
समाजकारण
0
Answer link
लोकमान्य टिळकांनी अनेक असंतुष्ट घटकांना संघटित केले, ज्यात शेतकरी, कामगार, आणि मध्यमवर्गीयांचा समावेश होता. त्यामागील प्रमुख उद्देश पुढीलप्रमाणे होते:
- शेतकऱ्यांचे संघटन:
ब्रिटिश सरकारद्वारे लादलेल्या अन्यायकारक कर आणि दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त करणे हा टिळकांचा उद्देश होता.
- कामगारांचे संघटन:
मुंबई (आताची मुंबई) आणि इतर औद्योगिक शहरांमधील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये सामाजिक व राजकीय जाणीव निर्माण करण्यासाठी टिळकांनी प्रयत्न केले.
- मध्यमवर्गीयांचे संघटन:
शिक्षित मध्यमवर्गीयांना राष्ट्रीय चळवळीत सक्रिय करणे आणि त्यांच्यामध्ये स्वदेशी, स्वराज्य आणि राष्ट्रीय शिक्षणाचे महत्त्व रुजवणे हे टिळकांचे ध्येय होते.
या संघटनांच्या माध्यमातून टिळकांनी जनतेला स्वराज्याच्या ध्येयाकडे आकर्षित केले आणि ब्रिटिश शासनाविरुद्ध एक मजबूत जनमत तयार केले.
अधिक माहितीसाठी आपण हे संदर्भ पाहू शकता:
- लोकमान्य टिळक: lokmanyatilak.com
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक: culturalindia.net
0
Answer link
भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६),
हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.
अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता या विषयावर व्याख्यान दिले. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.[६६] आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालील सिद्धांत मांडले.
वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.[६६][६७]
जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'[६८]
४ जानेवारी १९२८ रोजी द टाइम्स ऑफ इंडियाच्या इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली.[६९][७०]
आंबेडकरांनी जात या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
जात ही श्रमविभागणी वरही अवलंबून नाही आणि नैसर्गिक कल वा योग्यतेवरही अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कूळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडिलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.
भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.[७७] जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात.[७७] सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.[७८] आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.[७९] इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.[१८][८०] हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.[१८][८१]
राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते.
0
Answer link
एपीजे अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी विचार काय होते? संत गाडगे महाराजांनी जनतेला कोणता उपदेश दिला?
स्वच्छतेचा
5
Answer link
प्रांतवाद म्हणजे उपराष्ट्रवाद आणि विभागीय एकनिष्ठता होय. यात संपूर्ण देशाऐवजी विशिष्ट प्रांताविषयी किंवा राज्याविषयी आपुलकी अभिप्रेत होते. प्रांतवाद ही भारतातील राजकीय एकात्मतेची उपप्रक्रिया आहे. हा देशभरात दिसून येणारा विचार आहे.
धन्यवाद...!!
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही