संबंध शक्कल स्वभाव मानसशास्त्र

आजपर्यंत मी सिंगल आहे, माझी एकही गर्लफ्रेंड नाही. मी एवढा हुशार, हँडसम राहून सुद्धा माझ्या मित्रांच्या दोन-तीन गर्लफ्रेंड आहेत. या मुली पटतात तरी कशा काय?

3 उत्तरे
3 answers

आजपर्यंत मी सिंगल आहे, माझी एकही गर्लफ्रेंड नाही. मी एवढा हुशार, हँडसम राहून सुद्धा माझ्या मित्रांच्या दोन-तीन गर्लफ्रेंड आहेत. या मुली पटतात तरी कशा काय?

30
एकदम छान प्रश्न आहे तुमचा पण मी खात्री देतो माझं उत्तर जास्त छान असेल.

हे जग खुप छान समजुन घेणाऱ्या लोकांनी बनलेले आहे. जर तुम्ही अशी छान व्यक्ती शोधू शकत नाही तर छान व्यक्ती बना, होऊ शकत कोणाचा शोध तुम्ही भेटल्यावर संपेल.
थोडासा सुक्ष्म विचार करु आणि स्वतःलाच प्रश्न विचारू?

आपल्याकडे सर्दीची गोळी असतेच पण ती प्रत्येक वेळेस आपण सोबत घेऊन फिरतो का? श्वास घेण्यासाठी, प्रथिने पोहोचविण्यासाठी आपल्याला सलाईन लावतात पण ती दररोज नेहमीच लावली जाते का? आपल्याकडे अलिशान बाईक अथवा कार असते पण प्रत्येक क्षणाला आपण कारमध्येच असतो का??

उत्तर आहे "नाही". कारण की एकदा का वापर संपला गरज संपली की त्या सगळ्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या वस्तु आपण बाजुला ठेवतो. जेव्हा गरज पडली तेव्हा परत वापरतो. अगदी असचं व्यक्तीच्या बाबतीतही आहे. आई-बाबांना आपण खुप प्रेम करतो पण २४ तास त्यांच्यासोबत असतो का? मित्रांसोबत २४ तास असतो का?

नाही.. कारण आपल्या आयुष्यात प्रत्येकाला एक रॉल एक कॕरेक्टर असतं. त्यांना तेव्हाच स्थान आणि महत्व मिळते जेव्हा त्यांच काम असतं. गरज नसतांना आपण ह्यांना बाजुला फेकतो, दुर्लक्ष करतो असं नाही पण महत्त्व कमी-जास्त होत राहतं.

सांगायच तात्पर्य ऐवढेच की बायको, गर्लफ्रेंड हे पण तसेच आपल्या आयुष्यातले कॕरेक्टर असतात, नटी असतात. त्यांनी पण आपल्या आयुष्यात तेव्हाच यायला हवे जेव्हा त्यांची खरी गरज असेल.

सृष्टीचे नियम आहेत. जन्म, बालपण, तारुण्य, वयस्क, वृद्ध आणि मग मृत्यू. तर बायको, गर्लफ्रेंड ह्यांची गरज वयस्क असतांना पडते. तारुण्यात जग समजलेच कुठे असते, लात मारेल तिथे पाणि काढेल असं वय, एकदा ठरलं पक्क मनाशी की हे बनायचं तर समजा बनलेच, ताकतच तेवढी असते. तारुण्य म्हणजे साधारणतः १५-२४ च वय होय की नाही? मग हे वय स्वतःची भीती कमी करण्याचे वय, शरिरयष्टी वाढविण्याचे वय, बुद्धीची प्रगल्भता वाढवायचे वय, चांगल्या सवयी आत्मसात करायचे वयं.. सगळ्यां क्षमता विकसित करायच वयं... ह्या सगळ्या आपण स्वतःवर काम केल्यावर होतात. ह्या वयात ज्या सवयी, जशी विचारसरणी बनवणार तशी ती बनते आणि पुढे मृत्यूपर्यत तशीच राहते.

