Topic icon

गुन्हेगारी न्याय

0

भारतीय कायद्यानुसार, आरोपीला अनेक अधिकार आहेत, जे त्याचे संरक्षण करतात. त्यापैकी काही अधिकार खालीलप्रमाणे आहेत:

  • गिरफ्तारीचा अधिकार:
    • आरोपीला अटक वॉरंट पाहण्याचा अधिकार आहे.
    • अटक का केली जात आहे हे जाणून घेण्याचा त्याला अधिकार आहे.
  • वकೀಲ करण्याचा अधिकार:
    • आरोपीला स्वतःच्या इच्छेनुसार वकील निवडण्याचा आणि त्याला भेटण्याचा अधिकार आहे.
    • जर आरोपी गरीब असेल, तर सरकार त्याला मोफत वकील पुरवते.
  • शांत राहण्याचा अधिकार:
    • आरोपीला चौकशीदरम्यान शांत राहण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर बोलण्यासाठी कोणताही दबाव टाकला जाऊ शकत नाही.
  • लवकर सुनावणीचा अधिकार:
    • आरोपीला लवकरात लवकर न्याय मिळवण्याचा अधिकार आहे.
  • जामिनाचा अधिकार:
    • आरोपीला जामिनावर सुटण्याचा अधिकार आहे, काही गंभीर गुन्ह्यांमध्ये जामीन मिळू शकत नाही.
  • न्यायालयीन प्रक्रियेचा अधिकार:
    • आरोपीला साक्षीदारांची तपासणी करण्याचा आणि आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.

हे सर्व अधिकार आरोपीला निष्पक्ष आणि न्यायपूर्णTrial मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 9/6/2025
कर्म · 1420
1
  प्राचीन काळात असा दिला जायचा मृत्युदंड, पाहून उडेल थरकाप   ⭕*_

  .         *_आज बहुतेक देशांमध्‍ये गुन्‍हेगारांना शिक्षा म्‍हणून तुरुंगात डांबले जाते किंवा गुन्‍हा गंभीर असेल तर अंतिम शिक्षा म्‍हणून फाशी दिली जाते. मात्र पूर्वी राजे महाराजे गुन्‍हेगारांना अतिशय क्रूर शिक्षा द्यायचे. याबद्दल ऐकूणच थरकाप उडतो. वेगवेगळ्या देशात शिक्षा देण्‍याच्‍या पद्धतीही वेगवेगळ्या होत्‍या. आज आम्‍ही तुम्‍हाला यातील सर्वात भयानक आणि क्रुर पद्धतींबद्दल सांगणार आहोत._*

