Topic icon

शक्कल

0
दिवे, बचत खात्यावरील व्यवहारांबद्दल माहिती खालीलप्रमाणे:

अ. चालू खात्यावर दिवसातून कितीही वेळा व्यवहार केले जाऊ शकतात:

उत्तर: होय, हे विधान सत्य आहे. चालू खाते (Current Account) हे विशेषतः व्यवसायिकांसाठी असते. त्यामुळे त्यांना दिवसातून कितीही वेळा व्यवहार करण्याची मुभा असते. या खात्यावरpassive उत्पन्न मिळत नाही.

ब. बचत खात्याच्या व्यवहारावर बँक नियंत्रण ठेवते का?

उत्तर: होय, हे विधान सत्य आहे.बचत खाते (Savings Account) हे सामान्य नागरिकांसाठी असते. या खात्यातून पैसे काढण्यावर आणि जमा करण्यावर काही निर्बंध असतात.बँक या खात्यावरील व्यवहारांवर नियंत्रण ठेवते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1100
30
एकदम छान प्रश्न आहे तुमचा पण मी खात्री देतो माझं उत्तर जास्त छान असेल.

हे जग खुप छान समजुन घेणाऱ्या लोकांनी बनलेले आहे. जर तुम्ही अशी छान व्यक्ती शोधू शकत नाही तर छान व्यक्ती बना, होऊ शकत कोणाचा शोध तुम्ही भेटल्यावर संपेल.
थोडासा सुक्ष्म विचार करु आणि स्वतःलाच प्रश्न विचारू?

आपल्याकडे सर्दीची गोळी असतेच पण ती प्रत्येक वेळेस आपण सोबत घेऊन फिरतो का? श्वास घेण्यासाठी, प्रथिने पोहोचविण्यासाठी आपल्याला सलाईन लावतात पण ती दररोज नेहमीच लावली जाते का? आपल्याकडे अलिशान बाईक अथवा कार असते पण प्रत्येक क्षणाला आपण कारमध्येच असतो का??

उत्तर आहे "नाही". कारण की एकदा का वापर संपला गरज संपली की त्या सगळ्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या वस्तु आपण बाजुला ठेवतो. जेव्हा गरज पडली तेव्हा परत वापरतो. अगदी असचं व्यक्तीच्या बाबतीतही आहे. आई-बाबांना आपण खुप प्रेम करतो पण २४ तास त्यांच्यासोबत असतो का? मित्रांसोबत २४ तास असतो का?

नाही.. कारण आपल्या आयुष्यात प्रत्येकाला एक रॉल एक कॕरेक्टर असतं. त्यांना तेव्हाच स्थान आणि महत्व मिळते जेव्हा त्यांच काम असतं. गरज नसतांना आपण ह्यांना बाजुला फेकतो, दुर्लक्ष करतो असं नाही पण महत्त्व कमी-जास्त होत राहतं.

सांगायच तात्पर्य ऐवढेच की बायको, गर्लफ्रेंड हे पण तसेच आपल्या आयुष्यातले कॕरेक्टर असतात, नटी असतात. त्यांनी पण आपल्या आयुष्यात तेव्हाच यायला हवे जेव्हा त्यांची खरी गरज असेल.

सृष्टीचे नियम आहेत. जन्म, बालपण, तारुण्य, वयस्क, वृद्ध आणि मग मृत्यू. तर बायको, गर्लफ्रेंड ह्यांची गरज वयस्क असतांना पडते. तारुण्यात जग समजलेच कुठे असते, लात मारेल तिथे पाणि काढेल असं वय, एकदा ठरलं पक्क मनाशी की हे बनायचं तर समजा बनलेच, ताकतच तेवढी असते. तारुण्य म्हणजे साधारणतः १५-२४ च वय होय की नाही? मग हे वय स्वतःची भीती कमी करण्याचे वय, शरिरयष्टी वाढविण्याचे वय, बुद्धीची प्रगल्भता वाढवायचे वय, चांगल्या सवयी आत्मसात करायचे वयं.. सगळ्यां क्षमता विकसित करायच वयं... ह्या सगळ्या आपण स्वतःवर काम केल्यावर होतात. ह्या वयात ज्या सवयी, जशी विचारसरणी बनवणार तशी ती बनते आणि पुढे मृत्यूपर्यत तशीच राहते.

