
चित्रपट अभिनेते
4
Answer link
https://bit.ly/3aKuCj9
मराठी चित्रपटातील रांगडा अभिनेता - सुर्यकांत मांडरे
दि २२ आॅगष्ट २०२०
https://bit.ly/3aKuCj9
मराठी चित्रपट क्षेत्रात दोन सख्खे भाऊ कार्यरत होते.कोल्हापुरचे असणारे हे दोन भाऊ म्हणजे चन्द्रकांत व सुर्यकांत मांडरे. अगदी राम लक्ष्मणाची जोडी.
सुर्यकांत यांचा जन्म कोल्हापुरचा (२ जून १९२६ --- २२ ऑगस्ट १९९९)ते शिंपी समाजाचे होते.
प्रथम चन्द्रकांत यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. नंतर सुर्यकांत मांडरे यांनी. दोघेही राजारामपुरीत राहत होते. चन्द्रकांत मांडरे यांचा बंगला शाहुमिल जवळील रस्तयावर तर सुर्यकांत यांचे घर ६ व्या गल्लीत होते. (आता ते पाडुन डेव्हलप केले आहे) मी शाळकरी वयात असताना त्यांच्या घरासमोरून जाताना त्यांचे दर्शन होई
त्यांची आई तानुबाई तुकाराम मांडरे आणि वडील तुकाराम नारायण मांडरे यांच्या मायेच्या आणि शिस्तीच्या छताखाली, मोठे बंधू चंद्रकांत उर्फ गोपाळ मांडरे यांच्यासह कुळाचार आणि परंपरा जपणार्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. कोल्हापुरात सुरुवातीला सरस्वती विद्यालयात आणि त्यानंतर लक्ष्मीपुरीतिल हरिहर विद्यालयात त्यांनी शालेय शिक्षण घेतले.
सूर्यकांत यांचे उमदे, प्रसन्न व्यक्तिमत्त्व भालजी पेंढारकरांसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या नजरेस पडले आणि १९३८ साली वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ‘ध्रुव’ या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. शालेय शिक्षण एकीकडे सुरू होते, पण अभिनयाकडे, कलेकडे मन ओढ घेत होते. १९४३ साली मात्र शिक्षणाची वाट थांबली आणि बाबा गजबर या एका जाणकार चित्रकाराकडे ते चित्रकलेचे धडे गिरवू लागले. दरम्यान शिवचरित्रावर आधारित ‘बहिर्जी नाईक’ या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी बाल शिवाजीची भूमिका केली. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासून भालजी पेंढारकरांनी वामन मांडरे यांचे नाव ‘सूर्यकांत’ ठेवले आणि पुढच्या सगळ्या चित्रपटांत ते ‘सूर्यकांत’ याच नावाने पडद्यावर दिसू लागले.
चंद्रकांत मांढरे यांची ओळख उत्तम चित्रकार अशी असली तरी सूर्यकांत यांनीही कुंचला हाती घेतला होता.
व्यायामाने कमावलेले शरीर, मर्दानी आणि रांगडे व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी ग्रामीण बाजाच्या चित्रपटातील भूमिका हुबेहूब वठवल्या. १९५० साली राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘केतकीच्या बनात’ या चित्रपटामध्ये ‘सर्जेराव’ ही टर्रेबाज आणि रगेल नायकाची भूमिका केली. चित्रपट मंडळाकडून ‘फक्त प्रौढांसाठी’ असे शिफारसपत्र मिळालेला हा पहिला मराठी बोलपट होता.
