा ही जन्म झाला नव्हता तेंव्हाच जोतीराव फुले यांनी देशात शाळा सुरु केल्या होत्या डॉ. राधाकृष्णन यांनी जन्मानंतर देखिल देशात बहुजनांसाठी एकही शाळा सुरु केलि नाही म्हणजे बहुजनांच्या शिक्षणाशी डॉ. राधाकृष्णन यांचा अजिबात संबंध नाही बहुजनाना शिक्षणापासून वंचीत ठेवाण्यासाठी सनातनी लोकांनी अनेक कपटकारस्थाने केली अनेक ग्रंथाद्वारे बहुजनांच्या व स्त्रियांच्या शिक्षणावर सनातनी लोकांनी बंदी घातली हजारो वर्षांची ही बंदी मोडून जोतीराव फुले यांनी बहुजनंना शिक्षणाची दालने खुली केलीत.
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी सामाजिक परिवर्तानासाठी शाळा सुरु केली पण शाळा सुरु करण्यास मनुवादी समर्थक लोकांचा कड़क विरोध होता त्यामुळे शिक्षक मिळने देखील शक्य नव्हते तेंव्हा त्यांनी स्वतः हातात खडू घेउन मुलांना शिकविले अत्यंत तळमळीने शिकविनार्या फुले यांना कोणीही वेतन दिले नाही गोर-गरीब, अस्पृश्य, अनाथ, भुकेलेल्या मुलांना स्वतः गोळा करून त्यांनी मोफत शिकविले यासाठी त्या काळात त्यांना कोणीही अनुदान, सादिलखर्च, वेतनवाढ इ. दिली नाही त्यांनी गोर-गरिबांना मोफत पण आनंदाने शिकविले
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाला प्राथमिक शिक्षक सक्तीचे आणि मोफत करण्यासाठी धारेवर धरले -
भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने १८८२ साली सर विल्यम हंटर यांचे अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात .सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांना बहुजनंना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांनी सांगितले , तेंव्हा १९ ओक्टोबर १८८२ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर यांची भेट घेतली व एक निवेदन दिले त्यामध्ये जोतीराव फुले म्हणतात की बहुजनांच्या मुलांना वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे. सरकारला मिळणांरा महसूल बहुजनांचा आहे या महसुलावर बमनुवादी शिक्षण घेतात पण बहुजनांना शिक्षण घेण्यास विरोध करतात हे कटुसत्य जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. गोर-गरीब, कष्टकारी, कामकारी,शेतकरी,यांच्या मुलांना शिक्षण मिलावे यासाठी इंग्रज सरकारला जोतीराव फुले यांनी धारेवर धरले , राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी स्वतःची मिळकत शिक्षणांसाठी खर्च केली
मनुन त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा न करणे हा देशाचा, शिक्षण क्षेत्राचा अपमान आहे.
जोतीराव फुले यांनी रात्रं दिन अखंड श्रम करून पैसा उभा केला ते नामवंत बांधकाम तद्न्य होते खडकवासला धरण, कात्रज घाट, पुण्यातील, अनेक पुल, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल(मुंबई)इ. बांधकामे केलि त्यातून मिळालेल्या पैश्यातुन बहुजनांसाठी शाळा काढल्या. त्यांनी स्वतःचा विचार केला असता तर खूप श्रीमंत झाले असते. पण त्यांनी गरीब बहुजनंना श्रीमंत करण्यासाठी आयुष्य व पैसा मुला मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला. व्यक्तिगत हित, हौस, सुख दूर सारून जोतीराव फुले आणि त्यांच्या सौभाग्यवती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरु केल्या बहुजनांना शिक्षण मिळाल्याशिवाय हजारो वर्षांची गुलामगिरी संपणार नाही यासाठी जोतीराव फुले यांनी स्वखार्चाने शाळा सुरु केल्या म्हणजे निस्वार्थपणे जोतीराव तथा तात्यांनी शाळा सुरु केल्या. म्हणून ज्योतिबा फुले यांच्या नावाने शिक्षक दिवस साजरा करावा