राजकारण समाजकारण

बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेवर टीका केली?

2 उत्तरे
2 answers

बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेवर टीका केली?

0
भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
(१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), 
हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.

अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता या विषयावर व्याख्यान दिले. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.[६६] आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालील सिद्धांत मांडले.

वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.[६६][६७]

जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'[६८]

४ जानेवारी १९२८ रोजी द टाइम्स ऑफ इंडियाच्या इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली.[६९][७०]

आंबेडकरांनी जात या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

जात ही श्रमविभागणी वरही अवलंबून नाही आणि नैसर्गिक कल वा योग्यतेवरही अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कूळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडिलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.


भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.[७७] जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात.[७७] सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.[७८] आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.[७९] इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.[१८][८०] हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.[१८][८१]

राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते.


उत्तर लिहिले · 16/4/2023
कर्म · 7460
0

उत्तर: होय, बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेवर कठोर टीका केली. त्यांनी याPratibha socially समाजाला विभागणाऱ्या आणि अन्यायकारक व्यवस्थेचा तीव्र विरोध केला.

जातीव्यवस्थेवरील टीकेची काही मुख्य कारणे:

  • सामाजिक असमानता: जातीव्यवस्थेमुळे समाजात उच्च आणि नीच असा भेदभाव निर्माण होतो, ज्यामुळे काही विशिष्ट जातींना शिक्षण, नोकरी आणि सामाजिक जीवनात समान संधी मिळत नाहीत.
  • मानवी हक्कांचे उल्लंघन: जातीव्यवस्थेत, विशिष्ट जातींमध्ये जन्मलेल्या लोकांना त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित ठेवले जाते.
  • आर्थिक शोषण: शूद्र आणि अतिशूद्र जातींतील लोकांचे आर्थिक शोषण केले जाते. त्यांना कमी मोबदला मिळतो आणि ते दारिद्र्यात जीवन जगतात.
  • राजकीय दुर्बलता: जातीव्यवस्थेमुळे विशिष्ट जातींना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळत नाही, ज्यामुळे त्यांचे हितसंबंध दुर्लक्षित राहतात.

बाबासाहेबांनी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी अनेक आंदोलने केली आणि लोकांना संघटित केले. त्यांनी स्वतंत्र भारत देशात सर्वांना समान संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले.

अधिक माहितीसाठी: Annihilation of Caste

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1180

Related Questions

लोकमान्य टिळकांनी कोणकोणत्या असंतुष्ट घटकांना संघटित केले, त्यामागचा उद्देश कोणता?
बच्चू कडू कोणत्या समाजाचे आहेत?
एपीजे अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी विचार काय होते? संत गाडगे महाराजांनी जनतेला कोणता उपदेश दिला?
प्रांतवाद म्हणजे काय?
भारतीय राजकारणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विभूतींविषयी चर्चा कशी कराल?
उठा उठा पुन्हा तयार व्हा असे कोणाला आवाहन करतात?
कोणत्या क्षेत्रात नक्षलवादी प्रभाव अधिक आढळतो?