__________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________
सूर्यकांत यांना एकामागून एक चित्रपटांसाठी विचारणा होत गेली. त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटात अभिनय केला. या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी मुख्य नायक, खलनायक, साहाय्यक अभिनेता, चरित्र भूमिका, पाहुणा कलाकार, तर काही चित्रपटात विनोदी भूमिकाही साकारल्या. अस्सल कोल्हापुरी ग्रामीण भाषा बोलणार्या व धाडसी, कणखर, मर्दानी बाण्याच्या या नायकाने ग्रामीण चित्रपटात एक वलय निर्माण केले. ‘स्त्री जन्मा तुझी कहाणी’, ‘गृहदेवता’, ‘बाळा जो जो रे’ या चित्रपटातून त्यांनी ब्राह्मणी नायकही रंगवला. त्यांची जयश्री गडकर या अभिनेत्रीबरोबर जमलेली जोडी अतिशय लोकप्रिय ठरली. या जोडीने एकंदरीत सत्तावीस चित्रपट केले. सूर्यकांत यांनी सुलोचना आणि उषा किरण यांच्याबरोबरही केलेले चित्रपटही नावाजले गेले. ‘शिकलेली बायको’ (१९५९) या चित्रपटात, डॉक्टर असलेल्या सुशिक्षित पत्नीबरोबर पूर्वग्रहाने आणि आकसाने संसार करणारा नायक ‘रघुनाथ’ ही त्यांची उत्कृष्ट भूमिका होती. ‘साधी माणसं’ या चित्रपटात रंगभूषेशिवाय साकारलेला ‘शंकर लोहार’ प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला. १९६५ साली या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. ‘सांगत्ये ऐका’ (१९५९) या चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले. ‘कन्यादान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सूर्यकांत यांना १९६० साली राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. चित्रपटसृष्टीमध्ये तारखा आणि वेळा पाळणारे सूर्यकांत हे एक निर्व्यसनी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व होते. सूर्यकांत आणि त्यांचे थोरले बंधू चंद्रकांत (गोपाळ) यांच्या अतिशय निखळ आणि पारदर्शक बंधुप्रेमाचे दाखले चित्रपटसृष्टीत अनेकांनी अनुभवले आहेत. या दोन्ही बंधूंनी चौदा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
शिलंगणाचे सोने’, ‘जय भवानी’, ‘महाराणी येसूबाई’, ‘थोरातांची कमळा’, ‘पावनखिंड’, ‘स्वराज्याच्या शिलेदार’, ‘गनिमी कावा’ या ऐतिहासिक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी एक नवा मापदंड उभा केला. पाणीदार, बोलके डोळे, मर्दानी बलदंड शरीर आणि रुबाबदार वावरणे, यामुळे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सूर्यकांत हुबेहूब उठून दिसत. चित्रपटातील साहसदृश्यात डमी कलाकार न वापरता, त्यांनी घोडेस्वारीची कठीण व जीवावर बेतणारी दृश्ये स्वत: मेहनतीने वठवली. ‘रत्नघर’ या हिंदी चित्रपटात त्यांनी वाघाबरोबरची झुंज असे प्रत्यक्ष दृश्य दिले. चित्रपटसृष्टीचे रंगढंग अनुभवत समर्पणाने अभिनयकला जोपासली. ‘वारणेचा वाघ’ या चित्रपटात सत्तू भोसला ही भूमिका करत असतानाच दिग्दर्शक वसंतराव पेंटर यांनी पटकथा आणि संवादलेखनामध्ये सूर्यकांत यांना सहभागी करून घेतले.
चित्रपटांच्या बरोबरीने रंगभूमीही गाजवली. त्यांनी पाच ऐतिहासिक, अकरा सामाजिक आणि वीस ग्रामीण नाटकात अभिनय केला. ‘बेबंदशाही’, ‘झुंजारराव’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘लग्नाची बेडी’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘पाठलाग’, ‘दसरा उजाडला’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ अशा कितीतरी नाटकांचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. https://bit.ly/3aKuCj9

मराठी चित्रपटातील रांगडा अभिनेता - सुर्यकांत मांडरे
दि २२ आॅगष्ट २०२०
https://bit.ly/3aKuCj9
मराठी चित्रपट क्षेत्रात दोन सख्खे भाऊ कार्यरत होते.कोल्हापुरचे असणारे हे दोन भाऊ म्हणजे चन्द्रकांत व सुर्यकांत मांडरे. अगदी राम लक्ष्मणाची जोडी.
सुर्यकांत यांचा जन्म कोल्हापुरचा (२ जून १९२६ --- २२ ऑगस्ट १९९९)ते शिंपी समाजाचे होते.