*पोट फाडून निघायचा उंदीर*
ही क्रुर शिक्षा चीनमध्‍ये दिली जायची. यामध्‍ये व्‍यक्‍तीला पूर्ण नग्‍न करुन झोपवले जायचे. नंतर त्‍याच्‍या पोटावर एका पिंज-यात उंदीर ठेवला जायचा आणि त्‍या पिंज-यावर विस्‍तव ठेवजा जात असे. त्‍यामुळे पिंजरा अतिशय गरम होत असे. या गरमीपासून वाचण्‍यासाठी उंदीर त्‍या व्‍यक्‍तीचे पोट फाडून आत जात असे. *शरीराला मधोमध कापणे*
मध्‍ययुगात एखाद्या गुन्‍हेगाराला टॉर्चर करण्‍यासाठी अशी शिक्षा दिली जायची. यासाठी त्‍याला उलटे लटकवायचे. यामुळे त्‍याच्‍या शरीरातील सर्व रक्‍त डोक्‍याकडे येत असे. नंतर त्‍याच्‍या शरीराला मधोमध पूर्णपणे कापले जायचे.
*चामडी सोलणे*
प्राचिन ब्रिटनमध्‍ये ही अतिशय वेदनादायी शिक्षा गुन्‍हेगार किंवा शत्रुराष्‍ट्राच्‍या सैनिकाला दिली जायची. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,  येथे त्‍या व्‍यक्‍तीची संपूर्ण चामडी सोलली जायची. यादरम्‍यान त्‍या व्‍यक्‍तीचा वेदनेने मृत्‍यू होत असे. नंतर ही चामडी भरचौकात लटकवली जात असे.
*जिवंत भाजणे*
- प्राचीन अथेन्‍समध्‍ये 560बीसी दरम्‍यान गुन्‍हेगारांना अशी शिक्षा दिली जायची ज्‍यामुळे कोणी स्‍वप्‍नातही गुन्‍हा करण्‍याबद्दल विचार करु नये.
- गुन्‍हेगाराला सांडाच्‍या आकाराच्‍या एका तांब्‍याच्‍या भांडयामध्‍ये बंदीस्‍त केले जायचे.
- नंतर ते भांडे लालेलाल होईपर्यंत तापवले जायचे.
- यामुळे यातील व्‍यक्‍तीचा असहनीय वेदनेने जिवंतपणीच भाजून मृत्‍यू होत असे.
*मध चोपडून मृत्‍यूसाठी सोडणे*
ग्रीसमध्‍ये ही विचित्र शिक्षा दिली जायची. गुन्‍हेगारांना बळजबरी दुध आणि मध पिऊ घातले जायचे. नंतर त्‍यांना पूर्ण नग्‍ण करुन एका बोटला बांधले जायचे. आणि मृत्‍यूसाठी घनदाट अरण्‍य किंवा नदीत सोडले जायचे.
*माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव*
┕━━━━╗✹╔━━━━┙
*धारदार चाकूने काढले जायचे मांस*
आतापर्यंतच्‍या शिक्षांमध्‍ये या शिक्षेला सर्वाधिक क्रूर म्‍हटले गेले आहे. चिनमध्‍ये ही शिक्षा दिली जायची. गुन्‍हेगाराच्‍या शरीरावर धारदार चाकू चालवून त्‍याचे मांस काढले जायचे. असे त्‍याचा मृत्‍यूहोईपर्यंत केले जायचे. 1905बीसीमध्‍ये या‍ शिक्षेवर चीनमध्‍ये बंदी घालण्‍यात आली. या शिक्षेदरम्‍यान गुन्‍हेगाराला अफीम खाऊ घालण्‍याचे औदार्य तेवढे दाखवले जायचे.
*लाकडी सुळावर चढवणे*
प्राचीन रोममध्‍ये गुन्‍हेगारांना अतिशय धारदार अशा लाकडी सुळावर बसवले जायचे. नंतर ते सूळ हवेत उचलले जायचे. यादरम्‍यान ते सूळ त्‍या व्‍यक्‍तीच्‍या शरीराला चिरुन डोक्‍यातून बाहेर यायचे.
*द ब्रेकिंग व्‍हील*
ही शिक्षा जर्मनीत दिली जायची. यामध्‍ये गुन्‍हेगाराला एका चाकाला बांधले जायचे. याला ब्रेकिंग व्‍हील किंवा कॅथरीना व्‍हील असेही म्‍हटले जायचे. गुन्‍हेगाराला चाकाला बांधुन त्‍याला हातोड्याने तोपर्यंत मारले जायचे जोपर्यंत त्‍याची हाडे तुटत नाहीत.


8
*___________________________*
💫 *_🇮M⃞    a⃞    h⃞    i⃞    t⃞    i⃞    🇮_*   💫

_*⭕   भारतात जन्मठेपेची शिक्षा ही “आयुष्यभराची” असते की फक्त १४ वर्षांची असते? सत्य काय.?   ⭕*_