ह्या वयात पत्नी असणं "गरजेच" नाही. कारण तिच्यासाठी पण हे वयं महत्त्वाचे असतेच हो. तारुण्यात आपण मनाने, शरिराने आणि जगाच्या समजने कमकुवत असतोच. अशात दोन जणं सोबत आले की टक्कर ही होणारचं.. म्हणुन पहिलं प्राधान्य "अंडरस्टँडींग" ला.. एकदा ती बनली मग आपण तयार. आपण तयार नसतो, सवयी चांगल्या नसतात आणि नातं ठेवण्याचा प्रयत्न करतो. आहो असा प्रयत्न फसेलच ना.. ना शरिर, ना करिअर, ना जगाची समज.. टिकेल तरी कसं..???

आपण आपल्या स्वतःच्या स्वतःला दिलेल्या कमिटमेंट, शपथा पुर्ण करू शकत नाही तर जगाच्या, आईबाबांच्या आणि तिच्या कमिटमेंट कशा पुर्ण करू शकू?
म्हणुन हे वय स्वतःच्या नजरेत वर उठण्याचे असते. काही केमिकल लोचे शरिरात होताय वयात आल्यावर, कसं कसं होतयं, आकर्षक वाटतयं त्याला अनुसरून कुठे लगेच मुली/मुलामागे चालले.

आपला प्रोब्लेम हाच की एक विशिष्ट वेळ असतो प्रत्येक क्रियेला, घटनेला. आपण त्याअगोदरच फळफळ करून सगळा खेळ बिघडवतो.

मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटातील डायलोग आठवा. "नातं फुलाची कळी उमलण्यासारखं असतं.. परंतु आपण त्याला त्याचा पद्धतीने उमलुच देत नाही".. लावा आता डोकं ..

आयुष्यात समतोल साधतांना प्रत्येक क्रिया ठराविक वेळेला, ठराविक ठिकाणी, ठराविक व्यक्तीसोबत करायची.
हा निसर्गाचा नियम तुम्ही दुर्लक्ष केला तर समजा मेलाच..

मी असं मुळीच म्हणत नाहीये ह्या वयात ज्यांना गर्लफ्रेंड आहे ते चुकताय!

पण कुठेतरी ते नक्कीच कमी पडताय हे मला माझा अभ्यास आणि निरिक्षण सांगतयं. विवेकानंदांनी तीन अंग सांगितले आहेत त्यात तारूण्यात असतांनाच बदल करून घ्यायला हवेत.

१. शारिरीक
२. मानसिक आणि
३. अध्यात्मिक..

पण जेव्हा तुम्ही नात्यांत असणार, तेव्हा ह्यांवर त्याचा परिणाम हा होईलच. सगळं एकदम मॕनेज नाही होत. मुलीमागे करिअर ची वाट लावणारे मुलं, त्याने म्हटलं म्हणुन शरिर संबंध ठेवणारे मुली, २-३ अगोदर लव अफेअर्स करून परत चौथ्या-पाचव्या नात्यात जाऊन नव्याने सुरु करणारे सो कॉल्ड लवबर्ड काय प्रेम देतील, काय नात टिकवतील. हे सगळं होत ह्यामुळेच की सृष्टीचा नियम मोडला आहे तुम्ही ना पहिलं बटणं शर्टाचं चुकीचे लागले की सगळे चुकतात ना.. "अंडरस्टँडींग" वाढतच नाही वाढते फक्त तृष्णा, वासना.. ह्या तारूण्यात हे सगळं कंट्रोल केले तर आयुष्यभर कंट्रोल करणार एकदम सरळ सोप गणित आहे हे..

प्रेमाची, काळजीची, शरिरासुखाची, तिची गरज पडते हो पण आता नाही. ह्या सगळ्यांची एक वेळ असतेच. त्यावेळेस सगळ्या बरोबर येतात.
आताच प्रेम केले, फिरले, मजा केली तर लग्नानंतर बोंब पडेल कारण सगळं तर करून झालेलं असेल ना, नाविण्यपुर्ण असं काही नाही. आणि मग तिथुन जो सुरू होतो त्याला म्हणतात संसार.. आणि संसार चालवायचं असेल तर "अंडरस्टँडींग" हवी.

माझा मित्राला गर्लफ्रेंड आहे मग मला का नाही?

त्याच नीट निरीक्षण करा. किती बोलतो तिच्याशी, काय-काय घेतो तिच्यासाठी, काय-काय करतो तिच्यासाठी. आपण तो आनंदी आहे किंवा प्रेमात, नात्यात येणं आनंदाचे असते अशी एकच बाजु पाहतो.. दुसरी जी अधिक महत्त्वाची बाजु आहे ती आपल्याला कधीच दिसत नाही.. ती म्हणजे "नातं टिकवायचं असतं".. घट्ट पकडून ठेवायच असतं.. तार्यावरची कसरत असते. मुलीला सांभाळणे जॉक नाही.. समजुतीने राहणं चेष्टा नाही..

सगळे ताजमहल पाहून खुश होतात. त्यामागची मेहनत कोणालाच नाही दिसतं.
नात्यात राहणे गर्लफ्रेंड असणे कुल एकदम हवा टाईप आपल्याला वाटते. हे साफ चुकीचे आहे.

मी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त जणांची उदाहरणे पाहिली आहे, किस्से ऐकले आहेत, काही मी स्वतः जगले आहेत.. काही कुल नसते. नात्याचा अगोदरच जास्त खुश होतो असं जवळपास ८०% मुला-मुलींचे म्हणणे असते.

तिने मला सोडले.. तिचे दुसऱ्यांसोबत अफेकर आहे.. तो माझं ऐकत नाही, ती सारखी अॉनलाईन असते, तो अगोदर अभ्यास करायचा आता करत नाही, त्याने माझ्याशी संबंध ठेवले आता लग्नाला नाही म्हाणतोय, ती खुप बदलली आहे पहिल्या सारखी नाही राहिली... असं कधीपर्यत रडत बसणार.. सर्वस्वी चुक तिची-त्याची नसते.. टाळी एका हाताने वाजत नाही..

म्हणुन एक पुर्ण "अंडरस्टँडींग" असल्याशिवाय नात्यात पडूच नये. राख होणार, बरबाद होणार. आमच्यासारखी काही मोजकी बाहेर पडतात आपला जीव मुठीत घेऊन. म्हणुन ही धगधगती आग समाजासाठी, देशासाठी आपल्या लोकांसाठी पेटवायची.. सगळ्या गोष्टीं बरोबर एकदम बरोबर वेळेवर आपल्याला मिळतात ह्याबाबत मी ठाम आहे.

आणि तुमच्या कर्तृत्वाला पाहून जे तुमच्यावर प्रेम करतील ते टिकतील. बाकी सगळे जातात. म्हणुन मुलगी कशी पटते ह्यापेक्षा मी शारिरीकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि अध्यात्मिकदृष्ट्या सदृढ कसा बनू हा विचार.. बाकी सगळं मिळत आयुष्यात वेळेवर.. हे आता बनले नाही तर कधीच बनत नाही..

टिप : मी पण २४ वर्षाचाच आहे. आणि मी ह्या मार्गावर चालतोय आणि माझा विश्वास ठेवा मी खुप मस्त, साजेसे आणि महान कार्य करतोय. आणि मला जे काही हवं आहा ते सगळं माझ्याकडे आहे. हॕपी मी.. "अंडरस्टँडींग" बस्स बाकी सब मिट्टी..

ॐ..@फुंसुख वांगडूच ..
उत्तर लिहिले · 18/1/2019
कर्म · 75305
2
True caller उघडा
प्रोफाइल वर जा आणि तेथून तुमचं नाव एडिट करा आणि  save करा
उत्तर लिहिले · 8/10/2018
कर्म · 7485
4
क्षमा असावी...वरील प्रश्नांचे उत्तर नसून..
.पुढील माहिती कौन बनेगा करोडपती शो बाबत आहे..

◆KBC-10 : बिग बींना कॉम्प्युटर स्क्रिनवर प्रश्न, ऑप्शनव्यतिरिक्त आणखी काय काय दिसते? पहिलेच ठाऊक असतात का उत्तरे?


लोकांचे नशीब चमकवणा-या 'कौन बनेगा करोडपती' या शोचे दहावे पर्वही हिट होत आहे. शोमध्ये प्रश्नोत्तरांसोबतच अनेक मजेशीर किस्से समोर येत आहेत. KBC मधील अमिताभ यांचा अंदाज लोकांना पसंत पडतो. या शोमधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याच्याशिवाय शो पुढे जाऊच शकत नाही, ते म्हणजे 'कम्प्यूटर जी'. शोमध्ये अमिताभ अनेकदा कॉम्प्युटरशी बोलताना दिसतात. पण अमिताभ आणि स्पर्धकांच्या कॉम्प्युटरवर नेमके काय येत असते, त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये काय अंतर असतं? हे तुम्हाला ठाऊक आहे का...

●अमिताभ यांची कॉम्प्युटरची स्क्रिन


अमिताभ आणि स्पर्धकांचे कॉम्प्युटर दिसायला सारखे असतात. पण दोघांच्या प्रोग्रामिंगमध्ये बराच फरक असतो. शोमध्ये अनेकदा असेही स्पर्धक आले आहेत, ज्यांनी हॉट सीटवर नव्हे तर अमिताभ बच्चन यांच्या सीटवर बसून हा गेम खेळला आहे. खरं तर अमिताभ यांच्या कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर प्रश्नासोबतच त्याचे उत्तर येत असावे, असे तुम्हाला वाटत असेल, पण असे नाहीये.

●कंटेस्टंटनी सांगितले स्क्रिनचे सत्य..

'कौन बनेगा करोडपती'च्या 10 व्या पर्वात 12.5 लाख रुपये जिंकणारे स्पर्धक अभिनव पांडे यांनी अमिताभ त्यांच्या समोरच्या कॉम्प्युटर स्क्रिनवर नेमके काय काय बघू शकतात, याविषयीची माहिती दिली. अभिनव यांनी सांगितले, जेव्हा ते हॉट सीटवर पैसे जिंकून फास्टेस्ट फिंगर फर्स्ट कंटेस्टंटच्या रुपात अमिताभ यांच्या अगदी मागे बसले होते. तेथून त्यांना अमिताभ बच्चन यांची स्क्रिन स्पष्ट दिसत होती. अमिताभ त्यांच्या कॉम्प्युटरवर कंटेंट स्‍किप करण्यासोबतच तो ऑपरेटही करु शकतात. टाइमर आणि प्रश्न सेट करणारा कॉम्प्युटर ऑपरेटर दुस-या ठिकाणी बसलेला असतो. या सर्व गोष्टी अभिनव यांनी Quora वर शेअर केल्या होत्या.

●उत्तर दाखवत नाही 'कम्प्यूटर जी'

