Topic icon

व्रत आणि उपवास

2
तुम्ही  नेहमी संकष्टी चतुर्थी पकडता पण या वेळेस तुम्हाला लक्षात नाही राहिले आणि तुमचा चतुर्थीचा उपवास सुटला काय करावे काहीही नाही करायचं नाही परत पुढच्या वेळेस संकष्टी चतुर्थी चा उपवास करु शकता.
मुळात आपण देवाला घाबरतो.

कुठला तरी हेतू मनात ठेवून, स्वार्थी वृत्तीने उपवास करूच नये, उपवासाचा एक हेतू शास्त्रीय आहे, शरीर शास्त्रा प्रमाणे पोटाला आराम देऊन त्याला अजून कार्यक्षम ठेवण्याचा अन दुसरा हेतू आहे मनाने देवाजवळ राहण्याचा, आपण सध्याच्या युगात दोन्हीही हेतूंना हरताळ फासला आहे,

आपण सर्व आरत्या झाल्यावर एक श्लोक म्हणतो

त्वमेव माता च पिता त्वमेव,……..

ह्या श्लोकातील, सर्वात महत्वाचा, म्हणजे मला वाटणारा, आवडणारा भाव म्हणजे, त्वमेव बंधुश्च, सखा त्वमेव,

जर आपण देवाबद्दल हा भाव ठेवला तर मुळात उपवास केला असता, मोडला असता काही पाप लागेल का? का काही तोडगा करावा लागेल काय, असले प्रश्नच मुळात उद्भवणार नाहीत. चुकून काही खाल्ल्याने तो जगनियंता रागावणार मुळीच नाही, वृत्ती, हेतू प्रामाणिक असेल तर आणि तरच उपवास करण्याला अर्थ आहे, नाही का?

उत्तर लिहिले · 2/11/2023
कर्म · 53710
0
गुरुपौर्णिमेला उपवास करणे अनिवार्य नाही, परंतु अनेक लोक गुरुंप्रती आदर व्यक्त करण्यासाठी उपवास करतात.

गुरुपौर्णिमेला उपवास करण्याची प्रथा:

  • अनेक लोक त्यांच्या श्रद्धा आणि परंपरेनुसार गुरुपौर्णिमेला उपवास करतात.
  • काही लोक दिवसभर फलाहार घेतात, तर काही निर्जळी उपवास करतात.
  • उपवास करणे हे गुरुंप्रती आदर आणि समर्पण दर्शवण्याचा एक मार्ग आहे.

उपवास न करण्याचे कारण:

  • उपवास करणे हे बंधनकारक नाही.
  • ज्या लोकांना आरोग्यविषयक समस्या आहेत, ते उपवास करणे टाळू शकतात.
  • गुरुपौर्णिमेला गुरुंची पूजा करणे, त्यांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांच्या शिकवणींचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

त्यामुळे, गुरुपौर्णिमेला उपवास करायचा की नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असतो.

अधिक माहितीसाठी:

गुरुपौर्णिमा उपवास माहिती
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440
4
वटसावित्रीचा उपवास हा दुसर्‍या दिवशी सोडतात. वटसावित्रीच्या दिवशी कोणी केवळ फलाहार घेऊन तर कोणी उपवासाचे खाऊन उपवास करतात.
उत्तर लिहिले · 27/6/2018
कर्म · 9215