शिक्षण शाळा

आदर्श शाळा कशी असावी?

2 उत्तरे
2 answers

आदर्श शाळा कशी असावी?

2
आदर्श शाळा कशी असावी,
 आदर्श शाळा ही कल्पना स्वीकारते की सर्व विद्यार्थी शिकू शकतात आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित शिक्षणाच्या जागा तयार करण्यासाठी कार्य करतात . हे जाणकार शिक्षकांना आकर्षित करते, जे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी घेतात आणि त्यांच्या शिष्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सूचनांचे रुपांतर करतात.



 आदर्श  शळा कशी असावी याची कविकल्पना अनेकांनी रंगवली आहे. शाळा कशी असावी यावर कविता, गाणीही आहेत. त्या कविता एकूणच शाळेतील शिस्त, कंटाळा यापासून सुटका मागतात. निसर्गात जायला मागतात. बंड करून मोकळेपणा मागतात.... कृष्णमूर्ती लहानपणी शाळेत रमणारे नव्हते. त्यांनी शाळेत अनेकदा बोलणे खाल्ले कारण वर्गातल्या त्या कंटाळवाण्या वातावरणात त्यांचे मनच रमत नसायचे. त्यामुळे ते फारसे शिकू शकले नाहीत. त्यातूनच शिक्षण, शाळा हा त्यांच्या चिंतनाचा विषय झाला असावा.

त्यांचे ते प्रसिद्ध वाक्य नेहमीच सर्वत्र सांगितले जाते की, ‘‘शाळा आणि तुरुंग या जगातल्या दोनच जागा अशा आहेत की जिथं कुणीचं स्वत:होऊन जात नाही दाखल करावं लागतं ’’ यातून शाळा त्यांना तुरुंगासारखी वाटली... त्यामुळेच कृष्णजींनी जेव्हा पुढे शिक्षणाची मांडणी केली तेव्हा त्यांनी आदर्श मुक्त मनांची शाळा कशी असेल याची मांडणी केली. शाळेचा पाया भीती, शिस्त नसेल तर शाळा ही प्रेमाच्या पायावर आधारित असेल याचा पुरस्कार केला.
आदर्श शाळेचे चित्र मांडताना ते म्हणतात, ‘‘ शाळेच्या समर्पित कामावर प्रेम करणारे शिक्षक असतील तर तशाच प्रकारचे इतर सहकारी त्यांना मिळत जातील व जे समर्पित नाहीत ते हळूहळू दूर होतील... शिक्षक मुख्याध्यापकांच्या भीती दडपणाखाली नसतील व मुख्याध्यापकही शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांच्या दडपणाखाली नसतील. जेव्हा शाळेतील संबंध हे समानतेचे असतील तेव्हाच एक आनंदाचे प्रेमाचे वातावरण असेल....मुख्याध्यापक सर्व जबाबदार्‍या स्वत:च्याच खांद्यावर घेणार नाही तर याउलट प्रत्येक शिक्षक हा शाळेची जबाबदारी घेणारा असेल... अशी मध्यवर्ती केंद्र नसणारी शाळा चालू शकेल का, असा प्रश्न विचारला जाईल पण जेव्हा सर्वजण प्रज्ञेच्या, सहकार्याच्या आधारे काम करत असतील तेव्हाच हे घडू शकेल... ’’ कृष्णजींनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यालाच स्पर्श केलाय. ते शाळा म्हणजे शाळेची इमारत, तिथले उपक्रम, अभ्यासक्रम यावर भर देत नाहीत तर तिथे काम करणार्‍या माणसांवर भर देतात. तिथल्या माणसांच्या संबंधांविषयी माणसांच्या समजेविषयी बोलतात... हे त्यांचे वेगळेपण आहे. पुन्हा मुख्याध्यापकाला शाळेत स्वामित्वही ते देत नाही तर समज असलेल्या शिक्षकांच्या सामूहिक नेतृत्वाविषयी ते बोलतात.... शिक्षकांच्या वागण्यातूनच शाळेत एक वेगळे वातावरण निर्माण होईल, अशी त्यांची एकूण मांडणी आहे.

या शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांविषयीही ते बोलतात. ते म्हणतात, ‘‘ स्वयंनिर्णय घेणारे विद्यार्थी प्राधान्याने शाळेने निवडावे. स्वयंशिस्त पाळणारे विद्यार्थी या शाळेत तयार व्हावेत जेणेकरून भविष्यात स्वयंशासन देशात तयार व्हायला मदत होईल. शाळेत विद्यार्थी जर दुसर्‍याच्या भावना लक्षात घ्यायला व वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाने व ‘प्रज्ञेने संवादात भाग घेतला तर भावी काळातील जीवनात येणारे कठीण प्रश्न तो सोडवू शकेल... त्याहीपुढे शाळेत केवळ दैनंदिन जीवनाला गरजेचे शिक्षण देणे गरजेचे नाही तर जीवनातील सर्व गुंतागुंतीला सामोरे जाण्याची कला शिकविणे अपेक्षित आहे....’’ विद्यार्थ्यांना शाळेने कसे शिक्षण द्यावे हे ते नेमकेपणाने सांगतात. त्यांना अभिप्रेत असलेले शिक्षण शाळेने विद्यार्थ्याला भावी जीवनासाठी तयार करणे आहे... बाह्य शिस्तीपेक्षा त्यांना आंतरिक शिस्त शाळेत निर्माण होणे महत्त्वाचे वाटते. आज शाळांमध्ये तेच हरवल्याने केवळ भीतीच्या पायावर शाळा उभ्या आहेत.
शाळेत सतत शिकण्याची प्रक्रिया सुरू असणे त्यांना विलक्षण महत्त्वाचे वाटते. ते शिकणे केवळ शाळेतच नाही तर प्रत्येक क्षणाला शिकणे आहे. यातूनच शाळा त्यांना विलक्षण महत्त्वाच्या वाटतात. त्यांचे एक विलक्षण धाडसी विधान आहे. ते म्हणतात, ‘शाळा ही मला मंदिर-मशीद-चर्चपेक्षाही पवित्र वाटते कारण इथे शिकण्याची निरंतर प्रक्रिया सुरू आहे आणि इतरत्र ही शिकण्याची प्रक्रिया बंद झाली आहे....’’
शाळा हे या अर्थाने कृष्णजींना धार्मिक केंद्र वाटते....’’


उत्तर लिहिले · 9/1/2024
कर्म · 53750
0
आदर्श शाळा (Adarsh Shala) कशी असावी याबद्दल काही माहिती:

आदर्श शाळा म्हणजे अशी शाळा जी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते.

  • शिक्षण:
    • अध्यापन पद्धती उत्कृष्ट असाव्यात.
    • शिक्षकांनी प्रशिक्षित आणि अनुभवी असावे.
    • अभ्यासक्रम अद्ययावत असावा.
    • प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे आवश्यक आहे.
  • सुविधा:
    • वर्गखोल्या चांगल्या व हवेशीर असाव्यात.
    • प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि संगणक कक्ष असावेत.
    • खेळण्यासाठी मोठे मैदान असावे.
    • स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय असावी.
  • वातावरण:
    • शाळेचे वातावरण सुरक्षित आणि सकारात्मक असावे.
    • विद्यार्थ्यांना शाळेत शिकायला आनंद वाटला पाहिजे.
    • शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात चांगले संबंध असावेत.
  • इतर उपक्रम:
    • खेळ, कला, संगीत, नाटक यांसारख्या अतिरिक्त अभ्यासक्रमात सहभाग असावा.
    • शैक्षणिक सहली आयोजित केल्या जाव्यात.
    • सामाजिक कार्यात सहभाग असावा.
  • तंत्रज्ञान:
    • शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.
    • स्मार्ट क्लासरूम (Smart classroom) असाव्यात.
    • ऑनलाईन शिक्षण (Online learning) उपलब्ध असावे.

आदर्श शाळा केवळ पुस्तकी ज्ञानावरच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना एक चांगले नागरिक बनण्यास मदत करते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5220

Related Questions

College la application deun 7 divas zale pn college TC det nahi?
शालेय व्यवस्थापन म्हणजे काय? शालेय व्यवस्थापनाचे कार्य स्पष्ट करा.
शालेय व्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा?
शालेय व्यवहाराप्रती जबाबदारी?
प्रभावी वर्गखोली (Class room) व्यवस्थापन?
ग्रंथोपार्जन या संज्ञेची कामे उदाहरणासहित स्पष्ट करा?
ऑन द जॉब ट्रेनिंग आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग म्हणजे काय?