____________________________
   *_🇮माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव🇮_*
*╰──────•◈•──────╯*
____________________________
.        📯 *_🇮दि  ५   नोव्हेंबर २०१९ 🇮_* 📯
  .         *_आपण चित्रपटामध्ये किंवा खऱ्या आयुष्यामध्ये हे बघितले असेल की, एखाद्याला जन्मठेपेची शिक्षा होऊन सुद्धा त्याला १४ वर्षांनी सोडले जाते. जन्मठेप हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर खडतर तुरुंगवास, खूप श्रम आणि खूप खराब आयुष्य हे सर्व येते. आपल्याला वाटते एखाद्या व्यक्तीला जर जन्मठेप झाली तर त्याचे आयुष्य संपलेच, त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडले जाणार नाही, त्याला त्याचे संपूर्ण आयुष्य त्या अंधाऱ्या कोठडीमध्येचं घालवावे लागणार. पण आपण समजतो त्यापेक्षा सत्य काहीतरी वेगळेच आहे._*
*_..............................................._*
╔══╗
║██║      _*M⃞    a⃞    h⃞    i⃞    t⃞    i⃞    *      _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ🇮*_
https://m.facebook.com/story.php?story_fbid=615586878839239&id=100011637976439
____________________________
सर्वोच्च न्यायालयाचे वकील विराग गुप्ता यांनी याबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितले की,  *भारतीय संविधानामध्ये १४ वर्षाच्या शिक्षेला जन्मठेपेची शिक्षा म्हटले जाते, असा कुठेही उल्लेख नाही आहे* २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले होते की, आजीवन कारावास म्हणजे जन्मभर जेलमध्ये राहण्याची शिक्षा होय. सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले की, गुन्हेगारांना जर असे वाटत असेल की १४ किंवा जास्तीत जास्त २० वर्षांनी त्यांना परत सोडण्यात येईल तर हा त्यांचा गैरसमज आहे. असा कोणताही अधिकार त्यांना देण्यात आलेला नाही.
पण तरी सुद्धा हा प्रश्न उरतोच की, जर जन्मठेपेची शिक्षा त्या गुन्हेगारांना झाली असेल तरीही ते १४ वर्षांच्या शिक्षेनंतर सुटतात कसे ? त्याचे उत्तर जाणून घेऊया….
सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, एखाद्या कैद्याला जर जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर, त्या कैद्याला राज्य सरकारच्या ताब्यात दिले जाते.माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,त्या कैद्याची शिक्षा पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे काम राज्य सरकारचे असते. त्या कैद्याला १४ वर्ष, २० वर्ष, ३० वर्षानंतर तुरुंगातून सोडायचे की आयुष्यभर तिथेच ठेवावे याचा निर्णय फक्त राज्य सरकारच घेऊ शकते. जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराला कमीत कमी १४ वर्ष सक्तमजुरी ही करावीच लागते.
१४ वर्षाच्या आधी कोणत्याही गुन्हेगाराला तुरुंगातून मुक्त केले जाऊ शकत नाही. त्यानंतर त्याच्यावर निर्माण झालेल्या विश्वासाने, वागणुकीने किंवा त्याच्या आरोग्यासाठी किंवा त्याची कौटुंबिक स्थिती लक्षात घेऊन त्याला तुरुंगामध्ये ठेवण्याचा काळ निश्चित केला जातो.
सर्वोच्च न्यायालयाने याबबत सांगितले की,
*जन्मठेपेची शिक्षा झालेला गुन्हेगार हा अनिश्चित कालावधीसाठी ताब्यात असतो.  त्याच्या वागणुकीमधील बदल लक्षात घेऊन जर गुन्हेगाराची शिक्षा कमी करायची असेल, तर सीआरपीसीच्या कलम ४३२ नुसार शासनाला योग्य ते दयापत्र पास करावे लागते, परंतु  हे सुद्धा लक्षात घ्या की सीआरपीसीच्या कलम ४३३ – ए नुसार कमीत कमी १४ वर्ष शिक्षा प्रत्येक जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराला भोगावीच लागेल.*
म्हणून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्या नंतरही आरोपीला १४ वर्षांनी तुरुंगातून मुक्त केले जाते…
इनमराठी वरून साभार
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 🇮9890875498🇮* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*🇮माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव🇮*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛
*.............................................*
.       _*🇮ണคн¡т¡ รεvค🇮*_
.       *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
.            *༺♥༻​​*
0
भारतात दररोज फाशीची शिक्षा दिली जात नाही, (अपवादात्मक प्रकरण वगळता).
7
.      *_🄼🄰🄷🄸🅃🄸_*

  भारतात गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी केवळहाचदोर वापरला जातो  !  ‼