ह्या वयात पत्नी असणं "गरजेच" नाही. कारण तिच्यासाठी पण हे वयं महत्त्वाचे असतेच हो. तारुण्यात आपण मनाने, शरिराने आणि जगाच्या समजने कमकुवत असतोच. अशात दोन जणं सोबत आले की टक्कर ही होणारचं.. म्हणुन पहिलं प्राधान्य "अंडरस्टँडींग" ला.. एकदा ती बनली मग आपण तयार. आपण तयार नसतो, सवयी चांगल्या नसतात आणि नातं ठेवण्याचा प्रयत्न करतो. आहो असा प्रयत्न फसेलच ना.. ना शरिर, ना करिअर, ना जगाची समज.. टिकेल तरी कसं..???

आपण आपल्या स्वतःच्या स्वतःला दिलेल्या कमिटमेंट, शपथा पुर्ण करू शकत नाही तर जगाच्या, आईबाबांच्या आणि तिच्या कमिटमेंट कशा पुर्ण करू शकू?
म्हणुन हे वय स्वतःच्या नजरेत वर उठण्याचे असते. काही केमिकल लोचे शरिरात होताय वयात आल्यावर, कसं कसं होतयं, आकर्षक वाटतयं त्याला अनुसरून कुठे लगेच मुली/मुलामागे चालले.

आपला प्रोब्लेम हाच की एक विशिष्ट वेळ असतो प्रत्येक क्रियेला, घटनेला. आपण त्याअगोदरच फळफळ करून सगळा खेळ बिघडवतो.

मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटातील डायलोग आठवा. "नातं फुलाची कळी उमलण्यासारखं असतं.. परंतु आपण त्याला त्याचा पद्धतीने उमलुच देत नाही".. लावा आता डोकं ..

आयुष्यात समतोल साधतांना प्रत्येक क्रिया ठराविक वेळेला, ठराविक ठिकाणी, ठराविक व्यक्तीसोबत करायची.
हा निसर्गाचा नियम तुम्ही दुर्लक्ष केला तर समजा मेलाच..

मी असं मुळीच म्हणत नाहीये ह्या वयात ज्यांना गर्लफ्रेंड आहे ते चुकताय!

पण कुठेतरी ते नक्कीच कमी पडताय हे मला माझा अभ्यास आणि निरिक्षण सांगतयं. विवेकानंदांनी तीन अंग सांगितले आहेत त्यात तारूण्यात असतांनाच बदल करून घ्यायला हवेत.

१. शारिरीक
२. मानसिक आणि
३. अध्यात्मिक..

पण जेव्हा तुम्ही नात्यांत असणार, तेव्हा ह्यांवर त्याचा परिणाम हा होईलच. सगळं एकदम मॕनेज नाही होत. मुलीमागे करिअर ची वाट लावणारे मुलं, त्याने म्हटलं म्हणुन शरिर संबंध ठेवणारे मुली, २-३ अगोदर लव अफेअर्स करून परत चौथ्या-पाचव्या नात्यात जाऊन नव्याने सुरु करणारे सो कॉल्ड लवबर्ड काय प्रेम देतील, काय नात टिकवतील. हे सगळं होत ह्यामुळेच की सृष्टीचा नियम मोडला आहे तुम्ही ना पहिलं बटणं शर्टाचं चुकीचे लागले की सगळे चुकतात ना.. "अंडरस्टँडींग" वाढतच नाही वाढते फक्त तृष्णा, वासना.. ह्या तारूण्यात हे सगळं कंट्रोल केले तर आयुष्यभर कंट्रोल करणार एकदम सरळ सोप गणित आहे हे..

प्रेमाची, काळजीची, शरिरासुखाची, तिची गरज पडते हो पण आता नाही. ह्या सगळ्यांची एक वेळ असतेच. त्यावेळेस सगळ्या बरोबर येतात.
आताच प्रेम केले, फिरले, मजा केली तर लग्नानंतर बोंब पडेल कारण सगळं तर करून झालेलं असेल ना, नाविण्यपुर्ण असं काही नाही. आणि मग तिथुन जो सुरू होतो त्याला म्हणतात संसार.. आणि संसार चालवायचं असेल तर "अंडरस्टँडींग" हवी.

माझा मित्राला गर्लफ्रेंड आहे मग मला का नाही?

त्याच नीट निरीक्षण करा. किती बोलतो तिच्याशी, काय-काय घेतो तिच्यासाठी, काय-काय करतो तिच्यासाठी. आपण तो आनंदी आहे किंवा प्रेमात, नात्यात येणं आनंदाचे असते अशी एकच बाजु पाहतो.. दुसरी जी अधिक महत्त्वाची बाजु आहे ती आपल्याला कधीच दिसत नाही.. ती म्हणजे "नातं टिकवायचं असतं".. घट्ट पकडून ठेवायच असतं.. तार्यावरची कसरत असते. मुलीला सांभाळणे जॉक नाही.. समजुतीने राहणं चेष्टा नाही..

सगळे ताजमहल पाहून खुश होतात. त्यामागची मेहनत कोणालाच नाही दिसतं.
नात्यात राहणे गर्लफ्रेंड असणे कुल एकदम हवा टाईप आपल्याला वाटते. हे साफ चुकीचे आहे.

मी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त जणांची उदाहरणे पाहिली आहे, किस्से ऐकले आहेत, काही मी स्वतः जगले आहेत.. काही कुल नसते. नात्याचा अगोदरच जास्त खुश होतो असं जवळपास ८०% मुला-मुलींचे म्हणणे असते.

तिने मला सोडले.. तिचे दुसऱ्यांसोबत अफेकर आहे.. तो माझं ऐकत नाही, ती सारखी अॉनलाईन असते, तो अगोदर अभ्यास करायचा आता करत नाही, त्याने माझ्याशी संबंध ठेवले आता लग्नाला नाही म्हाणतोय, ती खुप बदलली आहे पहिल्या सारखी नाही राहिली... असं कधीपर्यत रडत बसणार.. सर्वस्वी चुक तिची-त्याची नसते.. टाळी एका हाताने वाजत नाही..

म्हणुन एक पुर्ण "अंडरस्टँडींग" असल्याशिवाय नात्यात पडूच नये. राख होणार, बरबाद होणार. आमच्यासारखी काही मोजकी बाहेर पडतात आपला जीव मुठीत घेऊन. म्हणुन ही धगधगती आग समाजासाठी, देशासाठी आपल्या लोकांसाठी पेटवायची.. सगळ्या गोष्टीं बरोबर एकदम बरोबर वेळेवर आपल्याला मिळतात ह्याबाबत मी ठाम आहे.

आणि तुमच्या कर्तृत्वाला पाहून जे तुमच्यावर प्रेम करतील ते टिकतील. बाकी सगळे जातात. म्हणुन मुलगी कशी पटते ह्यापेक्षा मी शारिरीकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि अध्यात्मिकदृष्ट्या सदृढ कसा बनू हा विचार.. बाकी सगळं मिळत आयुष्यात वेळेवर.. हे आता बनले नाही तर कधीच बनत नाही..

टिप : मी पण २४ वर्षाचाच आहे. आणि मी ह्या मार्गावर चालतोय आणि माझा विश्वास ठेवा मी खुप मस्त, साजेसे आणि महान कार्य करतोय. आणि मला जे काही हवं आहा ते सगळं माझ्याकडे आहे. हॕपी मी.. "अंडरस्टँडींग" बस्स बाकी सब मिट्टी..