प्रथम चन्द्रकांत यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. नंतर सुर्यकांत मांडरे यांनी. दोघेही राजारामपुरीत राहत होते. चन्द्रकांत मांडरे यांचा बंगला शाहुमिल जवळील रस्तयावर तर सुर्यकांत यांचे घर ६ व्या गल्लीत होते. (आता ते पाडुन डेव्हलप केले आहे) मी शाळकरी वयात असताना त्यांच्या घरासमोरून जाताना त्यांचे दर्शन होई
त्यांची आई तानुबाई तुकाराम मांडरे आणि वडील तुकाराम नारायण मांडरे यांच्या मायेच्या आणि शिस्तीच्या छताखाली, मोठे बंधू चंद्रकांत उर्फ गोपाळ मांडरे यांच्यासह कुळाचार आणि परंपरा जपणार्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. कोल्हापुरात सुरुवातीला सरस्वती विद्यालयात आणि त्यानंतर लक्ष्मीपुरीतिल हरिहर विद्यालयात त्यांनी शालेय शिक्षण घेतले.
सूर्यकांत यांचे उमदे, प्रसन्न व्यक्तिमत्त्व भालजी पेंढारकरांसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या नजरेस पडले आणि १९३८ साली वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ‘ध्रुव’ या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. शालेय शिक्षण एकीकडे सुरू होते, पण अभिनयाकडे, कलेकडे मन ओढ घेत होते. १९४३ साली मात्र शिक्षणाची वाट थांबली आणि बाबा गजबर या एका जाणकार चित्रकाराकडे ते चित्रकलेचे धडे गिरवू लागले. दरम्यान शिवचरित्रावर आधारित ‘बहिर्जी नाईक’ या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी बाल शिवाजीची भूमिका केली. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासून भालजी पेंढारकरांनी वामन मांडरे यांचे नाव ‘सूर्यकांत’ ठेवले आणि पुढच्या सगळ्या चित्रपटांत ते ‘सूर्यकांत’ याच नावाने पडद्यावर दिसू लागले.
चंद्रकांत मांढरे यांची ओळख उत्तम चित्रकार अशी असली तरी सूर्यकांत यांनीही कुंचला हाती घेतला होता.
व्यायामाने कमावलेले शरीर, मर्दानी आणि रांगडे व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी ग्रामीण बाजाच्या चित्रपटातील भूमिका हुबेहूब वठवल्या. १९५० साली राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘केतकीच्या बनात’ या चित्रपटामध्ये ‘सर्जेराव’ ही टर्रेबाज आणि रगेल नायकाची भूमिका केली. चित्रपट मंडळाकडून ‘फक्त प्रौढांसाठी’ असे शिफारसपत्र मिळालेला हा पहिला मराठी बोलपट होता.
__________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________
सूर्यकांत यांना एकामागून एक चित्रपटांसाठी विचारणा होत गेली. त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटात अभिनय केला. या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी मुख्य नायक, खलनायक, साहाय्यक अभिनेता, चरित्र भूमिका, पाहुणा कलाकार, तर काही चित्रपटात विनोदी भूमिकाही साकारल्या. अस्सल कोल्हापुरी ग्रामीण भाषा बोलणार्या व धाडसी, कणखर, मर्दानी बाण्याच्या या नायकाने ग्रामीण चित्रपटात एक वलय निर्माण केले. ‘स्त्री जन्मा तुझी कहाणी’, ‘गृहदेवता’, ‘बाळा जो जो रे’ या चित्रपटातून त्यांनी ब्राह्मणी नायकही रंगवला. त्यांची जयश्री गडकर या अभिनेत्रीबरोबर जमलेली जोडी अतिशय लोकप्रिय ठरली. या जोडीने एकंदरीत सत्तावीस चित्रपट केले. सूर्यकांत यांनी सुलोचना आणि उषा किरण यांच्याबरोबरही केलेले चित्रपटही नावाजले गेले. ‘शिकलेली बायको’ (१९५९) या चित्रपटात, डॉक्टर असलेल्या सुशिक्षित पत्नीबरोबर पूर्वग्रहाने आणि आकसाने संसार करणारा नायक ‘रघुनाथ’ ही त्यांची उत्कृष्ट भूमिका होती. ‘साधी माणसं’ या चित्रपटात रंगभूषेशिवाय साकारलेला ‘शंकर लोहार’ प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला. १९६५ साली या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. ‘सांगत्ये ऐका’ (१९५९) या चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले. ‘कन्यादान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सूर्यकांत यांना १९६० साली राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. चित्रपटसृष्टीमध्ये तारखा आणि वेळा पाळणारे सूर्यकांत हे एक निर्व्यसनी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व होते. सूर्यकांत आणि त्यांचे थोरले बंधू चंद्रकांत (गोपाळ) यांच्या अतिशय निखळ आणि पारदर्शक बंधुप्रेमाचे दाखले चित्रपटसृष्टीत अनेकांनी अनुभवले आहेत. या दोन्ही बंधूंनी चौदा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
शिलंगणाचे सोने’, ‘जय भवानी’, ‘महाराणी येसूबाई’, ‘थोरातांची कमळा’, ‘पावनखिंड’, ‘स्वराज्याच्या शिलेदार’, ‘गनिमी कावा’ या ऐतिहासिक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी एक नवा मापदंड उभा केला. पाणीदार, बोलके डोळे, मर्दानी बलदंड शरीर आणि रुबाबदार वावरणे, यामुळे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सूर्यकांत हुबेहूब उठून दिसत. चित्रपटातील साहसदृश्यात डमी कलाकार न वापरता, त्यांनी घोडेस्वारीची कठीण व जीवावर बेतणारी दृश्ये स्वत: मेहनतीने वठवली. ‘रत्नघर’ या हिंदी चित्रपटात त्यांनी वाघाबरोबरची झुंज असे प्रत्यक्ष दृश्य दिले. चित्रपटसृष्टीचे रंगढंग अनुभवत समर्पणाने अभिनयकला जोपासली. ‘वारणेचा वाघ’ या चित्रपटात सत्तू भोसला ही भूमिका करत असतानाच दिग्दर्शक वसंतराव पेंटर यांनी पटकथा आणि संवादलेखनामध्ये सूर्यकांत यांना सहभागी करून घेतले.
चित्रपटांच्या बरोबरीने रंगभूमीही गाजवली. त्यांनी पाच ऐतिहासिक, अकरा सामाजिक आणि वीस ग्रामीण नाटकात अभिनय केला. ‘बेबंदशाही’, ‘झुंजारराव’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘लग्नाची बेडी’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘पाठलाग’, ‘दसरा उजाडला’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ अशा कितीतरी नाटकांचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. https://bit.ly/3aKuCj9

2
Answer link
अमिताभ बच्चन (जन्म- ११ ऑक्टोबर, १९४२) बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय अभिनेता आहेत. ते प्रसिद्ध हिंदी साहित्यकार हरिवंश राय बच्चन यांचे सुपुत्र आहेत.
7
Answer link
रजनीकांत
शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत
हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता, मनोरंजन व्यवसायातील सर्वांत प्रसिद्ध व्यक्ती, भारतीय चित्रपटक्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, एक ख्यातनाम तमिऴ चित्रपट अभिनेते आणि परोपकारी/लोककल्याणकारी व्यक्ती आहेत. तमिऴनाडू राज्यात एम.जी.रामचंद्रन ह्यांच्यानंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून रजनीकांत ह्यांची ख्याती आहे. भारतीय चित्रपटक्षेत्रात ते महानायक अमिताभ बच्चन ह्यांच्याहूनही अधिक यशस्वी कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत.
रजनीकांत शिवाजीराव रामोजीराव गायकवाड
डिसेंबर १२, १९५०
बंगळूर, कर्नाटकइतर नावेरजिनी, तलैवर, सुप्परस्टार ,बॉस.राष्ट्रीयत्वभारतीयकार्यक्षेत्रअभिनय (चित्रपट : कन्नड, तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम, इंग्लिश, बंगाली)कारकीर्दीचा काळइ.स. १९७५ पासून भाषा मराठी, तमिळप्रमुख चित्रपटशिवाजी द बॉस, बिल्ला, दळपती, चंद्रमुखी, बाशा, मुतू, पडैयप्पा .वडीलश्री.रामोजीराव गायकवाड.आईसौ.जिजाबाई गायकवाड.पत्नी लता (रंगाचारी)रजनीकांत.अपत्ये मुलगी ऐश्वर्या रजनीकांत, मुलगी सौंदर्या रजनीकांत.
रजनीकांत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तमिऴ चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. तमिऴ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त सम्राट, प्रेक्षकांची अलोट गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकीबद्दल आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीकरिता रजनीकांत प्रसिद्ध आहेत.
रजनीकांत तमिऴ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगालीतसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत अद्याप पर्यंत काम केलेले नाही.
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत
हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता, मनोरंजन व्यवसायातील सर्वांत प्रसिद्ध व्यक्ती, भारतीय चित्रपटक्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, एक ख्यातनाम तमिऴ चित्रपट अभिनेते आणि परोपकारी/लोककल्याणकारी व्यक्ती आहेत. तमिऴनाडू राज्यात एम.जी.रामचंद्रन ह्यांच्यानंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून रजनीकांत ह्यांची ख्याती आहे. भारतीय चित्रपटक्षेत्रात ते महानायक अमिताभ बच्चन ह्यांच्याहूनही अधिक यशस्वी कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत.
रजनीकांत शिवाजीराव रामोजीराव गायकवाड
डिसेंबर १२, १९५०
बंगळूर, कर्नाटकइतर नावेरजिनी, तलैवर, सुप्परस्टार ,बॉस.राष्ट्रीयत्वभारतीयकार्यक्षेत्रअभिनय (चित्रपट : कन्नड, तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम, इंग्लिश, बंगाली)कारकीर्दीचा काळइ.स. १९७५ पासून भाषा मराठी, तमिळप्रमुख चित्रपटशिवाजी द बॉस, बिल्ला, दळपती, चंद्रमुखी, बाशा, मुतू, पडैयप्पा .वडीलश्री.रामोजीराव गायकवाड.आईसौ.जिजाबाई गायकवाड.पत्नी लता (रंगाचारी)रजनीकांत.अपत्ये मुलगी ऐश्वर्या रजनीकांत, मुलगी सौंदर्या रजनीकांत.
रजनीकांत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तमिऴ चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. तमिऴ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त सम्राट, प्रेक्षकांची अलोट गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकीबद्दल आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीकरिता रजनीकांत प्रसिद्ध आहेत.
रजनीकांत तमिऴ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगालीतसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत अद्याप पर्यंत काम केलेले नाही.
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
0
Answer link
मी तुम्हाला एका जुन्या हिंदी अभिनेत्याबद्दल माहिती देऊ शकेन:
दिलीप कुमार हे एक जुने हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते होते.
त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी झाला होता.
त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले.
त्यांच्या काही प्रसिद्ध चित्रपटांची नावे:
- मुगल-ए-आजम
- देवदास
- नया दौर
अधिक माहितीसाठी, आपण विकिपीडिया बघू शकता.
5
Answer link

*🤔अमिताभ यांनी 'बच्चन' आडनाव का लावले?*
कोची येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय जाहिरात संघाच्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी आपण 'बच्चन'आडनाव का वापरले याचा खुलासा केला. ते म्हणाले, जात लपवण्यासाठी माझे वडील हरिवंशराय बच्चन यांनी 'बच्चन' हे आडनाव लावले.
आमचे आडनाव श्रीवास्तव होते. मात्र आपल्याकडे आडनावावरून जात, धर्म ओळखला जातो. माझ्या वडिलांचा जातीधर्मावर विश्वास नसल्याने ही प्रथा बंद व्हावी यासाठी त्यांनी श्रीवास्तव हे आडनाव बदलून बच्चन असे ठेवले. मी माझ्या वडिलांची परंपरा पुढे चालवली, असेही बिग बी म्हणाले.