*_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ*
‼ _*म҉ ा҉ हित҉ ी҉  स҉ े҉ व҉ ा҉  ग्र҉ ू҉ प҉ ,҉  प҉ े҉ ठ҉ व҉ ड҉ ग҉ ा҉ व҉ *_ ‼
------------------------------------------------
*_दि. २७ मे  २҈ ०҈ २०_*
    फाशी देण्यासाठी अतिशय जाड दोर वापरण्यात येतो, जेणेकरून फास तुटू नये आणि तो आवळला जाताच गुन्हेगार त्वरित गतप्राण व्हावा. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की फाशीची शिक्षा देण्यासाठी वापरण्यात येणारा दोर हा केवळ एकाच ठिकाणावरून येतो.
हो खरंच आपल्या देशात फाशी देण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचा दोर वापरला जातो आणि हा दोर तयार होतो फक्त बिहार राज्यातील बक्सरच्या तुरुंगात!
╔══╗
║██║      _📍ⓂⒶⒽⒾⓉⒾ_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
*_🥫Mahiti seva group, pethvadgaon🥫_*
-----------------------------------------------
या दोराला म्हणतात ‘मनिला दोर’! आणि हा दोर केवळ बक्सरच्या तुरुंगातील कैद्यांमार्फतच बनवला जातो. जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होते तेव्हा सरकार बक्सर तुरुंग प्रशासनाकडे या दोराची मागणी करते आणि मग तुरुंग प्रशासन कैद्यांकडून हा स्पेशल मनिला दोर बनवून घेते. ज्याचाच फास काही दिवसांनी गुन्हेगाराच्या गळ्याभोवती आवळला जातो.
*🔹पण केवळ बक्सरच्या तुरुंगामध्येच हा दोर का तयार केला जातो?*
यामागे काही अंशी भौगोलिक कारण आहे. हा तुरुंग गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसला आहे, त्यामुळे सामान्य दिवशी देखील येथील तापमान हे दमट असते. मनिला दोर बनवण्यासाठी दमट वातावरण अतिशय गरजेचे आहे. दमट वातावरणात दोर गुळगुळीत आणि अधिक घट्ट होतात.
*गुन्हेगाराचे शरीराचा संपूर्ण भार काही सेकंद थोपवून धरण्यासाठी ज्या दोराने फाशी द्यायची आहे तो दोर गुळगुळीत आणि अधिक घट्ट असणे अत्यावश्यक असते.꧁༺* बक्सर तुरुंगातील कैदी अतिशय दमट तपमानामध्ये बसून आपल्या खुबीने हा दोर अधिक प्रभावशाली आणि कार्यक्षम बनवतात.
दोर बनवण्यापूर्वी ज्या गुन्हेगाराला फाशी देण्यात येणार आहे त्याच्या शरीराचा सर्व तपशील (वजन, उंची वगैरे) तुरुंग प्रशासन मागवून घेते आणि त्यानुसारच दोर बनवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट ज्या गुन्हेगाराला फाशी देण्यात येणार आहे त्याच्या उंचीच्या १.६ पट लांबीचा दोर तयार केला जातो आणि इतका जाड बनवला जातो जेणेकरून दोराला गुन्हेगाराचे वजन सहज पेलवेल.१९३० सालापासून बक्सर तुरुंगातील कैदी मनिला दोर तयार करत आहेत, म्हणजेच ब्रिटीश राजवटपासून या दोराचा वापर फाशी साठी केला जात आहे.
क्रूरकर्मा अजमल कसाब आणि अफजल गुरु या दोघांच्या गळ्याभोवती देखील याच मनिला दोराने फास आवळला गेला होता.
इनमराठी वरून साभार
https://m.facebook.com/story.php?story_fbid=726472797750646&id=100011637976439
-----------------------------------------------
*WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498* ☜♡☞
*📍म҉ ा҉ हित҉ ी҉  स҉ े҉ व҉ ा҉  ग्र҉ ू҉ प҉ ,҉   प҉ े҉ ठ҉ व҉ ड҉ ग҉ ा҉ व҉  📍*
*_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ*


2
पोलीस यंत्रणेचा भाग आहे. ते क्राईम डिटेक्शनसाठी काढलेले सॉफ्टवेअर आहे.
उत्तर लिहिले · 15/3/2019
कर्म · 165
0
होय, केली जाते. कारण प्रत्येक व्यक्तीसाठी कायदा एकच आहे.
उत्तर लिहिले · 17/2/2019
कर्म · 0