अमिताभ यांना प्रश्नाचे उत्तर आधीच ठाऊक असावे, असे अनेकांना वाटत असले. पण असे नाहीये. प्रश्नाचे उत्तर लॉक होईपर्यंत बिग बींच्या कॉम्प्युटर स्क्रिनवर उत्तर दिसत नाही. जेव्हा ते उत्तर लॉक करतात त्यानंतरच त्यांना उत्तराशी निगडीत डिटेल्स स्क्रिनवर वाचू शकतात.
हे डिटेल दाखवतात 'कम्प्यूटर जी'
अमिताभ यांच्या 'कम्प्यूटर जी'च्या स्क्रिनवर प्रश्न, ऑप्शन, लाइफलाइन्स यांसारख्या सर्व गोष्टी दिसतात. जर बिग बी एखाद्या स्पर्धकाचे नाव, शहर, जॉब किंवा गावाविषयी विसरले तर त्यांच्या कॉम्प्युटर स्क्रिनवर संबंधित सर्व माहिती उपलब्ध असते. अमिताभ बच्चन यांच्या स्क्रिनच्या आणखी एका विंडोमध्ये 'फोन अ फ्रेंड' नॉमिनीटे डिटेल्स दिसतात. स्क्रिनवर लागलेले टाइमर त्यांना ब्रेकविषयी सांगते. फास्टेस्ट फिंगर फर्स्टच्या वेळी ही स्क्रिन ऑफ असते.
उत्तर लिहिले · 12/9/2018
कर्म · 123540
13
तुमचा हात दगडाखाली अडकला आहे.म्हणजे तो तुमचा जवळचा आहे.आता तुम्हाला त्याच्याकडेन पैसे परत मिळवायचे आहेत व तेही त्याच्याशी न भांडता किंवा तुमच्या दोघांचे संबंध न बिघडता.म्हणजे तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.तुम्ही त्याच्याशी गोडीगुलाबीने बोलून बघा.एकदम सर्व पैसे परत करता येत नसतील तर थोडे थोडे करून द्यायला सांगा.तरीही तो तयार होत नसेल तर तुमच्या दोघांचेही नातेवाईक लागत असतील अशा व्यक्तीकडे याबाबत बोला व त्याना तुमचे पैसे परत मिळण्यासाठी मध्यस्थ करा.असे करण्यापूर्वी तुमच्याकडून पैसे घेतले आहेत त्याला सांगा तू जे काही केले आहेस ते मी आपल्या नातेवाईकांना सांगणार आहे.यावर त्याचे उत्तर बघून नातेवाईकांना याबाबत सांगायचे की नाही ते ठरवे.हे सर्व करण्यापूर्वी त्याच्यआ आर्थिक परिस्थितीचा अंदाज घ्या.तो खरोखर आर्थिक तंगित आहे का ते बघा.शेवटी काय करायचे ते तुमच्यावर आहे.
उत्तर लिहिले · 2/8/2018
कर्म · 91065
8


अस करण्यामागे कारण म्हणजे माश्यांना दूर ठेवण्यासाठी ...
अस अनुभव तर नाही, त्यामुळे अस होत असेल की नाही हे माहीत नाही, जर होत असेल तर त्या मागे कारण म्हणजे माश्यांच्या डोळ्यांमध्ये असंख्य लेन्स असतात, त्या जवळजवळ पूर्ण ३६०° अंशात किंवा जवळपास अंशात पाहू शकतात, अश्या परिस्थितीत पाण्या च्या बॅग मधून प्रकाश जाऊन तो वेगवेगळ्या वक्रा मध्ये परावर्तित होतो व माश्यांना याचा त्रास होतो, व त्या दूर राहतात.

(हे उत्तर फक्त माहितीतील आहे, या मागे जर कोणतं दुसर कारण असेल तर, किंवा तो कॉइन का ठेवला जातो, हे माहीत असेल तर कोणीतरी उत्तर द्या)
उत्तर लिहिले · 21/7/2018
कर्म · 85195
12
उत्तरे पाठ करण्यापेक्षा समजून घ्या, मग लक्षात राहतील ...



अस तर सगळेच सांगतात!


आणि हो बरोबर आहेच, समजून घेतलं तर लक्षात ही राहतील, व पुढे तेच ज्ञान ज्या क्षेत्रात जाणार आहेत तिथे उपयोगी पडेल ...

पण वेळ काही सारखी नसते, सगळंच वेळेत जमेल अस काही नसतं, मी तरी अश्या वेळी एक करायचो ... जे काही असेल त्याला गोष्टींचं रूप द्यायचो, मनात एक गोष्ट तयार करायचो, गोष्ट लक्षात राहते तस ते ही राहत, मग फक्त त्या गोष्टीच पुन्हा मनात उत्तर तयार करायचं ...
उत्तर लिहिले · 14/7/2018
कर्म · 85195