उपवास व्रत आणि उपवास धर्म

मी नेहमी संकष्टी चतुर्थी करतो, पण या वेळेस माझ्या लक्षात नाही राहिले आणि माझा चतुर्थीचा उपवास सुटला, तर काय करावे?

2 उत्तरे
2 answers

मी नेहमी संकष्टी चतुर्थी करतो, पण या वेळेस माझ्या लक्षात नाही राहिले आणि माझा चतुर्थीचा उपवास सुटला, तर काय करावे?

2
तुम्ही  नेहमी संकष्टी चतुर्थी पकडता पण या वेळेस तुम्हाला लक्षात नाही राहिले आणि तुमचा चतुर्थीचा उपवास सुटला काय करावे काहीही नाही करायचं नाही परत पुढच्या वेळेस संकष्टी चतुर्थी चा उपवास करु शकता.
मुळात आपण देवाला घाबरतो.

कुठला तरी हेतू मनात ठेवून, स्वार्थी वृत्तीने उपवास करूच नये, उपवासाचा एक हेतू शास्त्रीय आहे, शरीर शास्त्रा प्रमाणे पोटाला आराम देऊन त्याला अजून कार्यक्षम ठेवण्याचा अन दुसरा हेतू आहे मनाने देवाजवळ राहण्याचा, आपण सध्याच्या युगात दोन्हीही हेतूंना हरताळ फासला आहे,

आपण सर्व आरत्या झाल्यावर एक श्लोक म्हणतो

त्वमेव माता च पिता त्वमेव,……..

ह्या श्लोकातील, सर्वात महत्वाचा, म्हणजे मला वाटणारा, आवडणारा भाव म्हणजे, त्वमेव बंधुश्च, सखा त्वमेव,

जर आपण देवाबद्दल हा भाव ठेवला तर मुळात उपवास केला असता, मोडला असता काही पाप लागेल का? का काही तोडगा करावा लागेल काय, असले प्रश्नच मुळात उद्भवणार नाहीत. चुकून काही खाल्ल्याने तो जगनियंता रागावणार मुळीच नाही, वृत्ती, हेतू प्रामाणिक असेल तर आणि तरच उपवास करण्याला अर्थ आहे, नाही का?

उत्तर लिहिले · 2/11/2023
कर्म · 53710
0
चिंता करू नका, संकष्टी चतुर्थीचा उपवास चुकला तर तुम्ही काही गोष्टी करू शकता:

1. प्रायश्चित्त:

तुमचा उपवास चुकला आहे, त्यामुळे त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी देवाची क्षमा मागा. मनोभावे प्रार्थना करा आणि पुढील संकष्टी चतुर्थीला उपवास करण्याची प्रतिज्ञा करा.

2. दानधर्म:

गरजू लोकांना अन्नदान करा किंवा मंदिरात काही दान करा. तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही काही मदत करू शकता.

3. एकादशीचा उपवास:

एकादशीचा उपवास करून तुम्ही त्याचे पुण्य मिळवू शकता. एकादशी विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे या उपवासाने तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते.

4. चतुर्थी व्रत कथा:

गणपतीची चतुर्थी व्रत कथा वाचा किंवा ऐका. यामुळे तुम्हाला उपवासाचे महत्त्व समजेल आणि तुम्ही अधिक समर्पित व्हाल.

5. सकारात्मक विचार:

नकारात्मक विचार मनात आणू नका. देवाला आठवून सकारात्मक राहा. तुमची श्रद्धा आणि भक्ती कायम ठेवा.

टीप: हे सर्व उपाय तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहेत. त्यामुळे, आपल्या गुरुजी किंवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे उत्तम राहील.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

गुरुपौर्णिमेला उपवास करायचा असतो का?
वट सावित्री पौर्णिमेचा उपवास कधी सोडायचा?
जसे मुलींना अपेक्षित वर मिळवण्यासाठी सोळा सोमवारचे व्रत करतात, तसेच मुलांना अपेक्षित वधू मिळवण्यासाठी काही व्रत आहे का?