Topic icon

समजुती-गैरसमजुती

1
रात्री नखे काढताना बोटे कापली जाऊ शकतात. म्हणून रात्री नखे कापू नयेत असे म्हणतात, बाकी काही अंधश्रद्धा पाळू नका.
उत्तर लिहिले · 24/1/2020
कर्म · 18385
6
खरंच, जग विज्ञान युगाकडे झेप घेत आहे आणि आपण अजून अंधश्रद्धेचे पाढे गिरवत बसलो आहोत. शनिवारी लिंबू-मिरच्या बांधणे, अंगात देवी येणे, भुताटकी, भानामती, पशुंचे बळी देणे आणि मांजर आडवी गेल्यावर काम होत नाही, याउलट मांजर सांगत असेल, 'माणूस आडवा गेला तर माझे काम होत नाही.' सगळा मनाचा खेळ आहे. धन्यवाद!
उत्तर लिहिले · 26/11/2019
कर्म · 2285
16
मुळात कोणताही दिवस हा निसर्गनियमाप्रमाणे रोजच्या दिवसासारखाच सामान्य दिवस असतो. पण आपण त्याला वार, तारखांमध्ये आपल्या सोयीसाठी मोजू लागलो. त्यामुळे शनिवारी नखे, केस कापू नयेत असल्या मूर्ख गोष्टींकडे कृपया दुर्लक्ष करावे आणि बिनधास्त राहावे. ☺️😊
उत्तर लिहिले · 18/1/2019
कर्म · 47820
3
शास्त्रानुसार पाल डोक्यावर पडणे हे अशुभ आहे. हे वादविवादाचे संकेत देते. तसेच डोक्याच्या मध्यभागी पडली तर आजारांचे लक्षण मानले जाते.


पाल पुरुषांच्या समोरील अंगावर म्हणजेच पोटावर, छातीवर पडली तर शुभ मानले जाते. तसेच महिलांच्या पाठीमागील अंगावर पडली तर शुभ समजतात. 

गळ्यावर पाल पडल्यास यश मिळते. डाव्या पायावर पडल्यास संपत्ती प्राप्त होते, असे म्हणतात. 

टीप. मला माझ्या माहिती प्रमाणे ही माहिती मी मिळवली आहे ती खरी आहे का खोटी हे मला ही नक्की माहीत नाही तरी zee 24 Tass Marathi news channel var ek news aali hoti tyachi link mi sobat shair करीत आहे

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1135208943170156&id=121903694500691

उत्तर लिहिले · 6/11/2018
कर्म · 7940
15
याचे एक समज खालील लिंक मध्ये आहे. दुसरे कारण म्हणजे आस्तिक (देवाला मानणारे) लोकं देव हे आकाशामध्ये असल्यामुळे देवाच्या दिशेने चप्पलचा तळ असू नये असा समज आहे.
चप्पल उलटी पडू नये असे का म्हणतात? आणि त्या मागचे अंधश्रध्देचे कारण?
उत्तर लिहिले · 1/9/2018
कर्म · 569245
6
कसलं अपशकुन? अस काही नाही, बिनधास्त ठेवा, फोटो वगैरे काढणार असाल तर, सेल sample असेल तर बदला, आणि घड्याळ मशीन बिघडली असेल तर ती बदला, की झालं.
उत्तर लिहिले · 21/3/2018
कर्म · 85195
7
असं म्हणतात लहान बाळांना लगेच नजर लागते...
हे खरे आहे की मनुष्याची आंतरिक वाईट नजर समोरच्यास लागली तर समोरच्यास वाईट परिणाम होते... बाळाच्या आई किंवा वडिलांचा कुणी शत्रू असेल किंवा तिरस्कार करत असेल किंवा त्या घरावर कुणा वाईट व्यक्तीची वाईट नजर असेल तर नवजात बालकावर त्यांचा क्रोश उफाळून येतो... आणि मनातील वाईट इच्छा इतकी तीव्र असते की समोरच्यास परिणामाला सामोरे जावे लागते...
जेव्हा बाळास नजर लागते तेव्हा बाळ फार रडतं... आणि आई, आजी, मावशी किंवा आत्या असे वरिष्ठ व्यक्ती बाळाची नजर काढ़ते... या मध्ये मी खुद्द एक तर्क लावलेला... जर वाईट व्यक्ति बाळावर वाईट नजर लावतो तर आई , आजी कुणी जर नजर काढतात तेव्हा ते विविध आपापल्या परीने पर्याय क्रिया करून नजर काढतात... परंतु तशी क्रिया करताना त्यांच्यातुन निघणारा जो आत्मिक भाव असतो तो फार सकारात्मकतेने बाहेर येत असतो... कुणा कुणाची नावे घेतात आणि ती नजर निघुन जाउदे असे अगदी आर्ततेने आरोळी घालतात...(बाळ जर रडतच असेल म्हणून फक्त नजर लागली असे प्रत्येकवेळी न समजता प्रथोमचार म्हणून बाळांच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या...)
अर्थात शास्त्रीय दृष्टया पाहिले तर ... जेथे नकारात्मक प्रभाव जर तिव्रतेने येत असेल तर तितक्याच तिव्रतेने आपण सकारात्मक राहिले पाहिजे...
मी माझे वैयक्तिक मत व्यक्त केले आहे... काही चुकले असेल तर क्षमस्व...
धन्यवाद...!
उत्तर लिहिले · 11/2/2018
कर्म · 458560