ॐ..@फुंसुख वांगडूच ..
उत्तर लिहिले · 18/1/2019
कर्म · 75305
17
तुमचं वय किती ते तुम्ही लिहिलेलं नाही पण तरीही माझं उत्तर तुम्हाला समजेल अशी आशा करतो।
हे बघा वयात येन हा एक टप्पा आहे। जो सर्व लोकांच्या आयुष्यात येतो।नवीनच तारुण्यात पदर्पण करणार्यांना असं वाटण स्वाभाविक आहे, परंतु  इथे मी एक सांगू इच्छितो की वयात येण हा वयाच्या साधरणपणे 13 ते 18 वर्षापर्यंत असतो। त्या काळात या भावना सर्वात जास्त प्रमाणात असतात। ज्या प्रमाणे एक लहान बाळ एखाद्या चांकँऱ्या गोष्टीकडे रांगत जतो तसेच या वयातल्या या भावना। जसजसे वय पुढे होत जाते तसतशी परिपकवता येत जाते। प्रेम म्हणजे नक्की काय, आयुष्याची सोबत कशी असावी या गोष्टी वयात येण्याव्ह काळ लोटला कि कळतं। त्या काळात कधीकधी नको त्या चुका पण होतात। आणि त्याची मनावर पडलेली छाप खूप त्रास देत राहते।
कदाचित त्यामुळेच आपले पालक, मोठे लोक आपली काळजी घेत असतील। कारण तेही कधीतरी तुमच्या वयाचे होते।
राहिला मूळ मुद्दा कि तुम्ही हुशार असून पण का नाही gf होत।।। तर या गोष्टीचा अभिमान बाळगा।।तुमच्या समोर नाही पण पाठीमागे कोणीतरी म्हणत असतं कि हा मुलगा खरंच हुशार आहे, यात काहीतरी आहे।।। हा बाकीच्यांनासरखा नाही। याचा गोल, फोकस क्लिअर आहे।  कधीकाळी मी हि तुमच्यासारखा होतो।। आज मला अभिमान आहे की मी असा आहे।।। आणि उद्या तुम्हाला हि राहील।

शेवट एकच सांगेल "लोक तुम्हाला हसतील कारण तुम्ही वेगळे आहात, पण तुम्ही त्यांना हसू शकतात कारण ते सर्व सारखेच आहेत."👍
उत्तर लिहिले · 18/1/2019
कर्म · 15400
0

मला तुमच्या भावना समजतात. अनेकदा आपल्या मनात काही प्रश्न येतात आणि त्यांची उत्तरं मिळत नाहीत. तुमची विचारणा अगदी स्वाभाविक आहे. या संदर्भात काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत:

  • प्रत्येकाची वेळ वेगळी असते: तुमच्या मित्रांना लवकर यश मिळालं याचा अर्थ तुम्हालाही ते लगेचच मिळायला हवं असं नाही. प्रत्येकाचा मार्ग आणि वेळ वेगळा असतो.
  • आकर्षण: लोकांना कोण आवडतं हे व्यक्तिपरत्वे बदलतं. तुम्हाला आकर्षक वाटणाऱ्या गोष्टी दुसऱ्यांना तितक्याच आकर्षक वाटतील असं नाही.
  • कनेक्शन: नातं जुळण्यासाठी केवळ दिसणं किंवा बुद्धीमत्ता पुरेशी नाही, तर दोन व्यक्तींमध्ये भावनिक आणि मानसिक जुळणंही महत्त्वाचं असतं.
  • प्रयत्न: अनेकदा समोरच्या व्यक्तीला आवडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, संवाद साधावा लागतो आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतात.

तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करा, आपले छंद जोपासा, आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. योग्य वेळी तुम्हाला नक्कीच योग्य व्यक्ती भेटेल.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1180

Related Questions

मी लग्नासाठी मुलगी बघायला गेलो होतो. मुलगी स्वभावाला चांगली आहे, पण ती दिसायला तेवढी सुंदर नाहीये. पण तिला मी आवडतो. ती शिक्षण B.Com झालेली आहे. मग मी तिच्याशी लग्न केले पाहिजे का दुसरी बघू?
बायको चांगल्या गोष्टींकडे कानाडोळा का करते?
माझं लग्न ठरलं आहे आणि माझं अरेंज मॅरेज आहे. मी कधी मुलीशी जास्त बोललो नाही, मग मी माझ्या होणाऱ्या बायकोसोबत बोलण्याची सुरुवात कशी करावी?
महाराष्ट्रातील बाबर आडनावाचा आणि मुघल सम्राट बाबर यांचा काही संबंध आहे का?
आदिवासींचे हितसंबंध जोपासण्यासाठी आणि भौतिक जीवनमान सुधारण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती सांगा?
मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत अधिकार यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा?
नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाचा त्याच्या भाषेशी निकट संबंध असतो हे स्पष्ट करण्यासाठी प्रा. ग. प्र. प्रधान यांनी कोणती उदाहरणे दिली आहेत?